कंगना राणावतच्या निमित्ताने महाराष्ट्रात येउन इथल्या लोकांना कमी लेखणारी परप्रांतीय प्रवृत्ती समोर आलेली आहे. मुंबईत अतिरीक्त थारा या परप्रांतियांना दिल्यामुळे मुंबईतील मराठी माणूस बेरोजगार झाला आहे, त्याचा रोजगार हिरावून घेतला आहेच. पण आता लॉकडाउनच्या निमित्ताने परप्रांतात गेलेल्या या लोकांना पुन्हा थारा न देता त्यांच्या रोजगार मराठी माणसांना कसा मिळेल यासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. एकट्या कंगनाला विमानतळावर अडवून उपयोग नाही तर रेल्वेतून येणारे लोंढे थांबवण्याची ताकद शिवसेनेने दाखवली पाहिजे.
लॉकडाऊनमुळे अनेक लहानमोठा धंदा करणार्या गोरगरीब लोकांना, हातावर पोट भरणार्या कामकरी वर्गाला आहे तो बाडबिस्तरा गुंडाळून आपल्या मुलुखात निघुन जावे लागले. पण कालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर हेच लोक परत येउ लागले. आपल्याकडे असंघटीत क्षेत्रात काम करणार्या लोकांची संख्या मोठी आहे. मिळेल ते काम आणि जमेल तो धंदा करून आपल्या रोजीरोटीची व्यवस्था करणारे लाखो लोक आपल्या शहरात जगत असतात. ही प्रवृत्ती आता मराठी माणसाने जपली पाहिजे. मग तो रस्त्यावरील भेळपुरीवाला असो वा कुल्फीवाला की बांधकाम क्षेत्रात काम करणारे कुशल-अकुशल मजुर असो की पदपथावर कपडे, चपला-बूट, जरुरी वस्तू विकणारे विक्रेते. लघु व्यवसायात काम करणारे कामगार असो वा कच्च्या मालाचा पुरवठा करणारे छोटे पुरवठादार. लाखो लोक कोरोनामुळे आपल्या धंद्यातील बस्तान सोडून, मिळेल त्या मार्गाने स्वगावी निघुन गेले आहेत आणि आता ते परततील की नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे. काही परत येतही आहेत. पण ते लोक जे व्यवसाय नोकरी धंदा करत होते ते आम्ही शिकले पाहिजे. आमची मक्तेदारी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शिवसेना पुढे आली तर खर्या अर्थाने मराठी माणसावर त्यांचे उपकार होतील.
राज्यातील एकूण रोजगारापैकी सुमारे सत्तर टक्के रोजगार हा मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यात केंदित आहे. हा भाग कोरोनाच्या प्रभावाखाली असल्याने श्रमिकांच्या हाताला काम दुरापास्त झाले होते आणि चूल पेटण्याची शक्यता मावळली होती. पण त्याचवेळी परप्रांतिय कामगार त्यांच्या राज्यात गेल्याने निर्माण झालेल्या नवीन संधी स्वीकारण्याचा आणि पुन्हा शहरात परतण्याचा आशावादही राज्यातील कामगारांमध्ये निर्माण झाला होता. पण आता ते लोक परत येत आहेत. इथला रोजगार घ्यायचा आणि त्यांची राज्ये भरायची, महाराष्ट्रावर टीका करत सुटायचे. यासाठी त्यांचा रोजगार काढून घेण्याची हीच ती वेळ आहे शिवसेनेने दाखवून दिले पाहिजे. परप्रांतियांनी हिरावलेली ती कामे कष्टाची होती किंवा अंगमेहनतीची. ती सेवेची होती की पुरवठयाची. ती नाशवंत माल विक्रीची होती की फक्त जरुरी वस्तूंची. हा मुद्दा गौण आहे. पण वेळ सत्कारणी लावून जिथे दोन पैसे कमावण्याची जी संधी होती तिथे स्थलांतरीत लोकांनी कशाचीही पर्वा न करता आपला झेंडा रोवला होता. हाच झेंडा आता उखडून फेकायची हीच ती वेळ आहे.
महाराष्ट्रात अमराठी लोकांनी किती व्यवसाय आणि धंद्यांवर कब्जा केला आहे याचा आपण कधी विचार केला आहे काय ? राजस्थानी लोक किराणा मालाचा, मिठाईचा धंदा करतात. त्यांचेच काही भाऊबंध फर्निचर किंवा सुतारकाम, भिंतींना प्लास्टर करणे अथवा छतांना विविध नक्षीकाम करणे यात हुशार असतात. या कामांव्दारे ते बांधकाम आणि टिंबरकाम क्षेत्रात स्वतःचे वैशिष्टय जपतात. गुजराती लोक समभागांमध्ये पैसा गुंतवून शेअर मार्केटवर लक्ष ठेवतात. किराणाभुसार माल, उच्च प्रतीचे लाकूड, कपडेलत्ता, ज्वेलरी, फॅशन साहित्य पुरवठा या क्षेत्रात गुजराथी, जैन, माहेश्वरी समाजाने सगळी सूत्रे स्वतःच्या हातात ठेवली आहेत. शीख बांधवांनी वाहन आणि वाहनांचे सुटे भाग आणि मालवाहतुकीचा व्यवसाय आणि ढाबे चालवण्यात प्राविण्य मिळवले आहे. पंजाबी आणि दिल्लीकडील खाद्यपदार्थांची चव त्यांनी राज्याला अंगवळणी पाडली आहे. उडिपी लोकांनी खादयपदार्थांच्या हॉटेलांची श्रुंखला उभारली आहे. दाक्षिणात्य पदार्थांची चव त्यांनी सगळ्यांना चाखायला दिली आहे. उत्तर पूर्वेकडील राज्यातील म्हणजे मणिपूर, मिझोरम येथील लोकांनी चायनीज पदार्थांच्या गल्लीबोळातील ठेल्यांवर कब्जा जमवला आहे. इथे आम्ही कुठे आहोत? फक्त खरेदी करणारे ग्राहक?
बिहारी, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा या राज्यातील मजूरांनी बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम अंगिकारले आहे. बिहारी मजूर मिळेल आणि पडेल ते मोलमजुरीचे काम करण्यास तयार असतात. सुरक्षा रक्षक म्हणुन ते चौदा तास कमी पगारावर काम करतात. उत्तर प्रदेश आणि बिहारी भय्या गाईम्हशी पाळून दुधाचा धंदा करतात. विडी, सिगरेट आणि पानाची गादी चालवतात. रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यात याच लोकांची मक्तेदारी आहे. बंगाली आणि ओरिसाचे मजूर हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. नेपाळी बांधव वॉचमनचे काम करतात. केरळी लोक रस्त्याच्या कडेला नारळपाणी विकतात. तसेच वाहनांच्या टायरचे पंक्चर काढून देण्याचे आणि वाहन दुरुस्तीचे काम करतात. सिंधी, पारशी, इराणी लोकही धंदा व्यवसायात स्वतःला आजमावतात. आम्ही आहोत कुठे? मराठी तरुण मुले ज्या हिरीरिने दहीहंडीची, गणेशोत्सवाची, नवरात्रीची तयारी करतात तेवढयाच उत्साहाने ते छोटा मोठा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तनमन झोकून देऊन काम का करत नाहीत? धार्मिक कार्यात सहभागी होणे गैर नाही. पण पोटापाण्याचा कोणताही उदयोग लाज न बाळगता उभारण्याचे कर्तुत्व मराठी माणसं कधी दाखवणार? परप्रांतियांच्या नावाने खडे फोडण्यात आपण किती काळ वाया घालवणार? परप्रांतियांकडून आपण काहीच शिकणार नाही का? हीच ती संधी मानून शिवसेना काही आता परिवर्तन घडवेल का?
लॉकडाऊनमुळे अनेक लहानमोठा धंदा करणार्या गोरगरीब लोकांना, हातावर पोट भरणार्या कामकरी वर्गाला आहे तो बाडबिस्तरा गुंडाळून आपल्या मुलुखात निघुन जावे लागले. पण कालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर हेच लोक परत येउ लागले. आपल्याकडे असंघटीत क्षेत्रात काम करणार्या लोकांची संख्या मोठी आहे. मिळेल ते काम आणि जमेल तो धंदा करून आपल्या रोजीरोटीची व्यवस्था करणारे लाखो लोक आपल्या शहरात जगत असतात. ही प्रवृत्ती आता मराठी माणसाने जपली पाहिजे. मग तो रस्त्यावरील भेळपुरीवाला असो वा कुल्फीवाला की बांधकाम क्षेत्रात काम करणारे कुशल-अकुशल मजुर असो की पदपथावर कपडे, चपला-बूट, जरुरी वस्तू विकणारे विक्रेते. लघु व्यवसायात काम करणारे कामगार असो वा कच्च्या मालाचा पुरवठा करणारे छोटे पुरवठादार. लाखो लोक कोरोनामुळे आपल्या धंद्यातील बस्तान सोडून, मिळेल त्या मार्गाने स्वगावी निघुन गेले आहेत आणि आता ते परततील की नाही हे एक प्रश्नचिन्ह आहे. काही परत येतही आहेत. पण ते लोक जे व्यवसाय नोकरी धंदा करत होते ते आम्ही शिकले पाहिजे. आमची मक्तेदारी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शिवसेना पुढे आली तर खर्या अर्थाने मराठी माणसावर त्यांचे उपकार होतील.
राज्यातील एकूण रोजगारापैकी सुमारे सत्तर टक्के रोजगार हा मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यात केंदित आहे. हा भाग कोरोनाच्या प्रभावाखाली असल्याने श्रमिकांच्या हाताला काम दुरापास्त झाले होते आणि चूल पेटण्याची शक्यता मावळली होती. पण त्याचवेळी परप्रांतिय कामगार त्यांच्या राज्यात गेल्याने निर्माण झालेल्या नवीन संधी स्वीकारण्याचा आणि पुन्हा शहरात परतण्याचा आशावादही राज्यातील कामगारांमध्ये निर्माण झाला होता. पण आता ते लोक परत येत आहेत. इथला रोजगार घ्यायचा आणि त्यांची राज्ये भरायची, महाराष्ट्रावर टीका करत सुटायचे. यासाठी त्यांचा रोजगार काढून घेण्याची हीच ती वेळ आहे शिवसेनेने दाखवून दिले पाहिजे. परप्रांतियांनी हिरावलेली ती कामे कष्टाची होती किंवा अंगमेहनतीची. ती सेवेची होती की पुरवठयाची. ती नाशवंत माल विक्रीची होती की फक्त जरुरी वस्तूंची. हा मुद्दा गौण आहे. पण वेळ सत्कारणी लावून जिथे दोन पैसे कमावण्याची जी संधी होती तिथे स्थलांतरीत लोकांनी कशाचीही पर्वा न करता आपला झेंडा रोवला होता. हाच झेंडा आता उखडून फेकायची हीच ती वेळ आहे.
महाराष्ट्रात अमराठी लोकांनी किती व्यवसाय आणि धंद्यांवर कब्जा केला आहे याचा आपण कधी विचार केला आहे काय ? राजस्थानी लोक किराणा मालाचा, मिठाईचा धंदा करतात. त्यांचेच काही भाऊबंध फर्निचर किंवा सुतारकाम, भिंतींना प्लास्टर करणे अथवा छतांना विविध नक्षीकाम करणे यात हुशार असतात. या कामांव्दारे ते बांधकाम आणि टिंबरकाम क्षेत्रात स्वतःचे वैशिष्टय जपतात. गुजराती लोक समभागांमध्ये पैसा गुंतवून शेअर मार्केटवर लक्ष ठेवतात. किराणाभुसार माल, उच्च प्रतीचे लाकूड, कपडेलत्ता, ज्वेलरी, फॅशन साहित्य पुरवठा या क्षेत्रात गुजराथी, जैन, माहेश्वरी समाजाने सगळी सूत्रे स्वतःच्या हातात ठेवली आहेत. शीख बांधवांनी वाहन आणि वाहनांचे सुटे भाग आणि मालवाहतुकीचा व्यवसाय आणि ढाबे चालवण्यात प्राविण्य मिळवले आहे. पंजाबी आणि दिल्लीकडील खाद्यपदार्थांची चव त्यांनी राज्याला अंगवळणी पाडली आहे. उडिपी लोकांनी खादयपदार्थांच्या हॉटेलांची श्रुंखला उभारली आहे. दाक्षिणात्य पदार्थांची चव त्यांनी सगळ्यांना चाखायला दिली आहे. उत्तर पूर्वेकडील राज्यातील म्हणजे मणिपूर, मिझोरम येथील लोकांनी चायनीज पदार्थांच्या गल्लीबोळातील ठेल्यांवर कब्जा जमवला आहे. इथे आम्ही कुठे आहोत? फक्त खरेदी करणारे ग्राहक?
बिहारी, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा या राज्यातील मजूरांनी बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम अंगिकारले आहे. बिहारी मजूर मिळेल आणि पडेल ते मोलमजुरीचे काम करण्यास तयार असतात. सुरक्षा रक्षक म्हणुन ते चौदा तास कमी पगारावर काम करतात. उत्तर प्रदेश आणि बिहारी भय्या गाईम्हशी पाळून दुधाचा धंदा करतात. विडी, सिगरेट आणि पानाची गादी चालवतात. रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यात याच लोकांची मक्तेदारी आहे. बंगाली आणि ओरिसाचे मजूर हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. नेपाळी बांधव वॉचमनचे काम करतात. केरळी लोक रस्त्याच्या कडेला नारळपाणी विकतात. तसेच वाहनांच्या टायरचे पंक्चर काढून देण्याचे आणि वाहन दुरुस्तीचे काम करतात. सिंधी, पारशी, इराणी लोकही धंदा व्यवसायात स्वतःला आजमावतात. आम्ही आहोत कुठे? मराठी तरुण मुले ज्या हिरीरिने दहीहंडीची, गणेशोत्सवाची, नवरात्रीची तयारी करतात तेवढयाच उत्साहाने ते छोटा मोठा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी तनमन झोकून देऊन काम का करत नाहीत? धार्मिक कार्यात सहभागी होणे गैर नाही. पण पोटापाण्याचा कोणताही उदयोग लाज न बाळगता उभारण्याचे कर्तुत्व मराठी माणसं कधी दाखवणार? परप्रांतियांच्या नावाने खडे फोडण्यात आपण किती काळ वाया घालवणार? परप्रांतियांकडून आपण काहीच शिकणार नाही का? हीच ती संधी मानून शिवसेना काही आता परिवर्तन घडवेल का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा