लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असा दावा करत आहेत की, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवर लगेच ‘शरणागती पत्करली.’ एकीकडे काँग्रेस ‘आॅपरेशन सिंदूर’च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि भारतीय लष्करी दलांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी देशभरात जय हिंद सभा घेत आहे, तर दुसरीकडे त्यांचे वरिष्ठ नेते भारताने आत्मसमर्पण केल्याचे म्हणत आहेत. जर आपण पाहिले तर, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला थेट हल्ला हा भारतीय सशस्त्र दलांवरही अप्रत्यक्ष हल्ला आहे, कारण तेच युद्धभूमीवर खंबीरपणे उभे राहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे पाकिस्तान दररोज नवीन खुलासे करत आहे की, भारताने आपले हे नुकसान केले आहे, भारताने आपले ते नुकसान केले आहे. परंतु राहुल गांधी म्हणत आहेत की, भारताने शरणागती पत्करली आहे. लोकशाहीत एकमेकांवर राजकीय हल्ले करणे स्वाभाविक आहे, परंतु प्रत्येक वेळी सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. हा देशद्रोहच आहे.
सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाºयांसाठी ‘आॅपरेशन सिंदूर’चे व्हिडीओ पहिल्या दिवसापासूनच जनतेमध्ये उपलब्ध असल्याने, राहुल गांधींनी संपूर्ण आॅपरेशनच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांचे आत्मसमर्पण विधान अशा वेळी आले, जेव्हा भारताची सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगातील ३३ देशांच्या दौºयात त्या देशांच्या सरकारांना दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या धोरणाबद्दल स्पष्ट करत होते की, जर आमच्या भूमीवर दहशतवादी हल्ले झाले तर आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांना पुरस्कृत करणाºयांना शिक्षा देत राहू. अशा परिस्थितीत, हा प्रश्न देखील उपस्थित होतो की राहुल गांधी यांनी हे विधान भारताच्या या राजनैतिक मोहिमेला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने केले होते का? असा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, शिष्टमंडळात समाविष्ट असलेले विरोधी नेते ज्या पद्धतीने भारताची बाजू जोरदारपणे मांडत होते, त्यामुळे राहुल गांधींना याचा राग आला आहे का? असा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, परदेश दौºयांवर भारत सरकार आणि संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करणारे राहुल गांधी परदेशात भारत सरकारच्या वाढत्या स्वीकृतीने दुखावले गेले आहेत का? हा सरळसरळ देशद्रोह आहे. पाकिस्तानची भाषा राहुल गांधी करत आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्ष त्यांचे समर्थन करत आहेत. शरद पवार मात्र याला अपवाद आहेत. आपण खरे देशभक्त आहोत आणि देशहित महत्त्वाचे हे पवारांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांनी आघाडीच्या पत्रावरही सही केली नाही की त्यांच्या बैठकीला गेले नाहीत.
‘आॅपरेशन सिंदूर’च्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया राहुल गांधींसह सर्व नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, कोणत्याही परिस्थितीत सैन्याचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करू नये. जर अशा नेत्यांना सरकारवर विश्वास नसेल, तर त्यांनी ‘आॅपरेशन सिंदूर’च्या सुरुवातीपासूनच देशाला सर्व काही सांगत असलेल्या सैन्याचे ऐकले पाहिजे. सीडीएसने स्वत: याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. एक दिवस आधी, पुण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अधिक माहिती दिली आणि सांगितले की, १० मे रोजी सकाळी पाकिस्तानने अनेक हल्ले केले, ज्याचा उद्देश ४८ तासांत भारताला पराभूत करणे होता, परंतु त्यांनी स्वत: आठ तासांत आत्मसमर्पण केले आणि शत्रुत्व संपवण्यासाठी नवी दिल्लीशी संपर्क साधावा लागला. जनरल चौहान म्हणाले होते की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील भारताची कारवाई म्हणजे सीमापार दहशतवादाच्या ‘सहिष्णुतेची मर्यादा’ निश्चित करणे तसेच इस्लामाबादच्या आण्विक ब्लॅकमेलला सहन न करणे.
ते म्हणाले की, ‘समजा तुम्ही क्रिकेट कसोटी सामना खेळायला गेलात आणि डावाने जिंकलात, तर विकेट आणि चेंडू इत्यादींचा प्रश्नच उद्भवत नाही.’ सीडीएस म्हणाले की, ‘जेव्हा मला आमच्या बाजूने झालेल्या पराभवाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी म्हणालो की ते महत्त्वाचे नाही, परंतु निकाल आणि तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे.’ ते म्हणाले की, ‘१० मे रोजी रात्री एक वाजता, त्यांचे (पाकिस्तानचे) ध्येय ४८ तासांत भारताला पराभूत करणे होते. अनेक हल्ले करण्यात आले आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांनी हा संघर्ष वाढवला. तर प्रत्यक्षात आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले.’ जनरल चौहान म्हणाले की, पाकिस्तानला वाटले की भारताविरुद्धचे त्यांचे ‘आॅपरेशन’ ४८ तास चालेल, परंतु त्यांनी स्वत:च आठ तासांत पराभव स्वीकारला. सीडीएस म्हणाले की, मग त्यांनी (पाकिस्तानने) फोन उचलला आणि सांगितले की त्यांना आमच्याशी बोलायचे आहे. ते म्हणाले की, जेव्हा पाकिस्तानकडून बोलण्याची आणि तणाव कमी करण्याची विनंती आली, तेव्हा आम्ही ती स्वीकारली. सीडीएस म्हणाले की, युद्धात नुकसान झाले तरी तुम्हाला तुमचे मनोबल राखावे लागेल. ते म्हणाले की नुकसान महत्त्वाचे नाही, तर त्याचे परिणाम महत्त्वाचे आहेत. असे असतानाही राहुल गांधी खोटे का बोलत आहेत? त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का नोंद करू नये?
आॅपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. ते सुरूच आहे. हे शत्रुत्वात तात्पुरते विराम आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. जनरल चौहान यांनी पाकिस्तानी नेते भारताविरुद्ध द्वेष कसा पसरवत आहेत याची आठवणही करून दिली. सीडीएस चौहान म्हणाले की, १९६५ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी भारताविरुद्ध हजार वर्षांच्या युद्धाबद्दल बोलले होते. पहलगाम हल्ल्याच्या फक्त दोन दिवस आधी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले होते. तीच भाषा राहुल गांधी वापरत आहेत. त्यामुळे ते आहेत कोणाचे? भारताचे नागरिक की पाकिस्तानचे?
गेल्या महिन्यात चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानी लक्ष्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यांवर पाकिस्तानच्या एका नवीन दस्तऐवजात नवीन प्रकाश टाकण्यात आला आहे, कारण त्यात अशा किमान सात लक्ष्यांचा उल्लेख आहे जे पूर्वी माहीत नव्हते. दस्तऐवजात असे म्हटले आहे की, भारताने खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर, सिंध प्रांतातील अट्टोक, बहावलनगर, चोर आणि हैदराबाद आणि पंजाब प्रांतातील गुजरात आणि झांग येथे विविध लक्ष्यांना लक्ष्य केले. भारताच्या ‘आॅपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘आॅपरेशन बन्यान-उम-मर्सूस’वर पाकिस्तानने जारी केलेल्या दस्तऐवजात ही माहिती समाविष्ट आहे. पाकिस्तानी माध्यमांना शेअर केलेल्या कागदपत्रात ८, ९ आणि १० मे रोजी भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तथापि, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे उत्तर प्रदेश युनिट अध्यक्ष अजय राय यांनी राफेल विमानाच्या मॉडेलवर लिंबू आणि मिरची लटकवून भारतीय हवाई दलाची खिल्ली उडवली होती. त्यांचा व्हिडीओ पाकिस्तानात व्हायरल झाला. त्याचप्रमाणे, राहुल गांधी भारताच्या आत्मसमर्पणाचा दावा करून पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या विधानाला तेथील वर्तमानपत्रांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. पाकिस्तानी टीव्ही न्यूज चॅनेलदेखील यावर चर्चा करत आहेत आणि संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करत आहेत. हा सारासार काँग्रेसचा देशद्रोह आहे. त्यामुळे काँग्रेसवरच बंदी घालण्याची वेळ आलेली आहे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा