बुधवार, १७ जून, २०२६

हिंदूद्वेषाविरुद्ध आवाज


अलीकडेच अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात हिंदूंविरुद्ध होणाºया द्वेषपूर्ण गुन्ह्यांशी संबंधित एक ठराव मांडण्यात आला. हा ठराव मिशिगनचे डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य ठाणेदार यांनी मांडला. रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि सुहास सुब्रमण्यम यांच्यासह बत्तीस खासदारांनी या ठरावाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी मिनेसोटा सिनेटनेही हिंदूद्वेषाविरोधात एक ठराव मांडला होता. या ठरावाला ४०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. ‘कोहाना’ नावाच्या संघटनेने हा उपक्रम यशस्वीपणे पुढे नेला.


या ठरावाचा मुख्य उद्देश, अमेरिकेत राहणाºया हिंदू अमेरिकन नागरिकांविरुद्ध आणि हिंदू धर्म, चालीरीती व संस्कृतीविरुद्ध होणाºया पद्धतशीर अतिरेकी मोहिमांना प्रतिबंध करणे, तसेच हिंदू समाजाला सामोरे जाव्या लागणाºया भेदभावाचा विचार करून, अशी कृत्ये करणाºयांवर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करणे हा आहे. हिंदू समाजाविरुद्ध वाढता अतिरेकीपणा आणि हिंदू प्रार्थनास्थळांच्या नुकसानीच्या घटनांना प्रतिसाद म्हणून हा ठराव मांडण्यात आला.

अमेरिकेत मांडण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिला ठराव नाही. यापूर्वी एप्रिल २०२३मध्ये जॉर्जियाच्या राज्य विधानसभेने हिंदूंविरुद्ध वाढता अतिरेकीपणा, द्वेष आणि अत्याचारांना औपचारिकपणे मान्यता देणारा ठराव मंजूर केला होता. गेल्या काही वर्षांपासून, अमेरिका आणि युरोपसह अनेक पाश्चात्य देशांमध्ये हिंदू समाजाविरुद्ध अतिरेकीपणा आणि हिंसाचारात वाढ झाली आहे. हिंदू समाजाच्या सदस्यांसोबत कामाच्या ठिकाणी होणाºया भेदभावाच्या घटनांची नोंद झाली आहे. माहिती क्रांतीच्या या युगात विविध माध्यमांवर हिंदू परंपरा आणि श्रद्धांविरुद्ध पद्धतशीर प्रचार केला जात आहे. नकारात्मक आणि अपमानजनक दृष्टिकोन निर्माण करून हिंदू समाजाला बदनाम करणे आणि त्यांना निराश करणे हा त्याचा उद्देश आहे.


‘हिंदूफोबिया’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम सर एडवर्ड सुलिव्हन यांनी १८६६ मध्ये वापरला. त्यांनी हिंदूफोबियाचे वर्णन हिंदूंप्रति असलेला पूर्वग्रह आणि अपमानजनक वृत्तीचे एक स्वरूप असे केले. प्रख्यात लेखक राजीव मल्होत्रा ​​यांनीही त्यांच्या ‘स्नेक्स इन द गंगेज: ब्रेकिंग इंडिया २.०’ या गाजलेल्या पुस्तकात एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून भारताच्या शाश्वत संस्कृती आणि वारशाविरुद्ध जागतिक स्तरावर चालवल्या जात असलेल्या वैचारिक षड्यंत्राकडे लक्ष वेधले आहे.

अलीकडच्या काळात अनेक पाश्चात्य देशांमध्ये हिंदू धर्माच्या अनेक अनुयायांना लक्ष्य केले जात आहे. परिणामी, अनेक संसदांनी या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ‘हिंदूफोबिया इन स्कॉटलंड’ नावाचा एक अहवाल स्कॉटिश संसदेत सादर करण्यात आला. हा अहवाल गांधीवादी शांतता समितीने तयार केला होता. अहवालात म्हटले आहे की, २०१९ पासून स्कॉटलंडमध्ये राहणाºया हिंदूंवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, येथील हिंदू समाजाचे सदस्य पारंपरिक पोशाख घालणे आणि आपली ओळख सार्वजनिकरीत्या उघड करणे टाळतात.


मुख्य प्रवाहातील शिक्षण क्षेत्रातही हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दलचा द्वेष मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे, जिथे अनेक विद्यापीठे हिंदूंचा आणि हिंदू समाजाच्या सदस्यांचा अपमान करतात. या संदर्भात यूकेमधील आॅक्सफर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी रश्मी सामंत यांचा कटू अनुभव उल्लेखनीय आहे. तिच्या ‘अ हिंदू इन आॅक्सफर्ड’ या पुस्तकात तिने लिहिले आहे की, विद्यापीठातील हिंदूद्वेषामुळे तिला विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पडले. हे पद भूषवणारी ती पहिली भारतीय महिला होती. भारतातील हिंदू तत्त्वज्ञान आणि विचार जगाला एक कुटुंब मानतात. सर्व जीवांमध्ये एकाच चेतनेचे अस्तित्व आहे, ही हिंदू जीवनशैली आहे. हिंदू विचार सर्वसमावेशक असून, तो सर्वांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्नशील असतो.

एकोणिसाव्या शतकातील महान लेखकांपैकी एक असलेल्या लिओ टॉल्स्टॉय यांनी हिंदू धर्म आणि विचारांची खूप प्रशंसा केली आहे. प्रख्यात नाटककार आणि नोबेल पारितोषिक विजेते जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी हिंदू धर्माला जगातील सर्वात लवचिक, सहिष्णू आणि सर्वसमावेशक धर्म म्हटले आहे. प्रख्यात जर्मन लेखिका मारिया विर्थ यांनी त्यांच्या ‘थँक यू इंडिया : अ जर्मन वुमन्स जर्नी टू द विस्डम आॅफ योगा’ या पुस्तकात भारत आणि त्याच्या शाश्वत संस्कृतीची प्रशंसा केली आहे.


जगभरातील अनेक देशांमध्ये हिंदू समाजाचे असंख्य सदस्य शांततेने राहतात आणि आपल्या ज्ञान, बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाद्वारे आपल्या देशांच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत. ते वैद्यकशास्त्र, शिक्षण, तंत्रज्ञान आणि राजकारण यांसारख्या क्षेत्रांमध्येही अग्रगण्य भूमिका बजावत आहेत. वैश्विकता, मानवता आणि विवेकबुद्धी या गुणांवर आधारित हिंदू विचार, संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या भावनेसह वैश्विक बंधुत्वाचा संदेश देतो. जगानेही आपल्या प्राचीन आणि नित्य नवनवीन हिंदू परंपरेचा आदर केला पाहिजे.

- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: