prafulla phadke mhantat

मंगळवार, ३० जून, २०२०

उपचाराचे राजकारण


कोरोनाचा अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. हळुहळू अनलॉक होण्याची चर्चा आहे. आता सगळं पूर्वीसारखं होईल असे अनेकांना वाटत आहे. पण ज्याप्रकारे देशभरातील कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्या मानाने हा रोग आटोक्यात आला आहे असे वाटत नाही. कोणतेही मोठे संंकट असते तेंव्हा त्यावर सार्वत्रिक आणि एकजुटीचे उपाय महत्वाचे असतात. पण आज रामदेव बाबांनी दावा केलेल्या औषधांवरून जे राजकारण चालले आहे ते फार भयानक आहे. एका संकटातून देश जात असताना आणि बाहेर पडत असताना सावध असण्याची गरज असते. आज हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे अशीच स्थिती आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील किंवा देशातील बरे झालेल्या रूग्णांचा आकडा वाढत असला तरी नव्याने येणार्‍या रूग्णांचा आकडाही काही कमी नाही.
राज्याची परिस्थिती पाहिल्यास आत्तापर्यंत 1,42,075 रुग्णांची नोंद झाली आहे. 74,744 रुग्ण बरे झाले आहेत. पण गेल्या 24 तासात 3,870 नवीन रुग्ण सापडले आहेत. 60,147 रुग्णांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत राज्यात 6 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातही काल दिल्लीतील परिस्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या स्थितीवर एक नजर टाकल्यास जवळजवळ एकूण रुग्णांच्या 50 टक्के  रुग्ण बरे झाले आहेत, तर 50 टक्के अद्याप रुग्णालयात आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पेंद्र, राज्य सरकार व मुंबईत महापालिका प्रशासन हे युद्धपातळीवर उपाययोजना करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, अपेक्षित फळ मिळालेले नाही. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण अद्यापही मिळविता आलेले नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे अशीच स्थिती आहे.
   मुंबईत प्रारंभी वरळी, प्रभादेवी भागात मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्याचबरोबर भायखळा, ग्रँटरोड आदी भागातही रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर पालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना वाढवली. त्यामुळे वरळीमधील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर पूर्व उपनगरात घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. पालिकेने आवश्यक उपाययोजना वाढवली आणि घाटकोपरमधून कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाले. मात्र, आता कोरोनाने पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंड या भागात तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, दहिसर, बोरिवली या भागात शिरकाव केला आहे. सध्या या भागात कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. फक्त आवश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येत आहेत तर मोटार सायकलवरून दोघांना प्रवास करण्यास बंधने घालण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे. घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
   पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, या भागात ‘मिशन शून्य’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता शीघ्र कृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिरते दवाखाने, वैद्यकीय पथके कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणार आहेत. सरकार, पालिका विविध पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. परंतु, त्याला अपेक्षित यश येत नाही.
   त्यामुळे आता पालिकेने घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करणे, रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिकांनीही बाजारपेठ, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी उगाच गर्दी करू नये. तर राज्य सरकार आणि महापालिकेनेही सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांवर व्यवस्थित उपचार करण्यावर अधिक लक्ष पेंद्रीत करायला हवे. तेथील डॉक्टर, डीन यांनी विशेष करून कोरोना बाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कुठे काही हलगर्जीपणा होत तर नाही ना, त्याचा मोठा फटका त्या रुग्णाला बसत नाही ना, याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. महापौर, आयुक्त यांनी प्रत्येक रुग्णालयात जाऊन नुसती भेट न देता रुग्णांशी संपर्क साधून त्यांना सुविधा, उपचार नीटपणे मिळत आहेत ना, काही त्रास तर नाही ना, त्याबाबत माहिती जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करून अंमलबजावणी करायला हवी. राज्य सरकार व मुंबईत महापालिका यांनी एक लक्षात घ्यावे की, कोरोनाबाबत कुठेतरी आपले गणित चुकते आहे. त्याचा पुन्हा एकदा तज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करावा. आत्मपरीक्षण करावे आणि त्यावर एकदाचा अंतिम तोडगा, उपाययोजना करावी. कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोक़र्‍या गेल्या, रोजगार बुडाले, कंपन्या बंद पडल्या. सर्वकाही ठप्प झाले. देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केली तरच देशातील ठप्प झालेले जनजीवन  पुन्हा एकदा सुरुळीत होईल. त्यासाठी पेंद्र, राज्य सरकर, मुंबई महापालिका व खासगी रुग्णालये, इतर यंत्रणा आदींनी मिळून एकत्रित उपाय योजना करायला हवी. ही मात करण्यासाठी जो जो सहकार्य करत आहे त्या प्रत्येकाची मदत घेणे गरजेचे आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे असला किरकोळ विचार करून राजकीय अस्पृष्यतेला थारा देउ नये. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे औषध चांगले असेल तर त्यालाही संधी दिली पाहिजे. बाबा रामदेव भगवी वस्त्रे घालतात म्हणून त्यांना भाजपेयी ठरवून त्यांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील रोगी त्यांच्या औषधाने बरे होत असतील तर त्याला विरोध का?







येथे जून ३०, २०२०
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

माझ्याबद्दल

माझा फोटो
prafulla phadke mhantat
Mumbai, Maharashtra, India
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (246)
    • ►  जून (35)
    • ►  मे (51)
    • ►  एप्रिल (41)
    • ►  मार्च (38)
    • ►  फेब्रुवारी (37)
    • ►  जानेवारी (44)
  • ►  2024 (3)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (227)
    • ►  मे (15)
    • ►  एप्रिल (52)
    • ►  मार्च (48)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (58)
  • ►  2021 (510)
    • ►  ऑक्टोबर (8)
    • ►  सप्टेंबर (38)
    • ►  ऑगस्ट (49)
    • ►  जुलै (62)
    • ►  जून (61)
    • ►  मे (56)
    • ►  एप्रिल (60)
    • ►  मार्च (60)
    • ►  फेब्रुवारी (56)
    • ►  जानेवारी (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  डिसेंबर (59)
    • ►  नोव्हेंबर (15)
    • ►  ऑक्टोबर (16)
    • ►  सप्टेंबर (53)
    • ►  ऑगस्ट (35)
    • ►  जुलै (59)
    • ▼  जून (48)
      • उपचाराचे राजकारण
      • ‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ
      • संधीचा फायदा नाही
      • परिवर्तनाची वारी
      • मुखवटा बदलण्याचा डॅ्रगनचा डाव
      • ‘भक्तांची कैवारी, पंढरीची वारी
      • मुंबई सुरू करा
      • आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी
      • अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
      • चीनची पोटदुखी
      • लॉकडाउन आता नको रे बाबा...
      • सत्य परिस्थिती समोर यावी
      • भवितव्य अंधारात
      • आंबट द्राक्षांची गोष्ट
      • वाईट परिस्थिती
      • चोख उत्तर देण्याची वेळ
      • यांना कुणीतरी आवरा
      • आर्थिक कोंडी हाच उपाय
      • शिक्षणाच्या नावानं ...
      • आषाढस्य प्रथम दिवसे।
      • ‘ चुकीची वेळ'
      • लाठीचे रहस्य..
      • अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी
      • लोकशिक्षणाची वारी
      • प्रामाणिक माणसांना महातवितरणचा शॉक
      • माया ही पंढरी, सेवा ही पंढरी
      • चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
      • पाहु दे पंढरी । डोळा गळा॥
      • वारी चुकू न दे हरी...
      • समाजप्रबोधनाचे माध्यम वारी
      • स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
      • या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....
      • संतांची मांदियाळी
      • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
      • जाते माहेराला जाते माहेराला
      • पाउले चालती पंढरीची वाट
      • जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • आता पावसाची प्रतिक्षा
      • ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
      • अनेक भाव मनात आहेत...
      • तारणहार....
      • कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
      • मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
      • महायुद्धाची नांदी
      • या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
      • पुनश्च हरिओम
      • अनलॉक व्हायचे आहे....
    • ►  मे (51)
    • ►  मार्च (24)
    • ►  फेब्रुवारी (34)
    • ►  जानेवारी (33)
  • ►  2019 (109)
    • ►  डिसेंबर (45)
    • ►  नोव्हेंबर (11)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (9)
    • ►  फेब्रुवारी (17)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2018 (387)
    • ►  डिसेंबर (26)
    • ►  नोव्हेंबर (30)
    • ►  ऑक्टोबर (26)
    • ►  सप्टेंबर (20)
    • ►  ऑगस्ट (27)
    • ►  जुलै (32)
    • ►  जून (36)
    • ►  मे (39)
    • ►  एप्रिल (35)
    • ►  मार्च (37)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2017 (31)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  ऑगस्ट (11)
    • ►  जुलै (2)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (4)
    • ►  फेब्रुवारी (10)
  • ►  2016 (232)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (25)
    • ►  जुलै (19)
    • ►  जून (26)
    • ►  मे (29)
    • ►  एप्रिल (30)
    • ►  मार्च (31)
    • ►  फेब्रुवारी (29)
    • ►  जानेवारी (42)
  • ►  2015 (165)
    • ►  डिसेंबर (23)
    • ►  नोव्हेंबर (22)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (36)
    • ►  जुलै (33)
    • ►  जून (12)
    • ►  फेब्रुवारी (13)
    • ►  जानेवारी (24)
  • ►  2014 (206)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (26)
    • ►  ऑक्टोबर (9)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  जुलै (12)
    • ►  जून (23)
    • ►  मे (20)
    • ►  एप्रिल (85)
  • ►  2013 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2011 (2)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
  • ►  2010 (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  मार्च (2)

लेबल

  • uttam nirnay

गैरवर्तनाची तक्रार करा

facebook

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

हा ब्लॉग शोधा

Pages

  • Home

भारताला सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात एआयची भूमिका महत्त्वाची

लोकप्रिय पोस्ट

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • जाते माहेराला जाते माहेराला
    वारीमध्ये भक्तीमार्ग आहे. या भक्तीमार्गाचा पाया प्रेम आहे. प्रेमाचे सर्वोत्कृष्ठ स्थान म्हणजे आई. म्हणूनच आपल्याकडे विठोबा असेल नाहीत...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.