जिंकली युती, पण विजय आघाडीचा (24/10/2019)२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे वर्णन करायचे झाले, तर आकडेवारीनुसार युती जिंकली आहे, सत्ता कायम राखली आहे, पण खरा विजय झाला आहे, तो आघाडीचाच. वाक्य थोडं विचित्र वाटेल, पण भाजपला अपेक्षित आकडा पूर्ण करता आलेला नाही, हा त्यांचा पराभव आहे, तर खूप कमी जागा येतील, असे बोलले जात असताना खूपच जागा जिंकून राष्ट्रवादीने आघाडीला विजयच मिळवून दिलेला आहे, पण यामध्ये सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की, मतदारांना गृहित धरून काहीही होत नाही. या निकालाचे विश्लेषण अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे करतीलही, पण सेना-भाजपचे नेमके काय ठरले होते, हे यातून कुठेच दिसून येत नाही. अब की बार २२० पार हे भाजपचे स्वप्न मात्र धुळीला मिळाले आहे, हे नक्की.युतीचा फटकाया निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची निवडणूकपूर्व युती होती. मागच्या निवडणुकीत दोघे परस्पर विरोधात लढले आणि नंतर एक झाले, पण जागावाटपात भारतीय जनता पक्षाला कमी जागा वाट्याला आल्या. शिवसेनेला जास्त जागा गेल्या. त्यामुळे भाजपचे संख्याबळ कमी होणे अपरिहार्य होते. शिवसेनेच्या २०१४ ला ६३ जागा होत्या. त्यांना १२४ जागा दिल्या गेल्या, म्हणजे ६१ जागा त्यांना दिल्या गेल्या, तर भाजपच्या १२२ होत्या, त्यांना १५० जागा दिल्या म्हणजे फक्त २८ जागाच मिळाल्या. त्यामुळे भाजपने युती करून आपल्याच पक्षातल्या नेत्यांची कोंडी केली. कमी जागा लढवल्यावर विजयाच्या जागा कमीच होणार. २०१४ ला भाजपने २६० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ११० जागा या खेपेला कमी लढवल्या. त्यामुळे त्यांचे संख्याबळ कमी होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत भाजपने सेनेला जास्त जागा दिल्या. त्यामुळे सेनेच्या काही जागा वाढल्या. साहजिकच युतीचा फटका हा भाजपला बसलेला आहे.मेगाभरतीचा परिणामया निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात मेगाभरती झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज भापजमध्ये आले. काही लोक सोयीने शिवसेनेत गेले, पण यामुळे निष्ठावंतांना कुठे तरी डावलले गेल्याचे दिसून आले. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारण्यासाठी भाजपला मतदार संधी देत होते, त्याच नेत्यांना भाजप आपल्या पक्षात घेताना दिसत होते. मग हे सत्तांतर झाले कसे म्हणता येईल? भाजपच्या या मेगाभरतीचा परिणाम भाजपला भोगावा लागला आहे. आज भले सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे असला आणि युती सत्तेच्या जवळ असली, तरी विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी ही भक्कम झालेली आहे. जे लोक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत आणि त्यांनी विजय मिळवला आहे, ते कोणत्याही क्षणी धोका देऊ शकतात, हे नक्की. त्यामुळेच या निवडणुकीत युती जिंकली, पण विजय आघाडीचा झाला, असेच म्हणावे लागेल.शरद पवारांची रणनीतीया निवडणुकीत खºया अर्थाने आपली ताकद दाखवून दिली, ती शरद पवारांनी. भाजप-सेना युतीला ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत समोर कोणी पैलवान नाहीच. आमचे पैलवान तेल लावून उभे आहेत, पण समोर कोणी येत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर शरद पवारांनी कुस्ती बरोबरीच्या माणसासी होते. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे, अशा तºहेची टोलेबाजी केली होती, पण गर्वाचे घर खाली म्हणतात त्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे महाग पडले. त्याचप्रमाणे शरद पवारांनी सगळ्यांचे कच्चे दुवे पकडत आपल्यावर फोकस कसा केंद्रित होईल, हे त्यांनी पाहिले. निवडणुका जाहीर झाल्याच्या दरम्यानच राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा विषय आला. अजित पवारांसह अनेक आमदारांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार झाला. त्यावेळी शरद पवारांवर ईडीने गुन्हा नोंदवल्याची बातमी आली. ती त्यांनी कॅश केली. ईडीने नोटीस बजावलेली नसताना ते ईडी कार्यालयात निघाले. सगळीकडे फक्त शरद पवारांची चर्चा झाली. शरद पवारांनी जणू असे वातावरण निर्माण केले की, मला अटक करून दाखवाच. त्यामुळे राज्यभरातून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एकवटला. आपला नेता इतका कणखर असताना आपण हात-पाय गाळून उपयोग नाही, याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. त्यानंतर राज्यभर पवारांनी केलेले दौरे, महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण एकदम बदलून गेले. ऐंशीच्या आसपास वय असताना ते ज्या धडाडीने काम करत आहेत, त्याचे कौतुक होत गेले. त्यातच या निवडणुकीत पावसाने अवकृपा केली असली, तरी त्याचा फायदा शरद पवारांनी उठवला. साताºयात जो जोरदार पाऊस झाला, त्या भरपावसात भिजत त्यांनी सभा घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण केले. शरद पवारांची ही रणनीती राष्ट्रवादीला संख्याबळ वाढवण्यास आणि वातावरण फिरवण्यास कारणीभूत ठरली.काँग्रेसची मरगळया निवडणुकीत काँग्रेसला कुठे तरी मरगळ आल्याचे दिसत होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली असतानाही बाळासाहेब थोरात हे आपल्या मतदारसंघातच अडकून पडले. त्यामुळे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपापल्या भागावर लक्ष केंद्रित केले. आपल्या पक्षातील अन्य उमेदवारांना ताकद देण्यासाठी त्यांनी दौरे केले नाहीत. आपल्या आहेत त्या जागा टिकवण्यावर त्यांनी भर दिला. त्याच दरम्यान आम्ही आता थकलेलो आहोत, असे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वक्तव्य केले. काँग्रेसची मरगळ त्यांनी स्पष्ट केली, पण त्याचाही फायदा शरद पवारांनी उचलला. आम्ही थकलेलो नाही, पूर्ण ताकदीनिशी मैदानात आहोत हे सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता पवारांनी फेटाळून लावली. कदाचित सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांचे हे ठरलेले असू शकते. दोघे अतिशय जवळचे आहेत. सुशीलकुमार शिंदे पवारांना राजकीय गुरू, मित्र, नातेवाईक असे सगळे काही मानतात. त्यामुळे शरद पवारांना बळ देण्यासाठी काँग्रेसमधील मरगळ बोलून विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. त्याचा फायदा पवारांनी उठवला.पाडापाडीचे राजकारणया निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युती केलेली असली, तरी प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलला सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन दिसत नव्हते. मतदानाचा घसरलेला टक्का पाहता सेनेचा उमेदवार असलेल्या ठिकाणी भाजपचा मतदार आणि भाजपचा मतदार असलेल्या मतदारसंघात शिवसेना मतदारांनी निराशा दाखवली. कार्यकर्तेही उत्साहात दिसले नाहीत. ऐनवेळी पदाधिकाºयांनी दिलेले राजीनामे, पुणे, नाशिक आणि अन्य ठिकाणी भाजपने शिवसेनेला उमेदवारी न देण्यामुळे शिवसैनिकांची नाराजी, राजीनामे यामुळे पाडापाडीचे राजकारण झाले. त्याचा परिणाम मतदान कमी झाले आणि भाजपच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे खºया अर्थाने ही युती झाली होती, असे म्हणताच येत नाही. त्यातून ही युती झाली, ती केवळ आघाडी झाल्यामुळे झाली. युती करण्याचा हेतू काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढत असताना आपण जर स्वबळावर लढलो, तर त्याचा मतविभागणीचा फायदा आघाडीला मिळेल, हा दृष्टिकोन होता. त्यामुळे ही सोयीची युती झाली. ती वरिष्ठ पातळीवरून झाली, पण स्थानिक कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. त्याचा परिणाम युतीचे संख्याबळ घटले आणि २२० च्या आसपास जाण्याचे स्वप्न भंगले.दिग्गजांचे पराभवभारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठेची लढत असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव ही भाजपच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. बहीण-भावातील या लढतीत जे भावनिक मुद्दे आणले गेले, ते अतिशय वैताग आणणारे होते. त्याचप्रमाणे भाजपचे मान्यवर मंत्री असलेले नेते या निवडणुकीतून बाहेर पडणे आणि पराभूत होणे हे पाडापाडीच्या राजकारणाचे फलीत आहे. पंकजा मुंडे पराभूत झाल्या. विनोद तावडे यांना तिकीट नाकारले गेले. एकनाथ खडसे यांचे मागच्या पाच वर्षांत पुनर्वसन राहिले, पण त्यांना तिकीटही नाकारले गेले. ऊर्जा खाते सांभाळणाºया बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गजाला तिकीट नाकारणे असे अनेक मुद्दे भाजपमधील नाराजांना नकारात्मक बनवण्यास कारणीभूत ठरलेले दिसते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची झालेली घसरण ही त्यांनी करून घेतलेला आत्मघात म्हणावा लागेल.राष्ट्रीय मुद्दे घातक ठरलेभाजपची महाजनादेश यात्रा असो वा मोदी, शहांच्या प्रचारसभा. यातून भाजपने ३७० कलम आणि काश्मीरचा गवगवा फार केला. राज्य पातळीवरील मुद्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मतदारांनी भाजपला दणका दिला आहे. राम मंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे विषय लोकसभेला मान्य करता येतील, पण विधानसभेला शेतकºयांचे प्रश्न, आत्महत्या, कृषीमालाला हमीभाव, स्थानिक रोजगारांची निर्मिती हे असणे गरजेचे होते. त्यातच सातारा, सांगली, कोल्हापुरात आलेल्या पुराचा फटका, काही ठिकाणी अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक संकटांकडे विद्यमान सरकारने दुर्लक्ष केल्याची भावना आणि त्याचा प्रचारात कुठेही उल्लेख नसणे हेही या निकालात महत्त्वाचे ठरलेले दिसते. नेमकी भाजप-सेनेची ही कमजोर राष्ट्रवादीने हेरली आणि त्याचे भांडवल करून आपला फायदा करून घेतला, म्हणून या निकालाचे वर्णन जिंकली युती, पण विजय आघाडीचाच असे करावे लागेल.
शनिवार, १४ डिसेंबर, २०१९
जिंकली युती, पण विजय आघाडीचा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा