मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

मूक ाायकचा जन्मदिवस


आजचा दिवस म्हणजे ३१ जानेवारी हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला तो दिवस, म्हणूनच खºया अर्थाने तो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उच्चार केलेला दिवस. आज अनेकदा तोंड दाबण्याची, अभिव्यक्तीवर घाला घालण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असताना, हा दिवस आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला पाहिजे, असे वाटते. यानिमित्ताने मूकनायकच्या इतिहासावरही कटाक्ष टाकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.


मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२0 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी, १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक म्हणून काम केले, कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापक पदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील ‘मनोगत’ नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वत: लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते, तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.


या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै, १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै, १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.

सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यात आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. ‘मूकनायक’ पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. ‘मूकनायक’ एप्रिल १९२३ मध्ये बंद पडले.


बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय-धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.

काय करूं आतां धरूनिया भीड।


नि:शंक हे तोंड वाजविलें।।१।।

नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण।


सार्थक लाजोनी नव्हे हित।।२।।

पहिल्या अंकाच्या संपादकीयमध्ये त्यांनी एक प्रतिज्ञाच केली होती. ती म्हणजे, आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाºया अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खºया स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही, परंतु मुंबई इलाक्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता, असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे, तर केव्हा-केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाºया उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाºया जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही, म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये.


हा उल्लेख किंवा बाबासाहेबांनी दिलेला इशारा खºया अर्थाने चळवळीचे बीज होते, म्हणून आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिन म्हणून ३१ जानेवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला गेला पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा संकुचित देशापुरता मर्यादित नव्हता, तर ते अखिल मानवजातीचा विचार करणारे होते. त्यामुळे मानवामानवातील संघर्षात मागासलेल्यांचा आवाज उठवणारा हा मूकनायक होता.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील आणखी एक मजकूर उल्लेखनीय आहे. तो म्हणजे, ‘हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक-एक जात म्हणजे त्याचा एक-एक मजला होय; पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोºयाला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसºया मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.’ हे केलेले वर्णन म्हणजे मूकनायकाचा आतला खरा आवाजा होता. अभिव्यक्तीचा तो उच्च दर्जा होता, म्हणून हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उच्चार करणारा दिवस असावा असे वाटते.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\ 31/1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: