मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

व्यासपिठाचे शिष्ठाचार माहित नसलेले असभ्य सबनीस

८९ व्या साहित्य संमेलनाला पिंपरीत सुरूवात दिमाखात झाली. डी वाय पाटील आणि पी डी पाटील यांनी हे संमलेन भव्य दिव्य करून त्याला एका उंचीवर नेवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी या संमेलनाला गालबोट लावले. चांगल्या चाललेल्या समारंभाला आपल्या तोंडाच्या गटारगंगेत बुडवले. बेअक्कल, बेमुर्वतखोर आणि मूर्ख माणसाची निवड महाराष्ट्रात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते असा संदेश जगभरात पोहोचवण्याचे काम सबनीसांनी केले. सबनीस हा माणूस मूर्ख आहे याची जाणिव संमेलनाचे उद्घाटक आणि देशाचे नेते शरद पवार यांना अगोदरच होती. त्याचप्रमाणे मावळते अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनाही ही जाणिव होती. त्यामुळेच सबनीसांचे नाव न घेता त्यांच्या योग्यतेबद्दल शरद पवार यांनी समयोचीत उल्लेख केला. साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा गुणवत्तेवर निवडून यावा. तो राजकीय माणसाप्रमाणे राजकारण करून निवडून येणे हा साहित्याचा अपमान आहे अशा तर्‍हेचा शरद पवारांचा विचार होता. राजकारण, निवडणुका या आमच्यासाठी ठेवा पण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे जाणकार, मान्यवर अशा माजी अध्यक्षांच्या माध्यमातून नाव सुचवून व्हायला हवे असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. याचे कारणच या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले सबनीस हे योग्य नाहीत, लायक नाहीत हे शरद पवारांनी अगोदरच ओळखले होते. त्यामुळेच नेहमी संमेलनाध्यक्षांबद्दल भरभरून बोलणारे शरद पवार सबनीसांबद्दल काहीच बोलले नाहीत. फक्त योग्य माणूस निवडला गेला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणी सबनीस अयोग्य असल्याचे ते सूचीत करून गेले. सबनीस बहुदा पैशाच्या जोरावर किंवा दहशतीच्या जोरावरच संमेलनाचे अध्यक्ष झाले असावेत. कारण त्यांच्यात गुणवत्ता आहे हे कोणालाच पटले नसावे. सबनीसांचे साहित्यिक योगदान किती हाही प्रश्‍नच आहे. त्यामुळेच मावळते संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनीही नाराजी दर्शवली. अध्यक्षपदाची निवड माजी अध्यक्षाकडून व्हावी अशी आपली इच्छा आहे आणि तसा विचार नुकताच आपण बोलून दाखवला होता हे सांगून शरद पवारांच्या विचारांशी सहमत असल्याचे मोरे यांनी दाखवले. पण सभ्य माणसांच्या पंगतीत बसण्याची आपली लायकी नाही हे या श्रीपाल सबनीसांनी दाखवून दिले. सबनीस हे हत्तींच्या कळपात निर्बृद्ध रेड्याप्रमाणे वावरत होते. हंसांच्या पंगतीत कावळ्याप्रमाणे भासत होते. त्यामुळेच मर्यादा, शिष्ठाचार पाळण्याचे भान त्यांना नव्हते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आले होते. भाषण सुरू करण्यापूर्वी या मूर्ख सबनीसाने व्यासपिठावर उपस्थित नसलेल्या माणसांची नावे घेतली. आपल्या कार्यकर्त्यांची, मानसपुत्रांचे नाव घेतले पण मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नाही. व्यासपिठाचे शिष्ठाचार नावाची काही गोष्ट माहित नसलेल्या सबनीसांना हे शोभणारे असले तरी साहित्य संमेलनाला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्याचे मुद्दाम टाळून जातीयवादाला चिथावणी देण्याचे काम केले, ब्राह्मणांवर टिका करण्याचे गलिच्छ काम केले. नंतर कोणीतरी चिठ्ठी पाठवल्यावर आपण विसरलो म्हणून पुन्हा मुख्यमंत्र्यांचा उदोउदो केला. हे गलिच्छ राजकारण कशासाठी? केवळ प्रसिद्धीसाठी? सवंग लोकप्रियतेसाठी? पण यामुळे साहित्य संमेलनाची बेअब्रू होते याचे भान कोणाला आहे का? सभा शास्त्र माहित नसलेला, राज शिष्ठाचार माहित नसलेला असंस्कृत माणूस संमेलनाचा अध्यक्ष झाला ही मराठीची अवहेलना आहे. महाराष्ट्रात एकही लायक माणूस अध्यक्षपदासाठी नाही असा संदेश जगभर यातून गेला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात असल्या भोंदू, भुक्कड, फालतू, बेअक्कल माणसांना पाहण्यापेक्षा ते संमेलन बंद केले तर बरे असे साहित्यप्रेमींना वाटू लागले आहे. गेल्या वर्षी पंजाबसारख्या ठिकाणी अत्यंत सुंदर साहित्य संमेलन झाले होते. पंजाबी माणसांनी त्याचे कौतुक केले होते. त्या संमेलनाचे सगळे पावित्र्य या सबनीसांनी घालवले. मराठी माणसांचा अपमान आपल्या बेअक्कल कृतीतून त्यांनी केला आहे. त्या व्यासपिठावर गुलझार यांच्यासारखे अमराठी साहित्यिक होते. विविध भाषांमधील ज्ञानपीठप्राप्त साहित्यिक होते. त्यांच्यासमोर श्रीपाल सबनीस यांनी मराठी भाषेला नागवे करून महाराष्ट्रात आता विद्वान साहित्यिक संपले आहेत असाच संदेश पोहोचवला. आता महाराष्ट्रात आम्हा मुर्खांचे राज्य सुरू झाले आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शरद पवार, सदानंद मोरे, देवेंद्र फडणवीस, पी डी पाटील, गुलझार यांनी सभ्य, सात्विक आणि विद्वत्तापूर्ण भाषणे केली आणि साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ उंचीवर नेवून ठेवला. पण अखेरचे भाषण करून संमेलनाध्यक्षाने त्यावर शिंतोडे उडवून सगळा कार्यक्रम कोसळवला. त्यामुळे असल्या मूर्ख लोकांमुळे मराठी बदनाम होत आहे, मराठी माणूस बदनाम होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड योग्य पद्धतीने झाली नाही तर अस सबनीसी चाळे पाहून महाराष्ट्राचे तोंड काळे करण्याचा प्रकार सातत्याने पहावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: