वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करून, चर्चा करून, आपण सत्तेच्या दिशेने जायचे हे भाजपचे स्थापनेपासून इंगित होते, पण चर्चेसाठी कोणता विषय हाताळला आहे, यावर भाजपचे यशापयश ठरले आहे. त्यामुळेच प्रत्येक राजकीय पक्षाने भाजपचा चढ-उताराचा आलेख पाहिला, तर त्या पक्षाला तो मार्गदर्शक ठरेल. त्या चुका आपल्या पक्षात होत नाहीत ना हे पाहता येईल. १९७७ नंतर संघाच्या शाखा, वर्ग, प्रभात फे ºयांमधूनच त्यांनी संदेश देण्यास सुरूवात केली होती आणि त्यावेळी त्यांचे एक पद्य होते, नव्या युगाची हाक आम्हाला... ते त्यांनी खरे करून दाखवले. आता वाचाळवीरांना थोडा आवर घातला, तर ही झेप पुन्हा घेणे त्यांना शक्य होईलही, पण भाजपचा चढता आलेख प्रत्येकाने अभ्यासला तर अपयशाला वारंवार सामोºया जाणाºया पक्षांनाही त्यातून काही शिकायला मिळेल.
२०१४ ला सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी वापरलेल्या सोशल मीडियाची चर्चा जोरात झाली होती. त्यानंतर अलिबागच्या चिंतन शिबिरातही शरद पवारांनी सोशल मीडियाची दखल घ्यावी लागेल, असे कबूल केले होते. पण फक्त भाजपच्या यशस्वी फॉर्म्युल्याची दखल घेऊन चालणार नाही, तर १९८०च्या स्थापनेपासूनची वाटचाल पाहिली पाहिजे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपला २००४च्या निवडणुकीत वातावरण अनुकूल असतानाही अचानक सत्तेपासून दूर जावे लागले. हे कसे घडले याचाही अभ्यास केला पाहिजे. अतिआत्मविश्वास हा कायम घातकच असतो. त्यातलाच तो प्रकार होता. १९९९ ते २००३ या आपल्या कार्यकाळाचा ताळेबंद दाखवण्यासाठी भाजपने इंडिया शायनिंगची मोहीम जोरदारपणे उघडली होती, पण इंडिया शायनिंग म्हणजे सर्वोच्चपणा आला. आता यापेक्षा अधिक चांगले काही होणार नाही. त्यामुळे भाजपची क्षमता संपली असा तो अर्थ होता. शायनिंग म्हणजे आता सगळे ठिक आहे, यापेक्षा काही जास्त होणार नाही, असा त्यातून नकळत अर्थ होता. त्यामुळे आता यांची क्षमता संपली आता नव्याला संधी द्या हे मतदारांनी ठरवले. ही चूक जाहिरातबाजी करणाºया भाजपला समजण्यास दहा वर्ष लागली. त्यामुळे त्यांनी २०१४च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ ही घोषणा दिली.
अच्छे दिन आनेवाले हैं याचा अर्थ आताचे दिवस वाईट आहेत, सरकार वाईट आहे हे सहजपणे त्यांना ठसवता आले. ही प्रचाराची पद्धती लक्षात घेणे गरजेचे आहे. इंडिया शायनिंग किंवा फिल गूडचा वापर केला, पण प्रत्यक्षात उदारीकरण-खाजगीकरण- जागतिकीकरण धोरण घाईघाईने, व्यवस्थेला न जुमानता राबवल्याने या सरकारला आश्चर्यकारकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाचे विश्लेषण करताना भाजपचे तत्कालीन चाणक्य समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी असे वक्तव्य केले होते की, एनडीए आघाडी जशी भाजपने बांधली होती, तसाच प्रयोग काँग्रेसने केल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. महाजन यांच्या म्हणण्यात तथ्य होते. कारण काँग्रेसने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र येथे स्थानिक-प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती व या पक्षांना मिळालेले यश काँग्रेसच्या पथ्यावर पडून २००४ मध्ये डाव्यांच्या पाठिंब्यावर यूपीए आघाडी प्रत्यक्षात आली होती. हा गटातटाचा, प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून सत्ता मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयोग २००९मध्ये दिसून आला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या; पण त्यांना द्रमुक, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा अशा पक्षांना हाताशी घेऊन यूपीए-२ सरकार चालवावे लागले होते. आजही काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत वाटेकरी आहे, अन्य ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. आगामी काळात येणाºया काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अशाच प्रकारे यश मिळवता येईलही. कोणताही पक्ष आणि विचार कधी संपत नसतो. तो पुन्हा उसळी मारून वर येऊ शकतो, पण त्यासाठी विरोधकांच्या हालचाली, इतिहास, कार्यपद्धतीही समजून घेणे आवश्यक आहे.
यूपीए २ हे सरकार सतत तीन वर्षे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरल्यामुळे २०१४च्या लोकसभा निवडणुका घोषित होण्याअगोदर हे सर्व घटक पक्ष काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून पळून जाऊ लागले. या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांची त्यांच्याच प्रदेशात धूळधाण उडवल्याने देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला होता. तोच वेग २०१९ लाही कायम राखला होता. त्यामुळे केंद्रात भाजप हा बलवान पक्ष झाला. त्यात हिंदी पट्ट्यातील बहुतांश बडी राज्ये भाजपच्या हातात असल्याने प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला वावच शिल्लक राहिला नाही. त्यात भाजपने संसदेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला नाकारल्याने काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्षांची राजकीय कोंडी होऊ लागली.
भाजपचा संसदेत व रस्त्यावर मुकाबला करण्याइतपत ताकद व आत्मविश्वास या पक्षांमध्ये नाही, हे या पक्षांना लवकरच जाणवल्याने जी काही कोंडी निर्माण झाली होती, ती फोडण्याची गरज होती. भाजप आणि काँग्रेस हे मोठे राजकीय पक्ष या देशात आहेत. त्यामुळे या देशात द्विपक्षीय पद्धती आली नाही, तर सततचे राजकारण या दोन पक्षांभोवतीच फिरत राहणार आहे. त्यांच्या प्रवाहातच सर्वांना सामावून जावे लागणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
काँग्रेस आघाडीकडून राज्य काढून घेण्यासाठी भाजपला १० वर्ष लागली होती. तेवढा काळ पक्ष बांधून ठेवणे, सर्वांना सत्ता नसताना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले होते. अपयश आल्यावर इतर पक्षात जाण्याचे वेध लागतात. अशा पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. कोणत्या वेळी कोणती खेळी महत्त्वाची याचे भाजपचे नियोजन महत्त्वाचे असते. देशातील डावी ताकद अत्यंत कमकुवत झाली आहे. याचे कारण डावे आपल्याच पक्षातल्या संघर्षात अडकले आहेत. म्हणूनच अपयशात असताना अन्य पक्ष कसा मोठा होत गेला, विरोधकांनी काय किमया साधली याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
भाजपच्या स्थापनेनंतर वाजपेयींनी कमल जरूर खिलेगा असे भाष्य केले होते. तेव्हा त्यांना २०१४ साल दिसत होते. त्या काळात संघ परिवारात एक पद्य खूप गाजले होते. ‘नव्या युगाची हाक आम्हाला झेप आमुची यशाकडे, नरसिंहाचे वंशज आम्ही गती आमुची पुढे पुढे’. १९८०च्या संचलनापूर्वी सगळ्या शिबिरांमधून, प्रभात फेºयांमधून हे पद्य ऐकवले गेले होते, त्याचे हे यश आहे. दीर्घ परिश्रमांनंतर मिळालेले हे यश होते. ते दहा वर्ष टिकवण्याचे कसब मोदी सरकारने केले आहे. त्यांना पुढची झेप आता २०२४ ला घ्यायची आहेच, पण विरोधक यातून काही बोध घेणार का? हेपण पाहावे लागेल.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा