prafulla phadke mhantat

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

राजेशाही अजून डोक्यातच आहे!


राजकारणातील घराणेशाही हा मुद्दा बरेच दिवस मागे पडला होता. तो पुन्हा एकदा नव्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढला आहे. गेली दोन अडीच दशके घराणेशाहीचे राजकारण हा फार मोठा पगडा भारतीय लोकशाही आणि राजकारणावर होता. अर्थात हे जनतेने स्वीकारलेले होते. कारण, लोकशाही असली तरी डोक्यातील राजेशाही आणि सरंजामशाही अजूनही उतरलेली नाही, हेच त्याचे कारण. यापासून कोणताही पक्ष चुकलेला नाही हेही तितकेच खरे. नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाव न घेता, घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. इथे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होतो, मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री. यामुळे काही ठरावीक लोकांच्या हातात पैसा आला, तर बाकी सगळा देश गरीबच राहिला. हे आता बदलायला हवे, लोकशाहीसाठी ते घातक आहे, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यांनी केली. भारतीय जनता युवा मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.पण, घराणेशाहीची ही परंपरा बदलणे मतदारांच्या हातात आहे, राज्यकर्त्यांच्या नाही. मतदारांनी जोपर्यंत ही सरंजामशाही नाकारलेली नाही, तोपर्यंत यात बदल होणे शक्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर काही काळाकरिता लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते, पण त्या पदासाठी इंदिरा गांधींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. कारण, राजेशाहीच्या वातावरणातून भारत बाहेरच पडला नव्हता. राजे आणि संस्थानिकांच्या राजवटीची सवय इतकी अंगवळणी पडली होती की, राजाच्या माघारी त्याचा पुत्रच गादीवर येणार हे निश्चित होते. त्यालाच राज्यकारभार द्यायचा, त्यालाच राज्याभिषेक होणार हे ठरलेले होते. तोच प्रकार स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिला. त्यामुळे ही सरंजामशाहीची प्रवृत्ती तशीच सुरू राहिली. हा बदल तेव्हाच झाला असता, जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली; परंतु भारतीय मानसिकतेने आणि त्यातल्या त्यात नेहरू गांधी घराण्याचे मांडलिकत्व पत्करलेल्या काँग्रेसी मानसिकतेने त्यातून बाहेर पडू दिले नाही. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर कितीतरी लायक आणि अनुभवी असे लोक पंतप्रधानपदासाठी काँग्रेसमध्ये होते. पण, फारसा अनुभव नसलेल्या राजीव गांधींनाच पंतप्रधानपदी बसवायचे, असा विचार काही लाचार काँग्रेस नेत्यांनी केला आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या श्रेष्ठ नेत्यांचाही त्या पदासाठी विचार केला नाही. तिथेच लोकशाहीचा खून होऊन घराणेशाहीची बिजे घट्ट केली गेली. सहानुभूती आणि स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहरा या भांडवलावर राजीव गांधींनी पाच र्वष निभावून नेली. त्यामुळे बापानंतर मुलगा किंवा मुलगी, आईनंतर मुलगा किंवा मुलगी, पतीनंतर त्याची पत्नी किंवा मुलगा, मुलगी ही घराणेशाहीची परंपरा रुजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही बारामती या मतदारसंघात दुस-या कोणाचा विचार केला नाही. हा मतदारसंघ झाल्यापासून शरद पवार, अजित पवार आणि पुन्हा शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडेच हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीची भाषा करते, पण दुस-या कोणाला संधी देण्याची त्यांचीही मानसिकता नाही. कारण, घराणेशाहीची बिजे खोलवर रुजली आहेत. यावरच नितीन गडकरींनी नेमके बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील दुसरा छोटा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा पक्ष मोठा केला. पण, बाळासाहेबांच्या माघारी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच पक्षप्रमुख म्हणून निवड केली. तुलनेने अधिक योग्य असलेल्या राज ठाकरे यांना डावलून आणि ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून हे पद दिले गेले. त्यानंतर युवानेते म्हणून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाही पुढे करण्यात आले. शिवसेनेतील ज्येष्ठ नेतेसुद्धा जेव्हा या वयाने निम्मा किंवा मुलापेक्षा लहान असलेल्या आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात, तेव्हा अंगावर शहारा येतो, किती ही लाचारी असा प्रश्न पडतो. ही घराणेशाही सरंजामशाही डोक्यात असल्यामुळे आहे. गडकरी यांनी मारलेला टोला हा फक्त काँग्रेसला आहे असे वाटले, तरी या संपूर्ण मानसिकतेला तो आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

येथे नोव्हेंबर ०१, २०१८
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

माझ्याबद्दल

माझा फोटो
prafulla phadke mhantat
Mumbai, Maharashtra, India
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (246)
    • ►  जून (35)
    • ►  मे (51)
    • ►  एप्रिल (41)
    • ►  मार्च (38)
    • ►  फेब्रुवारी (37)
    • ►  जानेवारी (44)
  • ►  2024 (3)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (227)
    • ►  मे (15)
    • ►  एप्रिल (52)
    • ►  मार्च (48)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (58)
  • ►  2021 (510)
    • ►  ऑक्टोबर (8)
    • ►  सप्टेंबर (38)
    • ►  ऑगस्ट (49)
    • ►  जुलै (62)
    • ►  जून (61)
    • ►  मे (56)
    • ►  एप्रिल (60)
    • ►  मार्च (60)
    • ►  फेब्रुवारी (56)
    • ►  जानेवारी (60)
  • ►  2020 (427)
    • ►  डिसेंबर (59)
    • ►  नोव्हेंबर (15)
    • ►  ऑक्टोबर (16)
    • ►  सप्टेंबर (53)
    • ►  ऑगस्ट (35)
    • ►  जुलै (59)
    • ►  जून (48)
    • ►  मे (51)
    • ►  मार्च (24)
    • ►  फेब्रुवारी (34)
    • ►  जानेवारी (33)
  • ►  2019 (109)
    • ►  डिसेंबर (45)
    • ►  नोव्हेंबर (11)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (9)
    • ►  फेब्रुवारी (17)
    • ►  जानेवारी (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  डिसेंबर (26)
    • ▼  नोव्हेंबर (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  ऑक्टोबर (26)
    • ►  सप्टेंबर (20)
    • ►  ऑगस्ट (27)
    • ►  जुलै (32)
    • ►  जून (36)
    • ►  मे (39)
    • ►  एप्रिल (35)
    • ►  मार्च (37)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2017 (31)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  ऑगस्ट (11)
    • ►  जुलै (2)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (4)
    • ►  फेब्रुवारी (10)
  • ►  2016 (232)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (25)
    • ►  जुलै (19)
    • ►  जून (26)
    • ►  मे (29)
    • ►  एप्रिल (30)
    • ►  मार्च (31)
    • ►  फेब्रुवारी (29)
    • ►  जानेवारी (42)
  • ►  2015 (165)
    • ►  डिसेंबर (23)
    • ►  नोव्हेंबर (22)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (36)
    • ►  जुलै (33)
    • ►  जून (12)
    • ►  फेब्रुवारी (13)
    • ►  जानेवारी (24)
  • ►  2014 (206)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (26)
    • ►  ऑक्टोबर (9)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  जुलै (12)
    • ►  जून (23)
    • ►  मे (20)
    • ►  एप्रिल (85)
  • ►  2013 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2011 (2)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
  • ►  2010 (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  मार्च (2)

लेबल

  • uttam nirnay

गैरवर्तनाची तक्रार करा

facebook

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

हा ब्लॉग शोधा

Pages

  • Home

भारताला सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात एआयची भूमिका महत्त्वाची

लोकप्रिय पोस्ट

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • जाते माहेराला जाते माहेराला
    वारीमध्ये भक्तीमार्ग आहे. या भक्तीमार्गाचा पाया प्रेम आहे. प्रेमाचे सर्वोत्कृष्ठ स्थान म्हणजे आई. म्हणूनच आपल्याकडे विठोबा असेल नाहीत...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.