कोरोना आणि ओमिक्रॉनच्या तिसºया लाटेत राजकीय नेते आणि डॉक्टर मंडळींना या व्हायरसने लक्ष्य केलेले दिसते. त्याचप्रमाणे राजकारणी व्यक्तींची घरे हा व्हायरस सध्या काबीज करताना दिसत आहे. गेले तीन दिवस सातत्याने विविध पक्षांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री या व्हायरसने बाधित झाल्याचे दिसते आहे. या सर्व नेत्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे कोंडाळे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येऊन या व्हायरसचा फैलाव करण्यात तिसºया लाटेत राजकीय नेत्यांचा मोठा हात आहे, असेच म्हणावे लागेल. साहजिकच आगामी काळातील विविध निवडणुकांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नेते प्रचाराऐवजी व्हायरसचा प्रसार करतात का?, अशी शंका निर्माण होते आहे.
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये राजकीय मंडळींना देखील कोरोनाची लागण झाल्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता, त्यात त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भारती पवार यांनी सलग दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार हे दोघेही सलग दोन दिवस मुंबई दौºयावर होते. यादरम्यानच खासदार गोडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारती पवार यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सगळे नेते करतात त्याप्रमाणे याही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे, पण गेल्या काही दिवसांत किती नेत्यांची नावे कोरोनाची लागण झाली म्हणून समोर आली हे पाहिले, तर भविष्यातील निवडणुकीत हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते फिरत असतील, तर ही लाट निर्माण होणार यात शंकाच नाही.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, शिवसेनेचे मंत्री आणि महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे तसेच विविध पक्षांचे खासदारही बाधित झाले आहेत. संजय राऊत यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. राज ठाकरे यांच्या घराचा दरवाचा या व्हायरसने ठोठावला आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटीही सध्या या विळख्यात सापडत आहेत. अभिनेता अंकुश चौधरी, गायक सोनू निगम असे अनेक महत्त्वाचे लोक कोरोनाने ग्रासले जात आहेत. याशिवाय अडीचशेपेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आलेले आहे. याशिवाय मुंबईतील ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.
हे सगळे लोक, नेते, अभिनेते, डॉक्टर, पोलीस हे जनसंपर्कात असतात. जनतेच्या संपर्कात असतात. नेत्यांच्या बैठका, दौरे, कार्यकर्त्यांचे मेळावे यातून प्रचंड जनसंपर्क होत असतो. तो जनसंपर्क न राहता जनसंसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात नेतेमंडळी कोरोनाची तिसरी लाट पोहोचवताना दिसत आहेत हे नक्की.
हे सगळे लोक सुजाण आणि समाजाचे महत्त्वाचे बिंदू असताना त्यांना अशाप्रकारे झालेली लागण हे कुठेतरी गाफील राहिल्याचे द्योतक म्हणावे लागेल. कोरोनाचा संसर्ग हा गाफीलपणातून होतो आहे, असे गृहित धरले तर या बहुतेक नेते, अभिनेते यांनी मास्क वापरला नाही का?, सोशल डिस्टन्स पाळले नाही का?, स्वच्छतेची खबरदारी घेतली नाही का?, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे नेत्यांमुळे त्यांच्या जवळच्या त्यांच्या सान्निध्यात असणाºयांना लागण आणि त्यांच्यामुळे अन्य सामान्य कार्यकर्त्यांना लागण ही साखळी वाढत जाणार आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता सर्वच नेत्यांचे, सर्वच दौरे, भेटीगाठी रद्द करण्याची गरज आहे. निवडणुकांच्या तोंडावर तयारीसाठी प्रचाराला बडलेले हेच नेते आता प्रचाराऐवजी रोगाचा प्रसार करणार का अशी शंका यातून निर्माण होते. म्हणूनच यावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे.
कोणताही नेता, आमदार, खासदार, मंत्री दौºयावर आल्यावर शेकडो, हजारो कार्यकर्त्यांना ते भेटत असतात. त्या प्रत्येकाशी या नेत्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्या हजारो लोकांपर्यंत हा कोरोना पोहोचलेला असतो. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्याचे काँटॅक्ट ट्रेस्टिंग करणे अत्यंत अवघड आहे. कोरोना हा काही पक्ष आण धर्म पाहून येत नाही. त्याच्याकडे सर्वांबाबत समानता आहे. आजवर जेवढ्या राजकीय लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यात सर्वच पक्षीय आमदार, मंत्री यांना त्याने प्रसाद दिलेला आहे. त्या प्रसादाचे वितरण हे नेते पुन्हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे हे प्रकार सातत्याने होताना दिसतात. एकदा जर आपण नियमांचे पालन करायचे आहे हा आदेश काढला आहे, तर त्यात नेतेमंडळींना सवलत का दिली जात आहे? आज सुपरस्प्रेडरमध्ये हे राजकीय नेते, अभिनेते, पोलीस आणि डॉक्टर ही महत्त्वाची मंडळी ठरत आहेत. डॉक्टरच जग ग्रासले गेले, तर जनतेचे होणार काय? काही कारणाने डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली, तर तो डॉक्टर उपायांऐवजी अपायकारकच ठरेल, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा