गुरुवार, ३१ जुलै, २०२५

आॅपरेशन सिंदूरबाबत संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे गांभिर्य


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या आॅपरेशन सिंदूरशी संबंधित ज्वलंत प्रश्नांवर भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुमारे ३२ तास जोरदार चर्चा झाली, परंतु पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्री इत्यादी विरोधी पक्षनेत्यांच्या काही ज्वलंत प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकले नाहीत! यामागील मूलभूत कारण असे म्हटले जाते की, हुशार सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या काही मूर्ख प्रश्नांची धोरणात्मक उत्तरे अस्पष्ट पद्धतीने दिली आहेत. म्हणूनच असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पंतप्रधान मोदींच्या भाषणातून मिळालेल्या उत्तरांमध्ये विरोधकांच्या काही प्रश्नांची थेट आणि योग्य उत्तरे मिळाली नाहीत?


पंतप्रधान मोदी संसदेत बोलले असतील, परंतु त्यांच्याद्वारे अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान मोदींच्या भाषणात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली होती, परंतु अनेक प्रश्नांची उत्तरे उत्तरांच्या स्वरूपात नव्हती तर प्रश्नांच्या स्वरूपात होती. उदाहरणार्थ, सरकारने युद्धबंदी का केली याचे कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही? घोषणेपूर्वी ही माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत कशी पोहोचली, या मुद्द्यावर पहिले ट्विट करणारे कोण होते? त्याच वेळी पहलगाम ते पुलवामापर्यंत सुरक्षा बाबींमध्ये झालेल्या त्रुटींबद्दल कोणाकडूनही स्पष्ट उत्तर मिळाले नाही- मग ते संरक्षण मंत्री असोत, गृहमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत!

भारत आणि पाकिस्तानमधील ‘युद्धविराम’बद्दलची पहिली माहिती जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असेल, तर कशी हे देशवासीयांना जाणून घ्यायचे आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. कारण ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाची घोषणा करताना दावा केला होता की, अमेरिकेने ‘रात्रभर चालणाºया चर्चेत’ मध्यस्थी केली. व्यापाराच्या अटींवर युद्धविराम करण्यात आला. त्याच वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन डझनहून अधिक वेळा युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या राजनैतिक यशावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.


खरे तर, गेल्या सोमवारी स्कॉटलंडमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी झालेल्या चर्चेपूर्वी माध्यमांना संबोधित करताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसह जगभरात सुरू असलेल्या सहा मोठ्या युद्धांना थांबवण्यात त्यांच्या भूमिकेबद्दल बोलले होते. कारण ते आंतरराष्ट्रीय शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळविण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे भारतीय विरोधी पक्ष सतत असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, मोदी सरकार यावर गप्प का राहिले आहेत? हा दावा खरा आहे की खोटा? मोदींनी त्यांच्या संसदीय निवेदनातही ट्रम्प यांचा उल्लेख का केला नाही?

याचे थेट उत्तर असे असेल की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. कारण जागतिक राजनैतिक कुटनीतीमध्ये असे घडत नाही की, सरकार कोणत्याही नेत्याचे नाव घेऊन विधान करते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे अध्यक्ष आहेत. त्याच वेळी या संपूर्ण चर्चेत सरकारने चीनचे नावही घेतलेले नाही, ज्याने पाकिस्तानच्या वतीने संपूर्ण युद्ध लढले. म्हणून, पूरक प्रश्न असा आहे की जेव्हा ते चीनवर बोलत नाहीत, तेव्हा ते ट्रम्प यांच्यावर कसे बोलतील? अर्थात विरोधकांच्या हे डोक्याबाहेरचे आहे.


तिसºया देशाच्या हस्तक्षेपावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला आॅपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. ९ मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक तास प्रयत्न केला, पण त्यावेळी मी सैन्यासोबतच्या बैठकीत होतो. मी त्यांचा फोन उचलू शकलो नाही आणि नंतर जेव्हा मी त्यांना परत फोन केला, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. यावर माझे उत्तर असे होते की, जर पाकिस्तानचा असाच हेतू असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.

म्हणूनच एकामागून एक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, केंद्रातील मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेण्याचे का टाळत आहे? तर याचे स्पष्ट उत्तर असे आहे की, सध्याच्या काळात वेगाने प्रगती करणाºया भारताला आंतरराष्ट्रीय आघाडीवर अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अनेक गोष्टी वाटाघाटीच्या टेबलावर असल्याने, ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्तीचे नाव घेऊन भारत आपली स्थिती कमकुवत करू इच्छित नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही की, सरकार ट्रम्प यांचे समर्थन करत आहे. भारत अनावश्यकपणे अधिक समस्या निर्माण करू इच्छित नाही. म्हणूनच भारत आपल्या रणनीतीत यशस्वी होत आहे, तर विरोधी पक्ष अस्वस्थ असूनही परराष्ट्र अजेंड्यावर राजकीय चिखलफेक करत आहेत. विरोधकांना देशहितापेक्षा मोदींना सत्तेवरून कसे हटवता येईल यात अधिक स्वारस्य आहे. त्याचप्रमाणे देशहितापेक्षा स्वहित त्यांना महत्त्वाचे वाटत आहे. जगातील कोणत्याही नेत्याने मध्यस्ती केली नाही हे सांगितल्यावर त्यात ट्रम्प आले, हे न समजण्याइतके विरोधक मूर्ख आहेत का? पण ते मुद्दाम करत आहेत हे यातून स्पष्ट झाले.


भारताच्या विरोधी पक्षाला आणखी एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे की, आॅपरेशन सिंदूरमध्ये भारताची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली? तथापि, त्यांनी पाकिस्तानची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली हे देखील विचारायला हवे होते. याचे सरळ उत्तर असे असेल की, सुरुवातीला भारतीय लष्कराने राफेल लढाऊ विमान पाडल्याचा दावा फेटाळून लावला होता. परंतु त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने परदेशात कबूल केले की, असे काहीतरी घडले आहे. यामुळे प्रोत्साहित होऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्यात मे महिन्यात भारत-पाक संघर्षादरम्यान ‘पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली’ असा दावा केला होता. तथापि, ट्रम्प यांनी कोणत्या देशाची किती विमाने पाडण्यात आली हे स्पष्ट केले नाही. यापूर्वी पाकिस्ताननेही भारताची ‘पाच लढाऊ विमाने पाडल्याचा’ दावा केला आहे, जो भारताने नेहमीच नाकारला आहे. पण जे घडलेच नाही ते घडले असे सरकारने कबूल करावे हा विरोधकांचा कसला आग्रह म्हणावा लागेल? विरोधकांनी आता तरी देशहिताचा विचार करावा आणि भारताची नाचक्की करण्याचे काम करू नये. जे काम पाकिस्तान करत आहे तेच विरोधक करणार असतील तर त्यांचा हेतू स्पष्ट दिसून येतो की, ते कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहेत.

विरोधकांचे प्रश्न आणि वास्तव


खरे तर हा विषय न संपणाराच आहे. पण सोमवार, मंगळवारच्या ३२ तासांच्या चर्चेत विरोधकांनी आॅपरेशन सिंदूरवरून जे प्रश्न उपस्थित केले, त्यातून त्यांचा पोरकटपणा दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता आपण काय भाषा वापरतो आहे याचे भान विरोधकांना राहिलेले नाही हे केवळ या देशाने नाही तर जगाने पाहिले. त्यामुळे यातून उथळ वक्तव्ये करणाºया विरोधकांचीच नाचक्की झाली. कारण अशा अभ्यास न करता बोलणाºया विरोधकांना का संधी द्यायची असा विचार आज मतदार करत आहे, हे या चर्चेतले खरे वास्तव आहे.


खरे तर काँग्रेसने यापूर्वीही केंद्र सरकारकडे आॅपरेशन सिंदूरदरम्यान किती भारतीय विमाने पाडण्यात आली हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती. पण उत्तर देताना पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने आतापर्यंत या प्रश्नाचे कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही. लोकसभेत या मुद्द्यावर उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याचे कौतुक केले आणि म्हणाले की, काही विरोधी सदस्य किती विमाने पाडण्यात आली असे विचारत आहेत. मला वाटते की, हा प्रश्न आपल्या राष्ट्रीय भावनेला अनुरूप नाही. कारण त्यांनी किती शत्रूची विमाने पाडण्यात आली हे विचारले नाही. हे उत्तर बिनचूक होते. अमर अकबर अँथनी या चित्रपटात विनोद खन्नाकडून मार खाल्यानंतर कस्टडीतील अमिताभ विनोद खन्नाला विचारतो की , मैने दोही मारे लेकीन सॉलीड मारे ना? याचा अर्थ अमिताभची भूमिका बरोबर आहे असे होत नाही. जो स्मगलर रॉबर्टला सहाय्य करत आहे त्याचे कौतुक कसे करता येईल? आज विरोधक तिच चूक करत आहेत. त्यांना पाकिस्तानचा पुळका आला आहे, यासारखे दुर्दैव कोणते? आपण भारतातील विरोधी पक्ष आहोत की पाकिस्तानचे प्रतिनिधी हे अजून विरोधकांनी स्पष्ट केलेले नाही.

विरोधी पक्ष सरकारकडून हे देखील जाणून घेऊ इच्छितो की, भारतापेक्षा पाकिस्तानसोबत जास्त देश का आहेत? कारण भारत-पाक संघर्षादरम्यान तुर्की, अझरबैजान आणि चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर फक्त इस्रायल भारताच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. रशियानेही उघडपणे भारताला पाठिंबा दिला नाही. या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, जगातील कोणत्याही देशाने भारताला त्याच्या सुरक्षेत कारवाई करण्यापासून रोखलेले नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ देश आहेत आणि आॅपरेशन सिंदूरदरम्यान फक्त तीन देशांनी पाकिस्तानच्या समर्थनात निवेदन दिले. क्वाड, ब्रिक्स, फ्रान्स, रशिया आणि जर्मनी... कोणत्याही देशाचे नाव घ्या, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला. यात सगळे आले आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा भारत युक्रेनविरुद्ध रशियाला उघडपणे पाठिंबा देणार नाही, तर रशियाने पूर्वीप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध भारताला उघडपणे पाठिंबा देण्याची अपेक्षा का करावी! अशाच काही गोष्टी इतर देशांनाही लागू होतात. या प्रकरणात इस्रायल अपवाद आहे, कारण तो भारतासारख्या इस्लामिक कट्टरतावादाशी देखील झुंजत आहे. म्हणूनच त्याने कोणत्याही अटीशिवाय भारताला पाठिंबा दिला आहे.


दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत संबंधित प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले की, परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला आहे, हे अगदी बरोबर आहे. परंतु त्यांनी हे सांगितले नाही की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जग पाकिस्तानची बाजू घेत आहे. त्यांनी पुढे जोर देऊन म्हटले की, जेव्हा यूपीए सरकार सत्तेत होते, तेव्हा जगातील विविध देश दहशतवादाबद्दल पाकिस्तानवर टीका करत असत. पहलगाम हल्ल्यामागे असलेली व्यक्ती- जनरल मुनीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत जेवण करत आहेत. आपले पंतप्रधान तिथे जाऊ शकत नाहीत, परंतु जनरल मुनीर जेवण करत आहेत. या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक देश आपले हित लक्षात घेऊन भारताला पाठिंबा देईल, कारण त्यांना जागतिक व्यवस्थेचाही विचार करावा लागेल. अनेक देशांनी भारताचा निषेध केलेला नाही. याला भारताचा पाठिंबा म्हणून पाहिले पाहिजे. ही एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय प्रश्न असा आहे की, भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहे? हे योग्य आहे का? उत्तर असेल अजिबात नाही. हे ताबडतोब थांबवले पाहिजे. ‘आॅपरेशन सिंदूर’ या विषयावर संसदेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केला की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती, तर १४ सप्टेंबर रोजी आशिया कप क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कसा खेळेल? ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानशी व्यापार बंद आहे. तिथून विमाने येथे येऊ शकत नाहीत. जहाजे जलक्षेत्रात येऊ शकत नाहीत. तुमचा विवेक का जिवंत नाही? कोणत्या परिस्थितीत तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळाल? भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) अलीकडेच आशिया कप २०२५चे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आणखी दोन सामनेदेखील खेळले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, ज्वलंत प्रश्न असा आहे की, जेव्हा आपण राजनैतिक संबंध निलंबित केले आहेत, तेव्हा आपण क्रिकेट सामना का खेळत आहोत? जेव्हा भारत म्हणतो की व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालणार नाहीत, व्यापार आणि चर्चा एकत्र चालणार नाहीत, रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही, तर खेळ आणि रक्त एकत्र कसे चालेल? त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीत भारताने खेळता कामा नये. किक्रेटचे दीर्घकाळ सूत्र हाती घेणारे, बीसीसीआय, आयसीसीआयचे पद भूषवणारे शरद पवार यांनी याबाबत बोलणे अपेक्षित होते ते का यावर काही बोलले नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. बीसीसीआय ही स्वतंत्र संघटना आहे ती देशाच्या सरकारच्या माध्यमातून चालवली जात नाही, पण शरद पवार यांनी याबाबत पाकिस्ताशी सामने खेळू नयेत असे सुचवणे अपेक्षित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रफुल्ल फडके/अन्वय



बुधवार, ३० जुलै, २०२५

पाकिस्तानची भाषा


बैसरान दहशतवादी हल्ल्यात सामील असलेले तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी सुलेमान शाह उर्फ हाशीम मुसा, हमझा अफगाणी आणि जिब्रान यांचा आॅपरेशन महादेवमध्ये खात्मा झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत मंगळवारी आॅपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान जाहीर केले. काश्मीर खोºयातील दाचिगामच्या घनदाट जंगलात मारले गेलेले हे तिन्ही दहशतवादीच पहलगामच्या बैसरानमधील दहशतवादी हल्ल्यात सामील होते, असा निर्वाळाही शहांनी दिला आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दोन प्रमाणे दिली. पहिली बाब म्हणजे आॅपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपाशी सापडलेल्या एके ४७ आणि एम ९ रायफलींच्या गोळ्या आणि बैसरानमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आढळलेल्या गोळ्या एकमेकांशी तंतोतंत जुळत असल्याचे चंडीगडच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सांगितल्याचे आणि सहा तज्ज्ञांनी त्याची खातरजमा केल्याचे शाह यांनी सांगितले. त्यांनी दुसरे प्रमाण दिले ते या तिघा दहशतवाद्यांना बैसरानमध्ये ज्यांनी आश्रय दिला आणि अन्न पुरवले, त्या सध्या एनआयएच्या अटकेत असलेल्या बशीर अहमद जोठर आणि परवेझ अहमद जोठर या दोघांनीही या मृतदेहांची ओळख पटवून तेच हल्लेखोर असल्याचे सांगितले. ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्री प्रत्यक्ष लोकसभेमध्ये हा निर्वाळा या दोन सबळ पुराव्यांच्या आधारे देत आहेत, त्या अर्थी मारले गेलेले दहशतवादी हेच बैसरान हल्ल्यात सामील असलेले हाशीम मुसा आणि साथीदार असल्याचे मान्य करायला हरकत नसावी. अर्थात, बेछूट आरोप करणारे ढिसाळ विरोधक केवळ सत्तेपासून दीर्घकाळ दूर राहिल्यामुळे वेडेपिसे झालेले आहेत, ते याचा अखेरपर्यंत इन्कार करत राहतील, पण जनता मात्र सुजाण आहे.


अर्थात, दहशतवाद्यांनी बैसरानमध्ये पत्नी आणि मुलांसमक्ष पर्यटकांच्या हत्या केल्या असल्याने या सर्व कुटुंबीयांनी या दहशतवाद्यांचे चेहरे पाहिलेच असतील, जे ते कदापि विसरूच शकणार नाहीत. त्यामुळे आॅपरेशन महादेवमध्ये खात्मा झालेले दहशतवादी हेच ते बैसरानमध्ये रक्ताचा सडा पाडणारे सैतान होते याची त्यांची खात्री पटल्यास निश्चितच त्यांच्या वेदनेवर ती थोडीफार मलमपट्टी ठरेल. मारले गेलेले दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांचे पाकिस्तानी मतदार ओळखपत्र क्रमांकही मिळवले असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. यापेक्षा सरकारने, भारतीय सैन्याने काय करायला हवे होते? तरीही पाकिस्तानचे अतिरेकी मारले गेले याच्या दु:खातून सावरले न गेलेले विरोधक बरळत राहात आहेत यासारखे दुर्दैव काय म्हणायचे? देशाबाहेरचे शत्रू परवडले, पण हे अंतर्गत शत्रू घातक असतात. पोटातल्या जंताप्रमाणे माणसाला पोखरणारे हे शत्रू आहेत.

खरे तर बैसरान हल्ल्याचे तिघे हल्लेखोर उशिरा का होईना, परंतु मारले जाणे ही नि:संशय सुरक्षा दलांची फार मोठी कामगिरी आहे आणि त्या आॅपरेशन महादेवमध्ये सामील असलेले सर्व जवान कौतुकास पात्र आहेत. दाचिगामच्या घनदाट जंगलात या दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्यांना तेथून पाकिस्तानात पळून जाता येऊ नये याचा पक्का बंदोबस्त सुरक्षा दलांनी केला होता. या दहशतवाद्यांचा जंगलातील नेमका ठावठिकाणा कसून शोधला जात होता. एका दहशतवाद्याजवळील चिनी बनावटीचा उपग्रहाधारित फोन त्याने काही काळ चालू केला, त्या संदेशावरून त्यांचा नेमका ठावठिकाणा सुरक्षा दलांना कळून चुकला आणि लष्कर आणि निमलष्करी दले तसेच पोलीस यांनी तिन्ही हल्लेखोरांचा माग काढला आणि ते तंबूत झोपलेले असताना त्यांचा खात्मा केला गेला, असे गृहमंत्र्यांनी मंगळवारी सभागृहात जाहीर केले आहे. वास्तविक या गोष्टीचे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे होते. पण दुष्ट प्रवृत्तीच्या आणि पाकिस्तानवर अधिक प्रेम असणाºया विचाराने विरोधकांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. यातूनच विरोधकांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.


मात्र, बैसरान हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानीच होते याचा पुरावा काय, ते स्थानिक दहशतवादी नसतील कशावरून? असे अत्यंत बेजबाबदार सवाल बैसरान हल्ल्याचे पक्षीय राजकारण करण्याच्या नादात माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतेच द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत केले. पी चिदंबरम हा अत्यंत बेजबादार आणि मूर्ख माणूस म्हणावा लागेल. सध्या काँग्रेसमध्ये सर्वात मूर्ख कोण याचीच स्पर्धा लागलेली दिसून येते, हे यावरून दिसून येते. शशी थरुर यांना आॅपरेशन सिंदूरवर बोलू न देण्याच्या कृतीने काँग्रेसने आपली लाज आणखी काढली आहे. इतकी मोठी चूक करून भारतीय जनतेसमोर आपली पाकिस्नानशी असलेली लाचारी दाखवून दिली आहे. आपण काय बोलतो आहोत आणि नकळत पाकिस्तानला क्लीन चिट देतो आहोत याचे भानही चिदंबरम यांना उरले नाही. आपल्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची सारवासारव त्यांनी आता चालवली असली, तरी बैसरान हल्ल्यापासून हात झटकण्यासाठी भविष्यात चिदंबरम यांच्या या बेजबाबदार विधानांची साक्ष पाकिस्तान दिल्यावाचून राहणार नाही. ही अशा प्रकारची वक्तव्येच आपली बाजू अकारण कमकुवत करीत असतात. आॅपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेत अशा अनेक शंका घेतल्या गेल्या. सरकारला घेरण्याच्या नादात आपण पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन तर करीत नाही ना याचा विचार होताना दिसला नाही. एकीकडे संसदेत आॅपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना त्याच वेळी दहशतवाद्यांशी ही चकमक कशी झाली असा सवाल काही जण आता करतील यात शंकाच नाही. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा प्रश्न विचारलासुद्धा! बैसरानच्या सैतानांचा खात्मा झाला यासाठी सैन्य दलांच्या त्या पराक्रमाबद्दल त्यांची पाठ थोपटण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेच्या गंभीर विषयावर केवळ निवडणुकीतील मतांचे हिशेब समोर ठेवून अशा सवंग भूमिका घेतल्या जातात तेव्हा त्यातून देश कमकुवत होत असतो याचे भान विरोधकांना कधी येणार? विरोधक यातून आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहेतच, पण भारतीय सैन्य दलाचे मनोदय खचवण्याचे काम करत आहेत. जे काम पाकिस्तान करत आहे ते काम काँग्रेस करत आहे. काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा दिसत आहे यासारखे दुर्दैव कोणते?

एकाकीपणाचे विष पचवणे अवघड


एका अभ्यासानुसार प्रत्येक सहावा माणूस एकाकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालाचा हा निष्कर्ष आहे, ज्याने संपूर्ण जगाला चिंताग्रस्त केले आहे आणि आपण कोणत्या प्रकारची समाज रचना तयार करत आहोत याचा विचार करण्यास भाग पाडले आहे की, जी माणसाला एकाकी बनवत आहे. वाढता एकटेपणा ही एक साधी सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या नाही, तर ती एक जागतिक मानसिक आरोग्य संकट बनत आहे. जी व्यक्ती, समाज आणि व्यावसायिक संस्थांना आतून पोकळ करत आहे. तुटलेल्या नातेसंबंधांच्या आणि संवादाच्या अभावाच्या परिस्थितीत जगभरातील कोट्यवधी लोक पूर्णपणे शांततेचे जीवन जगत आहेत. जर आपण लक्षात घेतले तर, माणसांमधील ही शांतता महामारीच्या रूपात लाखो लोकांना मृत्यूचे आमंत्रण देत आहे. विशेष म्हणजे या संकटाचे सर्वात मोठे बळी तरुण ठरत आहेत. सामाजिक आणि कौटुंबिक विषमतेमध्ये वृद्धांना आधीच दुर्लक्षित केले जात आहे. निश्चितच, जीवनातील विषमता आणि असमानता वाढली आहे. अनेक प्रकारची आव्हाने आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विस्ताराबरोबर पिढ्यांमधील अंतर वाढले आहे.


डब्ल्यूएचओच्या अहवालात असे दिसून आले आहे की, आज जगातील सुमारे १६ टक्के लोक एकाकीपणा, समाजापासून दूर किंवा एकलकोंडेपणाचे बळी आहेत. ही परिस्थिती केवळ वृद्धांपुरती मर्यादित नाही तर ती तरुण, काम करणारे व्यावसायिक आणि अगदी मुलांपर्यंतही पसरली आहे. डिजिटल युगात, जिथे सर्वकाही ‘कनेक्टेड’ दिसते, मानवी नातेसंबंधांमध्ये एक अदृश्य अंतर, कृत्रिमता आणि जवळीकतेचा अभाव दिसून येत आहे. आपण जितके जास्त सोशल मीडियाच्या आभासी जगाशी जोडले जातो तितके आपण भावनिकदृष्ट्या एकटे पडतो. व्यक्तिवादी विचारसरणी, सामाजिक दुष्परिणाम आणि नातेसंबंधांच्या तुटणाºया भिंती यांचा सामाजिक रचनेवर खोलवर एकाकीपणाचा घातक परिणाम होत आहे. कौटुंबिक नात्यांमधील तडाखा, विवाहांमधील असंतोष आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही याची स्पष्ट लक्षणे आहेत. तरुण पिढीमध्ये नैराश्य, आत्महत्येची प्रवृत्ती आणि ड्रग्ज व्यसनाकडे झुकणे ही चिंताजनक प्रवृत्ती बनली आहे. एकाकीपणामुळे होणारे अल्झायमर, डिमेंशिया आणि इतर मानसिक आजार वृद्धांमध्ये वेगाने वाढत आहेत.

एकटेपणा ही केवळ एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक कमकुवतपणा नाही तर ती समाजाच्या सामूहिक अपयशाचे लक्षण आहे. जेव्हा आपण तंत्रज्ञान, वंश आणि स्वार्थात इतके अडकतो की, कोणाकडेही ऐकण्यासाठी वेळ नसतो, तेव्हा एकाकीपणाचा जन्म होतो. आता आपण नातेसंबंध, संवाद आणि करुणेच्या जगात परतण्याची वेळ आली आहे. अन्यथा, एकाकीपणा, दु:ख आणि असंतोषाच्या भावना त्रास देत राहतील. जणू काही स्वत:ची भावनाच राहिली नाही, इच्छाच उरली नाही. मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेले सौंदर्य दिसत नाही. असे दिसते की, बरेच लोक जिवंत आहेत, परंतु जिवंत असण्याच्या जादुई भावनेला स्पर्श करू शकत नाहीत. आपले विचार भौतिकवादी आणि सोयी-सुविधांकडे वळल्यामुळे आपल्या आकांक्षा गगनाला भिडल्या आहेत. परंतु वास्तवाशी समतोल साधू न शकल्यामुळे नैराश्य वाढत आहे. निश्चितच, सोशल मीडिया क्रांतिकारी मार्गाने विस्तारत आहे. परंतु त्याचे वास्तव आभासी, कृत्रिम, दिखाऊ आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो मित्र असल्याचा दावा प्रत्येकजण करतो, परंतु हे मित्र किती संवेदनशील आहेत? ते किती जवळचे आहेत? या प्रश्नांचे उत्तर नकारात्मक आहे, वास्तविक जीवनात माणूस पूर्णपणे एकटा आणि हरवलेला असतो. आभासी मित्रांचे कृत्रिम संवाद आपल्या जीवनातील प्रश्न सोडवू शकत नाहीत, एकाकीपणा दूर करू शकत नाहीत. निश्चितच, कृत्रिम नातेसंबंध आपल्या वास्तविक नात्यांच्या रचनेला बळकटी देऊ शकत नाहीत. कृत्रिमतेमुळे आपल्या शब्दांची प्रभावीता देखील कमी झाली आहे. ज्यामुळे लोक सतत एकाकी जीवनाकडे वाटचाल करत आहेत. आपल्या संयुक्त कुटुंबांचे बदलते स्वरूप आणि विभक्त कुटुंबांचा वाढता कलदेखील याच्या मुळाशी आहे. पूर्वी घरातील वडीलधारी लोक कोणताही धक्का किंवा दबाव सहजपणे सहन करत असत. पूर्वी सर्वजण आर्थिक आणि सामाजिक संकटांना एकत्रितपणे तोंड देत असत. पण आता वृद्धांना एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे. केरळमधील अशाच वृद्धापकाळाच्या संकटाची जाणीव करून, तेथील सरकारने ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केली आहे. हे एक चांगले पाऊल आहे. आज वृद्धांना नेहमीच एकटेपणा, कुटुंबातील सदस्यांकडून दुर्लक्ष, गैरवर्तन, तिरस्कार, कटुता, घराबाहेर फेकले जाण्याची भीती किंवा डोक्यावरील छपराच्या शोधात इकडे तिकडे भटकण्याचे दु:ख यामुळे त्रास सहन करावा लागतो. वृद्ध समाज इतका निराश, एकाकी आणि दुर्लक्षित का आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार निरोगी आणि आदर्श समाज निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखण्यात व्यस्त आहेत. त्यांनी वृद्धांच्या एकाकीपणाचाही विचार करावा आणि वृद्ध कल्याणकारी योजना राबवाव्यात जेणेकरून वृद्धांच्या प्रतिभेचा, कौशल्यांचा आणि अनुभवांचा योग्य वापर नवीन भारत-सशक्त भारताच्या उभारणीत करता येईल आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळातील एकटेपणा ही शोकांतिका बनू नये.

कामाच्या परिस्थितीतील वाढत्या गुंतागुंतीमुळे आणि जीवनशैलीच्या वाढत्या खर्चामुळे एकाकीपणाचे संकट अधिकच गडद झाले आहे. ज्या कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही काम करत आहेत तिथे ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे आणि मुले वसतिगृहे आणि बोर्डिंग स्कूलमध्ये राहत आहेत. व्यवसाय क्षेत्रातही कामाचा ताण लोकांना एकाकी बनवत आहे. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणीही एकटेपणा एक गंभीर आव्हान बनत आहे. भावनिक आसक्तीअभावी कर्मचारी कामात रस घेत नाहीत. त्याचा टीमवर्क, नवोन्मेष आणि सहकार्यावर नकारात्मक परिणाम होतो. जर एकटेपणा दीर्घकाळ टिकला तर त्यामुळे बर्नआऊट, कामाबद्दल असंतोष आणि कर्मचाºयांचा राजीनामा यांसारख्या परिस्थिती निर्माण होतात. यामुळे उत्पादकतेतही घट होते. मॅककिन्से आणि डेलॉइट यांसारख्या जागतिक सल्लागार कंपन्यांच्या अहवालांवरून असे दिसून येते की, एकाकीपणामुळे कर्मचाºयांची उत्पादकता १५-२० टक्क्यांनी कमी होऊ शकते, ज्यामुळे कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते. एकाकीपणाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक आणि संस्थात्मक पातळीवर सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. कुटुंब, मित्र आणि सहकाºयांसोबत वेळ घालवणे हीच खरी ‘समृद्धी’ आहे. कंपन्यांना आणि संस्थांना कर्मचाºयांची मानसिक आणि भावनिक स्थिती समजून घेणाºया नेतृत्वाची आवश्यकता आहे. डिजिटल संवादाऐवजी समोरासमोर संवाद, ‘घरून काम करा’ ऐवजी ‘समुदायासोबत काम करा’ याला प्राधान्य द्यावे लागेल. कार्यालये आणि समाजात समुपदेशन, गट चर्चा, ध्यान आणि योगास प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारने एकाकीपणाला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखले पाहिजे आणि सामाजिक समावेशासाठी ठोस कार्यक्रम राबवले पाहिजेत.


जागतिक आरोग्य संघटनेचा डेटादेखील धक्कादायक आहे की, एकाकीपणा दरवर्षी सुमारे आठ लाख लोकांचे जीवन संपवत आहे. यावरून असे दिसून येते की, एखादी व्यक्ती केवळ समाज आणि त्याच्या कार्यालयीन वातावरणापासूनच दूर राहत नाही तर तो त्याच्या कुटुंबापासूनही तुटलेला आहे. अलीकडेच देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी कार्यालयांमध्ये कामाचे तास वाढवण्याचा आग्रह धरला होता. एका उद्योजकाने असेही म्हटले होते की, घरी राहून फक्त पत्नीचा चेहरा पाहणे आवश्यक आहे का? ही एक असंवेदनशील आणि हास्यास्पद प्रतिक्रिया होती. खरे तर, लोकांमध्ये हा सामान्य समज प्रबळ झाला आहे की, जर एखाद्याकडे पैसे असतील तर तो सर्वकाही करू शकतो. ज्यामुळे त्याने परिसरापासून कामाच्या ठिकाणी त्याची पोहोच मर्यादित केली आहे. हेच कारण आहे की, आॅनलाइन जीवनात आपल्याभोवती गर्दी आणि हजारो मित्र असूनही, एखाद्या व्यक्तीला एकटेपणात जगण्याचा शाप दिला जातो. सत्य हे आहे की, लोक कोणाच्याही वेदना आणि दु:खाबद्दल संवेदनशीलपणे वागत नाहीत. कृत्रिमता सर्वत्र पसरली आहे. भेटीगाठी आणि एकत्र येण्याचे आपले उत्सवदेखील आता दिखावा आणि कृत्रिम भेटवस्तूंचे बळी बनले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या घटकांमुळे तो अधिकाधिक एकाकी होत चालला आहे, त्यावर आपण विचार केला पाहिजे. प्रत्यक्षात, एकटेपणा तेव्हाच संपेल जेव्हा आपण पुन्हा माणूस बनू.

प्रफुल्ल फडके/अन्वय



मंगळवार, २९ जुलै, २०२५

भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत


भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेन येत असतानाही ही कुत्री जोरात भुंकत येण्याचे प्रकार घडतात. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती आहे. लहान बालकांना भटक्या कुत्र्यांनी फरपटत नेऊन फाडल्याच्या, हल्ला केल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. ही दहशत थांबण्याची गरज आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याची दखल घेतली आहे आणि देशाच्या अनेक भागांत रेबीज आजारामुळे होणाºया भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या आणि मृत्यूंच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्यामुळे सार्वजनिक जीवनावर आणि विशेषत: शहरी जीवनावर व्यापक परिणाम होत आहे. ही समस्या केवळ भावनिकच नाही तर सामाजिक, आरोग्य आणि प्रशासकीय संकटही बनत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात कुत्र्यांची संख्या सहा कोटींच्या जवळपास आहे, परंतु असा अंदाज आहे की, ही संख्या १२ कोटींपेक्षा जास्त आहे.


एकट्या दिल्लीत आठ लाखांहून अधिक कुत्रे आहेत आणि दररोज सुमारे २००० कुत्रे चावल्याची प्रकरणे नोंदवली जातात. मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ यांसारख्या महानगरांमध्ये लाखो कुत्रे रस्त्यावर फिरताना दिसतात. लहान शहरे आणि गावांमध्ये परिस्थिती आणखी चिंताजनक आहे, कारण त्यांच्या काळजीसाठी किंवा नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय नाहीत. विचित्र बाब म्हणजे मानवांनी वस्ती असलेल्या शहरांमध्ये मुले आता खेळायला घाबरत आहेत, वृद्ध लोक एकटे चालण्यास घाबरत आहेत, भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लोक चालण्यास आणि दुचाकी चालवण्यास घाबरत आहेत. अचानक हल्ला करणारे कुत्रे प्राणघातक ठरत आहेत. रात्री त्यांची दहशत आणखी वाढते.

सर्वात भयानक समस्या म्हणजे भटक्या कुत्र्यांचा चावा आणि त्यामुळे होणारा आजार, रेबीज. भारतात दरवर्षी १५-२० लाख लोकांना कुत्रे चावतात आणि रेबीजमुळे सुमारे २०,००० मृत्यू होतात. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. यामुळे देशाच्या आरोग्य सेवांवर अतिरिक्त भार पडतो. बºयाचदा पीडित व्यक्तीला वेळेवर रेबीजची लस न मिळाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.


ग्रामीण आणि मागास भागात परिस्थिती आणखी वाईट आहे. देशात अनेक प्राणी हक्क संघटना आहेत, ज्या कुत्र्यांचे संरक्षण करण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे प्राणी निर्दोष आहेत, त्यांना मारणे किंवा काढून टाकणे अमानवी ठरेल. त्यांची भावना बरोबर आहे, परंतु जेव्हा हे कुत्रे मुले, महिला आणि वृद्धांसाठी धोका बनतात, तेव्हा सार्वजनिक हिताला प्राधान्य दिले जाऊ नये का? एकीकडे प्राणी प्रेम आहे, तर दुसरीकडे मानवी सुरक्षितता आहे. रस्त्यातून बिस्किटे वाटत कुत्र्यांनी भरवणाºया टोळ्या जणू माथेफिरू आहेत. ग्लुकोज बिस्किटे हे काय कुत्र्यांचे खाद्य आहे काय? पण बिस्किटे भरवायची आणि त्याचे रॅपर कागदाचा कचरा रस्त्यातच टाकून हे श्वानप्रेमी जातात. बिस्किटे खाऊन ती कुत्री तिथेच घाण करतात. रेल्वे स्थानकातील एक प्लॅटफॉर्म या श्वानप्रेमींनी घाण केल्याशिवाय सोडलेला नाही. श्वानप्रेमींनी या कुत्र्यांना रोखावे आणि आपल्या घरी घेऊन जावे.

कारण हा संघर्ष आता रस्त्यावर आणि न्यायालयांपर्यंत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात टिप्पणी केली की, ज्यांना कुत्रे आवडतात त्यांनी त्यांना रस्त्यावर नव्हे तर त्यांच्या घरी घेऊन जावे आणि त्यांना खायला द्यावे. अनेक रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालणाºयांवर कारवाई करण्याची आणि सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याची मागणी करत आहेत. खरे तर प्रत्येक शहरांमध्ये ‘नो डॉग आॅन स्ट्रीट पॉलिसी’ लागू केली पाहिजे.


भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकांकडे प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) योजना असूनही, त्यांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी ती कागदावरच मर्यादित राहिली आहे. कुत्र्यांचे नसबंदी आणि लसीकरण योग्यरीत्या केले जात नाही, कारण हे काम प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांवर सोडले जाते, ज्यात खूप भ्रष्टाचार आहे. एबीसी नियम, २०२३ मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्या नियमांमुळे समाजांवर खूप भार पडतो. या नियमांमध्ये, लोकांना सोसायटीच्या आवारात कुत्र्यांना खायला घालण्यास आणि त्यांच्यासाठी जागा निश्चित करण्यास सांगितले आहे. यामुळे अनेकदा वाद होतात. शेवटी, नसबंदीनंतरही कुत्रे परिसर, सोसायटीमध्ये का सोडले जातात? आक्रमक किंवा चावणारे कुत्रे तेथून काढून टाकले पाहिजेत. निवासी संकुलांमध्ये भटक्या कुत्र्यांना बंदी घातली पाहिजे, जेणेकरून लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. लोक मदतीसाठी सरकारी विभागांना फोन करतात, तक्रारी नोंदवल्या जातात, परंतु कारवाई नगण्य असते. कधीकधी, जेव्हा निराश लोक भटक्या कुत्र्यांना हाकलून लावतात, तेव्हा प्राणीप्रेमी किंवा संघटना त्यांच्यावर खटले दाखल करतात. कुत्रा पाळीव असो की भटका, त्याला माणसापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये.

केंद्र आणि राज्य सरकारांना स्थानिक संस्थांच्या सहकार्याने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढावा लागेल. यासाठी नसबंदी मोहीम जलद, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करावी लागेल. गेल्या १५ वर्षांपासून कुत्र्यांची गणना केली जात नाही. त्यांच्या मोजणीसोबतच जीपीएस ट्रॅकिंगसारखे उपाय राबवले पाहिजेत. सर्व शहरांमध्ये कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधली पाहिजेत. प्राणीप्रेमींना कुत्रे दत्तक घेण्यास सांगितले पाहिजे. आज जर आपण कॅब, अन्न वितरण आणि पेमेंटसाठी अ‍ॅप्स बनवू शकतो, तर भटक्या कुत्र्यांचा अहवाल देण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी का एखादी व्यवस्था नाही? कुत्रे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत.


ते एकनिष्ठ साथीदार असू शकतात, परंतु जेव्हा त्यांच्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येते, तेव्हा सहअस्तित्वाची व्याख्या बदलली पाहिजे. आपल्याला संवेदनशीलता आणि व्यावहारिकतेच्या संतुलनाने ही समस्या सोडवावी लागेल. लोक कुत्र्यांकडे द्वेषाने पाहू नये म्हणून हे देखील आवश्यक आहे. केरळ सरकारने भटक्या कुत्र्यांना इच्छामृत्यू (जीवन संपवणारे इंजेक्शन) देण्याबद्दल देखील बोलले आहे. आपले रस्ते सुरक्षित असले पाहिजेत, मुलांनी मुक्तपणे खेळले पाहिजे आणि लोकांनी भीतीच्या छायेत राहू नये. कुत्र्यांसाठीही जागा असली पाहिजे, परंतु नियंत्रित आणि सुरक्षित क्षेत्रात ती असली पाहिजे. ही दहशत थांबवलीच पाहिजे.

रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियनचे महत्त्व


भारतीय सैन्य त्यांच्या लढाऊ क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुनर्गठन करत आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी घोषणा केली आहे की, सैन्य एक नवीन ‘रुद्र ब्रिगेड’ आणि ‘भैरव लाईट कमांडो बटालियन’ तयार करत आहे. हे पाऊल भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर जलद प्रतिसाद देण्यासाठी आणि भविष्यातील युद्ध आव्हानांना तोंड देण्यासाठी एक मोठा बदल आहे. आज आपण बलशाली राष्ट्र आहोत हे दाखवण्याची हीच ती वेळ आहे. आम्हाला आता अमेरिकेने सांगावे आणि ऐकावे याची गरज नाही.


रुद्र ब्रिगेड दोन विद्यमान पायदळ ब्रिगेडचे रूपांतर करून तयार केले जात आहे. त्यांचे उद्दिष्ट सर्व लढाऊ शाखांना एकाच रचनेत एकत्रित करणे आहे, जेणेकरून सीमावर्ती परिस्थितीत अतिरिक्त सैनिक तैनात करण्याची आवश्यकता भासू नये. त्यात पायदळ, यांत्रिकीकृत पायदळ, टँक, तोफखाना, विशेष दल, ड्रोन आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट युनिट्सचा समावेश असेल. या ब्रिगेड एका एकत्रित कमांड स्ट्रक्चर अंतर्गत ठेवल्या जातील, जेणेकरून युद्धादरम्यान वेगवेगळ्या शाखांमध्ये चांगले समन्वय साधता येईल. आॅपरेशनल एरिया आणि भूमिकेनुसार ब्रिगेडची रचना बदलेल.

मैदानी भागात, यांत्रिकीकृत पायदळ, टँक रेजिमेंट आणि स्वयंचलित तोफखान्यासह जलद गतीने आक्रमक कारवाया केल्या जाऊ शकतात. त्याच वेळी, डोंगराळ भागात उच्च-उंचीवरील युद्ध करण्यास सक्षम पायदळ बटालियन आणि तोफखाना युनिट्सचा वापर केला जाईल. प्रत्येक रुद्र ब्रिगेडमध्ये ड्रोन-आधारित देखरेख, क्षेत्र संतृप्ती शस्त्रे आणि रिअल-टाइम बुद्धिमत्ता समाविष्ट असेल. यामुळे सीमेवरील परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल.


भैरव लाईट कमांडो बटालियनबद्दल सांगायचे तर रुद्र ब्रिगेड्ससह, सेना ‘भैरव लाईट कमांडो बटालियन’देखील तयार करत आहे. हे पारंपरिक विशेष दलांसारख्या खोल धोरणात्मक आॅपरेशन्सवर लक्ष केंद्रित करणार नाही, परंतु सीमावर्ती भागात जलद हल्ला, गतिशीलता आणि जलद प्रभाव निर्माण करण्यासाठी तैनात केले जाईल. या बटालियन हलक्या, चपळ असतील आणि लहान-प्रमाणात जलद आॅपरेशन्समध्ये विशेषज्ञ असतील. या बटालियन सीमेवरील शत्रूला आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमीच तयार असतील.

भारतीय सैन्याच्या सध्याच्या २५० सिंगल-आर्म ब्रिगेड्स (सुमारे ३,००० सैनिकांसह) सर्व लढाऊ शाखांनी सुसज्ज ब्रिगेडमध्ये रूपांतरित केल्या जात आहेत. हे नवीन फॉर्मेशन लॉजिस्टिक सपोर्टसह स्वयंपूर्ण असतील. सुरुवातीच्या टप्प्यात, ते मर्यादित संख्येत तयार केले जात आहेत. ही संकल्पना सैन्याच्या जुन्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप योजनेवर आधारित आहे.


रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन का आवश्यक आहेत? या प्रश्नाबाबत, सांगता येईल की, भारताच्या सीमा चीन आणि पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर सक्रिय धोक्यांनी वेढलेल्या आहेत. भविष्यातील युद्धांमध्ये जलद गती आणि बहु-दिशात्मक हल्ले आवश्यक असतात. या नवीन युनिट्ससह, सैन्य जलद तैनाती (१२-४८ तास), चांगले समन्वय आणि प्रगत अग्निशक्तिसह शत्रूला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असेल.

जर आपण एकात्मिक लढाई गट (आयबीजी) पाहिले तर आपण तुम्हाला सांगतो की, आयबीजी ही पारंपरिक ब्रिगेडपेक्षा मोठी आणि एका विभागापेक्षा लहान (सुमारे ५,००० सैनिक) असलेली स्वयंपूर्ण युद्ध युनिट आहे. त्यात पायदळ, चिलखती, तोफखाना, अभियंते आणि समर्थन सेवांचा समावेश आहे. कोणत्याही हल्ल्याच्या बाबतीत १२-४८ तासांत तैनात करण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या, दोन आयबीजी तयार करण्याची योजना आहे: ९ कॉर्प्स (पाकिस्तान सीमेवर), १७ स्ट्राइक कॉर्प्स (चीन सीमेवर).


भारतीय सैन्याचे भविष्यातील दृष्टी तंत्रज्ञानावर आधारित जलद लढाऊ क्षमतेवर आधारित आहे. म्हणूनच, अलीकडच्या वर्षांत सैन्याने लढाऊ क्षमतांचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला आहे. उदाहरणार्थ, ड्रोन प्लाटून आता बहुतेक इन्फंट्री बटालियनचा भाग आहेत. तोफखाना रेजिमेंट्सना लोटेरिंग म्युनिशन्स (दिव्यस्त्र कार्यक्रम)ने सुसज्ज करण्यात आले आहे. रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन या तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करतील आणि युद्धात अचूकता आणि वेग आणतील.

भारतीय सैन्याच्या युद्ध रणनीतीमध्ये स्पष्टपणे दिसणारे प्रमुख बदल म्हणजे- पारंपरिक संथ गतीच्या आॅपरेशन्सपासून दूर जाऊन सैन्य आता जलद, लवचिक आणि बहुआयामी हल्ल्यांवर भर देत आहे. रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन भारताला चीन आणि पाकिस्तान दोन्ही सीमेवर जलद प्रतिसाद देण्यास सक्षम करतील. ड्रोन, रिअल-टाइम पाळत ठेवणे आणि नेटवर्क-आधारित लढाऊ क्षमता सैन्याला भविष्यासाठी तयार करतील. या ब्रिगेडना वेगळे सैन्य किंवा समर्थन पाठवण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रतिसाद वेळ कमी होईल.


तथापि, रुद्र ब्रिगेड आणि भैरव लाईट कमांडो बटालियनची स्थापना ही भारतीय सैन्याच्या युद्ध रणनीतीमध्ये एक क्रांतिकारी बदल आहे. यामुळे केवळ सैन्याची आक्रमक आणि बचावात्मक क्षमता वाढणार नाही, तर वेग, अचूकता आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या लढाऊ शक्तीसह भारत आता भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज आहे, असा संदेश देखील देईल. ही एक अभिमानास्पद बाब आपल्यासाठी आहे. आज भारत प्रगत, विकसीत राष्ट्र म्हणून उदयास येत असताना आपल्याला प्रत्येक लढा स्वबळवर देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने घेतलेले हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोदी सरकारने आॅपरेशन सिंदूरदरम्यान कोणी कितीही दावे केले, तरी अमेरिकेला ठणकावून सांगितले होते आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नाही कारण आपल्या सैन्याच्या ताकदीवर आपला विश्वास आहे. आता पूर्वीचे मिळमिळीत आणि डळमळीत नेते या देशात नाहीत आणि कणखर नेते असल्यामुळे आपण एक सक्षम राष्ट्र आहोत हे जगाला दाखवण्याची हीच ती वेळ आहे.

- प्रफुल्ल फडके/अन्वय



सोमवार, २८ जुलै, २०२५

विकसीत भारताच्या दृष्टीने आणखी एक पाऊल


भारत आणि ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार म्हणजेच एफटीएवर सहमती झाली आहे. भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए) अस्तित्वात आल्यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारतीय शेतकरी, मच्छीमार, कारागीर आणि व्यवसायांना नवीन जागतिक मान्यता मिळेल. परवडणाºया दरात उच्च दर्जाच्या वस्तूंची उपलब्धताही सुनिश्चित केली जाईल. ही सरकारची कामगिरी नक्कीच अभिनंदनास पात्र अशी आहे.

CETA ची संकल्पना आॅस्ट्रेलिया, UAE आणि इतर काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांसारखीच आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचा हा एक भाग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी ती आकर्षक बनवण्यासाठी मोदी सरकारने एक मजबूत रणनीती स्वीकारली आहे. विकसित देशांसोबतचे मुक्त व्यापार करार या धोरणाच्या केंद्रस्थानी आहेत. अशा करारांमुळे व्यापार धोरणांशी संबंधित अनिश्चितता दूर होऊन गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो.

मागील UPA  सरकारने प्रतिस्पर्धी देशांसाठी भारताचे दरवाजे उघडून भारतीय व्यवसायांना धोक्यात आणणारी वृत्ती स्वीकारली होती. UPAसरकारच्या काळात, विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यास नाखूश होते, कारण त्या वेळी देशाची गणना जगातील पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये होत असे. तथापि, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. २०१४ पासून भारताचा GDP  जवळजवळ तिप्पट वाढून सुमारे ३३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


क्रांतिकारी सुधारणा, व्यवसाय करण्याची सोय आणि पंतप्रधानांचे जागतिक व्यक्तिमत्त्व यामुळे भारताला प्रचंड क्षमतेसह एक आकर्षक आर्थिक गंतव्यस्थान म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. आज जगाला भारताच्या आश्चर्यकारक विकास कथेचा भाग व्हायचे आहे. प्रमुख देशांकडून एकामागून एक एफटीए होत आहेत, ज्यामुळे ही मान्यता मिळते आहे.

युकेसोबतचा हा व्यापार करार बाजारपेठेत प्रवेश आणि स्पर्धात्मक वेग प्रदान करेल. यामुळे जवळजवळ ९९ टक्के शुल्क काढून टाकले जाईल, जे व्यापार मूल्याच्या जवळजवळ १०० टक्के व्यापते. यामुळे ५६ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारासाठी प्रचंड संधी निर्माण होतील, जो २०३० पर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज आहे. यामुळे लहान व्यवसायांना भरभराट होण्यास मदत होईल, कारण भारतीय उत्पादनांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्पर्धात्मक गती मिळेल.


क्रीडा उपकरणे कंपन्यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तार दिसून येईल. आकर्षक जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मक गती चर्मोद्योग तथा लेदर आणि पादत्राणे, कापड, सागरी उत्पादने आणि रत्ने आणि दागिने यासारख्या कामगारकेंद्रित क्षेत्रांना मदत करेल.

हे क्षेत्र, जिथे अनेक लघु व्यवसाय कार्यरत आहेत, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करतील. भारताची लेदर आणि पादत्राणे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. भारत युकेला कापड, लेदर आणि पादत्राणे पुरवणाºया शीर्ष तीन पुरवठादारांपैकी एक बनण्यासाठी आज चांगल्या स्थितीत आहे, ही नक्कीच आनंदाची बाब म्हणावी लागेल.


या करारामुळे ९५ टक्क्यांहून अधिक कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न शुल्क रेषांवर शून्य शुल्क आकारले जाईल, ज्यामुळे कृषी निर्यातीत जलद वाढ आणि ग्रामीण समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. पुढील तीन वर्षांत कृषी निर्यात २० टक्क्यांहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे २०३० पर्यंत भारताच्या १०० अब्ज डॉलर्सच्या कृषी निर्यातीच्या उद्दिष्टात योगदान मिळेल.

यामुळे भारतीय शेतकºयांसाठी प्रीमियम ब्रिटिश बाजारपेठा खुल्या होतील, ज्या जर्मनी, नेदरलँड्स आणि इतर युरोपियन युनियन देशांना उपलब्ध असलेल्या फायद्यांच्या तुलनेत किंवा त्याहूनही जास्त असतील. हळद, मिरपूड, वेलची, प्रक्रिया केलेली उत्पादने, लोणचे आणि डाळींनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वाढत्या निर्यातीमुळे शेतीचे उत्पन्न वाढेल आणि गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणपत्रासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. यामुळे कृषिमूल्य साखळीत असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


देशातील शेतकºयांचे संरक्षण करण्यासाठी एफटीए भारतातील सर्वात संवेदनशील कृषी क्षेत्रांना वगळते. भारताने दुग्धजन्य पदार्थ, सफरचंद, ओट्स आणि खाद्यतेलांवर कोणतीही शुल्क सवलत दिलेली नाही. हे अन्न सुरक्षा, किंमत स्थिरता आणि असुरक्षित शेतकरी समुदायांना प्राधान्य देण्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे. या करारामुळे भारतीय मच्छीमारांना, विशेषत: आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ आणि तामिळनाडूमधील मच्छीमारांना ब्रिटिश बाजारपेठेत प्रवेश मिळण्यास मदत होईल. या करारामुळे भारतीयांसाठी आयटी आणि संबंधित सेवा, वित्तीय सेवा आणि शिक्षण यासारख्या सेवांमध्ये नवीन संधी निर्माण होतील.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे एफटीए वस्तू आणि सेवांपेक्षा जास्त आहेत. आॅस्ट्रेलियन एफटीएसह, भारताने आयटी कंपन्यांना त्रास देत असलेल्या दुहेरी कराचा प्रश्न सोडवला. यूकेसोबतच्या कराराचा एक महत्त्वाचा मुद्दा दुहेरी योगदानाशी संबंधित आहे. ते नियोक्ते, यूकेमधील तात्पुरत्या भारतीय कामगारांना तीन वर्षांसाठी सामाजिक सुरक्षा योगदानातून सूट देते. यामुळे भारतीय सेवा प्रदात्यांची स्पर्धात्मकता वाढेल.


व्यापार करारांमुळे स्पर्धा वाढते, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाच्या वस्तू मिळण्यास मदत होते. मोदी सरकारने गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक समर्थन दिले आहे. गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आले आहेत आणि मुक्त व्यापार करारांवर चर्चा पुढे नेण्यात आली आहे.

कोणत्याही मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सरकारने उद्योग आणि इतर भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केली आहे. हे लक्षात घेणे आनंददायी आहे की या व्यापार करारांना उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा आणि स्वागत मिळाले आहे. या संदर्भात, यूकेसोबतचा हा करार मोठ्या अर्थव्यवस्थांमधील न्याय्य आणि महत्त्वाकांक्षी व्यापार करारांसाठी एक बेंचमार्क आहे.


हे आपल्या मुख्य हितसंबंधांशी तडजोड न करता वंचित समुदायांसाठी आकर्षक जागतिक संधींचे दरवाजे उघडते. नवीन भारत व्यवसाय कसा करतो याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

राजेंद्र प्रथम यांच्यावरून भाजप आणि द्रमुक यांच्यात संघर्ष


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटींमध्ये एक स्पष्ट धोरणात्मक आणि सांस्कृतिक संदेश लपलेला आहे. पंतप्रधानांच्या तामिळनाडू भेटीतही असाच संदेश लपलेला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये श्रीलंकेहून परतताना पंतप्रधान थेट रामेश्वरमला पोहोचले होते आणि आता मालदीवहून परतताना ते थेट तामिळनाडूतील तुतीकोरिन आणि त्रिची येथे येत आहेत, जिथे ते चोल सम्राट राजेंद्र प्रथम आणि आदि तिरुवतिराय महोत्सवात सहभागी होतील. ही भेट केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती नाही तर तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील राजकारणातील एक मोठे चिन्ह आहे.


सर्वप्रथम, रामेश्वरमबद्दल बोलताना, लक्षात घेतले पाहिजे की हे ठिकाण रामायण आणि श्रीराम यांच्याशी संबंधित आहे, ज्याचे धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व आहे. पंतप्रधानांचा तिथला दौरा दक्षिण भारतातील हिंदू श्रद्धेच्या प्रमुख केंद्रांना बळकट करण्याचा प्रयत्न मानला जात होता. त्याच वेळी, त्रिची येथे चोल सम्राट राजेंद्र प्रथम यांच्या जयंती सोहळ्यात पंतप्रधानांची उपस्थिती राष्ट्रीय स्तरावर तमिळ अभिमान आणि चोल इतिहासाचा सन्मान करण्याचा संदेश देते. यावरून असे दिसून येते की, केंद्र सरकार तमिळ संस्कृती आणि इतिहासाला भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून सादर करत आहे.

पंतप्रधान मोदींच्या या भेटी असा संदेश देतात की, तामिळनाडूचा इतिहास आणि संस्कृती राष्ट्रीय अभिमानाचा भाग आहे, त्यापासून वेगळे नाही. चोल सम्राट राजेंद्र प्रथमसारख्या ऐतिहासिक नायकांना राष्ट्रीय चर्चेत आणणे हाही द्रमुकच्या तमिळ अभिमानाच्या कथेला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय, त्रिची भेटीसह, पंतप्रधान तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे ४,८०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करत आहेत. यातून सांस्कृतिक अभिमान आणि आर्थिक प्रगती एकमेकांना पूरक असल्याचा संदेश जातो. हे संतुलन दाखवून, भाजप तामिळनाडूच्या लोकांना खात्री देऊ इच्छिते की, केंद्र सरकार प्रादेशिक विकास आणि सांस्कृतिक आदर या दोन्हीकडे लक्ष देत आहे. पंतप्रधान राजेंद्र चोल प्रथम यांच्या स्मृतिचिन्हाचे नाणे जारी करतील, तसेच गंगाईकोंडाचोलापुरममध्ये सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांची जयंती साजरी करतील आणि ‘आदि तिरुवतीराय’ उत्सवात सहभागी होणे याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. चोल साम्राज्याच्या सागरी विजयाची १००० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि गंगाईकोंडाचोलापुरम मंदिराच्या बांधकामाच्या स्मरणार्थ हा समारंभ आयोजित केला आहे.


चोल सम्राट राजेंद्र प्रथम यांच्यावरून द्रमुक आणि भाजप आमनेसामने का आहेत हा प्रश्न आहे, कारण की भारतीय राजकारणात इतिहास आणि प्रतीकांचा वापर नवीन नाही. पण येथे खरा प्रश्न असा आहे की, हजार वर्षांपूर्वीच्या या महान चोल सम्राटाच्या नावावर आणि योगदानावर इतका वाद का आहे? प्रश्न असा आहे की, त्याचे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ काय आहेत?

राजेंद्र प्रथम हे चोल साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली शासकांमध्ये गणले जातात. राजेंद्र प्रथम (१०१४-१०४४ इसवी सन) हा दक्षिण भारतातील सर्वात महान सागरी विजेता मानला जातो. त्याने आपला प्रभाव श्रीलंका, मालदीव, बर्मा (म्यानमार), थायलंड आणि कंबोडियापर्यंत वाढवला. चोल राजधानीला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याच्या त्याच्या कामगिरीमुळे त्याला ‘गंगाईकोंडा चोल’ ही पदवी मिळाली. त्याच्या कारकिर्दीत प्रशासकीय, सांस्कृतिक आणि सागरी व्यापार नेटवर्कचा प्रचंड विस्तार झाला. याशिवाय, राजेंद्र प्रथम हे केवळ लष्करी शक्तीचे प्रतीक नव्हते, तर ते सांस्कृतिक आणि स्थापत्य कलांचे एक महान संरक्षकही होते. तंजावर आणि गंगाईकोंडाचोलापुरमची भव्य मंदिरे त्यांच्या धार्मिक सहिष्णुता आणि स्थापत्य कौशल्याचे प्रतिबिंब आहेत. गंगाईकोंडाचोलापुरम मंदिर हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे आणि तमिळ शैव भक्ती परंपरेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.


द्रमुकसाठी, राजेंद्र प्रथम हे तमिळ अभिमान आणि द्रविड संस्कृतीचे प्रतीक आहे. पक्षाने बराच काळ असा युक्तिवाद केला आहे की, तमिळ संस्कृतीचा समृद्ध इतिहास आहे जो उत्तर भारत-केंद्रित ऐतिहासिक कथांमध्ये दडपला गेला आहे. द्रमुकला तमिळ लोकांना हे लक्षात यावे की त्यांच्या पूर्वजांनी समुद्रापलीकडे साम्राज्य निर्माण केले. याशिवाय, द्रमुक हा विषय ब्राह्मणवादी इतिहासलेखनाच्या प्रतिकार म्हणूनही सादर करतो. द्रविड चळवळीच्या सामाजिक न्यायाच्या अजेंड्यासह आणि जातीच्या असमानतेला आव्हान देण्याच्या अजेंडासह, राजेंद्र प्रथमचा तमिळ अभिमान पक्षाच्या राजकीय कथेत घट्ट बसतो.

दुसरीकडे, भाजपची रणनीती थोडी वेगळी आहे. पक्ष राजेंद्र प्रथम यांना ‘हिंदू साम्राज्यवादी शक्ती’ म्हणून सादर करत आहे ज्याने परदेशी शक्तींना पराभूत केले आणि भारताच्या सीमेपलीकडे हिंदू प्रभाव पसरवला. ही कथा भाजपच्या ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’च्या व्यापक विचारसरणीशी जोडते. याशिवाय, भाजप तामिळनाडूमध्ये आपली मुळे मजबूत करू इच्छिते, जिथे आतापर्यंत त्यांची उपस्थिती मर्यादित होती. द्रमुकच्या तमिळ अभिमानाला आव्हान देण्यासाठी, भाजप हिंदुत्वाच्या प्रिझममधून ऐतिहासिक नायकांना सादर करत आहे. यामुळे त्यांना तामिळनाडूमध्ये सांस्कृतिक बंध निर्माण करण्याची संधी मिळते.


जर आपण दोन्ही पक्षांमधील संघर्षाचे परिणाम पाहिले तर, द्रमुक तमिळ ओळख आणि एकतेचे संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप विद अभिमानावर भर देते, तर भाजप हिंदू अस्मिता आणि राष्ट्रीय अभिमानावर भर देते. शिवाय, ही लढाई केवळ भूतकाळातील आठवणींबद्दल नाही तर भावी पिढ्यांसाठी इतिहास परिभाषित करण्याबद्दलही आहे. दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी भाजप प्रादेशिक चिन्हे स्वीकारण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचेही दिसून येते, तर द्रमुक ही प्रादेशिक ओळख वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

चोल सम्राट राजेंद्र प्रथम यांच्या वारशावरील हा संघर्ष दर्शवितो की इतिहास हा केवळ भूतकाळाचा विषय नाही तर वर्तमानाच्या राजकारणासाठी एक शस्त्र बनतो. द्रमुक आणि भाजप दोघेही राजेंद्र प्रथम यांना त्यांच्या संबंधित वैचारिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा संघर्ष येत्या काळात तामिळनाडूच्या राजकारणात अधिक वैचारिक आणि सांस्कृतिक वादविवाद भरेल.


तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुतीकोरिन ते गंगाईकोंडा चोलापुरम ही भेट विकास आणि सांस्कृतिक प्रतीकात्मकतेचे संतुलित उदाहरण आहे. एकीकडे, ते दक्षिण तामिळनाडूला मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प भेट देत आहेत, तर दुसरीकडे, ते तमिळ इतिहास आणि अस्मितेच्या सर्वात गौरवशाली अध्यायांपैकी एक असलेल्या चोल सम्राट राजेंद्र प्रथम यांच्या स्मृतीचा सन्मान करत आहेत. तामिळनाडूच्या राजकारणावर भाजपची पकड मजबूत करण्यासाठी आणि प्रादेशिक ओळख राष्ट्रीय चर्चेशी जोडण्यासाठी हे पाऊल एक महत्त्वाचे धोरणात्मक प्रयत्न मानले जाऊ शकते.

प्रफुल्ल फडके/ अन्वय



काँग्रेस स्वत:चे नुकसान करते आहे


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा उलटला आहे आणि या आठवड्यात विरोधक बिहारमध्ये मतदार यादीची विशेष सघन पुनरावृत्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून दोन्ही सभागृहांत गोंधळ घालत राहिले. त्यामुळे संसदेबाहेरही हा गोंधळ निर्माण झाला.


राहुल गांधींनी विशेषत: निवडणूक आयोगावर निशाणा साधला. अलीकडेच त्यांनी असेही म्हटले होते की, कर्नाटकातील एका मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. त्यांनी एक प्रकारे निवडणूक आयोगाला धमकी दिली आहे की, जी एक संवैधानिक संस्था आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वात प्रभावशाली नेते असल्याने पक्षाचे इतर नेतेही त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यात गुंतले आहेत.

असे दिसते की, विरोधी पक्षाने मतदार यादी पडताळणीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गोंधळ सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे. कदाचित सत्ताधारी पक्षाने देखील हे मान्य केले असेल की, विरोधी पक्ष या मुद्द्यासह इतर काही मुद्द्यांवर गोंधळ सुरूच ठेवेल. या गोंधळात ते काही विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. संकुचित राजकीय हितसंबंध पूर्ण करण्यासाठी संसदेत आणि बाहेर विविध मुद्द्यांवर गोंधळ निर्माण करणे ही विरोधकांची सवय बनली आहे. गेल्या ८-१० वर्षांत अशी सवय अधिक दिसून आली आहे.


या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी, निवडणूक आयोगाने या राज्यातील मतदार यादी पडताळणी करणे आवश्यक मानले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता त्यांनी असेही म्हटले आहे की, ते देशभरातील मतदार याद्यांची पडताळणी करतील, कारण कोणत्याही निवडणुकीत केवळ वैध मतदारांनाच मतदानाचा अधिकार असणे आवश्यक आहे. हे खरे आहे. जे लोक वैध मतदार नाहीत किंवा इतरत्र कायमचे स्थायिक झाले आहेत किंवा परदेशातील लोक आणि अगदी घुसखोरदेखील निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतात याचा अर्थ काय?

विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, मतदार बनलेल्या किंवा चुकीच्या मार्गाने मतदार बनवलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार कसा दिला जाऊ शकतो? निवडणूक आयोगाला असे आढळून आले आहे की, बिहारमध्ये ६० लाखांहून अधिक लोक आहेत, ज्यांना या राज्यात मतदानाचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाने अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे का? ज्यांना भारताचे नागरिक नसल्याचा संशय आहे किंवा त्यांनी विशिष्ट राज्य सोडून इतरत्र कायमचे स्थायिक झाले आहे, अशा लोकांना मतदान करण्याची परवानगी का द्यावी? हे कोणापासून लपलेले आहे का की, सर्वत्र मतदार यादीत अशा अनेक लोकांची नावे आहेत जे मरण पावले आहेत किंवा इतरत्र स्थायिक झाले आहेत. अनेक वेळा इतर लोक त्यांच्या जागी मतदान करतात.


निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करावी का? सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या नेत्यांचे युक्तिवाद योग्य नसल्याचे विरोधी पक्ष लक्षात घेण्यास नकार देत आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीची प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला. त्यांनी निवडणूक आयोगाला काही सूचना दिल्या, ज्यांच्याशी आयोग सहमत नाही. त्यांच्या आक्षेपाचे समर्थन करण्यासाठी, विरोधी पक्ष असा युक्तिवाद करत आहेत की, निवडणूक आयोगाने बिहारमधील लोकांना पुरेसा वेळ दिला नाही. ते असेही विचारत आहेत की आयोग विधानसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया का पूर्ण करू इच्छित आहे, परंतु ही अन्याय गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने मतदार याद्या सुधारू नयेत?

हे खरे आहे की, बिहारमधील मोठ्या संख्येने लोकांना निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावृत्ती प्रक्रियेत सहभागी व्हावे लागले आहे, परंतु जनतेचे काही अधिकार आणि कर्तव्ये देखील आहेत. विरोधी पक्ष आणि विशेषत: राहुल गांधी असे वातावरण निर्माण करण्यात व्यस्त आहेत की, निवडणूक आयोग मागच्या दाराने भाजपला मदत करत आहे आणि मोदी सरकारच्या इशाºयावर सर्वकाही करत आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेत कथित हेराफेरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगानेही त्यांना उत्तर दिले आहे, पण ते आणि त्यांचे सहकारी काहीही समजून घेण्यास तयार नाहीत.


विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेस मतदार याद्यांच्या पडताळणीसारख्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात व्यस्त आहेत जे सामान्य लोकांचे प्राधान्य नाहीत. असे दिसते की काँग्रेसने हे मान्य केले आहे की, स्वत:च्या कारणांमुळे कमकुवत होत चाललेला राजकीय पाया मजबूत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सरकार आणि संवैधानिक संस्थांवर खोटे आरोप करणे. यामुळे काँग्रेस आणखी कमकुवत होईल, कारण सामान्य लोकांना त्यांचे हित आणि नुकसान चांगले समजते.

राहुल गांधींनी काँग्रेसला अजूनही तिचा गमावलेला राजकीय पाया परत मिळवता येईल याकडे लक्ष दिले तर बरे होईल, कारण तिच्याकडे सुमारे २० टक्के मते आहेत. काँग्रेस निवडणुकीत विजय आणि पराभव होतात आणि भाजपही निवडणुकीत हरतो या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका जिंकू शकली नाही. पश्चिम बंगालमध्ये ती अपयशी ठरली. भाजप तिच्यापेक्षा मजबूत होत आहे ही काँग्रेसची स्वत:ची कमजोरी आहे. जर काँग्रेसने आपला दृष्टिकोन सुधारला नाही, तर त्याच्यासोबत उभे असलेले प्रादेशिक पक्ष तिचे उर्वरित राजकीय पाया काबीज करतील. अनेक राज्यांमध्ये, प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला आधीच कमकुवत केले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजप निवडणुका जिंकत आहे, असा निराधार प्रचार करणे योग्य नाही हे काँग्रेसने समजून घेतले तर बरे होईल.

अ‍ॅशले मॅडिसन सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा


अ‍ॅशले मॅडिसनच्या सर्वेक्षणानुसार आता भारतातील लहान शहरे आणि गावेही बेवफाईच्या बाबतीत मोठ्या शहरांना कडक स्पर्धा देत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त दोन लाख लोकसंख्या असलेले तामिळनाडूतील कांचीपुरम हे भारतात ‘बेवफाईची राजधानी’ म्हणून उदयास आले आहे, तर दिल्ली दुसºया आणि गुरुग्राम तिसºया क्रमांकावर आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे. काही प्रकार फसवणूक करण्याच्या हेतूने होतात, तर काही प्रकार जाणूनबुजून केला जातो. पण यात शहरी आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक दरी कमी झालेली आहे हे एक निरीक्षण फार महत्त्वाचे आहे.


लग्नात फसवणूक करणे आता मोठ्या शहरांचा ट्रेंड राहिलेला नाही, लहान शहरे आणि गावातील लोकही ‘फसवणूक’च्या या खेळात उत्साहाने सहभागी होत आहेत. विवाहबाह्य संबंध आता गावातील लग्नांमध्येही एक सामान्य बाब बनले आहेत. ही काही बनवलेली गोष्ट नाही, विवाहित लोकांसाठी बनवलेल्या खास डेटिंग अ‍ॅप ‘अ‍ॅशले मॅडिसन’च्या अलीकडच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, आता लहान शहरे आणि गावातील लोक त्यांच्या जोडीदारांना फसवण्यात मोठ्या शहरांतील लोकांना जोरदार अशी स्पर्धा करत आहेत. तथापि, कठीण स्पर्धा असूनही, शहरातील लोकदेखील या बाबतीत मागे नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातील लोक साधे आणि शहरातील बेरकी, फसवणूक करणारे हे समीकरण बदलून आता सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. हे सत्य अत्यंत चिंताजनक आहे. धोका शहरातही आहे, तितकाच तो ग्रामीण भागातही आहे. पूर्वी कथा, कादंबºया आणि चित्रपटांमधून मुलींना फसवणे, फसवून विवाह करण्यासाठी धडपडणारे हे मुंबईसारख्या महानगरातून येत असत. पण या सर्वेक्षणात मुंबई ही स्वच्छ असल्याचे दिसून आलेले आहे.

अलीकडच्या काळात भारत अ‍ॅशले मॅडिसनसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. जून २०२५च्या साइनअप डेटानुसार, भारतातील टियर-२ आणि टियर-३ शहरांचे लोक ‘गुप्त प्रेमसंबंध’ ठेवण्याच्या बाबतीत मेट्रो शहरांच्या लोकांना मागे टाकत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तामिळनाडूतील एक लहान शहर कांचीपुरम, ज्याची एकूण लोकसंख्या फक्त दोन लाख आहे, यामध्ये अव्वल आहे. छोटी शहरे किंवा ग्रामीण भाग हा एकांतासाठी किंवा गुप्तता राखण्यासाठी निवडला जात आहे का? म्हणजे ज्याप्रमाणे रेव्हपार्ट्या, किंवा काही अनैतिकी पार्ट्या आयोजित करण्यासाठी फार्म हाऊसचा वापर केला जातो, त्याप्रमाणे अशा छोट्या शहरांचा वापर केला जात आहे का?


जरी तामिळनाडूतील कांचीपुरम त्याच्या सुंदर साड्या आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध होते, परंतु आता ते भारताचे नवीन अफेअर झोन बनल्यानंतर चर्चेत आहे. अ‍ॅशले मॅडिसनच्या जून २०२५च्या आकडेवारीनुसार, भारतातील २० जिल्ह्यांमध्ये कांचीपुरम हे शीर्षस्थानी आहे, जिथे विवाहित लोक या डेटिंग अ‍ॅपवर सर्वाधिक साइन अप करत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तामिळनाडूचे हे छोटे शहर गेल्या वर्षी १७ व्या क्रमांकावर होते आणि यावर्षी ते थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

कांचीपुरमनंतर मोठ्या मनाच्या लोकांची दिल्ली दुसºया क्रमांकावर आहे. येथे राहणाºया लोकांची हृदये एकाच वेळी अनेक लोकांसाठी धडधडतात. तिसºया क्रमांकावर दिल्लीला लागून असलेले गुरुग्राम आहे, जे राजधानीच्या सहवासाने प्रभावित आहे.


दिल्लीचे सहा जिल्हे आणि एनसीआरमधील ३ शहरे, गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा हे सर्व टॉप २० मध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय, जयपूर, रायगड आणि चंडीगड सारखी टियर-२ शहरे आता डेटिंग तसेच अफेअर्सच्या क्षेत्रात दिल्लीसोबत बरोबरी करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माया नगरी मुंबईचे नाव टॉप २० मध्ये समाविष्ट नाही. ही गोष्ट खरोखरच कौतुकाची म्हणावी लागेल. विशेषत: धार्मिक स्थळांवर असणाºया निवासस्थानांचा वापर अशा संबंधांसाठी होत आहे काय याचा तपास करावा लागेल किंवा शहरातील मोठमोठी महागडी निवासस्थाने परवडत नसल्याने अनैतिक संबंध ठेवणारे अशा छोट्या शहरांचा किंवा ग्रामीण भागांचा शोध घेत आहेत काय याचाही तपास करावा लागेल.

फक्त साइनअप नाही, एप्रिलमध्ये अ‍ॅशले मॅडिसनने you gov  सहकार्याने एक सर्वेक्षण केले, तेव्हा आणखी एक खुलासा झाला. भारत आणि ब्राझील अशा दोन देशांमध्ये आहेत जिथे ५३ टक्के लोकांनी उघडपणे कबूल केले की, त्यांचे प्रेमसंबंध आहेत. अ‍ॅशले मॅडिसनचे मुख्य धोरण अधिकारी पॉल केबल म्हणाले की, ‘भारत नातेसंबंधांची व्याख्या पुन्हा परिभाषित करत आहे.’ त्यांच्या मते, भारत त्यांच्या जागतिक बाजारपेठेत सहाव्या क्रमांकावर आहे आणि वर्षाच्या अखेरीस ते आणखी वर जाण्याची अपेक्षा आहे. ते असेही म्हणाले, ‘आम्ही लोकांना न सांगता, सुरक्षितपणे, गोपनीयपणे आणि निर्णय न घेता त्यांचे नाते एक्सप्लोर करण्याचा पर्याय देतो.’


त्यामुळे विवाहबाह्य संबंध ही समस्या न राहता एक फॅशन होऊ पाहत आहे. किंबहुना ती जीवनशैली बनत आहे. सेकंड होम असते तशी सेकंड फॅमिली करण्याचा ट्रेंड वाढत आहे ही बाब चांगली की चिंताजनक याचा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. पण टिव्ही मालिकांमधील एकही मालिका अशी नाही की, ज्यात विवाह बाह्य संबंधांचे समर्थन, कथानक नाही. त्यामुळे यातून अनुकरणाची प्रवृत्ती वाढत असेल, तर अशा मालिकांवर बंदी घालावी का याचा विचार समाजधुरिणांनी केला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/अन्वय


शनिवार, २६ जुलै, २०२५

मोदींच्या मालदीव भेटीमुळे हिंदी महासागरात भारताची पकड मजबूत


२०२३ मध्ये जेव्हा मोहम्मद मुइज्झू सत्तेवर आले तेव्हा त्यांनी ‘इंडिया आउट’ मोहिमेला उघडपणे पाठिंबा दिला आणि भारतीय लष्करी उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या सुरुवातीच्या परदेश दौºयांवरून असेही दिसून आले की, मालदीव आता चीनच्या जवळ जात आहे. परंतु भारताने कोणतीही घाईघाईने पावले उचलली नाहीत. उलट, त्यांनी वाढीवतेवर सहभाग (संवाद, संघर्ष नाही) धोरण स्वीकारले. भारताने संरक्षण कर्मचाºयांच्या जागी तांत्रिक तज्ज्ञांची नियुक्ती केली, ज्यामुळे मालदीवच्या ‘सार्वभौमत्वाच्या’ चिंता दूर झाल्या, परंतु धोरणात्मक उपस्थिती कायम ठेवली. त्याच वेळी, विकास प्रकल्प शांतपणे पुढे नेण्यात आले, जेणेकरून सामान्य लोकांना भारताच्या भूमिकेचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय, ३० अब्ज रुपयांची क्रेडिट लाइन, चलन स्वॅप आणि ट्रेझरी बिल यासारख्या आर्थिक मदतीमुळे मालदीवच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. तसेच, सांस्कृतिक, राजकीय आणि पक्षस्तरीय सहभाग पुन्हा सुरू करण्यात आला, जेणेकरून भारत आणि मालदीवमधील बहुस्तरीय संपर्क अबाधित राहतील.


याशिवाय, २०२४-२५ मध्ये, भारताने नवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी मागील विकास कार्यक्रम जलद गतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले. हनिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प यासारखी मोठी बांधकाम कामे याची उदाहरणे आहेत. चीनसमर्थीत बंदर राजकारणाला पर्याय म्हणून हे केवळ आर्थिकच नाही तर धोरणात्मकही आहेत.

तसे पाहिले तर, भारताच्या धोरणात प्रचंड राजनैतिक परिपक्वता होती. मुइज्झूच्या चिथावणीनंतरही, भारताने भावनिक प्रतिक्रिया दिली नाही, तर दीर्घकालीन धोरणात्मक विचारसरणीने पुढे सरकला. पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी आलेले लोक आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या मुइज्झूचा आनंद पाहण्यासारखा होता. मालदीवसारख्या देशात, राष्ट्रपती स्वत: विमानतळावर राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करतात ही परंपरा राहिलेली नाही. विमानतळावर पंतप्रधान मोदींचे वैयक्तिकरीत्या स्वागत करणारे मुइज्झू अनेक खोल संदेश देतात. उदाहरणार्थ, ‘इंडिया आउट’ मोहिमेतून हा पूर्णपणे यू-टर्न आहे. आता राष्ट्रपती स्वत: भारताच्या सर्वोच्च नेत्याचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत. याशिवाय, मुइज्झू हे दाखवू इच्छितात की, आता भारतासोबतचे सहकार्य राष्ट्रीय हिताचे आहे. हा देशवासीयांना एक संकेत आहे की, भारत शत्रू नाही तर मदतनीस आहे. हा एक राजनैतिक संकेतही आहे की, चीनने कितीही प्रयत्न केले तरी मालदीवच्या परराष्ट्र धोरणात भारत अजूनही सर्वोच्च आहे.


याशिवाय, मालदीवची राजधानी माले येथे भारताच्या मदतीने बांधलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर पंतप्रधान मोदींचे चित्र लावणे हेही एक महत्त्वाची घडामोड आहे. हे केवळ भारताच्या संरक्षण मदतीची स्थिरता दर्शवत नाही तर मालदीवच्या लोकांना हेही दर्शवते की चीन कर्ज देतो, परंतु भारत सुरक्षा आणि स्थिरता देतो. तसे पाहिले तर, हा भारताच्या सॉफ्ट पॉवरचा विजय आहे, जो कोणत्याही लष्करी शस्त्र किंवा बंदर करारापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मोदींच्या मालदीव भेटीचा परिणाम पाहता, हे स्पष्ट झाले आहे की, भारत अजूनही मालदीवसाठी एक धोरणात्मक प्राधान्य आहे. तसेच, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशसारखे शेजारी देश हे पाहत आहेत की, भारत कोणत्याही धमकीशिवाय, कर्जाच्या सापळ्याशिवाय सहकार्य आणि स्थिरतेचा मार्ग देतो. याशिवाय, हिंदी महासागराच्या व्यापक धोरणात्मक देखरेखीसाठी मालदीवचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. मोदींच्या भेटीनंतर, भारताची उपस्थिती आणि वैधता तेथे स्थिर आणि कायदेशीर झाली आहे- हे चीनसाठी एक धोरणात्मक प्रतिबंधक आहे.


स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणात ‘मुख्य पाहुणे’ म्हणून एखाद्या गैरएमडीपी सरकारने भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे केवळ परस्पर आदराचे लक्षण नाही, तर भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणाच्या यशाचा पुरावाही आहे. तसेच, पंतप्रधान मोदींचा हा राज्य दौरा हा सरकार प्रमुखाचा पहिलाच राज्य दौरा आहे, ज्याचे आयोजन नोव्हेंबर २०२३ मध्ये राष्ट्रपती मुइज्झू करत होते. मालदीवमध्ये अशी परंपरा आहे की, नवीन राष्ट्रपती होणारी व्यक्ती प्रथम भारताला भेट देते, परंतु मुइज्झूची पहिली भेट तुर्कीला होती, त्यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीला गेले. त्यानंतर त्यांनी चीनलाही खूप प्रसिद्धी दिली, पण जेव्हा त्यांना इतरांच्या कर्जाच्या सापळ्यात आणि भारताच्या नि:स्वार्थ मदतीतील फरक समजला तेव्हा त्यांनी गेल्या वर्षी दोनदा भारताला भेट दिली आणि आता त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही परदेशी राष्ट्रप्रमुखाचा पहिलाच राजकीय दौरा केला आहे. पण ज्या व्यक्तीने त्यांना आमंत्रित केले आहे ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

अशा प्रकारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीव दौरा हा केवळ प्रतीकात्मक नाही तर धोरणात्मक दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ही भेट द्विपक्षीय संबंधांमधील कटुतेनंतर ‘पुनर्स्थापना’चे संकेत देतेच, परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनातून भारत त्याच्या शेजारील देशांशी संबंध कसे हाताळतो हेही दर्शवते. तथापि, पंतप्रधान मोदींचा हा दौरा केवळ द्विपक्षीय संबंधांच्या ६० वर्षांचा उत्सव नाही तर येणाºया दशकांसाठी दिशा निश्चित करतो. भारत आणि मालदीवमधील संबंध आता केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भागीदारी राहिलेले नाहीत- ते सागरी सुरक्षा, विकास आणि प्रादेशिक संतुलनाचे मजबूत आधारस्तंभ बनत आहेत. ही भेट स्पष्ट संकेत देते की, भारत टीकेला बळी न पडता त्याच्या शेजारील भागात स्थिरता आणि सहकार्यासाठी वचनबद्ध आहे. आणि हे कोणत्याही परिपक्व जागतिक शक्तीचे सर्वात मोठे लक्षण आहे.


प्रफुल्ल फडके/ अन्वय


भारत केंद्रीत इतिहास लेखन आवश्यक


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अलीकडेच इयत्ता ८ वीच्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी, इंडिया अँड बियॉन्ड’ या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात काही बदल केले आहेत. या उपक्रमाचा मूळ उद्देश इतिहास, भूगोल, आर्थिक जीवन आणि शासन यासारख्या विषयांना एकत्रित करून विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या सामाजिक विकासाची समग्र समज विकसित करणे आहे.


हे पुस्तक वर्षानुवर्षे मागणी असलेल्या संतुलित इतिहास लेखनाच्या दिशेने एक ठोस प्रयत्न असल्याचे दिसते. या पुस्तकात १३व्या ते १७व्या शतकापर्यंतचा मध्ययुगीन इतिहास तपशीलवार सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिल्ली सल्तनतचा उदय आणि पतन, समकालीन प्रतिकार, त्या काळातील राजकीय अस्थिरता, लष्करी मोहिमा, विजयनगर साम्राज्य, मुघल आणि त्यांचा प्रतिकार, मराठे आणि शिखांचा उदय इत्यादींचे ऐतिहासिक पुराव्यांवरून विश्लेषण करण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तके समकालीन आणि भारतकेंद्रित करणे ही काळाची गरज आहे. भारतीयांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी हे आवश्यक आहे. दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये निवडक पद्धतीने का शिकवला जावा? खानवाच्या लढाईत, चंदेरीच्या लढाईत, घाघ्राच्या लढाईत आणि इतर अनेक आक्रमणांमध्ये बाबरने नरसंहार आणि लूटमार केली. युद्धानंतर मारल्या गेलेल्या हिंदूंच्या कवटीचे मनोरे उभारण्याची बाब त्याच्या ‘बाबरनामा’ या आत्मचरित्रात तपशीलवार नोंदवली आहे.


आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबराच्या कथित महानतेचे अशा प्रकारे कौतुक केले गेले आहे की जर त्याच्या नावापुढे ‘महान’ हे विशेषण जोडले नाही तर काहीतरी गहाळ झाल्यासारखे वाटते. सत्य हे आहे की, १५६८ मध्ये चित्तोड किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान त्याने सुमारे तीस हजार हिंदूंची कत्तल केली, ज्यात महिला, मुले आणि अगदी शेतकरीही होते. ९ मार्च १५६८ रोजी अकबराने स्वत: प्रकाशित केलेले फतेहनामा-ए-चित्तोड या तथ्यांची साक्ष देते. १५९८मध्ये संकलित केलेल्या मुन्शत-ए-नमकीनमध्येही हा फतेहनामा समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचे संकलक अकबराचे दरबारी मीर अब्दुल कासिम नमकीन होते. अकबराचे समकालीन आरिफ मोहम्मद कंधारी यांनीही त्यांच्या तारिख-ए-अकबरी या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

अकबराच्या सर्वात प्रमुख दरबारींपैकी एक असलेल्या अबुल फजल यांचे ‘ऐन-ए-अकबरी’ आणि ‘अकबरनामा’ आणि इमाम अब्दुल कादिर बदाऊनी यांचे ‘मुंतखब-उत-तवारीख’ ही पुस्तकेही त्याच्या क्रूरतेच्या, धार्मिक कट्टरतेच्या आणि कामुकतेच्या अतिरंजित तपशिलांनी भरलेली आहेत. असे असूनही चित्रपट आणि इतिहासात त्याला एक आदर्श नायक म्हणून सादर केले गेले होते, तर अबुल फजलच्या मते, ‘अकबरच्या हरममध्ये सुमारे पाच हजार महिला होत्या आणि या पाच हजार महिला त्याच्या ३६ पत्नींपेक्षा वेगळ्या होत्या.’ तो सुंदर महिलांना पळवून नेण्यासाठी आणि त्यांना त्याच्या वासनेचा बळी बनवण्यासाठी मीना बाजार आयोजित करत असे. त्याच्या क्रूरतेच्या यातनामय प्रक्रियेतून सुटण्यासाठी आणि त्यांची ओळख आणि स्वाभिमान जपण्यासाठी, हिंदू महिला जळत्या चितेत स्वत:ला जाळून जौहर करणे हे जीवापेक्षाही सन्माननीय मानत असत.


स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांपर्यंत पाठ्यपुस्तकांमध्ये अशा कमकुवत आणि बर्बर शासकाला कोणत्या मानसिकतेने महान म्हणून शिकवले जात होते आणि मातृभूमी, स्वराज्य, स्वधर्म आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी लढणाºया महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या योद्ध्यांना जाणूनबुजून लहान असल्याचे सिद्ध केले जात होते? छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप किंवा इतर कोणत्याही सनातनी शासकाने धर्म किंवा पूजेच्या आधारावर गैरसनातनी अनुयायांशी भेदभाव केला असेल किंवा त्यांची कत्तल केली असेल किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केली असतील असे एकही उदाहरण सापडणार नाही. मग धर्माच्या आधारावर गैरमुस्लिमांचा नरसंहार करणारे मुघल कसे महान झाले? भारताचा खरा इतिहास शिकवला जायला हवा. छत्रपती शिवरायांचा आदर्श जगाला मान्य असताना आमच्या इतिहासात मोगलांना जेवढे स्थान दिले गेले आहे तेवढे महाराजांना का नाही दिले गेले? स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे हेच शिकवले गेले. या संकुचित मनोवृत्तीला बदलण्याची गरज आहे.

हे सर्वमान्य सत्य आहे की, औरंगजेब तलवारीच्या बळावर हिंदुस्थानला दारुल हराममधून दारुल इस्लाममध्ये रूपांतरित करू इच्छित होता. त्याच्या दृष्टीने प्रत्येक हिंदू फक्त आणि फक्त काफिर होता, ज्याचा रक्तपात करणे, ज्यांची मंदिरे नष्ट करणे, ज्यांचा विश्वास निर्दयीपणे चिरडणे हे तो आपले ‘शुद्ध आणि धार्मिक कर्तव्य’ मानत होता. १२ एप्रिल १६६९ रोजी त्याने हिंदूंवर जिझिया कर लादण्याचा आदेश दिला. औरंगजेबाने हिंदू सणांवर बंदी घातली होती आणि तो जिवंत असेपर्र्यंत हिंदूंना दिवाळी साजरी करता येत नव्हती किंवा उघडपणे होळी खेळता येत नव्हती. त्याने त्याच्या संपूर्ण राज्यातील हिंदू मंदिरे, शैक्षणिक केंद्रे आणि पवित्र स्थळे पाडण्याचा आदेश दिला होता. त्याच्या आदेशानुसार काशीचे विश्वनाथ मंदिर, मथुराचे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि पाटणचे सोमनाथ मंदिर यासह हजारो मंदिरे पाडण्यात आली. १६८८ मध्ये त्याने हिंदूंसाठी पालखी, हत्ती आणि घोडे बंदी घातली आणि शस्त्रे बाळगणे हा गुन्हा घोषित केला. औरंगजेबाच्या हिंदूंवरील बर्बर आणि क्रूर अत्याचारांचे तपशीलवार वर्णन त्याच्या एका दरबारी मुहम्मद साकी मुस्तैद खान यांनी लिहिलेल्या ‘मासिर-ए-आलमगिरी’ या पुस्तकात वाचता येते. हत्याकांड करणाºयांचे गौरव करणे थांबवण्याची आणि स्वत:, मालमत्तेवर आणि भारतावर केंद्रित इतिहास पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे. भारताचा खरा आणि अचूक आदर्श व्यक्तींचा इतिहासच अभ्यासक्रमात असला पाहिजे. 

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

राजकीय खळबळ वाढवणारा राजीनामा


उपराष्ट्रपती होण्यापेक्षा जगदीप धनखड यांचा राजीनामा अधिक आश्चर्यकारक आहे. हे दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद ना कोणालाही असेच दिले जाते आणि ना कोणी ते असेच सोडत आहे. जनता दलातून राजकारण सुरू करणारे आणि काँग्रेसमार्गे भाजपमध्ये आलेले धनखड, प्रथम राज्यपाल आणि नंतर उपराष्ट्रपती होणे आश्चर्यकारक होते. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्यामागे त्यांनी आरोग्याला प्राधान्य दिल्याचे कारण सांगितले, परंतु त्याबाबत सर्व प्रकारच्या चर्चा आहेत. त्यामुळे हा राजीनामा राजकीय खळबळ माजवणारा असाच आहे.


जर आरोग्याच्या कारणास्तव लोक राजीनामा स्वीकारू शकत नसतील, तर त्याचे कारण नेत्यांची सत्तेची लालसादेखील आहे. पद तर सोडाच, देशात असे फारसे नेते नाहीत ज्यांनी स्वेच्छेने राजकारण सोडले आहे. तथापि, या वर्षी मार्चमध्ये अँजिओप्लास्टी झाल्यानंतरही धनखड यांची स्पष्टवक्तेपणाची सवयही कमी झाली नाही.

न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरातून रोख रकमेच्या वसुलीचा मुद्दा असो किंवा राज्य सरकारांच्या विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ मर्यादा असो, त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे भाष्य केले आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत आणीबाणीच्या काळात जोडलेले समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढून टाकण्याची मागणी आणि एक देश-एक निवडणूक यांसारख्या राजकीय मुद्द्यांवर ते गप्प राहिले नाहीत. विरोधी पक्षांनी धनखड यांच्या अशा विधानांना सरकार आणि भाजपच्या अजेंडाशी जोडलेले असल्याचे म्हटले आणि धनखड यांना सातत्याने लक्ष केले होते.


धनखड हे आजवरचे सर्वात बोलके आणि कदाचित वादग्रस्त उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यभागी संसदेच्या अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे ते पहिले उपराष्ट्रपती आहेतच पण, ते राज्यसभेचे अध्यक्षदेखील आहेत की ज्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पक्षपाती वर्तनाचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करणारे विरोधी पक्ष आता त्यांचे कौतुक करत आहेत आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अर्थात राजकारणाचे हे संधीसाधू स्वरूप आहे. अशा बोलक्या व्यक्तीच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, परंतु पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जगदीप धनखड यांच्याशिवाय क्वचितच कोणाला यामागचे सत्य माहिती आहे. विरोधी गटाकडून दोन परस्परविरोधी कथांना खतपाणी घातले जात आहे.


पहिले बिहारला लक्ष्य करण्यासाठी एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत, नितीश कुमार यांना पुढील उपराष्ट्रपती बनवून, बिहारी ओळखीच्या नावाखाली विधानसभा निवडणुका जिंकून त्यांना बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा होईल. दुसरे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत सभागृहनेते जे. पी. नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या वर्तनामुळे दुखावल्यानंतर धनखड यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या व्यवसाय सल्लागार समितीच्या दुसºया बैठकीला नड्डा आणि रिजिजू न आल्याने धनखड नाराज होते, असेही म्हटले जात आहे.

उपराष्ट्रपती असल्याने ते राज्यसभेचे अध्यक्ष आणि सभागृहाचे संरक्षकदेखील होते. सभागृहाच्या कामकाजात काय नोंदवले जाईल आणि काय नाही हे ठरवणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. नड्डा यांनी त्यांच्या आसनावर बसून विरोधकांना ज्या पद्धतीने इशारा दिला होता, त्यामुळे धनखड यांना कदाचित वाईट वाटले असेल. नड्डा म्हणाले होते की, त्यांचे विधान रेकॉर्डवर येणार नाही. धनखड यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाची सूचना सरकारशी चर्चा न करता मंजूर केल्याबद्दल आणखी एक चर्चा सगळीकडे होत आहे.


भावना दुखावण्यासाठी कोणतेही निश्चित मानक नसले तरी, जगदीप धनखड यांची प्रतिमा रागाच्या भरात निर्णय घेणाºया नेत्यासारखी नाही, अन्यथा ते उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले नसते. मग धनखड यांच्या राजीनाम्यामागे खरोखरच काहीतरी सुनियोजित रणनीती आहे का? भाजपच्या राजकीय शैलीकडे पाहिले तर तिथे काहीही योगायोगाने घडत नाही.

भाजप इतर पक्षांमधून येणाºया नेत्यांना सहजासहजी महत्त्वाची पदे देत नाही. या प्रकरणात हेमंत बिस्वा सरमा, सत्यपाल मलिक आणि धनखड यांच्यासारखे फार कमी अपवाद आहेत. ईशान्येकडील भाजपच्या विस्तारात त्यांच्या भूमिकेचे बक्षीस म्हणून, माजी काँग्रेस नेते हेमंत आता आसामचे मुख्यमंत्री आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून, धनखर यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संघर्ष सतत चर्चेत होता. विरोधी पक्ष उपाध्यक्षपदाच्या त्यांच्या नियुक्तीचा संबंध त्याशी जोडतात, परंतु सत्यपाल मलिक यांनी भाजपच्या विश्वासार्हतेला तितकेच नुकसान केले आहे जितके विरोधी पक्ष करू शकले नाहीत.


दोन वर्षांपूर्वी जेव्हा धनखड उपराष्ट्रपती झाले, तेव्हा असे म्हटले जात होते की भाजप संतप्त शेतकºयांना, विशेषत: जाट समुदायाला शांत करू इच्छित होते. भाजपने निवडणूक हिताचे किती काम केले याचे विश्लेषण केले असेल. धनखड यांची नवीन भूमिका काय असेल आणि नवीन उपराष्ट्रपती कोण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याबद्दलही सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत.

जर उपराष्ट्रपतीपदाच्या माध्यमातून निवडणुकीची सूत्रे रचायची असतील, तर भाजपला दक्षिण भारतातील एका नेत्याला राजमुकूट मिळवून द्यायचा असेल, जिथे त्यांचा एकमेव सत्तेचा किल्ला कर्नाटकही कोसळला आहे. भूतकाळातील अनुभवावरून भाजपचे राजकारण, रणनीती आणि व्यवस्थापन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नजीकच्या भविष्यात अनेक मोठे बदल होणार आहेत. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची बºयाच काळापासून वाट पाहिली जात आहे. संघटना, मंत्रिमंडळ आणि सत्तास्थापनेत मोठे बदल दिसले तर आश्चर्य वाटू नये.

भारताच्या यूपीआयने अमेरिकेच्या व्हिसाला मागे टाकले


अलीकडच्या काळात भारत विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर दररोज नवीन विक्रम करत आहे. काही क्षेत्रांमध्ये भारत आता संपूर्ण जगात आघाडीवर असल्याचे दिसून येते. बँकिंग व्यवहारांच्या बाबतीत भारताने क्रांती घडवून आणली आहे. अलीकडच्या काळात आर्थिक क्षेत्रात भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (वढक)????????? ने दररोज होणाºया आर्थिक व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर अमेरिकेच्या ६७ वर्षे जुन्या व्हिसा आणि मास्टरकार्ड पेमेंट सिस्टमला मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर भारत आता जगातील सर्वात मोठे रिअल टाइम पेमेंट नेटवर्क बनले आहे.


२०१६ पूर्वी भारतात आॅनलाइन पेमेंट म्हणजे फक्त व्हिसा आणि मास्टर कार्ड होते. व्हिसा आणि मास्टर कार्ड चालवणाºया या दोन अमेरिकन कंपन्यांची संपूर्ण जगात आॅनलाइन पेमेंटवर मक्तेदारी होती. व्हिसा १९५८ मध्ये अमेरिकेत सुरू झाला आणि हळूहळू ही कंपनी २०० हून अधिक देशांमध्ये पसरली आणि आॅनलाइन पेमेंटच्या बाबतीत संपूर्ण जगाची मक्तेदारी केली. जागतिक स्तरावर या कंपनीला आव्हान देण्याच्या उद्देशाने भारताने २०१६ मध्ये यूपीआय स्वरूपात स्वत:ची पेमेंट सिस्टम विकसित केली आणि २०२५ पर्यंत भारताची यूपीआय सिस्टम संपूर्ण जगात पहिल्या स्थानावर आली. यूपीआय पेमेंट सिस्टमद्वारे आॅनलाइन बँकिंग व्यवहार क्षणार्धात केले जातात. आज यूपीआय सिस्टमने भाजी विक्रेते, चहा विक्रेते, मदत घेणारे नागरिक आणि कमी प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाºया नागरिकांसाठी आॅनलाइन बँकिंग व्यवहार खूप सोपे केले आहेत. आज भारताच्या यूपीआय प्रणालीद्वारे दररोज ६५ कोटींहून अधिक व्यवहार (दरमहा १८०० कोटींहून अधिक व्यवहार) केले जात आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिसा कार्डद्वारे दररोज ६३.९ कोटी व्यवहार केले जात आहेत. अशाप्रकारे भारताच्या यूपीआयने दैनंदिन व्यवहारांच्या बाबतीत ६७ वर्षांच्या यूएस व्हिसाला मागे टाकले आहे. भारतातील केंद्र सरकारच्या या सर्वात उल्लेखनीय कामगिरीपैकी एक आहे. भारत आता या बाबतीत संपूर्ण जगात आघाडीवर आहे. भारताने अवघ्या ९ वर्षांत हे यश मिळवले आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील भारताच्या यूपीआय प्रणालीचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, हा नवीन तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे आणि ही प्रणाली अत्यंत प्रभावी आहे. भारताची यूपीआय प्रणाली जागतिक बँकिंग नकाशावर भारताला एक खूप मोठी शक्ती बनवू शकते.

भारतातील यूपीआयच्या यशाचा पाया प्रत्यक्षात केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाºया अनेक आर्थिक योजनांद्वारे घातला गेला आहे. सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड बनवल्यानंतर, जेव्हा आधार कार्ड नागरिकांच्या बँक खात्यांशी जोडले गेले आणि देशातील गरीब वर्गाला मदत करण्यासाठी केंद्र सरकार चालवत असलेल्या विविध योजनांतर्गत मदतीची रक्कम थेट नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागली, तेव्हा एका मजबूत पेमेंट सिस्टमची गरज भासू लागली आणि २०१६ मध्ये आॅनलाइन पेमेंट सिस्टम म्हणून यूपीआयचा जन्म झाला. यूपीआय आधार कार्ड आणि प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये उघडलेल्या खात्यांशी जोडले गेले. नागरिकांचे मोबाइल नंबर आणि आधार कार्ड बँक खात्यांशी जोडून यूपीआय सिस्टमद्वारे आर्थिक व्यवहार आणखी सोपे केले गेले. आज भारतातील सुमारे ८० टक्के तरुण आणि वृद्धांनी विविध बँकांमध्ये खाती उघडली आहेत. यूपीआयद्वारे काही मिनिटांत एका बँक खात्यातून दुसºया बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात. यूपीआय आॅनलाइन पेमेंट सिस्टम म्हणून आल्यानंतर आता भारतातील नागरिक एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड विसरू लागले आहेत.


भारताबाहेर राहणारे भारतीय नागरिकदेखील काही मिनिटांत यूपीआयद्वारे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात आॅनलाइन बचत हस्तांतरित करू शकतात. पूर्वी एका देशाच्या बँक खात्यातून दुसºया देशाच्या बँक खात्यात बँकिंग चॅनेलद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी २ ते ३ दिवस लागायचे आणि परदेशी बँकादेखील अशा ट्रान्सफर रकमेवर चार्जेस आकारत असत. आता यूपीआयद्वारे एका देशाच्या बँक खात्यातून दुसºया देशाच्या बँक खात्यात काही मिनिटांत पैसे ट्रान्सफर केले जातात. यामुळे भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण देखील होत आहे. जगातील इतर देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना यूपीआय प्रणालीद्वारे त्यांचे खर्च भागवणे आणि विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये शुल्काची रक्कम जमा करणे खूप सोपे होईल. ज्या देशांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या जास्त आहे अशा देशांमध्ये भारताची यूपीआय प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज या देशांमध्ये राहणाºया भारतीय नागरिकांकडून दरवर्षी १३५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम भारतात पाठवली जात आहे. जागतिक स्तरावर भारताच्या यूपीआय प्रणालीची वाढती स्वीकृती असल्याने, भारताचे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्वदेखील कमी होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रुपयाची मागणी वाढेल आणि विमुद्रीकरणाची प्रक्रिया वेगवान होईल.

भारताने यूपीआय प्रणाली सुरू केली आहे. आज दररोज होणाºया व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत भारताने अमेरिका, चीन आणि संपूर्ण युरोपला मागे टाकले आहे. सध्या संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, ओमान, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि नेपाळ अशा जगातील ७ देशांमध्ये भारताची यूपीआय प्रणाली वापरली जात आहे. या देशांमध्ये राहणारे भारतीय वंशाचे नागरिक यूपीआयद्वारे भारताशी थेट आर्थिक व्यवहार करत आहेत. मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, कंबोडिया, दक्षिण कोरिया, जपान, तैवान आणि हाँगकाँगसारखे आग्नेय देशदेखील भारताच्या यूपीआय प्रणालीचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. युनायटेड किंग्डम, आॅस्ट्रेलिया आणि युरोपीय देशांनीही त्यांच्या देशात भारताची यूपीआय प्रणाली लागू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सायप्रस आणि नामिबिया दौºयादरम्यान या दोन्ही देशांनी भारताला त्यांच्या देशात भारताची यूपीआय प्रणाली सुरू करण्याची विनंती केली आहे. आता जगातील अनेक देशांचा भारताच्या यूपीआय प्रणालीवर विश्वास वाढत आहे आणि जर या देशांनी त्यांच्या देशात भारताची यूपीआय प्रणाली लागू केली, तर यामुळे भारतात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता देखील वाढेल.


- प्रफुल्ल फडके/अन्वय


भारत स्वच्छ उर्जेत जगाला मार्ग दाखवत आहे


हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानादरम्यान स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्याबाबत कोणतीही दुविधा नाही. असे असूनही, जीवाश्म इंधन आणि अक्षय ऊर्जेवरील ही चर्चा अनावश्यक संघर्षात अडकली आहे. यामध्ये, ऊर्जा परिस्थितीवरील संक्रमणाची जटिलता दुर्लक्षित केली जात आहे आणि ही परिस्थिती ग्लोबला साउथ म्हणजेच विकसनशील किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत अधिक दिसून येते.


जीवाश्म इंधनांचा पूर्णपणे त्याग करणे आवश्यक नाही, तर त्यांच्यावर अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जीवाश्म नसलेल्या इंधनांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक वाढवण्याकडे वाटचाल करण्यासाठी संतुलित धोरण आवश्यक आहे. सौर, पवन, जल, अणु आणि जैव-ऊर्जेतील गुंतवणूक ही या धोरणाच्या गाभ्यामध्ये असली पाहिजे.

गेल्या दशकात सौर आणि पवन ऊर्जेचा खर्च ८० टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. यामुळे, अनेक क्षेत्रांमध्ये सौर-पवन ऊर्जेचा खर्च कोळसा आणि वायुआधारित विजेपेक्षा किफायतशीर झाला आहे. अक्षय ऊर्जा केवळ किमतींमध्ये स्थिरता प्रदान करत नाही तर ऊर्जा स्वातंत्र्यही सुनिश्चित करते आहे. ही यंत्रणा एकदा स्थापित झाल्यानंतर, किंमत जवळजवळ नगण्य होते.


हे काही फायदे आहेत जे जीवाश्म इंधन कधीही जुळवू शकत नाहीत. अशा क्षमता भू-राजकीय गतिरोधांनाही सहजपणे तोंड देऊ शकतात, कारण ऊर्जा-समृद्ध प्रदेशांमधील तणाव पुरवठा साखळीवर परिणाम करतात. रशिया-युक्रेन युद्ध हे याचे एक मोठे उदाहरण होते. स्वच्छ देशांतर्गत ऊर्जेमध्ये गुंतवणूक करणारे देश अशा अस्थिरतेपासून वाचू शकतात.

हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी, अक्षय ऊर्जा स्रोतांचा अवलंब करणे अधिक आवश्यक बनले आहे, कारण केवळ जीवाश्म इंधनांमुळे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सुमारे तीन-चतुर्थांश उत्सर्जन होते. हे स्पष्ट आहे की, अक्षय ऊर्जेबाबत आव्हान स्वीकारण्याशिवाय कार्बनपासून मुक्तता मिळवणे कठीण होईल.


इतके व्यापक फायदे असूनही, विकसित देशांनाही त्यांचे स्वच्छ ऊर्जा लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही हे खरे आहे. सुरुवातीला आघाडी मिळवल्यानंतर, युरोपियन युनियनची पावलेही या आघाडीवर डगमगली. राजकीय दबाव, किमतींबद्दल चिंता आणि कार्बन नियमांना वाढता विरोध यासारखे पैलू यासाठी जबाबदार आहेत. अमेरिकेत, अजूनही ६० टक्क्यांहून अधिक वीज जीवाश्म इंधनांपासून निर्माण केली जात आहे. याचा परिणाम असा आहे की, हवामान संकट वाढवण्यासाठी कमीत कमी जबाबदार असलेल्या देशांवर स्वच्छ ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करण्याचा दबाव आहे आणि तेही त्यांना किमान पाठिंबा न देता.

यामुळे विकसनशील देशांसाठी अशक्य परिस्थिती निर्माण होते. हे पाहता, भारत, इंडोनेशिया आणि ब्राझीलसह आफ्रिकेच्या एका चांगल्या भागाच्या दारावर दुहेरी आव्हान ठोठावत आहे. एकीकडे त्यांना कार्बन फूटप्रिंट कमी करायचा आहे आणि दुसरीकडे त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत, लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करायचा आहे. या देशांमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्या वाढ आणि राहणीमानात सुधारणा यामुळे ऊर्जेची मागणी आणखी वाढणे स्वाभाविक आहे.


या परिस्थितीत भारताचे यश उल्लेखनीय आहे. या वर्षी जूनपर्यंत, देशातील एकूण स्थापित वीज क्षमतेच्या ५०.०८ टक्के अक्षय ऊर्जेचा वाटा होता. पॅरिस कराराअंतर्गत राष्ट्रीय निर्धारित योगदान (एनडीसी) वचनबद्धतेसाठी निश्चित केलेल्या लक्ष्याच्या पाच वर्षे आधी हा टप्पा पार करण्यात आला. यामध्ये सौर, पवन, जलविद्युत, जैव आणि अणुऊर्जेचा समावेश आहे. ४८४.८२ गिगावॅटच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये या अक्षय स्रोतांचा वाटा २४२.७८ गिगावॅट होता. कोणत्याही विकसनशील देशासाठी हे एक अत्यंत दुर्मीळ प्रकरण आहे, ज्याने स्वत:साठी निश्चित केलेल्या लक्ष्यापूर्वी असे यश मिळवले आहे. यामध्ये धोरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पीएम-कुसुम आणि पीएम सूर्यघरसारख्या योजनांनी सौर ऊर्जेचा अवलंब करण्यास मदत केली आहे, तर सौर उद्याने आणि पवन कॉरिडॉरमुळे स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत झाली आहे. जैव ऊर्जेच्या विस्तारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. म्हणूनच भारत जी-२० देशांमध्ये सर्वात कमी दरडोई उत्सर्जन करणारा देश राहिला आहे, स्वच्छ ऊर्जेच्या आघाडीवर मोठी झेप घेतली आहे.


भारताची रणनीतीही खूप व्यावहारिक आहे. ते जीवाश्म इंधन अचानक सोडत नाही आणि कोळसा आणि वायूवर आधारित संयंत्रे अजूनही प्रमुख ऊर्जा पुरवठादार आहेत. भारताने २०३० पर्यंत जीवाश्म नसलेली क्षमता ५०० गिगावॅट आणि २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यामुळे त्याला ग्रीड आधुनिकीकरण, ऊर्जा साठवणूक, स्वच्छ तंत्रज्ञान सामग्री पुनर्वापर आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या आधुनिक इंधनांमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल.

चीनही अशा क्षमता प्रदर्शित करत आहे. तो सौर पॅनेल, पवन टर्बाइन आणि इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. तरीही हे दुर्लक्ष करता येणार नाही की तो जगातील सर्वात मोठा उत्सर्जक आहे, त्याच्या अर्ध्याहून अधिक वीज अजूनही कोळशापासून तयार केली जाते.


अक्षय ऊर्जेचा विस्तार आवश्यक आहे, परंतु तो पुरेसा नाही आणि जीवाश्म इंधनांचा विस्तार होत राहिल्याने उत्सर्जन वाढतच राहील. अशा परिस्थितीत, कोळशाची किंमत कमी करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. ही एकच चौकट प्रभावी ठरू शकत नाही. जागतिक दक्षिणेला हे समजून घ्यावे लागेल की, जीवाश्म इंधनांपासून मुक्तता एका रात्रीत मिळवता येत नाही, परंतु त्यांना अक्षय ऊर्जा स्रोतांवरील संसाधने वाढवावी लागतील.

अक्षय ऊर्जेवरील आंतरराष्ट्रीय धोरणात बदलही आवश्यक आहेत. यासाठी, आर्थिक संसाधने आणि तंत्रज्ञान हस्तांतरण प्रदान करण्याचे धोरण केवळ उदारीकरण करावे लागणार नाही, तर अनेक गुंतागुंतीच्या पैलूंचीही काळजी घ्यावी लागेल. भारताचे यश याबाबतीत आशा निर्माण करते. जर भारत हे ध्येय साध्य करू शकला तर जगही त्या दिशेने पुढे जाऊ शकते.

काँग्रेस कोणाची बाजू मांडेल?


मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध प्रारंभिक आरोपपत्र दाखल केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर वड्रांना जाणूनबुजून त्रास देण्याचा आरोप केला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये काँग्रेसची स्थिती इतकी दयनीय झाली आहे की, राहुल यांच्या आरोपानंतर काही दिवसांतच, ईडीने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक केली. ईडीने भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. हा घोटाळा २०१९-२०२२ दरम्यान सुमारे २१६१ कोटी रुपयांच्या बेकायदा वसुलीशी संबंधित आहे. प्रश्न असा आहे की, कोणत्या भ्रष्टाचारासाठी काँग्रेस नेते राहुल, सोनिया आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अखेर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांना द्वेषपूर्ण कारवाईसाठी जबाबदार धरतील.


मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध प्रारंभिक आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ईडीने ११ जणांना आरोपी बनवले आहे. या प्रकरणावर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, गेल्या १० वर्षांपासून या सरकारकडून माझ्या मेहुण्याला त्रास दिला जात आहे. हे आरोपपत्र आहे, त्याच कटाचा आणखी एक भाग. शिखोपूर जमीन व्यवहार प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. ईडीच्या मते, वाड्रा यांनी येथे ३.५३ एकर जमीन फक्त ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली होती, जी वाड्रा यांनी काही काळानंतर ५८ कोटी रुपयांना विकली.

आपल्या मेहुण्यांसाठी बाजू मांडण्यापूर्वी, राहुल गांधी कदाचित विसरले असतील की, सोनिया गांधी आणि त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे खटले सुरू आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाले. ईडीच्या आरोपपत्रात सोनिया गांधी आरोपी क्रमांक १ आणि राहुल गांधी आरोपी क्रमांक २ आहेत. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांनाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. राहुल गांधींना वाड्राच्या प्रकरणात कट दिसतो. परंतु इतर घोटाळ्यांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये काँग्रेसचे मौन हे सिद्ध करते की, काँग्रेस आपल्या भूतकाळाची पुनरावृत्ती करत आहे.


केंद्रात काँग्रेसचे सरकार नाही, परंतु काँग्रेस सत्तेत असलेल्या काही राज्यांमधून भ्रष्टाचाराच्या बातम्या येत राहतात. कोलार-चिक्काबल्लापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (कोमुल)च्या २०२३च्या भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कर्नाटक काँग्रेसचे आमदार केवाय नांजेगौडा यांची १.३२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नांजेगौडा हे कोमुलचे अध्यक्षही आहेत. ईडीच्या मते, कोमुलने घेतलेल्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश होता, परंतु पैसे आणि राजकीय शिफारसींच्या बदल्यात त्यात फेरफार करण्यात आला. संघीय एजन्सीने आरोप केला आहे की, नांजेगौडा यांच्या नेतृत्वाखालील भरती समितीने कोमुलचे व्यवस्थापकीय संचालक केएन गोपाल मूर्ती आणि इतर संचालकांशी संगनमत करून काही कमी पात्र उमेदवारांना फायदा मिळवून दिला, तर पात्र उमेदवारांना वंचित ठेवले.

आज काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्षही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहेत. कर्नाटकात, खर्गे यांचे पुत्र राहुल खर्गे यांच्या नेतृत्वाखालील सिद्धार्थ विहार ट्रस्टवर वाटप केलेल्या जमिनीच्या तुकड्यात छेडछाड केल्याचा आरोप होता. कर्नाटकात भाजपचे सरकार असते तर खर्गे यांच्यावरही भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला असता. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने संशयास्पद परिस्थितीत खर्गे यांच्या कुटुंबाने चालवलेल्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला ५ एकर जमीन दिली होती. विशेष म्हणजे, या परिसरातील संशोधन आणि विकास सुविधांसाठी नियम बनवल्यानंतर काही दिवसांतच खर्गे कुटुंबाने चालवलेल्या ५ एकर जमीन (खर्गे कुटुंबाने चालवलेल्या ट्रस्टला) देण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खर्गे मागे पडले होते. खर्गे कुटुंबाच्या मालकीच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टने वादग्रस्त जागा परत करून भ्रष्टाचारातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला.


असे एकही राज्य नाही जिथे काँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप झालेले नाहीत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर नजर टाकली तर दिल्लीपासून हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ते महाराष्ट्रापर्यंतचे मोठे काँग्रेस नेते सीबीआय, आयकर आणि ईडीसारख्या एजन्सींच्या निशाण्यावर आहेत. तथापि, काँग्रेस आपल्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना नकार देते. भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गांधी कुटुंब, खर्गे आणि काँग्रेसमधील इतर नेते भाजपवर द्वेषातून कारवाई केल्याचा आरोप करत आहेत, परंतु त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये हा द्वेष अद्याप सिद्ध झालेला नाही. प्रसिद्ध घोटाळे आणि फसवणुकींमध्ये कोणालाही न्यायालयाकडून क्लीन चिट मिळू शकलेली नाही. प्रश्न असा आहे की, जर काँग्रेस इतकी स्वच्छ आहे, तर ती ईडी आणि इतर एजन्सींच्या आरोपांपासून न्यायालयांपासून का सुटका मिळवू शकली नाही? काँग्रेससह १४ राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरावरील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.


सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, नेत्यांना विशेष प्रतिकारशक्ती देता येणार नाही. नेत्यांनाही सामान्य नागरिकांसारखे अधिकार आहेत. जर सामान्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली तर तो एक धोकादायक प्रस्ताव असेल. नेत्यांच्या अटकेबाबत वेगळी मार्गदर्शक तत्त्वे असू शकत नाहीत. या टिप्पणीनंतर ही याचिका मागे घेण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सतत तोंड देत असलेल्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांना कदाचित अद्याप हे समजलेले नाही की जोपर्यंत ते भ्रष्टाचारावर शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते देशातील मतदारांचा गमावलेला विश्वास परत मिळवू शकणार नाहीत.

प्रफुल्ल फडके/अन्वय



बुधवार, २३ जुलै, २०२५

उच्च निर्णयावर प्रश्न


मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईची लाइफलाइन किंवा जीवनरेखा म्हटले जाते. १९ वर्षांपूर्वी ११ जुलै २००६ रोजी या जीवनरेखेवर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. त्या दिवशी सात लोकल ट्रेनमध्ये सहा मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत १८७ लोक ठार झाले आणि ८०० हून अधिक जखमी झाले. हे स्फोट भारतीय इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानले जात होते. ७/११च्या स्फोटांची भीषणता इतकी होती की, जखमींपैकी बरेच जण त्यांच्या जखमांमधून बरे होऊ शकले नाहीत आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वच्या सर्व आरोपी खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असतानाही उच्च न्यायालयात निर्दोष सुटतात ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस अत्यंत दुखावला गेलेला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे.


त्या भयानक दृश्यांचे साक्षीदार असलेले अनेक लोक मानसिकदृष्ट्या आजारी पडले. हल्ल्यांचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसच्या तपासात असे दिसून आले की, या स्फोटांमागे पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था आयएसआय होती, ज्याने स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया म्हणजेच सिमीच्या स्थानिक जिहादींचा वापर केला होता. या स्फोटांमध्ये पाकिस्तानी लोकांचाही सहभाग होता आणि त्यापैकी एकाचा या स्फोटांमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात एटीएसने २८ जणांना आरोपी बनवले होते, त्यापैकी फक्त १३ जणांवर खटला चालवता आला.

उर्वरित १५ जणांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे, जे अजूनही तपास यंत्रणांच्या ताब्यात नाहीत. २०१५ मध्ये विशेष मकोका न्यायालयाने पाच आरोपींना मृत्युदंड आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ दोषींना निर्दोष सोडले, असे म्हणत की सरकारी वकील त्यांचे आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. यासाठी त्यांनी अनेक कारणे दिली, जी केवळ धक्कादायक नाहीत तर अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये हलगर्जीपणाचे दर्शन घडवतात. या निर्णयामुळे सामान्य दुखावला आहे तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनोबल वाढले आहे. पाकिस्तानला दिलासा देणारा हा निर्णय आहे.


आरोपींना निर्दोष सोडण्याचा अर्थ असा नाही की, दहशतवादी कट रचला गेला नव्हता किंवा तपास यंत्रणा खोटे बोलत होत्या. याचा पुरावा म्हणजे आरोपपत्रात नाव असलेले दोन आरोपी, अब्दुल रझाक आणि सोहेल शेख, १९ वर्षांपासून फरार आहेत. ते आता पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे मानले जाते. ६०० पेक्षा जास्त पानांचा उच्च न्यायालयाचा निर्णय वाचल्यावर, अशा संवेदनशील प्रकरणातही देशाची व्यवस्था किती हलगर्जी आणि लज्जास्पदपणे काम करत होती हे स्पष्ट होते. आरोपींपैकी एक ८ नोव्हेंबर २००३ रोजी भारतीय पासपोर्टवर जेद्दाहला गेला आणि तेथून इराणमार्गे दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला गेला. तेथे त्याने त्याचा भारतीय पासपोर्ट नष्ट केला. परतताना आयएसआयने त्याला बनावट पाकिस्तानी पासपोर्ट दिला, ज्याच्या मदतीने त्याला जेद्दाहमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट नव्हता, पण त्याला आपत्कालीन परवानगीने भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतरही कोणत्याही एजन्सीला त्याची चौकशी करण्याची गरज वाटली नाही आणि तो पुढील दोन वर्षे भारतात आरामात या बॉम्बस्फोटांचा कट रचत राहिला. उच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, अभियोजन पक्षाने आरोपींना निर्दोष सोडण्याचा मार्ग कसा मोकळा केला. ज्या प्रत्यक्षदर्शीने दोन आरोपींना बॉम्ब असलेली बॅग घेऊन ट्रेनच्या बोगीतून खाली उतरताना पाहिले होते आणि ज्याच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार केले होते, त्याला पोलिसांनी कधीही आरोपींची ओळख पटवू दिली नाही.

हा साक्षीदार बॉम्बस्फोटात जखमी झाला होता. स्फोटात जखमी झालेल्या इतर पाच प्रत्यक्षदर्शींचे जबाब कधीही न्यायालयात नोंदवले गेले नाहीत. या जखमींमध्ये पोलीस कॉन्स्टेबल संतोष प्रकाश खानविलकर होते. त्यांनी दहशतवाद्यांनाही पाहिले होते, परंतु पोलिसांनी स्वत:च्या कर्मचाºयाची साक्ष घेणे आवश्यक मानले नाही. दहशतवाद्यांनी मोहन कुमावत यांच्या दुकानातून कुकर खरेदी केले होते, जे बॉम्बमध्ये रूपांतरित केले गेले होते. कुमावत यांना दहशतवाद्यांना ओळखण्याची परवानगी नव्हती किंवा त्यांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले नव्हते.


१०० दिवसांनंतर अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींव्यतिरिक्त इतर साक्षीदारांसमोर घेण्यात आलेली ओळख परेडही चार महिन्यांनंतर घेण्यात आली. ओळख परेड करणाºया अधिकाºयाला तसे करण्याचा अधिकार नव्हता. पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि सरकारी वकिलांच्या वृत्तीवरही न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. निकाल वाचून असे दिसते की साक्षीदारांना न्यायालयात हजर न केल्याने न्यायाधीशांना आरोपींना सोडण्यास भाग पाडण्यात आले. हा असा पहिलाच खटला नाही.

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील बहुतेक सूत्रधार अजूनही पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहेत. जयपूर आणि वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयांचे निकाल या वर्षीच आले आहेत आणि या प्रकरणांमध्ये काय होईल हे कोणालाही माहिती नाही. २०२२ मध्ये अहमदाबाद बॉम्बस्फोटातील ७७ पैकी २८ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. २०११ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल आजपर्यंत आलेला नाही. १९९६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील लाजपत नगर बॉम्बस्फोटातील तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली होती.


गेल्या चार दशकांत असंख्य दहशतवादी हल्ले सहन करणाºया देशात अजमल कसाब, अफझल गुरू आणि याकूब मेमन वगळता कोणालाही फाशीची शिक्षा झाल्याचे आठवत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या बलवंत सिंग राजोआना यांना २००७ मध्ये न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा आजपर्यंत अंमलात आणलेली नाही. ७/११च्या ट्रेन बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना कमकुवत खटल्यामुळे निर्दोष सोडण्यात आल्यानंतर, देशातील सरकारी यंत्रणेत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, त्या १८७ जणांना कोणीही मारले नाही का? फक्त केवळ भौतिक विकासामुळे देश विकसित राष्ट्र बनत नाही. त्याच्या व्यवस्थादेखील समान प्रमाणात विकसित झाल्या पाहिजेत आणि न्याय व्यवस्था ही सर्व व्यवस्थांचा कणा आहे. आपण जगभरातील देशांना दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी करत असताना, आपल्या स्वत:च्या संस्था आणि अभियोजन पक्ष दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा दाखवतात, ही शरमेची बाब आहे.