भारत आाणि चीन यांच्यातील सीमावादाने सध्या पुन्हा डोके वर काढले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार भारतीय राज्यांच्या सीमा चीनला लागून आहेत. या सर्व सीमाप्रदेशाच्या काही भागांमध्ये चीन जाणून बुजून कुरापती काढतो. पंतप्रधान मोदींनी याबाबत काही ठोस भूमिका घेतल्याचे दिसत आहे. गुरूवारीच चीन आणि भारत यांच्यातील समस्या सोडवण्यासाठी या दोघांना हव्या त्या मध्यस्ताची निवड करावी असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. पण पण कोणाही मध्यस्थाची सध्या गरज नाही असे मोदींनी स्पष्ट केले आहे, हे बरे झाले.या दोन देशांमधील सीमा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली न जाता ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ म्हणून ओळखली जाते. याचाच अर्थ असा की सीमाप्रदेशात ज्या रेषेवर ज्या देशाचे सैनिक उभे आहेत तिथपर्यंत त्या देशाची सीमा आहे असे मानले जाते. यावरून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष उद्भवतो. तसेच कित्येकदा दोन्ही देशांचे सैनिक युद्धाच्या पवित्र्यात एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यांच्यात मारामारी होते. एकमेकांना ढकलणे, पाडविणे किंवा घाबरविण्याचा प्रयत्न करणे असेही प्रकार घडतात. गेल्या दोन तीन वर्षात तर हे सातत्याने चालले आहे. 2017 पासून डोकलामचा मुद्दा निर्माण झाल्यावर चीन भारत हे संबंध तणावचेच आहेत. पण त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावायची गरज निर्माण झालेली आहे. या चीनी डॅ्रगनला भिउन कितीकाळ गप्प बसणार आहोत याचे उत्तर आता मोदी सरकारला दिले पाहिजे.सैनिक म्हटले की तो रायफल किंवा तत्सम शस्त्राचा उपयोग करूनच लढणार, अशी अनेकांची समजूत असते व ती सर्वसामान्य परिस्थितीत खरीही असते. पण भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये एकमेकांवर शस्त्र नव्हे, तर शारीरिक बळाचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चीनकडून भारतीय प्रदेशात घुसखोरी होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अरुणाचल प्रदेशाच्या तावांग भागात तर आठ वर्षांपूर्वी चिनी सेनेच्या काही तुकडया महिनाभर तळ ठोकून होत्या. नंतर त्या माघारी गेल्या. हे प्रकार सतत घडताना दिसतात. म्हणूनच यातून अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच 2017 मध्ये डोकलाम या भारत आणि भूतानला जोडणाऱया प्रदेशात चीनने घुसखोरी करून भारत व भूतान यांना एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सेनेने असामान्य संयम आणि निर्धार दाखवत परिस्थिती हाताळली होती आणि तब्बल 73 दिवसांच्या या खडाखडीनंतर चिनी सैन्य माघारी गेले होते. पण हे सतत होणे योग्य नाही. त्यासाठी एकदाचा कायमचा हा प्रश्न सोडवून टाकला पाहिजे. आज चीन पाकीस्तान, नेपाळ या दरिद्री देशांना हाताशी धरून भारतात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे चीनी नकटे नाक वेळीच ठेचले नाही तर भारताला कायमचा त्रास सहन करावा लागेल.वास्तविक पाहता हा काही आजचा मुद्दा नाही. म्हणजे 1967 नंतर असे संघर्ष अनेकदा झाले पण दोन्ही सैन्यांमध्ये एकदाही एकही गोळी झाडली गेलेली नाही. भारत पाक सीमेवर सातत्याने गोळीबार होत असतो. चकमकी होत असतात. पण चीनी ड्रगन समोरासमोर लढण्याचे प्रकार करत नाही. फक्त भारतीय सैन्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न कत असतो. म्हणजेच हे युदद्ध नसून दबावतंत्र असते. असे प्रकार चिनी सेनेकडून अधिक प्रमाणात घडतात व भारत सर्वसाधारणपणे प्रतिकार करण्याचे धोरण आचरणात आणतो.आता सध्या जो संघर्ष सुरू आहे, त्याचेही स्वरूप असेच आहे पण त्याला कोरोना उद्रेकाची पार्श्वभूमी आहे. कोरोनाचा विषाणू चीनमधूनच जगात सर्वत्र पसरला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी आर्थिक आणि सामरिक महासत्तांचेही प्रचंड नुकसान या उद्रेकाने होत आहे. त्यामुळे भारतासह पाश्चात्य जगात चीनविरोधात असंतोष खदखदत आहे. या नाराजीच, जगभरातील संतापाचा भारताने फायदा उठवण्याची गरज आहे. आज भारताला जागतीक समर्थन मिळू शकते. चीनचा दुष्टपणा ठेचून काढायची हीच संधी आहे. त्यातून हा कायमचा प्रश्न सोडवता येईल. प्रत्यक्षात कोरोनाच्या प्रसारामुळे चीनवर दोन प्रकारचे आरोप केले जातात. एक, या विषाणूच्या उद्रेकाची माहिती चीनने जगापासून हेतुपुरस्सर लपवून ठेवली. त्यामुळे जग बेसावध राहिले आणि नंतर कोरोनाच्या उद्रेकाला मोठया प्रमाणात बळी पडले. दुसऱया आरोपानुसार हा विषाणू चीननेच तयार केला असून स्वतःचे वर्चस्व जगावर स्थापन करण्यासाठी या विषाणूचा प्रसारही त्यानेच केला. आज गेल्या महिनाभरातील जगातील आकडेवारी पाहिली तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये या रोगावर नियंत्रण आलेले आहे. चीनचा आकडा लाखही झालेला नाही. मृतांचा आकडा जेमतेम साडेतीन हजारांच्या आत आहे. पण मोठ्या देशांमध्ये ही कित्येक हजार आणि लाखात संख्या आहे. त्यामुळे चीनने जगावर हा रोग लादून जैविक हल्ला केला आहे याला हा पुरावाच आहे. अर्थात चीनवर होत असलेल्या दोन्ही आरोपांपैकी कोणताही आरोप खरा असला किंवा दोन्ही खरे असले तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की, चीनकडे सारे जग संशयाच्या दृष्टीने पहात आहे. म्हणूनच चीनला धडा शिकवायलाच हवा, अशी तीव्र सार्वत्रिक भावना आहे. युरोपियन महासंघाच्या काही देशांनी या कोरोना प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. चीनने अर्थातच या मागणीला कडाडून विरोध केला. पण भारताने चौकशीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे चीन बिथरला असून त्याने भारताची कुरापत काढण्यास आरंभ केला आहे. प्रारंभी त्याने नेपाळला भारताविरोधात चिथावणी दिली. त्यामुळे लडाखमधील जो भाग निर्विवादपणे भारताच्या अधिकारात आहे, तो आपल्या नकाशात दाखवून नेपाळने भारताची कळ काढली. हे त्या देशाने चीनच्या सांगण्यावरूनच केले हे निश्चित आहे. पण तेवढयानेही भागत नाही, म्हणून आता स्वतःच त्याने भारतावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. म्हणूनच कोरोना संकटाच्या काळातच हे प्रकार घडत आहेत. म्हणूनचत केव्हा ना केव्हा आपल्याला चीनशी संघर्ष करावा लागणार, हे ओळखून भारताने सीमेवर सज्जता वाढविण्यास प्रारंभ केला. सीमेपर्यंत मार्ग बांधून सैनिक वाहने शेवटच्या टोकापर्यंत जातील अशी व्यवस्था केली जात आहे. तसेच अरुणाचल प्रदेशात विमानांसाठी धावपट्टया बांधून वायुदलाची सोय पाहिली आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला आपल्या सीमांचे रक्षण सर्वात आधी करावे लागते, हे साधे तत्त्व आहे. पण मागच्या सरकारांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. आपले सामरिक धोरण नेहमीच पाकिस्तानकेंदी राहिले होते. भविष्यात चीनच्या आव्हानाचाही स्वीकार करावा लागेल या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सीमेवर सेनेच्या सोयीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे अक्षम्य आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. चीनकडून आपल्याला धोका नाही, अशा चुकीच्या समजुतीच्या आधारावरच आपली धोरण आखणी होत होती. पण मोदी सरकारने हा धोका ओळखून त्याला तोंड देण्याच्या दृष्टीने सज्जता चालविली आहे. त्यामुळे चीनच्या संतापात भर पडली असून त्याचा अहंकार दुखावला गेला आहे. त्यामुळे भारताला त्याची ‘जागा’ दाखवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. पण भारताने कौतुकास्पद निर्धार आणि संयम यांचे एकचवेळी प्रत्यंतर देत चीनचे दबावतंत्र हाताळल्याचे दिसते. सध्या चीनलाही युद्ध परवडण्यासारखे नाही. कारण कोरोना प्रकरणात त्याची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अशा स्थितीत त्याने युद्ध सुरू केल्यास जगातील सर्व देश त्याच्या विरोधात एकत्र येऊ शकतात. तसे निमित्त जगाला मिळवून देणे सध्या चीनच्या फायद्याचे नाही. मात्र काहीही असले तरी भारताने सीमेवर अखंड सावधानता बाळगत चीनचा दबाव झुगारण्याचे सध्याचेच धोरण सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे. वेळ आलीच तर जागतीक पातळीवरील चीनविरोधातील नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच या डॅ्रगनचा काटा काढता येईल.
रविवार, ३१ मे, २०२०
डॅ्रगनचा काटा काढण्यासाठी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा