आज ३१ डिसेंबर. २०१९ या वर्षाचा अखेरचा दिवस. या वर्षाने आम्हाला काय दिले आणि काय गमावले याचा विचार होणे आजच्या दिवशी स्वाभाविक आहे. नवीन वर्षात पदार्पण करताना या वर्षातील चांगले बरोबर घेऊन जायचे आणि वाईट इथेच सोडायचे या संकल्पाने आपल्याला बायबाय करायचा आहे.मावळत्या वर्षात आनंदाचे, समाधानाचे क्षण खूपच कमी लोकांना अनुभवायला मिळाले. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित अत्याचार, सीमायुद्धे, वर्चस्ववाद, दहशदवादी हल्ले यांमुळे संपूर्ण जगभरातील जनजीवन ढवळून काढणारे २०१९ हे वर्ष, खºया अर्थाने विविध पातळीवरील आपल्या जबाबदाºयांबाबत जाणिवांचा जागर करणारे, तरुणाईला रस्त्यावर उतरवणारे आणि लोकप्रतिनिधी, राज्यकर्त्यांना जाब विचारणारे वर्ष ठरले.देशपातळीवर कुठे काय घडले, याचा विचार करायचा तर २०१९ च्या जानेवारी महिन्यापासूनच देशातील चेन्नई शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. जानेवारीपासूनच चेन्नईमधील अनेक हॉटेल्स, आयटी कंपन्यांनी एकतर स्थलांतरित होणे पसंत केले, तर बहुतेकांनी आपले व्यवसाय गुंडाळले. अनेक स्थानिक नागरिक पाण्याच्या त्रासाने हैराण होत इतरत्र स्थायिक झाले. सोन्यापेक्षाही पाण्याचा टँकर महाग अशी अवस्था चेन्नईतील नागरिकांनी अनुभवली.महाराष्ट्रात या वर्षी भरपूर म्हणजे अतिरेकी पाऊस झाला. वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन चुकल्याने हैराण आणि अगतिक झालेल्या शेतकºयाला यंदा महापुराने चांगलाच फटका दिला. यंदा वर्ष संपले, तरी आपल्या घरी न परतलेल्या आणि बेसुमार बरसलेल्या पावसाने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांना पुराचा, ढगफुटीचा, अवकाळी पावसाचा, ओल्या दुष्काळाचा दणका दिला. महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही सावरलेला नाही, तर अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भातील शेतकºयाचे अश्रू अद्याप पुसले गेलेले नाहीत.दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मुंबईची तुंबई झालीच, पण तुंबईचे लोण फक्त मुंबईपुरते मर्यादित न राहता ते विरार, नालासोपारा, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, ते अगदी बदलापूर स्टेशनपर्यंत पोहोचले. राज्यातील सर्वच नद्यांनी आपले उग्र रूप दाखवून दिले. वर्षभरात पावसात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.पर्यावरणाची बेसुमार हानी कराल, तर निसर्ग तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, हेच या वर्षाने दाखवून दिले. पर्यावरण वाचवण्यासाठी यंदा जगभरातील लहानग्यांनी विशेष योगदान दिले. ग्रेटा थनबर्गच्या आंदोलनामुळे प्रेरित झालेल्या जगभरातील मुलांनी, तरुणांनी रस्त्यावर येत ‘निसर्ग वाचवा’चा संदेश दिला. मुंबईतील आरे जंगलातील झाडांची कत्तल वाचवण्यासाठी विद्यार्थांनी आपल्या परीक्षा सोडून रात्रभर झाडांचे रक्षण करीत लढा दिला. आरे वाचवा मोहिमेला देशातून आणि देशाबाहेरील पर्यावरणप्रेमींनी साथ दिली, हा एकप्रकारच्या जबाबदारीचा जागरच होता.हे वर्ष विशेष गाजले ते लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकांनी. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नव मतदारांना, युवकांना संधी मिळाल्याने देशभरात युवकांनी मोठ्या प्रमाणात भाजप आणि मित्रपक्षाला मतदान केल्याचे स्पष्ट झाले.गत पाच वर्षांत काँग्रेससह २२ विरोधकांनी रोजगारनिर्मिती, बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले, मात्र युवकांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत नरेंद्र मोदींच्या कार्यकुशलतेला दुसºयांदा स्वीकारले. विरोधकांनी मोदींची तुलना हिटलरशी केली, तर युवकांनी मोदींना प्रेरणास्थानी मानत त्यांचे विदेशी दौरे, परकीय धोरण, सातत्याने कार्यमग्न असणे, मोदींच्या कार्यकाळात सुधारलेले आंतरराष्ट्रीय संबंध, सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ला, अभिनंदनची सुरक्षित घरवापसी, मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया, डिजिटल भारत, शिष्यवृत्ती, मराठा आरक्षण, खुले आरक्षण, बेटी बचाव आदींबाबत निर्णायक भूमिका घेतल्याच्या अनेक कारणांनी मोदींचे नेतृत्व बिनशर्त स्वीकारले. त्यामुळे देशभरात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या बहुमतात ९ कोटी नवमतदारांचा समावेश आहे, ज्यात जवळपास ७ कोटी मतदार १८ ते २१ वयोगटांतील आहेत. विशेष म्हणजे, या नवमतदारांपैकी अर्ध्याहून अधिक मतदार हे ग्रामीण भागातले आहेत. नव मतदारांमध्ये तरुणींचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.लोकसभेची सत्ता मोदींच्या पारड्यात टाकणाºया महाराष्ट्राने राज्यातही भाजपला विधानसभेत बहुमत दिले, मात्र बहुसंख्य तरुण उमेदवारांनी दुसºया पसंतीची मते देताना राष्ट्रवादीच्या शरद पवारांना ८०व्या वर्षीही दाखवलेल्या धडाकेबाज जिगरला मानाचा कौल दिला, हे नाकारता येणार नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकाच आठवड्यात दोन मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ ही ऐतिहासिक नोंद म्हणूनही २०१९ लक्षात राहील. राजकीय पक्षांच्या स्थापनेपासून एकमेकांविरोधात असणारे, विभिन्न विचारधारेचे तीन पक्ष एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन करू शकतात, हा नवा राजकीय पायंडाही याच २०१९ या वर्षात अनुभवायला मिळाला.अनेक सकारात्मक घटनांचा अनुभव देणाºया २०१९ वर्षात भारतीय संशोधकांची चांद्रयान मोहीम, भारतीय नौदलाची अवकाश सज्जता, सैन्याच्या सक्षमीकरणासाठी सुरू असणाºया अनेक लक्षवेधी योजनांच्या फलश्रुतींमुळे जवानांना मिळालेले पाठबळ देशाच्या संरक्षण सामर्थ्यांची मान उंचावणारे ठरले आहे.२०१९ हे वर्ष अनेकार्थाने सकारात्मक ठरले असले, तरी महिला व बालकांच्या सुरक्षेत मात्र अद्यापही आपण मागासलेलेच आहोत, हे अधोरेखित करणाºया या वर्षाने उन्नाव आणि हैदराबादच्या क्रूर कृत्याने माणुसकीला काळिमा फासला गेला. याशिवाय पोक्सो कायद्यातील बदल, ट्रीपल तलाक बंदी, ३७० कलम रद्द, नागरिकत्व दुरुस्ती, अयोध्या निकाल, अशा महत्त्वूपर्ण निकालांनी हे वर्ष संवेदनशील ठरले.वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदीचा फटका, मंदावत चालेले उद्योग अशा अनेक नकारात्मक घटनांमुळे देशभरात अशांतता आणि उद्रेकाचे वातावरण दिसले. सरासरी विचार केला, तर मावळत्या वर्षात आनंदाचे, समाधानाचे क्षण खूपच कमी लोकांना अनुभवायला मिळाले. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित अत्याचार, सीमायुद्धे, वर्चस्ववाद, दहशदवादी हल्ले यामुळे संपूर्ण जगभरातील जनजीवन ढवळून काढणारे २०१९ हे वर्ष, खºया अर्थाने विविध पातळीवरील आपल्या जबाबदाºयांबाबत जाणिवांचा जागर करणारे, तरुणाईला रस्त्यावर उतरवणारे आणि लोकप्रतिनिधी, राज्यकर्त्यांना जाब विचारणारे जागर वर्ष ठरले.हे वर्ष सर्वात वाईट कोणाला गेले असेल, तर भारतीय जनता पक्षाला, म्हणजे लोकसभा निवडणुकीत यश मिळत असताना, विधानसभा निवडणुकीत हातातील सत्ता जात होत्याच, पण त्याहीपेक्षा सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारखे दिग्गज नेत्यांचे निधन हे भाजपचे झालेले मोठे नुकसान आहे. या आठवणी घेऊन पुढे जायचे आहे, तरीही शेवटचा दिवस गोड व्हावा आणि नव्या वर्षात चांगले व्हावे, या भूमिकेतून या वर्षाला निरोप देऊया.
मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९
बाय बाय २०१९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा