गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

फेरीवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे


फेरीवाल्याने चाकूने हल्ला करत महिला सरकारी अधिकाºयाला जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये घडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून मोठा संताप व्यक्त करण्यात आला. ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली दोन बोटं गमवावी लागली आहेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण हे एवढं बळ या फेरीवाल्यांना येतेच कुठून? अर्थात ही घटना ठाण्यात काही प्रथमच घडते आहे असे नाही. चार वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचे अधिकारी संदीप माळवी यांच्यावरही असाच जीवघेणा हल्ला फेरीवाल्यांनीच केला होता. गावदेवी मैदानाजवळ फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आलेल्या माळवी यांच्यावर हा हल्ला झाला होता. असे प्रकार अनेक वेळा ठाण्यात घडले आहेत.


या प्रकारानंतर त्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण यावरची मनसे नेते राज ठाकरे यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. महिला अधिकाºयावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारे अधिकाºयावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवालसुद्धा राज यांनी उपस्थित केला आहे. अर्थात महिला अधिकाºयाची बोटं तोडणारा तो हल्लेखोर इतक्या लवकर बाहेर येईल असे नाही. तो जेव्हा चार-सहा महिन्यांनी बाहेर येईल तेव्हा सगळे जण विसरलेले असतील. त्यामुळे त्याला मार खावा लागेलच असे नाही, पण या फेरीवाल्यांचा माज उतरवलाच पाहिजे हे नक्की.

खरं तर हे सगळे फेरीवाले अनधिकृतपणे आपला धंदा करत असतात. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची २ बोटं आणि त्यांच्या अंगरक्षकाचं १ बोट तुटलं. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परप्रांतातून इथे येऊन आपल्या मराठी माणसांवर हल्ले होत असतील, तर सामान्यांसाठी हे फार मोठे संकट आहे. पूर्वी परप्रांतीयांची दहशत फक्त मुंबईत होती. आता ठाणेही मराठी माणसांचे राहिले नाही असे चित्र आहे. अरुंद रस्त्यांवर आपली दुकाने मांडायची, रहदारीला अडथळे निर्माण करायचे, वाहतुकीची कोंडी करायची, वाहन सोडा, पण धड रस्त्याने चालणेही मुश्कील होते, अशा प्रकारे वेडेवाकडे गाडे हे फेरीवाले लावतात. सर्वसामान्यांवर दादागिरी करतात. अस्वच्छता करतात. हे फेरीवाले रस्ते, फुटपाथवरची जागाच अडवतात असे नाही, तर पान, गुटखा खाऊन सर्वत्र घाण करतात. परप्रांतातून इथे येऊन इतकी दादागिरी करण्यासाठी यांना बळ येते कुठून? असे सगळे अनधिकृत फेरीवाले हुडकून काढून हाकलले पाहिजेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतात हाकलून दिले पाहिजे. मराठी माणसांना लुटायला आलेले, त्यांना त्रास देण्यासाठी आलेल्या या गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांचा, परप्रांतीयांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.


ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाºयांना देण्यात आले आहेत, पण अशा प्रकारे महिला अधिकाºयावर हल्ला होण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. राज ठाकरे यांनी गर्जना केलेली आहे. आता शिवसेनेने आपले ठाणे वाचवण्यासाठी, हा परप्रांतीयांचा त्रास थांबवण्यासाठी बाह्या सरसावण्याची गरज आहे.

रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले इतके आक्रमक होतात आणि शस्त्र बाळगून रक्तपात घडवतात ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. त्याला फक्त अटक करून उपयोगाचे नाही, तर त्याला ठाण्यातून नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे. हे जर आज सहन केले, तर उद्या दुसरा कोणी पुढे सरसावेल आणि असे दुष्कृत्य करेल. या प्रकारांना आळा घालण्याची नितांत गरज आहे.


खरं तर ही एक फार मोठी साखळी असते. त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते हे अशा फेरीवाल्यांना जागा देत असतात. त्यांच्याकडून काही पैसे घेत असतात. या राजकीय संरक्षणापोटी या फेरीवाल्यांचे सगळे धंदे बिनबोभाट चालत असतात. त्यामुळे आपल्याला नेत्यांना, कार्यकर्त्यांना जे पैसे द्यायचे आहेत त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून यांची मुजोरी वाढत जाते. त्यामुळे फक्त अशा फेरीवाल्यांनाच नाही, तर फेरीवाल्यांना संरक्षण देणाºया, त्यांना त्यांची दुकाने अनधिकृतपणे लावून देण्यासाठी आपली ताकद त्यांच्या पाठीमागे उभी करणाºयांनाही समज देण्याची गरज आहे. आपण कोणाला इथे जागा देत आहोत याचे भान अशा नेत्यांना असले पाहिजे. ठाण्यात ना फेरीवाला क्षेत्र, असे अनेक ठिकाणी बोर्ड लागलेले असले, तरीही त्याच्या आसपास फेरीवाले असतात. फुटपाथ नावाची गोष्टच अस्तित्वात राहात नाही. त्यामुळे सामान्य माणसांना या गोष्टीचा खूप त्रास होतो. फेरीवाल्यांनी जागा अडवल्याने वाहनांना मोकळी वाट मिळत नाही. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, आजारी माणसांना गाडी, रिक्षात घालून दवाखान्यात जायचे म्हटले, तरी या अडथळ्यांमुळे त्रास होतो, पण याचा कसलाही विचार केला जात नाही, परंतु आता सर्वच महापालिकांनी या दादागिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलीस फोर्स लावून या दादांना हुसकावून लावले पाहिजे. असे हल्ले वारंवार होण्याची प्रथा पडण्यापूर्वीच कारवाई केली तर जरब बसेल. यामध्ये कसलेही राजकारण न आणता कारवाई केली गेली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: