गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

नोंद महत्त्वाची


वाढत्या बलात्काराच्या प्रकारानंतर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते आवश्यक होतेच; पण त्याच पाठोपाठ महाराष्ट्रात, मुंबईत घातपातासाठी सज्ज झालेले सहा दहशतवादी दिल्ली पोलिसांनी पकडले. यापैकी एकाचे वास्तव्य मुंबईत गेल्या वीस वर्षांपासून होते. धारावीत तो राहत होता. त्यामुळे अशा किती प्रवृत्ती आपल्या इथे राहतात याची माहिती असणे आवश्यक आहेच. त्यामुळे आता तर अशा प्रत्येक परप्रांतीयाची तो इथे कशासाठी आला आहे, काय करतो आहे, याची नोंद असणे अत्यंत आवश्यक वाटू लागले आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाºया दोन पाकिस्तान्यांसह सहा अतिरेक्यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटकेची बातमी आणि त्यानंतर चौकशीत येणारी माहिती ही अत्यंत धक्कादायक अशीच आहे. हे कारस्थान किती काळापासून चालू होते, याचा विचार आता करावा लागेल. आज एक कट उघडकीस आला आहे. त्यातील फक्त सहाच जण सापडले आहेत; पण असे किती तरी कट रचले गेले असतील, रचले जाणार असतील आणि शेकडो-हजारोंचा त्यात सहभागही असू शकतो, याची कल्पना करता येणे अशक्य आहे, कारण या मुंबईच्या पोटात असे किती तरी अनधिकृतपणे परप्रांतीय राहत असतील. विनापरवाना, विनापासपोर्ट इथे राहत असतील. केवळ मुंबईच नाही, तर ठाण्यातील मुंब्रा हा भागही तसा भयानक असाच आहे. तेथे अनेकदा गुन्हेगार सापडले आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येकाची नोंद ही असणे अत्यंत आवश्यक आहे.


आजवर अशा घटनांमध्ये हजारो निरपराधांचा बळी गेला आहे. २६/११च्या आठवणी आजही ताज्या आहेत; पण अशा घटना घडत राहिल्या, तर आणखी किती निष्पापांना जिवाला मुकावे लागेल, याचा अंदाज सांगता येत नाही. या अतिरेक्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण मिळाले. त्यामागे पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना आहे. आयएसआय आणि दहशतवाद हे एक समीकरण आहे. पाकिस्तानात असो किंवा जगात कुठेही, दहशतवादी घटनांच्या मागे कुठे ना कुठे आयएसआय असतेच. याही कटाच्या मागे आयएसआय आहे, म्हणजे पाकिस्तान आहे. त्यामुळेच आपण अधिक सावध झाले पाहिजे आणि सजग राहिले पाहिजे.

अफगाणिस्तानात आता तालिबान्यांचे राज्य आल्यामुळे पाकिस्तानच्या मनसुब्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आता उघडकीस आलेल्या या भयंकर कटाच्या मागे थेट तालिबानचा हात दिसत नसला किंवा मानता येत नसला, तरी त्यांच्याशी वैचारिक साधर्म्य असलेल्यांनाच अटक झाली, हे नाकारता येत नाही. पुढच्या काळात कदाचित या कटाचे आणखी तपशील येतील; पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, तर भारताला अधिक सजग व्हावे लागेल आणि प्रत्येक नागरिकाला सतर्क राहावे लागेल, हे नक्की.


भारतात आता सणासुदीचे दिवस आले आहेत. गणेशोत्सव सुरू आहे. नवरात्रात दुर्गा पूजन, दसरा, दिवाळी असे सलग सुमारे दोन महिने सणांचे आहेत. कोरोनामुळे अर्थकारणाला आलेली मरगळ हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे बाजारपेठा फुलू लागलेल्या आहेत. अर्थकारणाची सर्व क्षेत्रे सुरळीत होत आहेत. हे जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे पाकिस्तानला भारताचे हे वैभव पाहावत नाही. त्यात तालिबानची भर पडली. त्यामुळे पाकिस्तानची हिंमत वाढली आणि भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी माथेफिरूंची आयती फौज मिळू लागली. त्यामुळे घातपाताचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे आता हे घुसखोर दहशतवादी कुठे लपून बसले आहेत, त्यांना कोणी थारा दिला आहे का, याचा शोध होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रत्येकाची असणारी नोंद महत्त्वाची ठरणार आहे.

इस्लामी मूलतत्त्ववादाचा धोका सा‍ºया दुनियेला आहे. फक्त इस्लाम मानणाºयांनाच जगण्याचा आणि राज्य करण्याचा हक्क आहे; जिहाद करताना मृत्यू आला, तर सत्तर की बहात्तर सुंद‍ºया तुमच्या सेवेला हजर होतात. पाश्चात्य विचारसरणीचे अनुकरण वाईट, इतर धर्मांचे अस्तित्व आम्ही मानत नाही व मानणार नाही, अशा टोकाच्या विचारांचे हे दहशतवादी पाईक असतात. त्यासाठी काहीही करायला तयार होतात. २६/११च्या घटनेतील कसाब हा असाच होता. त्याच्या तपासात उलगडलेल्या या माहितीवरून सगळे स्पष्ट झाले होते. त्याच विचारांचे हे लोक आहेत. अशी मानसिकता असलेल्यांची संख्या प्रत्यक्ष घातपाती कारवाया करणाºयांपेक्षा किती तरी मोठी आहे. ती फक्त भारतात नाही, तर जगभरात आहे. थोडीशी साथ मिळाली की, असे माथेफिरू अतिरेकी बनून काम करायला तयार होतात. आता किंवा यापूर्वी भारतात पकडले गेलेले अतिरेकी त्याच मालिकेतले आहेत.

इस्लामच्या विरोधकांनी निर्माण केलेली व्यवस्था उध्वस्त करून इस्लामी नैतिक व्यवस्थेची स्थापना किंवा पुन:स्थापना करणे, हे आपले पवित्र ध्येय आहे, असे त्यांना शिकविले जाते. ही कथित नैतिक व्यवस्था कोणती, तर महिलांनी कायम बुरख्यात राहावे, त्यांनी फक्त मुले जन्माला घालावीत, पुरुषांना कितीही बायका करता येतील, इतर धर्मीयांचे मुंडके उडवणे हा आपल्या पवित्र कर्तव्याचा भाग आहे, वगैरेंची शिकवण देणारी. त्याला एकेकाळी भारतात अंडरवर्ल्ड डॉन राहिलेल्या दाऊद इब्राहिमसारख्यांचा पाठिंबा. हे सगळं भयानक आहे, म्हणूनच आपल्या आसपास वावरणाºया प्रत्येक अनोळखी, परप्रांतीय व्यक्तीचे इथे नेमके काय काम आहे, तो कशाला आला आहे, हे समजणे आवश्यक आहे. त्याची नोंद असणे आवश्यक आहे. कोणताही घातपात करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी चोख कामगिरी बजावली त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेतच. पण इथल्या पोलिसांनीही आता राजकारणात, अन्य लफड्यात न अडकता अशा घातपाती शक्ती कुठे आहेत का, हे पाहण्यासाठी नोंदी ठेवणे आवश्यक आहे.


........................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: