कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाउनमुळे माणसं घरात बसून होती आणि आहेत. त्यामुळे चोर्या, दरोडे या प्रकारात घट झालेली असली तरी सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र प्रचंड वाढ झालेली दिसते. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे पारंपरिक गुन्हेगारीचे प्रमाण एकीकडे कमी होत असताना सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे, हे आता दिसून येते आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या ऑनलाईन व्यवहारामुळे तर सायबर गुन्हेगारांसाठी जणू पर्वणीचाच काळ आला आहे. गेल्या काही दिवसांपासूनपासून सोशल मिडीयावरून झालेल्या ओळखीतून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, गुंतवणुकीचे आमिष, लॉटरी लागल्याचे आमिष, संकेतस्थळावरून मोबाईल संच, फर्निचर, दुचाकी, मोटारी अशा वस्तूंची विक्री करायची आहे, असे आमिष दाखवून सामान्यांना हातोहात गंडा घालण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे दर दिवशी सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वास्तविक याबाबत सायबर विभागाकडून वेळोवेळी प्रबेधन करण्यात येत असले तरी सर्वसामान्य नागरिक खास करुन महिला याकडे कानाडोळा करताना दिसतात. कोणतीही बँक आपला पासवर्ड, खाते नंबर वा इतर गोपनीय माहिती विचारत नाही, असे वारंवार खुद्द बँकाकडून सांगण्यात येत असते. तसे मेसेजही बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असतात, पण तरीही हमखास कोणाचा तरी फसवा फोन येतो आणि ग्राहक फसला जातो. कोव्हीड कर्ज, मुद्रा कर्ज च्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून कर्ज घ्या म्हणून फोन करणारे अनेक लोक कार्यरत आहेत. तुम्हाला 30, मिनीटात ते 24 तासात कर्ज खात्यात ट्रान्स्फर करतो असे सांगून सर्व्हीस आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे गोळा करणारी यंत्रणा कार्यरत आहे. बँक बझार, पैसा बझार, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला अशा मोठमोठ्या कंपन्यांची नावे सांगून हे पैसे लुटण्याचे प्रकार होत आहेत. पोलीस, बँका तसेच अन्य संस्थांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तरीही हे प्रकार फोफावत आहेत. माणसांच्या असहायतेचा गैरफायदा उठवला जात आहे. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येणार्या आमिषांना बळी पडू नका. ऑनलाईन व्यवहार करताना खातरजमा करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण पोलीस नेमके काय आवाहन करतात हे या गुन्हेगारांना माहिती असते. त्यामुळे ते त्यावर मार्ग काढून सफाईदारपणे गुन्हे करतात. त्यामुळे हे प्रकार वाढीस लागतात.
सायबर क्राईमच्या आकडेवारीनुसार देशभरात घडणार्या सायबर क्राईमपैकी 70 टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातूनच केले जातात. मोबाईलचे सीम सहजपणे बदलता येतात वा वापरुन फेकून देता येतात. त्यांचा माग शोधण्यासाठी अथक प्रयत्न घ्यावे लागतात. तपास अधिकारी चिवट असेल तर तो कोणत्याही गुन्हेगाराला कोठूनही शोधून काढतोच, मात्र तपासात हलगर्जीपणा झाला तर मात्र गुन्हेगाराच्या पथ्यावर पडते. मोबाईलच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक, हॅकींग, फेक कॉल्स, बदनामी, व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून अश्लील मेसेज, फोटो, व्हीडिओ शेअर करणे, फोटोशॉपच्या ट्रिक्स वापरुन एखाद्याचे फेक अकाऊंट तयार करणे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे. खासगी संदेश सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करणे, पैशाची, शरीरसुखाची मागणी करणे असे गुन्हे घडतात. आपला आपल्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद असणे याकरीताच महत्वाचे असते. कोव्हीड 19 अर्थात कोरोनाच्या संकट काळात हे प्रकार अधिक वाढीस लागले. राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2013 हे सायबर क्षेत्रातील सर्वसमावेशक सायबर सुरक्षा धोरण पहिल्यांदाच भारत सरकारने आणले. या धोरणात काही महत्वाच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला होता. यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र, चाचणी केंद्र, मालवेअर देखरेख केंद्र, राष्ट्रीय गंभीर माहिती सुरक्षा केंद्र यांची उभारणी करण्याचे नमूद करण्यात आले होते. भारत सरकारने आता नवे सायबर सुरक्षा धोरण 2020 आणले जाईल अशी घोषणा केली आहे. अर्थात सायबर सुरक्षेबाबतच्या मुद्यावर आपल्याकडे पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इंटरनेट-सक्षम साधने आणि प्रचंड माहिती यासारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र आता अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. देशातील विविध संस्था आता आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. सायबर हल्ल्यांचा सामना करणा-या जगातील पहिल्या 10 देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. विशेष म्हणजे, कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच हे सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. फिशिंग, स्पॅमिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यंत्रणांची स्कॅनिंगच्या माध्यमातून महत्वाची माहिती चोरणे, अशा घटनांमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. हॅकिंग, स्पॅम मेलद्वारे मालवेअरचा शिरकाव आणि अशाच इतर असुरक्षित प्रकारांचा वापर करुन सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती वाढल्याने इंटरनेटवर संशयित सर्फिंगचेही प्रमाण वाढले आहे. कदाचित ही फक्त एक सुरुवात आहे आणि येत्या काळात सायबर हल्ल्यांचे हे प्रमाण आणखी वाढेल, अशी दाट शक्यता आहे.माणसं घरातून बाहेर पडत नाहीत, सहजगत्या त्यांना फसवून लुटता येईल याची जाणिव गुन्हेगारी जगतात वाढीस लागल्यानेच हे सर्व घडून येताना दिसते आहे. देशभरात घडणा-या गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपासयंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. नेट बँकींग करताना कॉमन वाय फायचा वापर टाळावा असे वारंवार सांगितले जाते. याशिवाय मोबाईल बँकींग करताना ‘वन टाईम पासवर्ड’चा आग्रह धरावा. आपला ओटीपी शेअर करु नका, किंवा तुमच्या मोबाईलवर माझा ओटीपी चूकून आला आहे, तो मला सांगा अशी विचारणा करणार्यांपासून सावध रहा. ऑनलाईन वा ऑफलाईन आर्थिक व्यवहार असोत वा व्यक्तिगत माहितीचे आदान प्रदान दक्षता बाळगलीच पाहिजे. पण हे एक नवे आव्हान पोलिसांपुढे आहे हे निश्चित.
वास्तविक याबाबत सायबर विभागाकडून वेळोवेळी प्रबेधन करण्यात येत असले तरी सर्वसामान्य नागरिक खास करुन महिला याकडे कानाडोळा करताना दिसतात. कोणतीही बँक आपला पासवर्ड, खाते नंबर वा इतर गोपनीय माहिती विचारत नाही, असे वारंवार खुद्द बँकाकडून सांगण्यात येत असते. तसे मेसेजही बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असतात, पण तरीही हमखास कोणाचा तरी फसवा फोन येतो आणि ग्राहक फसला जातो. कोव्हीड कर्ज, मुद्रा कर्ज च्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून कर्ज घ्या म्हणून फोन करणारे अनेक लोक कार्यरत आहेत. तुम्हाला 30, मिनीटात ते 24 तासात कर्ज खात्यात ट्रान्स्फर करतो असे सांगून सर्व्हीस आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली पैसे गोळा करणारी यंत्रणा कार्यरत आहे. बँक बझार, पैसा बझार, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला अशा मोठमोठ्या कंपन्यांची नावे सांगून हे पैसे लुटण्याचे प्रकार होत आहेत. पोलीस, बँका तसेच अन्य संस्थांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तरीही हे प्रकार फोफावत आहेत. माणसांच्या असहायतेचा गैरफायदा उठवला जात आहे. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येणार्या आमिषांना बळी पडू नका. ऑनलाईन व्यवहार करताना खातरजमा करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण पोलीस नेमके काय आवाहन करतात हे या गुन्हेगारांना माहिती असते. त्यामुळे ते त्यावर मार्ग काढून सफाईदारपणे गुन्हे करतात. त्यामुळे हे प्रकार वाढीस लागतात.
सायबर क्राईमच्या आकडेवारीनुसार देशभरात घडणार्या सायबर क्राईमपैकी 70 टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातूनच केले जातात. मोबाईलचे सीम सहजपणे बदलता येतात वा वापरुन फेकून देता येतात. त्यांचा माग शोधण्यासाठी अथक प्रयत्न घ्यावे लागतात. तपास अधिकारी चिवट असेल तर तो कोणत्याही गुन्हेगाराला कोठूनही शोधून काढतोच, मात्र तपासात हलगर्जीपणा झाला तर मात्र गुन्हेगाराच्या पथ्यावर पडते. मोबाईलच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक, हॅकींग, फेक कॉल्स, बदनामी, व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून अश्लील मेसेज, फोटो, व्हीडिओ शेअर करणे, फोटोशॉपच्या ट्रिक्स वापरुन एखाद्याचे फेक अकाऊंट तयार करणे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे. खासगी संदेश सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करणे, पैशाची, शरीरसुखाची मागणी करणे असे गुन्हे घडतात. आपला आपल्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद असणे याकरीताच महत्वाचे असते. कोव्हीड 19 अर्थात कोरोनाच्या संकट काळात हे प्रकार अधिक वाढीस लागले. राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2013 हे सायबर क्षेत्रातील सर्वसमावेशक सायबर सुरक्षा धोरण पहिल्यांदाच भारत सरकारने आणले. या धोरणात काही महत्वाच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला होता. यात राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र, चाचणी केंद्र, मालवेअर देखरेख केंद्र, राष्ट्रीय गंभीर माहिती सुरक्षा केंद्र यांची उभारणी करण्याचे नमूद करण्यात आले होते. भारत सरकारने आता नवे सायबर सुरक्षा धोरण 2020 आणले जाईल अशी घोषणा केली आहे. अर्थात सायबर सुरक्षेबाबतच्या मुद्यावर आपल्याकडे पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इंटरनेट-सक्षम साधने आणि प्रचंड माहिती यासारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे सायबर हल्ल्याचे क्षेत्र आता अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. देशातील विविध संस्था आता आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम झाल्या आहेत. सायबर हल्ल्यांचा सामना करणा-या जगातील पहिल्या 10 देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. विशेष म्हणजे, कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच हे सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. फिशिंग, स्पॅमिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील यंत्रणांची स्कॅनिंगच्या माध्यमातून महत्वाची माहिती चोरणे, अशा घटनांमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. हॅकिंग, स्पॅम मेलद्वारे मालवेअरचा शिरकाव आणि अशाच इतर असुरक्षित प्रकारांचा वापर करुन सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती वाढल्याने इंटरनेटवर संशयित सर्फिंगचेही प्रमाण वाढले आहे. कदाचित ही फक्त एक सुरुवात आहे आणि येत्या काळात सायबर हल्ल्यांचे हे प्रमाण आणखी वाढेल, अशी दाट शक्यता आहे.माणसं घरातून बाहेर पडत नाहीत, सहजगत्या त्यांना फसवून लुटता येईल याची जाणिव गुन्हेगारी जगतात वाढीस लागल्यानेच हे सर्व घडून येताना दिसते आहे. देशभरात घडणा-या गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपासयंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. नेट बँकींग करताना कॉमन वाय फायचा वापर टाळावा असे वारंवार सांगितले जाते. याशिवाय मोबाईल बँकींग करताना ‘वन टाईम पासवर्ड’चा आग्रह धरावा. आपला ओटीपी शेअर करु नका, किंवा तुमच्या मोबाईलवर माझा ओटीपी चूकून आला आहे, तो मला सांगा अशी विचारणा करणार्यांपासून सावध रहा. ऑनलाईन वा ऑफलाईन आर्थिक व्यवहार असोत वा व्यक्तिगत माहितीचे आदान प्रदान दक्षता बाळगलीच पाहिजे. पण हे एक नवे आव्हान पोलिसांपुढे आहे हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा