बुधवार, ११ जून, २०२५

वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर उपस्थित होणाºया प्रश्नांमध्ये, आकाशवाणी आणि नंतर दूरदर्शनच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण येते जेव्हा सामान्य लोकांचा आकाशवाणीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातम्यांवरील विश्वास यावरून समजतो की, चौकाचौकात चहाच्या दुकानांवर उभे राहूनही बातम्या ऐकण्यात कोणीही संकोच करत नव्हता तर अभिमान बाळगत होता. जर आपण आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातम्यांबद्दल बोललो तर सकाळी ८ आणि रात्री ९:४५च्या बातम्यांच्या बुलेटिनची आतुरतेने वाट पाहत होते, तर राज्यातील कोणताही रहिवासी सकाळच्या प्रादेशिक बातम्या तसेच संध्याकाळी ७च्या प्रादेशिक बातम्या चुकवू शकत नव्हता. आकाशवाणी आणि दूरदर्शनचा हा सुवर्णकाळ या अर्थाने म्हणता येईल की, सरकारी नियंत्रणाखाली असूनही, सामान्य माणूसच नाही तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेतेही बातम्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नव्हते. पूर्वी असे घडत असे की, लोक आकाशवाणीच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करायचे. विश्वासार्हतेचे हे सोपे काम नव्हते, परंतु त्या काळातील दिग्गज माध्यमांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने, समर्पणाने आणि निष्पक्षतेने ते जोपासण्याचे काम केले आणि त्याचा परिणाम असा झाला की, त्या काळातील माध्यम क्षेत्रातील दिग्गजांना संपूर्ण समाजात आदर होता, मग ते राजकीय पातळीवर असो, नोकरशाही पातळीवर असो किंवा सामान्य लोकांमध्ये.

हा आकाशवाणीचा काळ होता जेव्हा टेलिप्रिंटर आणि टेलिफोन ही मुख्य माध्यमे होती. माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडून पोस्टाने बातम्या येत असत, तर संपूर्ण राज्यातील प्रमुख बातम्यांचा प्रादेशिक बातम्यांमध्ये समावेश करणे महत्त्वाचे होते. अशा परिस्थितीत, दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लागणाºया संथ गतीच्या बातम्या या केवळ वर्तमानपत्रांसाठी डिक्टेशन असायचे. ही विश्वासार्हता आकाशवाणी आणि दूरदर्शनने मिळवली होती. त्यासाठी त्या सर्व कर्मचाºयांचे योगदान फार मोठे होते. पण अशी विश्वासार्हता आज कोणत्याही वृत्तवाहिनीला निर्माण करता आलेली नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. टीव्ही न्यूज चॅनेलच्या बातम्या या खºयाच असतील याची कोणीही गॅरेंटी देऊ शकत नाही. मात्र दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून असे कधी होत नव्हते. त्यामुळे आरडाओरडा करून आक्रस्ताळेपणे बातम्या देणाºया वाहिन्यांना आता आपल्या विश्वासार्हतेसाठी प्रयत्न करावे लागतील. नाहीतर लोक तिकडे पाठ फिरवतील.

आज वृत्तवाहिन्या किंवा न्यूज चॅनेल या माध्यमांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हात आली आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आली आहे. आज चॅनेल निराधार चर्चा आणि आरोप आणि प्रतिआरोपांचे व्यासपीठ बनणे सामान्य झाले आहे. उर्वरित काम सोशल मीडियाने केले आहे. जिथे अपलोड केलेले साहित्य केवळ गोंधळ निर्माण करत नाही तर त्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यामुळेच बातम्या प्रसारित करताना चॅनेल स्वत: व्हिडीओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असे व्हायला हवे की, अशा बातम्या आणि व्हिडीओ फक्त टीआरपीसाठी प्रसारित करू नयेत, जोपर्यंत वृत्तसंपादक स्वत: समाधानी होत नाही. कारण हा प्रेक्षकांचा विश्वास राखण्याचा प्रश्न बनतो. एक काळ असा होता की, जेव्हा जेव्हा कोणतीही मोठी घटना घडायची तेव्हा लोक आकाशवाणीचे येणारे न्यूज बुलेटिन ऐकायचे आणि पुष्टी मिळाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवायचे. आज चुकीच्या आणि खोट्या बातम्या येणेही सामान्य बाब होत आहे.

आकाशवाणीच्या जुन्या काळाच्या संपादकांच्या बहाण्याने आज माध्यमांच्या विश्वासार्हतेचा तोच जुना काळ पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसारित बातम्यांच्या विश्वासार्हतेवर जर काही प्रश्न निर्माण झाला तर ते माध्यमांसाठी आव्हानापेक्षा कमी नसावे. आज माध्यम जगताला विश्वासार्ह संपादक, कंटेट रायटरची गरज आहे, जेणेकरून त्यावर प्रकाशित किंवा प्रसारित होणाºया बातम्या, विश्वासार्ह मानल्या जातील. बदलत्या परिस्थितीत, ही गरज अधिक वाढली आहे, कारण आज समाज अधिक गोंधळलेला आहे आणि माध्यमे तसेच सोशल मीडियाने विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे भविष्यातील हे फार मोठे आव्हान आहे. चार दिवसांपूर्वी मुंब्रा-दिवा दरम्यान झालेल्या प्रवासी लोकल अपघाताचे वर्णन वाहिन्यांनी चुकीचे दाखवले यावर कोणीही बोलत नाही. रेल्वे आणि सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे करून मोकळे झाले. रिकामटेकडे विरोधकही रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागू लागले. पण यात प्रवाशांची चूक आहे हे कोणीही बोलले नाही. दरवाजात उभे राहू नका, अशी कॅसेट सतत लोकलमध्ये वाजत असते. तरीही नियम मोडून दरवाजात उभे राहतात. हे लोक कोण असतात? तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यासाठी त्यांना दरवाजा हवा असतो. ३ मिनिटाला स्टेशन आले की, लोकल स्लो झाल्यावर चालत्या रेल्वेतून थुंकणारे लोक असतात हे. बेशिस्त वर्तन करणारे दरवाजात असतात हे कोणीही अधोरेखित केलेले नाही. त्यामुळे आता वृत्तवाहिन्यांना आपला विश्वास संपादन करावा लागेल.

प्रफुल्ल फडके/ अन्वय

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: