सोमवार, १८ मे, २०२०

बदल स्विकारतील ते टिकतील

   तसं पाहिलं तर आजवर आलेल्या निरनिराळ्या रोगांच्या साथींमध्ये असंख्य माणसांचा मृत्यू झाला. गेल्या वीस वर्षात डेंग्यू, लेप्टो, बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू, सार्स असे अनेक रोग टप्प्याटप्प्याने जगभरात आले आणि त्यांनी अनेकांना मृत्युच्या कवेत घेतले. परंतु ‘कोविड-19’ माणसे मारण्याबरोबरच, किंबहुना जास्त ताकदीने संपूर्ण जगातील समाजव्यवस्था बदलण्यात यशस्वी होत आहे. कित्येक संसर्गजन्य आणि स्पर्शजन्य रोग यापूर्वी येऊन गेले, पण शहरेच्या शहरे, जिल्हेच्या जिल्हे आणि राज्येच्या राज्ये पाच पाच, सात-सात आठवडे बंद ठेवण्याची वेळ मनुष्य जातीवर आली नव्हती. ‘कोविड-19’ ने ही वेळ आणली. या बंदमुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली, कोटयवधी लोक बेरोजगार झाले. हळूहळू उद्योगधंदे सुरू होऊ लागले तरी गेलेला रोजगार सहजी परत मिळणार नाही. कारखाने, दुकाने यात काम करणाऱया सर्व माणसांना पूर्वीप्रमाणे एकाच वेळी कामावर जाता येणार नाही. त्यामुळे या रोगाने केवळ माणसे मारली नाहीत तर देशच्या देश उद्धवस्त केेले. अर्थव्यवस्थेला सुरूंग लावला. अनेकांना देशोधडीला लावले. त्यामुळे हा शारीरीक आणि सामाजीक असा रोग राहिला आहे.शहरी भागात आज या बाजूची दुकाने, उद्या त्या बाजूची दुकाने उघडी ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे. सम-विषम तारखांनुसार आलटून-पालटून रस्त्याच्या एकेका बाजूला पार्किंग करण्याची ‘पी-1’, ‘पी-2’ पद्धत असते तशी. पण गर्दी होत असली तरी जसजसा संसर्गाचा फटका बसू लागेल तसतसे हेच लोक स्वतःहून घरात बसू लागतील. या चमत्कारिक परिस्थितीमुळे संपूर्ण जगातील प्रचलित उद्योगप्रणाली आणि अर्थव्यवस्थेची चाके निरनिराळ्या दिशेने वळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका वेगळ्या बदलाची दिशा सुरु झालेली आहे. यालाच कदाचित कोरोना क्रांती म्हणावे लागेल. क्रांती म्हणजे मोठ्या प्रमाणावर बदल होणे. अचानक आणि एकाएकी करावा लागणे. तसा हा कोरोना क्रांतीचा बदल आहे.     1990नंतरचा काळ जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे टप्प्यांचा होता. ‘कोविड-19’ चा उद्भव चीनमधून झाल्याची ठाम खात्री वाटत असल्यामुळे जगभरातील उद्योगक्षेत्रात चीनमध्ये गुंतवणूक करणे आणि तिथे उद्योग चालविणे याबद्दल प्रतिकुल भावना निर्माण झाली. आज प्रत्येक देशातील जनतेतील मोठी संख्या रोजगार गमावू लागल्यामुळे ‘विदेशी गुंतवणुकीला खुले दरवाजे, ‘आऊटसोर्सिंग’ असल्या प्रकारांकडे पाठ फिरवणे भार पडत आहे. परदेशात कारखाने उभारणे ही गेल्या चार दशकातील महत्त्वाची प्रक्रिया होती. ती प्रथा बदलताना दिसत आहे. ‘कोविड-19’ मुळे लोकांची क्रयशक्ती एकदम खाली आली. खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आणि खरेदी करू शकणाऱयांची संख्याही कमी झाली. जागतिक मंदीच्या काळात क्षमता कमी होते, पण हा फार मोठा मार बसल्यामुळेच सारे जमींपर अशी अवस्था झाली आहे. ‘कोविड-19’ ने ही गती अनेक पटींनी वाढवली.  आज भारतात काही रुग्णालयांमध्ये रुग्णांपर्यंत औषधे, भोजन, चहा नेण्यासाठी यंत्रमानव (रोबो) किंवा यांत्रिक ढकलगाडी (ऑटोकार्ट) यांचा वापर सुरू झाल्याच्या बातम्या आपण वाचत़ो, ऐकत़ो यामागील उद्देश रुग्णांशी येणारा थेट संपर्क टाळणे हाच आह़े  नाहीतर इतकी माणसं, प्रचंड लोकसंख्य असताना यंत्रमानवांचा वापर करण्याची गरज काय पडली असती? हाच प्रकार अन्य कारखान्यांबाबतही आहे. म्हणजे जेव्हा कारखान्यात उत्पादन केले जाते, तेव्हा अनेक कामगारांचा स्पर्श वस्तूंना होत असत़ो त्या स्पर्शातून होणाऱया विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त स्वयंचलित यंत्रसामग्री ही संकल्पना अस्तित्वात येण्याची शक्यता आता बळावली आहे. त्यामुळे हे कोरोना किंवा कोव्हीड 19 मुळे बदललेले जग माणसाला बसवणारे आहे.अनेक ठिकाणी  यंत्रे माणसाप्रमाणे कामे करतात़ ही सगळी मंडळी सर्वत्रच मनुष्यबळाची जागा घेतील़ आगामी काळात यंत्रमानव बौद्धिक आणि धोरणात्मक कामे करण्याची शक्यता जगातील विचारवंतांना वाटू लागली आह़े म्हणजे सगळं जर यांत्रिक झालं तर माणसाने फक्त घरात बसायचे. फक्त मनोरंजन करायचे, प्रजोत्पादन करायचे, थोडक्यात जनावरांप्रमाणेच गोठ्यात बांधल्याप्रमाणे रहायचे का असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. शाळा महाविद्यालये चालू वर्षात सुरू होण्याची शक्यता आता मावळली आह़े विद्यापीठे, महाविद्यालये यातून वरचेवर आयोजित होणारी चर्चासत्रे, परिसंवाद, नाना तऱहेची शिबिरे या सर्वांवर गदा आली आह़े अर्थात नाही झाली अशी चर्चासत्रे तरी ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’ च्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतच राहतील, परंतु महाविद्यालयात या चर्चासत्रांचा आणि परिसंवादांना उपस्थित राहणाऱया प्रतिनिधींचा चहा-अल्पोपहार, भोजन या निमित्ताने स्वयंपाकी मंडळींना केटरर म्हणून पाहिजे तर लाखोंचे काम मिळत़े औद्योगिक, व्यापारी, वैद्यकीय, वकिली अशा सर्वच क्षेत्रात दररोज जगभर शेकडो चर्चा सत्रे, परिसंवाद होत असतात आणि त्यासाठी उपस्थित असणाऱयांचा प्रवास, निवास आणि भोजन यातून प्रचंड आर्थिक उलाढाल होत़े एकत्रच यायचे नसल्याने अनेक सेवा क्षेत्रातले रोजगारही धोक्यता आहेत. या सेवा पुरवणाऱयांचा रोजगार जगात कायमस्वरूपी धोक्यात आला आह़ेम्हणजे कोव्हीडचे मानवी शरीरावरच्या परिणामापेक्षा हे परिणाम फारच भयंकर आहेत.कोविड 19 मुळे सुरक्षेचा विषयही गंभीर बनला आह़े कंपनीच्या फाटकातून, इमारतीच्या प्रवेशद्वारातून, कचेरीच्या दालनाच्या दरवाजातून आत शिरताना कपाळावर फोकस मारून ताप तपासणाऱया ‘गन’ सर्वत्र दिसू लागल्या आहेत़  या रोगाचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याच्या भीतीने मानवी सुरक्षा रक्षकांची जागा यंत्रे घेण्याची शक्यता निर्माण झाली आह़े आज संसर्गाच्या भीतीने बाहेरच्यांना रोखण्यासाठी इमारतीबाहेर बसलेले रखवालदार नोकरी टिकून राहिल्याच्या आनंदात असले तरी सुरक्षेची बदलती संकल्पना त्यांचे भवितव्य धोक्यात आणू शकत़े या सर्व गोष्टींचा परिणाम जगभर बेरोजगारांची संख्या वाढण्यात आणि परिणामी गरीबांचे प्रमाण वाढण्यात होईल़ चोऱयामाऱया वाढतील़  कारण यामुळे अनेकांचा रोजगार हिरावून घेतला जाणार आहे. जगभर गुन्हेगारील वाढवण्यास कारणीभूत ठरणारा हा रोग आहे. त्यामुळे समाजमनावर परिणाम करणाराही हा रोग  आहे  हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संरक्षण यंत्रणा, पोलीस यांच्यावर ताण पडणार आहे. त्या क्षेत्रात मोठी श्रमशक्तीची गरज भासेल असे दिसते. त्यामुळे गुन्हेगारी जगतावर नजर ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी होतील़  बसचा आकार मोठा आणि आसनक्षमता कमी अशी अवस्था असेल. यातून मुंबईची कल्पनाच करणे शक्य नाही. कारण मुंबईत 40 सीटच्या बसमध्ये 100 माणसे लटकत असतात. बेस्टचा कंडक्टर कधीही याला विरोध करत नाही. तीथे जेमतेम 18 ते 20 लोकांना न्यावे लागेल म्हणजे नेमके चित्र कसे असेल? हे फार विचित्र, हास्यास्पद आणि भयानक परिणाम आगामी काळात होणार आहेत, त्याचा विचार करावा लागेल. म्हणूनच हे लॉकडाउन नंतरचे नवे जग, बदललेले जग कसे असेल याचा विचार केला पाहिजे. थोडक्यात काय तर रोजगाराचे स्वरूप बदलेल, जे हा बदल  स्विकारतील ते टिकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: