शनिवार, २० जून, २०२६

योग्य निर्णय घेण्याचे परिणाम


एका राजकारण्याची पारख त्याच्या धोरणांवरून आणि नेतृत्वावरून केली जाते, आणि त्याची सर्वात मोठी परीक्षा संकटाच्या काळात येते. पंतप्रधान मोदी हे असे नेते आहेत जे हे सर्व निकष पूर्ण करतात. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी प्रगतीचे नवीन मापदंड प्रस्थापित केल्यानंतर, गेल्या १२ वर्षांपासून पंतप्रधान म्हणून त्यांनी निर्णायक निर्णयांद्वारे भारताचे सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. २०१४ मध्येच जन धन बँक खात्यांच्या माध्यमातून वंचितांना बँकिंग सेवांशी जोडून त्यांनी आर्थिक समावेशकता वाढवली, त्याचबरोबर त्यांनी यूपीएद्वारे आॅनलाइन पेमेंटमध्ये एक अशी क्रांती घडवून आणली, जिने केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला चकित केले.


संपूर्ण जगाला गुडघे टेकायला लावणाºया कोविड-१९ महामारीच्या काळातही, त्यांच्या नेतृत्वाने देशाला प्रभावीपणे मार्ग दाखवला. राष्ट्रीय लॉकडाउनसारखे कठोर निर्णय निश्चितपणे घेण्यात आले असले तरी, त्यांनी देशाला मोठ्या संकटातून वाचवले. जॉन्स हॉपकिन्स आणि प्रिन्स्टनसारख्या संस्थांनी असा अंदाज वर्तवला होता की, कोविड-१९ च्या उच्चांकाच्या काळात भारतात दररोज सरासरी दहा हजार मृत्यू होतील. मानवी आपत्ती टाळण्यासाठी राजकीय वेदना सहन करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार हे त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वाचे उत्तम उदाहरण होते.


विनाशकारी कोविड-१९ महामारी आठवा, जेव्हा इटली आणि स्पेनसारख्या विकसित देशांमधील रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार केले जात होते. तेव्हाही, तुलनेने कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा असूनही, भारताने हे संकट हाताळण्यात अधिक यश मिळवले. याच काळात त्यांनी स्वदेशी लस विकसित करण्याचे धाडस दाखवले, कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मनमानी अटी स्वीकारून त्या खरेदी कराव्या लागल्या होत्या. जर भारताने स्वत:ची लस विकसित केली नसती, तर इतर कोणत्याही देशाने ती उपलब्ध करून दिली नसती आणि लाखो लोक अनिश्चित काळासाठी तिच्यापासून वंचित राहिले असते. ही स्वदेशी लस केवळ कोविडवरील लसच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही एक प्रभावी लस ठरली, ज्यामुळे सामान्य स्थितीकडे जलद परत येण्यास आणि विकासकामांना वेगाने पुन्हा सुरुवात करण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा एक प्रशंसनीय पैलू म्हणजे त्यांचे स्थूल आर्थिक धोरण. एकीकडे प्रगत अर्थव्यवस्थांनी केवळ मागणीआधारित प्रोत्साहनावर लक्ष केंद्रित केले, तर दुसरीकडे भारताने पायाभूत सुविधांवर विशेष भर देत पुरवठाआधारित आणि मागणीआधारित उपायांचे संतुलित मिश्रण निवडले. या निवडीमागील शहाणपण कोविडनंतरच्या आर्थिक आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. प्रगत अर्थव्यवस्थांना त्यांच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा दोन ते चार पटीने जास्त महागाई दराचा सामना करावा लागला, तर भारताचा महागाई दर त्याच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक सरासरीपेक्षा कमी राहिला.


कोविड असूनही, भारताने सुमारे ८ टक्केची मजबूत आर्थिक वाढ आणि भक्कम आर्थिक स्थिरता मिळवली. या परिस्थितीची २००८-०९च्या जागतिक आर्थिक संकटाशी तुलना केल्यास हे चित्र अधिक स्पष्ट होते. प्रगत अर्थव्यवस्थांनी मागणीला चालना देण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे, कोविडच्या धक्क्याप्रमाणे जागतिक आर्थिक संकट हे पुरवठ्यावर आधारित धक्का नसतानाही, १८ महिने मासिक चलनवाढीचा दर दुहेरी अंकी राहिला. जर भारताने कोविडच्या काळात प्रगत अर्थव्यवस्थांचे अनुकरण केले असते, तर आपल्याला अनेक वर्षे २० टक्क्यांहून अधिक चलनवाढीच्या दराचा सामना करावा लागला असता. योग्य निर्णय घेण्याच्या मोदींच्या दृढनिश्चयाने भारताला त्या बिकट परिस्थितीतून वाचवले.

इराण, अमेरिका-इस्रायल युद्धातही जगभर हाहाकार माजला असताना सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे त्यांचे निर्णय हे फार महत्त्वाचे ठरले. रशिया, ब्रिटन, फ्रान्स अशा मोठ्या देशांबरोबर करार करून पंतप्रधानांनी परिस्थिती अत्यंत नियंत्रित ठेवली. त्यामुळे बाकीच्या देशांप्रमाणे भारताला युद्धाचे तीव्र चटके सोसावे लागले नाहीत. विरोधकांना हे कधीच दिसणार नाही. कारण त्यांना लोकशाही मान्यच नाही. जे विरोधक लोकशाही मार्गाने आलेले निर्णय दडपणाने, गुंडगिरी आणि आंदोलनाने मोडून काढतात त्यांच्याकडून लोकशाहीची अपेक्षा करता येणार नाही. पण लोकशाही जिवंत ठेवून देशाला विकसित करण्याचे फार मोठे काम मोदी करत आहेत हे तितकेच खरे आहे.


आज जगभरात योगा दिन साजरा होत आहे. भारतातील योगाला जागतिक प्रसिद्धी देण्याचे काम केवळ मोदींसारखे नेतृत्वच करू शकते. स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यासाठी सत्तेवर आल्यावर बारा वर्षांपूर्वी त्यांनी सर्वात प्रथम स्वच्छता अभियान हाती घेतले. यामध्ये त्यांनी देशवासीयांना आवाहन केले. त्यामुळे सगळे राजकीय पक्षही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हातात झाडू घेऊन स्वच्छतेसाठी उतरले होते. जनतेला एकत्रित करण्याचे हे कौशल्य मोदींमध्ये आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर त्यांची दखल घेतली जाते. आज ३३पेक्षा जास्त मोठ्या देशांतील त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार हे फक्त नरेंद्र मोदी या भारतीय पंतप्रधानांना मिळाले आहेत. परदेशात गेल्यावर त्यांनी ज्या भेटी द्यायच्या त्यातही अत्यंत नावीन्य आणले होते. कोणतीही मौल्यवान वस्तू न देता भारतीय संस्कृतीतील, भारतीय मातीतील कानाकोपºयातील संस्कृतीची प्रतीके त्यांनी दिली आणि भारताचे महत्त्व जगापर्यंत पोहोचवले. विकासाचा मार्ग हा उत्तम दळणवळणातून जातो हे जाणून त्यांनी रेल्वे, विमान, मेट्रो, इलेक्ट्रिक व्हेईकल या सगळ्यांना प्रोत्साहन दिले आणि सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले. हे फक्त चांगले नेतृत्व करू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: