- कुबेरांच्या माफीनाम्यानंतर त्यांच्यावर टिका केली असली तरी त्यामुळे ज्या असहिष्णूपणामुळे कुबेरांना अग्रलेख मागे घ्यावा लागला त्या असहिष्णूतेचे समर्थन कधीच केले जाणार नाही. कुबेरांनी लिहिले ते चूक की बरोबर हा प्रश्न नाही तर ज्यांच्या दबावामुळे कुबेरांना माफी मागण्याची वेळ आली त्या दबाव टाकणारांचे समर्थन कधीच करता येणार नाही. कारण जगातील सर्वात जास्त असहिष्णू वृत्ती याच लोकांकडून आलेली आहे. याबाबत भोंदू पुरोगामी काही बोलणार नाहीत. पण नाण्याची दुसरी बाजूही आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.
- धर्मांतराच्या मुद्द्यावरून ख्रिश्चन आणि ख्रिश्चनधार्जिण्या विचारवंतांनी प्रचाराचा गदारोळ उठवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. हिंदूत्ववाद्यांवर हिटलरचे वारस असण्याचाही आरोप केला जात आहे. हिटलरचा आरोप करताना हिंदू धर्माने तसे काय केले याचे कसलेही पुरावे या लोकांकडे नाहीत. पण हिंदू या शब्दाची, हिंदू या धर्माची आणि हिंदूस्थानची चीड असल्यामुळे कारण नसताना त्या धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र कोणी करत असेल तर ते बिल्कूल खपवून घेतले जाणार नाही. हिंदूधर्माचे पुरस्करते, धाडसाने गर्जना करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेले म्हणजे हिंदू धर्म संपला असे समजण्याचे कारण नाही. त्यांच्या वारसांनी लाचार होवून पडती बाजू घेतली तरी बाळासाहेबांचा विचार जीवंत ठेवणारेही या राज्यात आहेत हे लक्षात घ्यावे आणि ज्या दडपशाहीने अग्रलेख मागे घेण्याचा दहशतवाद मांडला त्यांनी सावध व्हावे. भारत विरोधी घोषणा देणे पुण्यकर्म आणि संशयास्पद असलेल्या संतपदाबाबत स्पष्टपणे बोलणे हे मात्र पाप ठरवले जात असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा कोण आणत आहे? अशा प्रकारे हिंदू धर्मावर, हिंदू संत महंतांवर टिका झाल्यावर हिंदूंनी कोणत्याही वर्तमानपत्राला माफी मागायला लावले नव्हते. तो त्यांचा विचार आहे असे समजून दुर्लक्ष केले होते. ख्रिस्ती धर्मीय असणार्या अनेक देशांमध्ये हिंदू धर्मियांच्या देवदेवतांची विटंबना केली जाते. तेव्हा या ख्रिस्ती बांधवांना कधी हे शहाणपण का सुचले नाही हा प्रश्न आहे. म्हणजे अमेरिकेत आणि अन्य ख्रिस्ती देशांमध्ये टॉयलेटच्या टाईल्सवर गणपतीची चित्र काढली होती असे प्रकार घडले आहेत. त्याबाबत कोणी कधी बोलले नाही. कोणत्याही वर्तमानपत्राला माफी मागण्यास ना हिंदूंनी सांगितले ना ख्रिश्चनांनी. हिंदू धर्मातील राम, कृष्ण, गणपती आणि अन्य देवांची तर नेहमीच थट्टा केली जाते. तेव्हा हिंदू कधीही पेटून उठत नाहीत. पण संतपदाबद्दल आपले मत व्यक्त केले तर एवढी दहशत या धर्माने माजवावी हे अनाकलनीय आहे. हिंमत असेल तर ख्रिश्चन धर्मियांनी, त्यांच्या कोण पोप टोप असतील त्यांनी कुबेरांच्या मुद्द्यांचे खंडण करून आपली भूमिका मांडणे गरजेचे होते. लोकसत्ताने ते नक्कीच छापले असते. वसई विरारमध्ये बडे प्रस्त असलेले प्रा. रॉबर्ट फ्रान्सिस हे फादर सातत्याने लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता यातून लिखाण करत असतात. त्यांनी यावर आपली मते का मांडली नाहीत?
- त्यामुळे हा दबाव नक्की ख्रिश्चन बांधवांचा होता की आणखी कोणाचा होता? कसल्या व्यावसायिक स्पर्धेचा होता काय याचाही उलगडा होणे आवश्यक आहे. पण यातून एक दिसून आले की जगात सर्वात सहिष्णू धर्म कोणता असेल तर तो हिंदू धर्मच आहे. कारण मुकाटपणे आपल्यावर झालेली कसलीही टिका सहजपणे तो धर्म सहन करतो. बाकीचे धर्मिय जसा दहशतवाद मांडतात तसा हिंदू धर्मिय कधी मांडत नाहीत. त्यामुळेच वाहिन्यांवर चालणार्या एरंडाच्या गुर्हाळातून शनीच्या चौथर्यावर चढणार्या महिला काय किंवा आणखी कोणत्याही मंदीराच्या प्रश्नावरून अनेक विद्वान बोलतात. निखिल वागळे, कुमार केतकरांसारखे निर्लज्ज लोक हिंदू धर्मियांना नावे ठेवतात. पण त्यांची याबाबत एका अक्षराने बोलण्याची हिम्मत झाली नाही. यावरूनच कोणता धर्म दहशतवादी आहे हे यातून दिसून आले आहे. त्यामुळे या अन्य धर्मियांच्या इतिहासातील काही गोष्टीही पाहणे आवश्यक आहे.
- धार्मिक संहिष्णूतेचा मुद्दा घ्या. ख्रिस्ती धर्म म्हणजे जणू धार्मिक संहिष्णूतेचा कळस असल्याचा आव आणला जातो. ज्या राष्ट्रातील लोकांचे धर्मांतर घडवून आणण्यात येते, त्या राष्ट्राच्या आत्म्यावर जो वार केलेला असतो, त्याची पुसटशी कबुलीही हे लोक देत नाहीत. वास्तविक या धर्माचा प्रसार करणारे मूळ रोमन राज्यकर्ते मुक्त विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. ‘देवांचा कोणी अपमान केला तर देवांनी त्याला बघून घ्यावे.’ असे रोमन सम्राट टायबेरीयस याची अधिकृत भूमिका होती. त्यामुळे ‘आमचाच देव खरा, तोच एकटा संपुर्ण विश्वाचा अधिष्ठाता’ ही भारतातील बुरसटलेल्या ख्रिश्चनांची भूमिका चुकीची आहे. विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा गैरफ़ायदा उठवून ख्रिस्ती पंथाने अनेक गोरगरीब रोमनांचे धर्मांतर घडवून आणले. तोच प्रकार सातत्याने भारतात झालेला आहे. माल्कम नावाचे कॅथलिक इतिहासकार सांगतात की, ‘पहिल्या क्रुसेडचा प्रारंभ आणि शेवट ज्यु लोकांच्या रक्तपाताने झाला (१०९६)’. लॉर्ड एक्टन हे दुसरे कॅथलिक इतिहासकार लिहीतात की, ‘खांद्यावर क्रुस धारण करणार्यांनी प्रभूभोजनाचा (कम्युनियन) विधी आटोपताच दिवसाचा उरलेला वेळ ज्यु लोकांच्या माना तोडण्यात घालवला. सहा हजार स्त्रीपुरूषांना त्यांनी ठार केले. सतराव्या शतकापर्यंत तरी एवढ्या तेवढ्या कारणावरून ख्रिस्तभक्त ज्यु लोकांच्या कत्तली करीत असत. प्रभू भोजनाच्या प्रसंगी चर्चमध्ये पाव आणि वाईनचा प्रसाद वाटला जातो. पाव म्हणजे प्रतिकरुपी ख्रिस्ताचा देह आणि वाईन म्हणजे रक्त. पाव आणि रक्त ग्रहण करणारा मेल्यावर स्वर्गात जातो अशी समजूत. एकप्रकारच्या बुरशीमुळे कधी कधी हा पाव लाल रंगाचा बनतो. पाव लाल बनला की कुणा दुष्ट ज्युने ख्रिस्ताच्य देहात सुरा खुपसला अशी आवई उठे आणि पाठोपाठ शेदोनशे ज्युंचा जीव घेण्यात येई. या असल्या शिकवणुकीवर आणि विचारांवर जगणार्या लोकांनी हिंदू धर्माला सहिष्णूतेची भाषा शिकवू नये. कुबेरांवर ज्या प्रकारे दबाव टाकला त्यावरून अजूनही हे लोक किती दुष्ट, असहिष्णू आणि हिंसक आहेत हेच अधोरेखित झाले आहे, ही नाण्याची दुसरी बाजू आहे.
मंगळवार, २२ मार्च, २०१६
नाण्याची दुसरी बाजू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा