- आपल्याकडे सध्या भोंदू देशप्रेमाची लाट आली आहे. या लाटेत स्वत: मनसोक्त डुंबायचे आणि सत्ताधारी भाजपला झोडपून काढायचे हे नवे तंत्र कॉंग्रेसने विकसीत आणले आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम केले जात आहे तर देशद्रोही कन्हैय्याला डोक्यावर घेतले जात आहे. या भोंदू देशप्रेमाचा बुरखा फाडण्याची आता गरज आहे. आपली पापं झाकण्यासाठी दुसर्यांना बदनाम करण्याचे तंत्र कॉंग्रेसने अवलंबले आहे. पण म्हणून त्यातून निष्क्रिय अशा पप्पूचे कर्तृत्व मोठे होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
- त्याचप्रमाणे सध्या देशात राष्ट्रीयत्वाची महती सांगणारे नेते दुसर्या कोणत्या देशाविरुद्ध ओरडत नसून स्वत:च्याच देशबांधवांच्या विरोधात घसा खरवडत आहेत. आपले ढोंगी राष्ट्रभक्त आपल्याच नागरिकांच्या विरोधात धर्म किंवा जातीचे भांडवल करून विखार पसरवत आहेत.
- मागच्या आठवड्यात एका मुस्लिम आमदाराला महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. कारण काय तर त्यांनी म्हटले की, आपण ‘भारतमाता की जय’ या घोषणेऐवजी ‘जय हिंद’ म्हणणे अधिक पसंत करू. या दोन घोषणांमधला फरक काय आहे हे मला नेमकेपणाने माहीत नाही. या वारिस पठाण विरोधात दंड थोपटणारे काही भाजप सेनेचे आमदार नव्हते. सत्ताधारी भाजपने निलंबित केले असले तरी कॉंग्रेस राष्ट्रवादीचेही त्यावेळी देशप्रेम उफाळून आले होते. त्यामुळेच आपणच निर्माण केलेले भूत आपल्यापेक्षा मोठे होते आहे हे लक्षात आल्यावर कॉंग्रेसने आक्रमकपणा दाखवून दिला. त्यासाठी कॉंग्रेसला देशप्रेमाची आठवण झाली. म्हणजे केवळ स्वार्थासाठी आणि सत्तेसाठीच कॉंग्रेसला हे सगळे आठवत असते. भाजप शिवसेनेला रोखण्यासाठी एमआयएमला पुढे करणार्या कॉंग्रेसने एमआयएमला दाबण्यासाठी सत्ताधारी भाजपचा उपयोग केला. देशप्रेमाच्या भोंदू बुरखा घालून वारिस पठाणला निलंबित केले गेले. पण त्याचवेळी अफझल गुरूची बाजू घेणार्या, भारत विरोधी घोषणा देणार्या कन्हैय्याचे समर्थन पप्पू गांधी करत होते. मग त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला का नाही? त्यांना संसदेतून निलंबित कसे केले नाही? हा कॉंग्रेसचा दुटप्पीपणाच नव्हे काय?
- आजच्या भारतामध्ये राष्ट्रीयत्व म्हणजे दुसर्या कोणत्याही देशाविरुद्ध नसून, इथल्याच भारतीयांच्या विरुद्धची भावना हेच राष्ट्रीयत्व बनले आहे. राष्ट्रीयत्वाची महती सांगणारे नेते दुसर्या कोणत्या देशाविरुद्ध ओरडत नसून, स्वत:च्याच देशबांधवांच्या विरोधात घसा खरवडत आहेत. आपले ढोंगी राष्ट्रभक्त आपल्याच नागरिकांच्या विरोधात धर्म किंवा जातीचे भांडवल करून विखार पसरवत आहेत. त्याचाच एक प्रकार म्हणजे कॉंग्रेससारखे देशाची दिशाभूल करणारे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे एमआयएमसारख्या देशविघातक शक्तींना बळ देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे कन्हैय्यासारख्या देशद्रोही तरूणाची पाठराखण करून युवाशक्तीला वाममार्गाला लावण्याचे काम कॉंग्रेस करत आहे.
- भारतीय मुस्लिमांना किंवा भारतीय दलितांना दाबून टाकणे म्हणजे राष्ट्रीयत्व नव्हे, हे कॉंग्रेसला समजले पाहिजे. आपल्याकडे भावनात्मक आधार असलेले राष्ट्रीयत्व कोणते याची निश्चित व्याख्या नाही. भारतमाता की जय ही घोषणा देणे ही गोष्ट वगळता राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याची अजून काही भावनात्मक निशाणी दिसत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे देशघातक लोक आणि थेट भारताविरोधात घोषणा देणारे कन्हैय्या आणि त्याचे समर्थक जितेंद्र आव्हाडांसारखे विषारी लोक. यांच्या छळवादात या देशातील लोकशाही सापडली आहे. या दोन विघातक शक्तींचा सोयीनुसार वापर करण्याचे काम कॉंग्रेस करत आहे. या कॉंग्रेसचा खरा चेहरा समजून घेणे गरजेेचे आहे.
- सध्या देशप्रेमाचे, बदलाचे, सुधारणेचे, स्वातंत्र्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे फार मोठे पेव फुटले आहे. त्यात आमचे काही पत्रकार मित्रही हात धुवून घेत आहेत. अशा बेगडी देशप्रेमात कुमार केतकर, निखिल वागळे, जतिन देसाई असे लाचार पत्रकार स्वत:ला संधी शोधत आहेत. ज्यांनी चांगली पत्रकारीता करून तरूण पिढीपुढे आदर्श ठेवला पाहिजे तेच लोक नाव कमावल्यावर देशाला विकायला, विभाजीत करायला निघाले आहेत हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. हे सगळे सुमार, वटवाघळे कॉंग्रेसच्या पे रोलवर आहेत. देशप्रेमाचा बेगडी मुखवटा घालण्याचा ते आग्रह करत आहेत. त्यामुळेच
- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रवादी भूमिकेवरच अधिक भर देण्यात यावा, असे ठरवण्यात आले. राष्ट्रवादावर भर देण्याचा विषय निश्चितच स्वागतार्ह आहे. पण ज्याप्रकारे खोटे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद कॉंग्रेसकडून जोपासला जात आहे तसा मार्ग भाजपने अवलंबू नये एवढीच माफक अपेक्षा. या राष्ट्रवादी भूमिकेचा जगात भारताची एक नागरी सुसंस्कृत समाज म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी उपयोग होईल असे समजायला काहीच हरकत नाही.
मंगळवार, २९ मार्च, २०१६
देशप्रेमाची दांभिकता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा