शनिवार, ४ जानेवारी, २०२५

मान्याच्या वाडीत मराठीचा ठराव


किसना त्वांड पाडून म्हमईवरनं गावाकडं आला. म्हमईवरून आल्यावर इचारपूस कराय समदा गांव जमतो. तसा किसनाच्या घरात येकेक करून मान्याच्या वाडीतील गावकरी जमले. आता समद्यांना किसनानं सांगून टाकलं की त्यो काय पुनांदा म्हमईला जानार न्हाय.


झालं.. मान्याच्या वाडीत काईबाई विषय लागतोच गावकºयांना. तसा चावडीवरचा विषय झाला. किसन्यानं का म्हमईला जायचं टाळलं यावरून समद्या गावात चर्चा झाली. सरपंच दौलतराव मान्यांच्या कानाव ही बात गेली, तशी त्यांनी ग्रामपंचायतीची मीटिंगच बुलावली. मीटिंगचं आमंत्रण समद्या सदस्यांना दिलं. इरोदी पक्षनेता कैलास मान्याला पण आमंत्रण आलं. आता या मीटिंगमध्ये नक्की काय होनार?

मान्याच्या वाडीनं एक डाव निर्णय घेतला की ते त्याचा पार तडीस नेण्यासाठी आटापिटा करतात, हे संपूर्न माराष्ट्राला आतापातुर माहिती झालं होतं. हितं काय बी झालं तरी त्याचा उत्सव असतो. अगदी भांडण असू दे नाहीतर लग्नकार्य.. ते पन थाटात आणि खास शैलीत होतं. त्यामुळे मान्याची वाडी हे नाव आता समदीकडं झळकत होतं. त्यामुळे आता या ग्रामपंचायतीच्या मीटिंगकडे समद्यांची नजर लागली होती. ग्रामपंचायत जो निर्णय घेनार तो नंतर सार्वजनिक सभेत सांगितला जानार हुता.


रविवारी संध्याकाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सगळे सदस्य जमले. विशेष आमंत्रित म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बंडू मास्तरांना आमंत्रित केलं व्हतं. सरपंच दौलतराव मान्यांनी बोलायला सुरुवात केली, ‘समस्त ग्रामपंचायत सदस्य आनि उपस्थित सर्वांना या ठिकानी मी का बोलावलं हाय हे ठाव हायच. आपल्या गावचा सुपुत्र किसन बाबुराव माने हा म्हमई सोडून गावाकडं आला. गावाकडं आला याचं कोनाला दु:ख असायचं कारान न्हाई. पर त्यो ज्या कारनानं वापस आलाय ते कारान चिंतेचं हाय. आता आपल्या गावाकडली मुलं शिकल्यासवरल्याली असली तरी विंग्रजी, हिंदी भाषेतून बाहीर गेल्याव बोलाय कचरत्यात. त्ये काय म्हनत्यात मºहाटीत ते डेरिंग न्हाई व्हत.’

‘पर डेरिंग ह्यो विंग्रजी शब्द हाय’... महीपती बोलला, तसं दौलतराव मिश्किलपणे म्हणाले, ‘तरी म्हनलं अजून विरोदी पक्षानं त्वांड कसं उघाडलं नाय... आर महिपतीदादा, भावना समजून घ्याव्यात. तर म्या काय बोलत होतो, हा... तर मोठ्या शहरात, म्हमईला गेल्याव सगळीकडं विंग्रजी, हिंदी बोलत्यात. मºहाटी बोललं की अपमान करत्यात. त्याचं लईच टेन्शन किसन्यानं घेतलं अन् त्यो परत आलाय. अशा प्रकारे कोनी माघारी येनं हे गावासाठी शोभा देनारं न्हाई, म्हनून आजची मीटिंग हाय. यावर काय उपाय करता येईल यावर चर्चा व्हाय पायजे. ग्रामपंचायतीचा हा ठराव आपन पालकमंत्र्यापातूर पोहोचवू.’


‘पर म्या काय म्हनतो,’ महिपतीनं त्वांड पुन्हा उघडलं अन् म्हनाला, ‘आलाय तर करुद्या की त्याला शेतीवाडी. काय कमी हाय का गावांत.’ त्याचं वाक्य पुरं व्हायच्या आतच भैरु माने म्हनाला, ‘ आरं त्याला हतं यायला कोनी बंदी केली नाय. पर त्यो ज्या प्रकारे आला ते वाईट हाय. जरा समजून घे की. उगा ते संसदेसारखं इरोदासाठी इरोद नकं करू..’

आता जित्या पाटलाला जोर आला. युवा नेता असल्यानं आगामी भावी काळात आपल्याला इथं सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशी आशा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपलं वेगळं मत मांडायचं ही त्याची ख्याती होती. तो म्हणाला, ‘गावचा एक तरुन मºहाठी बोलला म्हनून अपमानाती होऊन मुंबई सोडून परत येत असल तर ते मान्याच्या वाडीला अपमानास्पद आहे. म्हमई आमची राज्याची राजधानी हाय. तिथं मºहाटी चालत नसेल तर हुनार कसं? आज मान्याच्या वाडीतील घरटी एक मानूस म्हमईत हाय. त्या परत्येकानं तिथं त्यांची भाषा बोलली तर आपल्या भाषेला अभिजीतचा दर्जा दिऊन काय उपयोग हाय?’


‘अभिजीत नाही, अभिजात... ’ बंडू मास्तरांनी नुकताच अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना इथे करेक्शन करता आलं. तसं जित्या म्हनाला, ‘तेच हो.. पन आपली ही अभिजात भाषा आपन टिकवली न्हाय तर काय त्या दर्जाला अर्थ हाय? तवा आपन आजच हितं ठराव कराय पायजेल की, आपल्या गावातला परत्येक जन म्हमईत मºहाटीच बोलल.’

‘असं कसं चालंल? आँ असं कसं चालंल?’ परशा मान्यानं तोंड उचकाटलं, ‘आता टॅक्शीवाल्याला मराठी येत नसंल, तो भय्या असंल तर हिंदीत बोलाय नगं? दुकानदार गुजराती, मारवाडी, पंजाबी असंल तर त्यो कसा मºहाटी बोलनार? झालंच तर रेल्वेचं तिकीट काडाय तिकीट खिडकीवर सगळी बाहीरची मानसं असतील तर हिंदी बोलाय नगं का?’


‘ लई बोललात...’ दौलतराव माने गरजलेच. ‘आरं, त्ये लोक पोटापान्यासाठी इथं आले आहेत. त्यांची भाषा शिकवायला नाय.. भाषा शिकवायची तर मास्तरकी करा तुमच्या राज्यात जाऊन. परशाभाऊ तुमच्यासारख्या कचखाऊ मानसांमुळं हे समदं घडलंय. ज्या टॅक्शीवाल्याला मºहाटी येत नाय त्याच्या टॅक्शीत बसू नका. आरं हितं समदं धंदे त्या लोकांनी केल्यावर त्यांनी भाषा तरी आपली वापरली पायजेल ना? आमच्या खिशातला पैसा, आमाला गिºहाईक बनवून काडत असाल तर आमच्या भाषेत बोला. नाय तर ज्याला मºहाटी बोलाय येतंय त्याच्याकडे जा.’

आता परबती पाटील बोलला, ‘ पर यवड्या मोठ्या मुंबईत मºहाटी बोलनारा टॅक्शीवाला न्हाई? फळविक्रेता न्हाई? किराणा दुकानदार न्हाई? ’


‘ या म्हमईत सकाळी दूध घालाय येतोय त्यो भय्या, पेपरवाला कानडी नायतर मद्रासी, झालंच तर सलूनवाला, बांधकाम कामगार, दुकानदार, टॅक्सीवाला, रेल्वे कर्मचारी, सगळे बिगर मºहाटी. आपन फकस्त आपला पैसा त्यांना द्यायचा अन् त्यांची भाषा बोलायची. पर हे कवापातूर चालनार? ही आमची चूक हाय. आमी लोक त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलतो. पर आता ठराव करून टाका, जो मºहाठी बोलंल त्याच्याकडूनच खरेदी करू. नायतर आमची यंत्रणा सुरू करू. आपल्या गावातील परत्येकानं आपल्या पै पावन्याला कळवा, की जे म्हमईत ºहात्यात त्यांनी मºहाटीच बोललं पायजे. म्हमईत मºहाटी बोलनाºयांकडूनच खरेदी करा. तसं केलं न्हाई तर गावच्या जत्रंला यायचं न्हाय की हितल्या सातबारावर हक्क ठिवू देनार न्हाय. आपली मºहाटी टिकवायची असंल तर राज्यातल्या परत्येक ग्रामपंचायतींनी असा ठराव केला पायजेल. ते म्हमईतील मºहाटीचे कैवारी पक्ष, नेते नुसते भोंगळ हायत. त्यांनी काय केलं नाय म्हनून आपल्याला गावातून, मºहाटी मातीतून हा उठाव कराय पायजेल.’

सर्वांनी आनंदानं टाळ्या वाजिवल्या अन् मान्याच्या वाडीनं ठराव केला, ‘आमच्या गावातील कोणीही म्हमईत मºहाटीशिवाय बोलनार न्हाई. मºहाटी बोलनाºया विक्रेत्याचीच सेवा घेईल. मºहाटी विक्रेता नसंल तर पर्यायी व्यवस्था केली जाईल.’


प्रफुल्ल फडके/ मु. पो. मान्याची वाडी

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: