कंगना राणावत सोमवारी पुन्हा मनालीला गेली आणि पुन्हा तिने ट्टिटरवरून मुक्ताफळे उधळायला सुरुवात केली. काही गरज आहे का? पण हर कुत्ता अपनी गली में शेर होता है, या उक्तीप्रमाणे हिमाचलप्रदेशात जाउन तिने बोलायला, आरोप करायला सुरूवात केली. वृत्तवाहिन्यांना तेवढाच उद्योग असल्याप्रमाणे मंगळवारी सकाळपासूनच कंगनाचे पुराण त्यांनी सुरू केले. ही अतिशय हिडीस आणि संतापजनक बाब आहे. कोरोनामुळे चित्रपटव्यवसाय बंद झाल्यामुळे तीचे हे चर्चेत राहण्याचे उद्योग चालले आहेत का?
मुख्य विषय सोडून भलत्याच विषयांवर काथ्याकूट करण्यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही. संपूर्ण जग कोरोनासारख्या महाभयंकर संकटात सापडले असून अजूनही त्यावर संपूर्ण नियंत्रण आणू शकेल असे औषध किंवा लस मिळत नसल्याने या संकटाची तीव्रता वाढत चालली आहे. मंगळवारी सकाळीच कुणीतरी वक्तव्य केले की 2024 पर्यंत ही लस येण्याची शक्यत नाही. या संकटामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोट्यवधी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी निर्बंध उठवून व्यवहार सुरळीत करण्याचे धोरण सरकारला स्वीकारावे लागले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून आरोग्यव्यवस्था कोलमडायला लागली आहे. अशी परिस्थिती असताना सगळी कामे बाजूला ठेवून कंगना राणावत कसला वाद घालत बसते? अगं बाई तुला खरोखरच देशाची चिंता आहे तर मग सोनू सूदप्रमाणे काहीतरी लोकांसाठी कर. मुंबईने तुला आसरा दिला आहे, त्या मुंबईशी गद्दारी करून तुला काय मिळणार आहे? का हा तुझा नवा रोल आहे? कुणी पैसे चारून तुझ्या तोंडून ही स्क्रीफ्ट तर वदवून घेत नाही ना? म्हणजे पैशासाठी काहीही करायला तू तयार होणार का? देशात काय चालले आहे आणि तू कसला भलता वाद घालत बसत आहेस?
आज काय देशात परिस्थिती आहे? आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पुण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने, तर नाशिकमध्ये वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचे संकट, ग्रामीण भागात त्याची वाढणारी व्याप्ती, अपुर्या आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, शासकीय यंत्रणांमधील समनव्याचा अभाव, सरकारची चुकीची धोरणं, त्यात आवश्यक असणारे बदल या गोष्टींवर सगळा फोकस आवश्यक आहे. पण एक अभिनेत्री म्हणून सामाजिक बांधिलकी सांभाळायची सोडून नसते वाद कसले घालत बसती आहे ही बया? अगोदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण व आता कंगना रणौत नावाच्या भंपक अभिनेत्रीच्या वादग्रस्त विधानावर चर्चा करण्यात सध्या सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वाहिन्य मश्गुल आहेत. याशिवाय दुसार देशात कोणताही प्रश्न नाही. शेतकरी आत्महत्या, सामान्यांच्या आत्महत्या या बाईला, वाहिनीला दिसत नाहीत. पण त्या सुशांतसिंगच्या आत्महत्येचे अवडंबर का इतके माजवले आहे? कंगना रणौतने मुंबई पोलीस,राज्यातील आघाडी सरकार, या सरकारचे नेतृत्व करणारी शिवसेना यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात हल्ले करून वादाला तोंड फोडले. आता पुन्हा आपल्या गल्लीत जाउन जोरात भुंकायला सुरूवात केली, हे चांगले नाही. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेतेही तिच्या पाठीशी नको इतके महत्व देउन उभे आहेत. कामाचं बघा, जनहिताचं बघा. एक ड्रग्ज घेणारा, त्या रॅकेडमध्ये असलेल्या अभिनेत्याला किती महत्व द्यायचे? पण सरकारवर टीका करण्यासाठी कोणताही विषय हाती घ्यायचा या मानसिकतेतून विरोधक नको त्या विषयावर चर्चा करत बसले आहेत, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे शल्य अजूनही डाचत असलेल्या भाजपच्या काही नेत्यांनी कंगनाची पाठराखण केली. तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी हा विषय आणखी पेटवला. कंगनाची मुक्ताफळं ही केवळ बाष्कळ बडबड नाही, तर त्यामागे राज्यातील आघाडी सरकारला बदनाम करण्याची व शिवसेनेला उचकवण्याची भाजपचीच चाल आहे असा आरोप आता सर्व स्थरातून होत असताना तो विषय किती ताणायचा हे समजले पाहिजे. वाहिन्यांनी त्या कंगनाचे अवास्तव महत्व वाढवणे थांबवले पाहिजे. केंद्र सरकारने कंगनाला तातडीने ’वाय’ दर्जाची सुरक्षा देऊन एकप्रकारे या आरोपांना पुष्टीच दिली आहे. त्यामुळे सरळ सरळ यात राजकारण आहे हे समजत असतानाही त्या दोन्ही पक्षांना आपल्या चाली खेळू देत पण जनहितासाठी आपण आता वृत्तांकन केले पाहिजे असे वाहिन्यांना का वाटत नाही? आता कंगना राणावत आणि वाद यांचं नातं नवीन नाही. सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहण्याच्या सवयीमुळे बॉलिवूडमधील बहुतांश मंडळी कंगनापासून दोन हात दूर राहणे पसंत करतात. सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा हा बळी असल्याचा आरोप केला. अनेकांची नावं घेत प्रसारमाध्यमांना खमंग बातम्या देण्याचा रतीबच तीने लावला. त्यामुळे वाहिन्यांना ती न्यूज सोर्स वाटू लागली. टीआरपी वाढवण्यासाठी काहीतरी आपल्याला सापडले म्हणून तिला अवास्तव महत्व दिले गेले. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या प्रकरणाकडून ड्रग प्रकरणाकडे वळले. मुख्य विषयाला बगल देण्याचे त्यातून राजकारण सुरू झाले. हे अत्यंत घाणेरडे प्रकार चालले आहेत. म्हणून ते तातडीने थांबवले पाहिजेत. जनहिताचे काहीतरी पाहिले पाहिजे. कारण यामुळे सरकार आपले अपयश लपवण्यासाठी आणि या बाईला सध्या काही काम नसल्यामुळे वाद वाढवत आहेत असा संदेश यातून जात आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
आज काय देशात परिस्थिती आहे? आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पुण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने, तर नाशिकमध्ये वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचे संकट, ग्रामीण भागात त्याची वाढणारी व्याप्ती, अपुर्या आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, शासकीय यंत्रणांमधील समनव्याचा अभाव, सरकारची चुकीची धोरणं, त्यात आवश्यक असणारे बदल या गोष्टींवर सगळा फोकस आवश्यक आहे. पण एक अभिनेत्री म्हणून सामाजिक बांधिलकी सांभाळायची सोडून नसते वाद कसले घालत बसती आहे ही बया? अगोदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण व आता कंगना रणौत नावाच्या भंपक अभिनेत्रीच्या वादग्रस्त विधानावर चर्चा करण्यात सध्या सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वाहिन्य मश्गुल आहेत. याशिवाय दुसार देशात कोणताही प्रश्न नाही. शेतकरी आत्महत्या, सामान्यांच्या आत्महत्या या बाईला, वाहिनीला दिसत नाहीत. पण त्या सुशांतसिंगच्या आत्महत्येचे अवडंबर का इतके माजवले आहे? कंगना रणौतने मुंबई पोलीस,राज्यातील आघाडी सरकार, या सरकारचे नेतृत्व करणारी शिवसेना यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात हल्ले करून वादाला तोंड फोडले. आता पुन्हा आपल्या गल्लीत जाउन जोरात भुंकायला सुरूवात केली, हे चांगले नाही. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेतेही तिच्या पाठीशी नको इतके महत्व देउन उभे आहेत. कामाचं बघा, जनहिताचं बघा. एक ड्रग्ज घेणारा, त्या रॅकेडमध्ये असलेल्या अभिनेत्याला किती महत्व द्यायचे? पण सरकारवर टीका करण्यासाठी कोणताही विषय हाती घ्यायचा या मानसिकतेतून विरोधक नको त्या विषयावर चर्चा करत बसले आहेत, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे शल्य अजूनही डाचत असलेल्या भाजपच्या काही नेत्यांनी कंगनाची पाठराखण केली. तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी हा विषय आणखी पेटवला. कंगनाची मुक्ताफळं ही केवळ बाष्कळ बडबड नाही, तर त्यामागे राज्यातील आघाडी सरकारला बदनाम करण्याची व शिवसेनेला उचकवण्याची भाजपचीच चाल आहे असा आरोप आता सर्व स्थरातून होत असताना तो विषय किती ताणायचा हे समजले पाहिजे. वाहिन्यांनी त्या कंगनाचे अवास्तव महत्व वाढवणे थांबवले पाहिजे. केंद्र सरकारने कंगनाला तातडीने ’वाय’ दर्जाची सुरक्षा देऊन एकप्रकारे या आरोपांना पुष्टीच दिली आहे. त्यामुळे सरळ सरळ यात राजकारण आहे हे समजत असतानाही त्या दोन्ही पक्षांना आपल्या चाली खेळू देत पण जनहितासाठी आपण आता वृत्तांकन केले पाहिजे असे वाहिन्यांना का वाटत नाही? आता कंगना राणावत आणि वाद यांचं नातं नवीन नाही. सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहण्याच्या सवयीमुळे बॉलिवूडमधील बहुतांश मंडळी कंगनापासून दोन हात दूर राहणे पसंत करतात. सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा हा बळी असल्याचा आरोप केला. अनेकांची नावं घेत प्रसारमाध्यमांना खमंग बातम्या देण्याचा रतीबच तीने लावला. त्यामुळे वाहिन्यांना ती न्यूज सोर्स वाटू लागली. टीआरपी वाढवण्यासाठी काहीतरी आपल्याला सापडले म्हणून तिला अवास्तव महत्व दिले गेले. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या प्रकरणाकडून ड्रग प्रकरणाकडे वळले. मुख्य विषयाला बगल देण्याचे त्यातून राजकारण सुरू झाले. हे अत्यंत घाणेरडे प्रकार चालले आहेत. म्हणून ते तातडीने थांबवले पाहिजेत. जनहिताचे काहीतरी पाहिले पाहिजे. कारण यामुळे सरकार आपले अपयश लपवण्यासाठी आणि या बाईला सध्या काही काम नसल्यामुळे वाद वाढवत आहेत असा संदेश यातून जात आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा