संपूर्ण देशाच्या दृष्टीने या आठवड्यातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती तर ती अयोध्येतील राममंदीराच्या भूमिपूजनाची. पण आता या भूमिपूजनानंतर अनेकांची पोटदुखी वाढली आहे. राजकीय पक्षांचे विशेषत: भाजप विरोधकांचे तर धाबेच दणाणले आहेत. त्यामुळेच सोशल मिडीयावर फक्त एकच चर्चा आहे. ती म्हणजे आता 2024 च्यनिवडणुकीपूर्वी मंदीर उभे केले जाईल आणि भाजप त्याचा निवडणुकीत फायदा उठवले आणि सत्तेवर येईल. त्यामुळे काँग्रेस आदी सर्वच विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
विरोधी पक्षांचा किती दुटप्पीपणा आहे हेच यातून दिसते. एकीकडे म्हणायचे, राम सर्वांचा आहे. राम मंदीर बांधले पाहिजे. दुसरीकडे म्हणायचे जाहीरनाम्यात गेल्या चार निवडणुकीत भाजपने राममंदीराचा मुद्दा उठवला होता. ते बांधून दाखवा. आता ते बांधले जाते आहे तरी विरोधकांना चिंता आहेच. त्यामुळे रामाच्या मंदीराची भिती विरोधकांनी घेतलेली दिसते.
खरंच तसा विचार केला तर 5 तारखेला एक अविश्वसनीय असाच कार्यक्रम झाला. म्हणजे 500 वर्षे जे शक्य झाले नाही, ते ‘याचि देही याचि डोळा’ साकार होत असताना संपूर्ण देशानेच नव्हे तर जगानेही पाहिले. अमेरिकेतही त्याचा आनंद व्यक्त केला गेला. फक्त आनंद झाला नाही तो काँग्रेसजनांना. म्हणजे मृत्यू जवळ आल्यानंतर, पराभव समोर आल्यानंतर रावण जसा रामाच्या नावानं शंख करत होता तशीच अवस्था विरोधकांची झालेली आहे. दिलेले वचन भाजपने पूर्ण केले असेल, जाहीरनाम्यातील सगळी वचने पूर्ण केली असतील आणि त्याचा प्रचारात वापर केला, काय केले याचा हिशोब मांडला तर त्यात चूक काय आहे?
काम न करता फक्त आश्वासने देण्याची काँग्रेसची परंपरा आता संपुष्टात आलेली आहे. दशकानुदशके निवडणुका या रस्ते, पाणी, वीज या विषयावर लढल्या जात होत्या. लोकांना दारिद्य्रात ठेवले जात होते. पण आता परिस्थिती बदलत असेल आणि रामराज्य येणार असेल तर चिंता का करायची? पण विरोधकांना हेच राममंदिराचे भूमिपूजन झालेले अजूनही पचलेले नाही. त्यांची मळमळ बाहेर येत आहे. त्यामुळे त्यांनी या विषयाला फाटे फोडण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे वाटेल त्या प्रतिक्रिया देउन आपल्या आकलेचे प्रदर्शन करण्याचे अनेकांनी चालवले आहे. आपण मोदींना विरोध केला की विचारवंत ठरतो, पुरोगामी ठरतो ही व्याख्या आजकाला रूढ होत आहे. कसलाही विचार नसला तरी अविचारी माणसेही मोदी आणि भाजप द्वेषातून पुरोगामी आणि विचारवंत बनत आहेत. पण हा मुद्दा मोदी, भाजपचा नाही. राम ही देशाची अस्मिता आहे. म्हणून तो महत्वाचा आहे हे साधे काँग्रेसआदी नेते आणि तथाकथीत पुरोगामी, विचारवंताना समजत नाही.
काँग्रेसची भलावण करणारी एक मूर्ख पत्रकार सागरिका घोष म्हणते की ‘भूमिपूजनाने चीन नाराज झाला,’ असे ट्विट केले आहे. चीनचा काय संबंध? पण काँग्रेसला बरे वाटावे म्हणून असे काहीतरी बावळटासारखे मत प्रदर्शित केले.
शशी थरूर यांनी तर कमालच केली आहे. मोदींनी अयोध्येतील भाषणात ‘130 कोटी भारतीय’ म्हटले. मग उर्वरित 8 कोटी भारतीय नाहीत का? असे ट्विट केले आहे. शब्दांचा कीस काढण्याचा हा प्रकार आहे. आपण बोली भाषेत म्हणतो, शंभर कोटी, सव्वाशे कोटी. अमूक इतके. म्हणजे त्या क्षणाला जन्माला येणार्या प्रत्येकाची नोंद घेतली पाहिजे अशाप्रकारचे बालीश विधान शशी थरूर करतात. हा चक्क हलकटपणा आहे. खोटारडेपणा आहे. थोडा देशाभिमान बाळगा की. पण नाही, देशाभिमान बाळगला की लगेच ते मोदी समर्थन होते. अहो मोदी आज आहेत. पण राम युगानुयुगे आहे हे लक्षात घेण्याची गरज यांना वाटत नाही.
राम मंदीर हा हिंदू मुसलमानातील वाद आहे असे विनाकारण काँग्रेसने पसरवले. प्रत्यक्षात हे मंदीर उभे राहते आहे याचा आनंद तमाम भारतीयांना झालेला आहे. त्यात मुसलमानही आलेच. अनेक ठिकाणी त्यादिवशी हिंदु मुसलमानांनी एकत्र येउन आरती केल्याच्याही बातम्या आहेत. पण ही एकी काँग्रेसला डोकेदुखी झालेली आहे. भारतातील बहुसंख्य मुसलमानांनी राममंदिराचे वास्तव आणि त्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्य केले आहे. त्यामुळे तिथे भूमिपूजन होणे आणि कालांतराने भव्यदिव्य राममंदिर उभे होणे स्वाभाविकच आहे, अशी त्यांची भावना आहे. पण काँग्रेस आणि अशा तमाम तथाकथीत पुरोगाम्यांच्या दुहीच्या राजकारणामुळे काही दुष्ट लोकांचा पोटसूळ उठतो. अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी म्हणतात की, एकदा मशीद ही कायमची मशीद असते. तिथे दुसरे काही बांधण्यासाठी तिला तोडता येत नाही. तिथे मशीद होती आणि भविष्यातही राहील, असे आम्ही मानतो. ही मशीद मंदिर तोडून बांधलेली नाही, परंतु आता मात्र मंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाऊ शकते. म्हणजे भविष्यात अशा जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचे काँग्रेस, समाजवादी नेत्यांचे कारस्थान आहे याचेच हे द्योतक आहे. उत्तरप्रदेशातील संभल येथील समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर्रहमान बुर्क यांनी म्हटले की, अयोध्येत बाबरी मशीद होती आणि नेहमीच राहील. नरेंद्र मोदी सरकारने ताकदीच्या भरवशावर पायाभरणी केली आणि न्यायालयातही आपल्या बाजूने निकाल करवून घेतला. मुसलमान मोदी-योगींच्या नाही, तर अल्लाच्या भरवशावर आहे. भूमिपूजनाने मुसलमानांनी खवळून उठायला हवे. ही भडकावू वक्तव्ये करण्याचे यांचे धाडस होतेच कसे? या देशात रहायचे असेल तर इथले कायदे मानले पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे मंदीर उभे राहात आहे. हा न्याय त्यांना मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. पण अशांना भडकावण्याचे काम काँग्रेस करते आहे.
या लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वसहमतीच्या निकालाचे कितीही दाखले दिलेत, तरी काहीही फरक पडणार नाही. पण काही प्रामाणिक देशप्रेमी लोक काँग्रेसमध्येही आहेत. राजकारण डोळ्यासमोर ठेउन असले तरी त्यांनी रामाचे महत्व जाणले आहे. मध्य प्रदेश काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्या प्रांत कार्यालयावर रोषणाई केली आणि प्रभू रामचंद्रांचा भव्य फलक लावला. एवढेच नाही, तर कार्यालयात पूजादेखील केली.तिकडे प्रियांका वढेरांनाही बळेबळेच रामाचे गुणगान करणारे ट्विट करावे लागले. त्यामुळे बळेबळे का होईना राहुल गांधींनाही रामभक्तीचा पुळका आणावा लागला. अखिलेश यादव यांनी मात्र ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला आहे. अर्थात राममंदीराचे भूमिपूजन ही जरी देशाची अस्मिता असली तरी विरोधकांची डोकेदुखी त्याने वाढली आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती बळावली आहे.
खरंच तसा विचार केला तर 5 तारखेला एक अविश्वसनीय असाच कार्यक्रम झाला. म्हणजे 500 वर्षे जे शक्य झाले नाही, ते ‘याचि देही याचि डोळा’ साकार होत असताना संपूर्ण देशानेच नव्हे तर जगानेही पाहिले. अमेरिकेतही त्याचा आनंद व्यक्त केला गेला. फक्त आनंद झाला नाही तो काँग्रेसजनांना. म्हणजे मृत्यू जवळ आल्यानंतर, पराभव समोर आल्यानंतर रावण जसा रामाच्या नावानं शंख करत होता तशीच अवस्था विरोधकांची झालेली आहे. दिलेले वचन भाजपने पूर्ण केले असेल, जाहीरनाम्यातील सगळी वचने पूर्ण केली असतील आणि त्याचा प्रचारात वापर केला, काय केले याचा हिशोब मांडला तर त्यात चूक काय आहे?
काम न करता फक्त आश्वासने देण्याची काँग्रेसची परंपरा आता संपुष्टात आलेली आहे. दशकानुदशके निवडणुका या रस्ते, पाणी, वीज या विषयावर लढल्या जात होत्या. लोकांना दारिद्य्रात ठेवले जात होते. पण आता परिस्थिती बदलत असेल आणि रामराज्य येणार असेल तर चिंता का करायची? पण विरोधकांना हेच राममंदिराचे भूमिपूजन झालेले अजूनही पचलेले नाही. त्यांची मळमळ बाहेर येत आहे. त्यामुळे त्यांनी या विषयाला फाटे फोडण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे वाटेल त्या प्रतिक्रिया देउन आपल्या आकलेचे प्रदर्शन करण्याचे अनेकांनी चालवले आहे. आपण मोदींना विरोध केला की विचारवंत ठरतो, पुरोगामी ठरतो ही व्याख्या आजकाला रूढ होत आहे. कसलाही विचार नसला तरी अविचारी माणसेही मोदी आणि भाजप द्वेषातून पुरोगामी आणि विचारवंत बनत आहेत. पण हा मुद्दा मोदी, भाजपचा नाही. राम ही देशाची अस्मिता आहे. म्हणून तो महत्वाचा आहे हे साधे काँग्रेसआदी नेते आणि तथाकथीत पुरोगामी, विचारवंताना समजत नाही.
काँग्रेसची भलावण करणारी एक मूर्ख पत्रकार सागरिका घोष म्हणते की ‘भूमिपूजनाने चीन नाराज झाला,’ असे ट्विट केले आहे. चीनचा काय संबंध? पण काँग्रेसला बरे वाटावे म्हणून असे काहीतरी बावळटासारखे मत प्रदर्शित केले.
शशी थरूर यांनी तर कमालच केली आहे. मोदींनी अयोध्येतील भाषणात ‘130 कोटी भारतीय’ म्हटले. मग उर्वरित 8 कोटी भारतीय नाहीत का? असे ट्विट केले आहे. शब्दांचा कीस काढण्याचा हा प्रकार आहे. आपण बोली भाषेत म्हणतो, शंभर कोटी, सव्वाशे कोटी. अमूक इतके. म्हणजे त्या क्षणाला जन्माला येणार्या प्रत्येकाची नोंद घेतली पाहिजे अशाप्रकारचे बालीश विधान शशी थरूर करतात. हा चक्क हलकटपणा आहे. खोटारडेपणा आहे. थोडा देशाभिमान बाळगा की. पण नाही, देशाभिमान बाळगला की लगेच ते मोदी समर्थन होते. अहो मोदी आज आहेत. पण राम युगानुयुगे आहे हे लक्षात घेण्याची गरज यांना वाटत नाही.
राम मंदीर हा हिंदू मुसलमानातील वाद आहे असे विनाकारण काँग्रेसने पसरवले. प्रत्यक्षात हे मंदीर उभे राहते आहे याचा आनंद तमाम भारतीयांना झालेला आहे. त्यात मुसलमानही आलेच. अनेक ठिकाणी त्यादिवशी हिंदु मुसलमानांनी एकत्र येउन आरती केल्याच्याही बातम्या आहेत. पण ही एकी काँग्रेसला डोकेदुखी झालेली आहे. भारतातील बहुसंख्य मुसलमानांनी राममंदिराचे वास्तव आणि त्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्य केले आहे. त्यामुळे तिथे भूमिपूजन होणे आणि कालांतराने भव्यदिव्य राममंदिर उभे होणे स्वाभाविकच आहे, अशी त्यांची भावना आहे. पण काँग्रेस आणि अशा तमाम तथाकथीत पुरोगाम्यांच्या दुहीच्या राजकारणामुळे काही दुष्ट लोकांचा पोटसूळ उठतो. अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी म्हणतात की, एकदा मशीद ही कायमची मशीद असते. तिथे दुसरे काही बांधण्यासाठी तिला तोडता येत नाही. तिथे मशीद होती आणि भविष्यातही राहील, असे आम्ही मानतो. ही मशीद मंदिर तोडून बांधलेली नाही, परंतु आता मात्र मंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाऊ शकते. म्हणजे भविष्यात अशा जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचे काँग्रेस, समाजवादी नेत्यांचे कारस्थान आहे याचेच हे द्योतक आहे. उत्तरप्रदेशातील संभल येथील समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर्रहमान बुर्क यांनी म्हटले की, अयोध्येत बाबरी मशीद होती आणि नेहमीच राहील. नरेंद्र मोदी सरकारने ताकदीच्या भरवशावर पायाभरणी केली आणि न्यायालयातही आपल्या बाजूने निकाल करवून घेतला. मुसलमान मोदी-योगींच्या नाही, तर अल्लाच्या भरवशावर आहे. भूमिपूजनाने मुसलमानांनी खवळून उठायला हवे. ही भडकावू वक्तव्ये करण्याचे यांचे धाडस होतेच कसे? या देशात रहायचे असेल तर इथले कायदे मानले पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे मंदीर उभे राहात आहे. हा न्याय त्यांना मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. पण अशांना भडकावण्याचे काम काँग्रेस करते आहे.
या लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वसहमतीच्या निकालाचे कितीही दाखले दिलेत, तरी काहीही फरक पडणार नाही. पण काही प्रामाणिक देशप्रेमी लोक काँग्रेसमध्येही आहेत. राजकारण डोळ्यासमोर ठेउन असले तरी त्यांनी रामाचे महत्व जाणले आहे. मध्य प्रदेश काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी 5 ऑगस्ट रोजी पक्षाच्या प्रांत कार्यालयावर रोषणाई केली आणि प्रभू रामचंद्रांचा भव्य फलक लावला. एवढेच नाही, तर कार्यालयात पूजादेखील केली.तिकडे प्रियांका वढेरांनाही बळेबळेच रामाचे गुणगान करणारे ट्विट करावे लागले. त्यामुळे बळेबळे का होईना राहुल गांधींनाही रामभक्तीचा पुळका आणावा लागला. अखिलेश यादव यांनी मात्र ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला आहे. अर्थात राममंदीराचे भूमिपूजन ही जरी देशाची अस्मिता असली तरी विरोधकांची डोकेदुखी त्याने वाढली आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती बळावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा