अलीकडेच, काँग्रेस नेते राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याची बातमी आली. सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याच्या भयानक परिणामांची इतिहासात असंख्य उदाहरणे असूनही, काँग्रेस पक्षाने यासंदर्भात सीआरपीएफच्या पत्राकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांच्या विशिष्ट विनंतीला न जुमानता महात्मा गांधींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास नकार दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांच्या हत्येच्या फक्त दहा दिवस आधी, बिर्ला भवन येथील प्रार्थनागृहाजवळ बॉम्बस्फोट झाला. सुरक्षा कर्मचाºयांना सतर्क करण्यात आले. दिल्लीच्या स्थानिक पोलीस अधीक्षकांनी (एसपी) गांधीजींकडे जाऊन प्रार्थना सभेला उपस्थित असलेल्या लोकांची तपासणी करण्याची परवानगी देण्याची विनंती केली, परंतु गांधीजींनी नकार दिला. त्यानंतर, प्रादेशिक डीआयजींनी त्याच उद्देशाने गांधीजींची भेट घेतली. त्यांनीही अशीच विनंती केली. तरीही त्यांनी नकार दिला. जेव्हा सरदार पटेल स्वत: महात्मा गांधींना भेटले तेव्हा गांधीजींनी बिर्ला भवन येथील प्रार्थना सभेला उपस्थित असलेल्यांची तपासणी केल्यास आमरण उपोषण करण्याची धमकी दिली. सरदार पटेल काय करू शकले असते? यामुळे नथुराम गोडसे यांना अनुकूल वातावरण मिळाले. त्यांनी गांधीजींची निर्घृण हत्या केली. पण गांधीजींच्या हत्येनंतर काय झाले? देशात, महाराष्ट्रात जाळपोळ झाली, कत्तली झाल्या.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही अशाच परिस्थितीत हत्या करण्यात आली. या दोघांनीही जाणूनबुजून त्यांच्या सुरक्षा शिष्टाचारांचे उल्लंघन केले. इंदिरा गांधी यांच्याकडे गांधींच्या हत्येची उदाहरणे होती. राजीव गांधी यांच्याकडे गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येची उदाहरणे होती. राहुल गांधी यांच्याकडे स्वत:च्या निष्काळजीपणामुळे प्रत्येकी तीन हत्यांची उदाहरणे आहेत. अनेक लोक म्हणतात की, या देशातील लोक इतिहासातून शिकत नाहीत, ते बरोबर आहे.
इंदिरा गांधींच्या हत्येबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (ठरअ)????चे प्रमुख आर.एन. काओ यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानातील संत्री बिअंतसिंग यांच्या संशयास्पद स्वभावाबद्दल सुरक्षा संस्थांना सतर्क केले. ते पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार देखील होते. याआधारे, बिअंत यांना दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र युनिटमध्ये बदली करण्यात आली. जेव्हा इंदिरा गांधींना हे कळले की त्यांना नियुक्त करण्यात आले आहे, तेव्हा त्यांनी त्यांना सुरक्षेसाठी त्यांच्या निवासस्थानी पुन्हा नियुक्त केले. ३१ आॅक्टोबरच्या त्या अंधाºया सकाळी पंतप्रधानांवर गोळीबार करणारे ते पहिले होते. त्यानंतर दंगल उसळली आणि हजारो शिखांची कत्तल झाली.
सुरक्षा मानकांमधील अशाच निष्काळजीपणामुळे २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील पेरम्बदुर येथे मानवी बॉम्बस्फोटात राजीव गांधींचा मृत्यू झाला. त्या दिवशी झालेल्या स्फोटापूर्वी, ब्लू बुकमध्ये नोंदवलेल्या राजीव गांधींच्या सुरक्षा उपायांचे पालन केले गेले नाही. नियमांनुसार, राजीव गांधींकडे येणाºयांची झडती घ्यायला हवी होती, परंतु राजीव यांनी स्वत: परवानगी न दिल्यामुळे मानवी बॉम्बची झडती घेण्यात आली नाही. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनुसूया डेझी अर्नेस्ट यांनी मानवी बॉम्ब धनू राजीवपर्यंत पोहोचू नये म्हणून वारंवार प्रयत्न केले, परंतु राजीव गांधींनी सुरक्षा कर्मचाºयांना सांगितले, सर्वांना माझ्याकडे येऊ द्या.
आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहाच्या आचारसंहिता पाळत नाहीत किंवा त्यांच्या भाषणांमध्ये किंवा विधानांमध्ये कायदेशीर किंवा बेकायदा टिप्पण्यांचा विचार करत नाहीत. परिणामी, त्यांना अनेक कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ते त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दलही निष्काळजी आहेत. ८ आॅगस्ट २०१७ रोजी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, राहुल गांधी यांनी गेल्या दोन वर्षांत १२१ नियोजित आणि अनियोजित प्रवास केले आहेत. अनेक वेळा त्यांनी बुलेटप्रूफ कार वापरली नाही.
अलीकडचीच घटना अशी आहे की, व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुखांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबतच्या कथित निष्काळजीपणाबद्दल काँग्रेस अध्यक्षांसह राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी अलीकडेच काही दौरे केले, ज्यांची सुरक्षा यंत्रणांना आगाऊ माहिती देण्यात आली नव्हती. अशा कारवायांमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही पत्रात म्हटले आहे. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, प्रत्युत्तरात्मक हिंसाचारात अनेक निष्पाप लोक मारले गेले. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याचा सरकारने गांभीर्याने विचार करणे शहाणपणाचे ठरेल. जर सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल, तर त्यांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेची तरतूद देखील असली पाहिजे. जनतेत मिसळणे योग्य आहे, जनसंपर्क असणे योग्य आहे, पण स्वत:ची काळजी घेणे हेही नेत्यांचे कर्तव्य आहे. राहुल गांधींनी हा शिष्टाचार न मोडता असलेल्या सिक्युरिटीचा मान राखला पाहिजे. नेत्यांना असलेले सुरक्षा कवच हे जनहितार्थ असते. कारण सुरक्षेत कोणतीही चूक झाली तर त्याचे पडसाद उमटत असतात. त्याने जनजीवन अस्ताव्यस्त होते. त्यामुळे देशातील शांतता, सुव्यवस्था आणि कायदेव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तरी राहुल गांधी यांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे.
28 /09/2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा