उपचाराचे राजकारण
कोरोनाचा
अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. हळुहळू अनलॉक होण्याची चर्चा आहे. आता सगळं
पूर्वीसारखं होईल असे अनेकांना वाटत आहे. पण ज्याप्रकारे देशभरातील
कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्या मानाने हा रोग आटोक्यात आला आहे असे वाटत
नाही. कोणतेही मोठे संंकट असते तेंव्हा त्यावर सार्वत्रिक आणि एकजुटीचे
उपाय महत्वाचे असतात. पण आज रामदेव बाबांनी दावा केलेल्या औषधांवरून जे
राजकारण चालले आहे ते फार भयानक आहे. एका संकटातून देश जात असताना आणि
बाहेर पडत असताना सावध असण्याची गरज असते. आज हे संकट पूर्णपणे टळलेले
नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत
प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा
होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट
गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे अशीच स्थिती आहे.
महाराष्ट्र आणि
मुंबईतील किंवा देशातील बरे झालेल्या रूग्णांचा आकडा वाढत असला तरी नव्याने
येणार्या रूग्णांचा आकडाही काही कमी नाही.
राज्याची परिस्थिती
पाहिल्यास आत्तापर्यंत 1,42,075 रुग्णांची नोंद झाली आहे. 74,744 रुग्ण बरे
झाले आहेत. पण गेल्या 24 तासात 3,870 नवीन रुग्ण सापडले आहेत. 60,147
रुग्णांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत राज्यात
6 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातही काल दिल्लीतील
परिस्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या स्थितीवर एक नजर
टाकल्यास जवळजवळ एकूण रुग्णांच्या 50 टक्के रुग्ण बरे झाले आहेत, तर 50
टक्के अद्याप रुग्णालयात आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची
संख्या अधिक आहे. पेंद्र, राज्य सरकार व मुंबईत महापालिका प्रशासन हे
युद्धपातळीवर उपाययोजना करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहेत. मात्र, अपेक्षित फळ मिळालेले नाही. कोरोनावर संपूर्ण
नियंत्रण अद्यापही मिळविता आलेले नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर
महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे
कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत
तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे
अशीच स्थिती आहे.
मुंबईत प्रारंभी वरळी, प्रभादेवी भागात मोठया
प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्याचबरोबर भायखळा, ग्रँटरोड
आदी भागातही रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर पालिकेने युद्धपातळीवर
उपाययोजना वाढवली. त्यामुळे वरळीमधील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले
होते. त्यानंतर पूर्व उपनगरात घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत
गेली. पालिकेने आवश्यक उपाययोजना वाढवली आणि घाटकोपरमधून कोरोना रुग्णांचे
प्रमाण काहीसे कमी झाले. मात्र, आता कोरोनाने पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंड
या भागात तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, दहिसर, बोरिवली या भागात शिरकाव
केला आहे. सध्या या भागात कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. फक्त आवश्यक
वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येत आहेत तर मोटार सायकलवरून दोघांना प्रवास
करण्यास बंधने घालण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात करडी नजर ठेवण्यात
येत आहे. घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णाच्या
संपर्कातील नागरिकांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पालिका आयुक्त
इकबाल चहल यांनी, या भागात ‘मिशन शून्य’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला
आहे. याअंतर्गत आता शीघ्र कृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिरते
दवाखाने, वैद्यकीय पथके कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणार आहेत. सरकार,
पालिका विविध पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. परंतु, त्याला अपेक्षित यश
येत नाही.
त्यामुळे आता पालिकेने घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करणे,
रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. तसेच,
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिकांनीही बाजारपेठ, रस्ते, सार्वजनिक
ठिकाणी उगाच गर्दी करू नये. तर राज्य सरकार आणि महापालिकेनेही सरकारी,
पालिका व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांवर व्यवस्थित उपचार करण्यावर अधिक
लक्ष पेंद्रीत करायला हवे. तेथील डॉक्टर, डीन यांनी विशेष करून कोरोना
बाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कुठे काही
हलगर्जीपणा होत तर नाही ना, त्याचा मोठा फटका त्या रुग्णाला बसत नाही ना,
याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. महापौर, आयुक्त यांनी प्रत्येक
रुग्णालयात जाऊन नुसती भेट न देता रुग्णांशी संपर्क साधून त्यांना सुविधा,
उपचार नीटपणे मिळत आहेत ना, काही त्रास तर नाही ना, त्याबाबत माहिती जाणून
घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करून अंमलबजावणी करायला हवी. राज्य सरकार व
मुंबईत महापालिका यांनी एक लक्षात घ्यावे की, कोरोनाबाबत कुठेतरी आपले गणित
चुकते आहे. त्याचा पुन्हा एकदा तज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करावा.
आत्मपरीक्षण करावे आणि त्यावर एकदाचा अंतिम तोडगा, उपाययोजना करावी.
कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोक़र्या गेल्या, रोजगार बुडाले, कंपन्या बंद
पडल्या. सर्वकाही ठप्प झाले. देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.
त्यामुळे कोरोनावर मात केली तरच देशातील ठप्प झालेले जनजीवन पुन्हा एकदा
सुरुळीत होईल. त्यासाठी पेंद्र, राज्य सरकर, मुंबई महापालिका व खासगी
रुग्णालये, इतर यंत्रणा आदींनी मिळून एकत्रित उपाय योजना करायला हवी. ही
मात करण्यासाठी जो जो सहकार्य करत आहे त्या प्रत्येकाची मदत घेणे गरजेचे
आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे असला किरकोळ विचार करून राजकीय अस्पृष्यतेला
थारा देउ नये. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे औषध चांगले असेल तर त्यालाही
संधी दिली पाहिजे. बाबा रामदेव भगवी वस्त्रे घालतात म्हणून त्यांना भाजपेयी
ठरवून त्यांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील
रोगी त्यांच्या औषधाने बरे होत असतील तर त्याला विरोध का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा