कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय, देवस्थान समितीने राज्य शासनाच्या आदेशानंतर घेतला. त्यानंतर मंगळवारी या पगारी पुजारी नेमण्याची भरती प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्यात आली. कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय, कर्म हे एका विशिष्ठ जातीसाठी असता कामा नये. ते कर्म करण्यासाठी आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर त्या ज्ञानाचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. त्यामुळे पौरोहित्य किंवा पूजापाठासंबंधी वैदीक शिक्षण घेतलेल्या कोणालाही या नोकरीपासून रोखता कामा नये. पुजारी हा ब्राह्मण जातीचाच असला पाहिजे असा कुठेही नियम नाही, कायदा नाही मग त्या जागा जर सर्व जातीच्या लोकांना दिल्या तर काय हरकत आहे? राज्य सरकारने याबाबत आग्रही भूमिका घेऊन या पुरोगामी महाराष्टÑाचे नाव राखले आहे. पुरोगामीपणाची परंपरा आपण राजर्षी शाहू महाराजांपासून सांगतो. त्यांच्याच कर्मभूमीतून ही सुरवात झाली त्याचे स्वागतच केले पाहिजे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात पगारी पुजारी आणि सेवक पदासाठी या परिक्षा होत आहेत. त्यासाठी विविध जातीचे ११३ उमेदवार ही परिक्षा देणार आहेत. यामध्ये ६ महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे महिलांना पौरोहित्याचा अधिकार नाही असे म्हणणाºयांना चांगलीच चपराक बसली आहे. दोन तीन वर्षांपूर्वी महिलांच्या हक्कासाठी किंबहुना समानतेसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंदीर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. तेंव्हा कोल्हापूरच्या या मंदीरात झालेली झटापट ही चिंताजनक होती. परंतु तृप्ती देसाई यांनी देवीच्या मंदीरात देवीला साडी नेसवण्यासाठी महिलाच पुजारी असली पाहिजे, ती कोणत्याही जातीची असली तरी चालेल पण देविला साडी ही पुरूष पुजाºयाने नेसवता कामा नये असा आग्रह धरला होता. त्यादृष्टीने महिला पुजारी या मुलाखतीला आणि परिक्षेला येत आहेत हे चांगले आहे. या मंदिरात कामकाजासाठी एकूण ५५ पुजाºयांची गरज आहे. त्यात काही महिला असतील तर हा प्रश्नही त्यातून निकाली लागू शकतो. पुजारीपदासाठी परीक्षा घेऊन भरती होणे हा अभिनव उपक्रम आहे. त्यामुळे महाराष्टÑाचे पुरोगामीत्व राखले जाणार आहे. त्यासाठी एकूण २५ गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यासाठी ठेवलेल्या पात्रतेत हिंदू उमेदवारच परीक्षेसाठी पात्र असेल हे निश्चित केलेले आहे. अन्य नोकरीप्रमाणे याही नोकरीसाठी येणाºया उमेदवाराला उमेदवाराला गावातील पोलीस पाटलांकडून किंवा स्थानिक पोलिस ठाण्यातून वर्तणुकीचा दाखला घेणे बंधनकार करण्यात आला आहे. देवीची पूजा करणारा पुजारी हा चारित्र्याने निष्कलंक असला पाहिजे. त्यादृष्टीने ही अट महत्त्वाची ठरते. याशिवाय या उमेदवाराला शाहू वैदिक स्कूलची मान्यता असणे आवश्यक असणार आहे. तसेच उमेदवार संपूर्ण शाकाहारी असावा, धर्मशास्त्राचा अभ्यासक असावा याही अटी या परीक्षेसाठी आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेला आणि मुलाखतीला येणारºया उमेदवाराचे पौरोहित्य शिक्षण योग्य प्रकारे झालेले आहे की नाही यासाठी त्याच्याकडून सप्तशती चंडी पाठ, श्रीयंत्रविद्या पूजा, वेदोक्त षोडशोपचार, राजोपच्चार, चंडी हावन, देवी भागवत पुराण, नवरात्री पूजा विधी, मुद्रान्यास, मंत्रोच्चार, अभिषेक पूजा येते की नाही याचीही परीक्षा होणार आहे. धार्मिक मान्यतेला आणि पूजाविधीला कोणताही धक्का न लावता योग्य पुजाºयाकडून हे काम करवून घेतले जाणार आहे हे महत्वाचे आहे. योग्यप्रकारे शिक्षण घेतलेल्या पात्र उमेदवाराला जातीचे बंधन असत नाही हे यातून स्पष्ट होते, हेच महाराष्टÑाच्या पुरोगामीपणाचे लक्षण आहे. साधारण १०० वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये सर्व जातींचे पुजारी असावेत आणि या पुजाºयांना धार्मिक शिक्षण मिळावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदिक स्कूलची स्थापना केली होती. त्यानंतर आता या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. शाहू महाराजांची जयंती याच महिन्यात २६ तारखेला आहे. त्या निमित्ताने त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट म्हणावी लागेल. करवीर निवासीनी अंबाबाई देवीला मागील वर्षी श्री पूजक अजित ठाणेकर यांनी घागरा चोळी नेसवली होती. याविरोधात कोल्हापुरात मोठं आंदोलन सुरु झालं आणि मंदिरातील पुजारी हटाव अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूर, शिर्डी मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जातीची बंधने काढून टाकत फक्त पात्रतेला प्राधान्य दिले आहे. हा एक महत्वाचा निर्णय असल्याने त्याचे सर्वत्र स्वागत झाले पाहिजे. भारतीय पुराणात शिक्षण घेऊन जाती व्यवस्थेतील दरी दूर करता येते हे सांगितले आहे. विश्वामीत्र हे क्षत्रिय होते त्यांनी तपश्चर्या म्हणजे विशिष्ठ शिक्षण घेऊन ब्रह्मर्षीपद प्राप्त केले होते. त्यामुळे पौरोहित्य, वैदिक कर्मकांडं ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे असे नाही. त्यामुळे या कार्यातील नोकºया या सर्व जातींसाठी खुल्या आहेत हे स्पष्ट झालेच पाहिजे. त्यादृष्टीने महाराष्टÑाचा पुरोगामी चेहरा समोर येईलच पण पूजा पाठ, पौरोहित्य हे विशिष्ठ शिक्षणाने करता येते ते जन्माने एका विशिष्ठ जातीत येऊन करता येते असे नाही. त्यामुळे आधुनिक महाराष्टÑाचा पाया मजबूत होण्यास मदत होईल. मंत्रपठण, ग्रहण आणि ज्ञानाचा मार्ग सर्वाना मोकळा झालेला आहे.
मंगळवार, १९ जून, २०१८
पुरोगामी महाराष्टÑाचा पाया
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा