भारतीय स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत भारतीय सैन्यातील २१ जणांना परमवीरचक्र या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. भारतातील जे सर्वोच्च पुरस्कार आहेत त्यामध्ये भारतरत्न हा पहिल्या क्रमांकाचा तर त्याच तोडीचा असलेला आणि सैनिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे परमवीरचक्र पुरस्कार. आजवर दिलेल्या २१ परमवीरचक्र विजेत्यांमध्ये महाराष्टÑातून हा पुरस्कार मिळवणारे रामा राघोबा राणे हे एकमेव आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य सरकारने त्यांच्या शौर्यगाथेचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची गरज आहे. आजपर्यंत अभ्यासक्रमात १९६५ च्या भारत पाक युद्धातील अब्दुल हमीद यांच्या पराक्रमाचा समावेश करण्यात आला होता. पण अन्य कोणत्याही परमवीरचक्र विजेत्याची शौर्यगाथा अभ्यासक्रमात आली नाही. महाराष्टÑातील एकमेव असलेल्या रामा राघोबा राणे यांच्या शौर्याची गाथा तरी राज्य सरकारने अभ्यासक्रमात समाविष्ट करुन भारतीय सैन्याचा सन्मान करण्याची गरज आहे.रामा राघोबा राणे हे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. प्रारंभी त्यांची नाईक (कॉर्पोरल) पदी नेमणूक झाली. दुसºया महायुद्धात त्यांची तुकडी म्यानमारमध्ये जपानविरुद्ध लढण्यास पाठवली गेली. तेथील आराकान मोहीमेतून त्यांची डिव्हिजन माघार घेत असताना त्यांच्या सेनापतीने राणे व इतर काही सैनिकांना बुथिदौंग येथे मागे राहण्याचा हुकुम दिला. गावाजवळची मोक्याची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी त्यांना दिली गेली. काम झाल्यावर रॉयल नेव्हीकडून त्यांची उचलबांगडी होणार होती. काम झाल्यावर आरमारी मदत आलीच नाही. त्यावेळी राणे आणि त्यांच्या सहकाºयांनी शत्रूचा सुळसुळाट असलेली नदी पार करीत कूच केली व बाहरी येथे आपल्या गोटात येउन मिळाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यायवर रामा राघोबा राणे यांची तैनात कोर आॅफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंटचे पद दिले गेले. इथून पुढची राणे यांची शौर्यगाथा खूपच महत्वाची आहे.१९४८च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर हे गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले. त्यानंतर भारतीय सैन्याने तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल रोजी चौथ्या डोगरा बटालियनने बरवाली पुलासह राजौरी काबीज केले. तेथून पुढील प्रगती शत्रूने पेरुन ठेवलेल्या सुरुंग आणि इतर अडथळ्यामुळे रोखली गेली. यावेळी रामा राघोब राणेंच्या ३७वी एल्गार फील्ड कंपनीला रस्ता मोकळा करण्यास पुढे केले गेले. त्यांनी हे काम सुरू करताच पाकिस्तान्यांनी उखळी तोफांचा मारा सुरू केला. त्यात राणेंचे दोन सैनिक ठार झाले आणि स्वत: राणे यांच्यासह इतर पाच सैनिक जखमी झाले. या स्थितीतही राणे यांनी उरलेल्या सैनिकांसह आपले काम सुरुच ठेवले आणि रणगाड्यांसाठी मार्ग मोकळा केला. पुढील बारा तासात जखमी अवस्थेत राणे आणि त्यांच्या सैनिकांनी रणगाड्यांसाठी वेगळा व सोपा रस्ता तयार केला. शत्रूच्या माºयातच त्यांचे हे काम सुरु होते. या घटनेला आज ७० वर्ष झाली आहेत. त्यानंतर १० एप्रिल रोजी राणे यांनी पहाटे उठून पुन्हा रणांगणाची वाट धरली. मशीनगनचा मारा आणि सुरुंगांचे स्फोट होत असतानाच त्यांनी रणगाड्यांच्या वाटेत पडलेली पाच देवदाराची झाडे बाजूला केली. रणगाडे येथून पुढे गेल्यावर अजून एक अडथळा त्यांच्या समोर आला. शत्रू याभोवतालच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेला होता. अडलेल्या रणगाड्यांवर मारा करीत होता. राणे स्वत: एका रणगाड्यात बसून पुढे गेले. भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरुंग लावून फोडून काढले. चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली. हे काम फार अवघड होते. पण राणे यांचे त्याबाबतचे धाडस फार मोठे होते. त्यानंतर ११ एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोचले आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले. हाच विजयाचा मार्ग ठरला. राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि शेकडोजण जखमी केले. पण समोर मारा होत असताना अहोरात प्रयत्न करून रस्ता तयार करणे आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालणे या रामा राघोबा राणे यांच्या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माºयाखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला. एवढे महान काम करणाºया मराठी माणसाचा परिचय नव्या पिढीला होणे आवश्यक आहे. महाराष्टÑातून एकमेव परवीरचक्र मिळवलेल्या राणे यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. राणे यांचे कार्य निरपेक्ष आहे. पण सरकारने त्याची दखल घेतलीच पाहिजे. या युद्धानंतर राणे लष्करातच राहिले. पुढे २५ जून, १९५८ रोजी ते मेजरपदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर राणे सैन्याचे नागरी सेवक होते. १९७१मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली. त्यांचे १९९४ मध्ये पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाने आपल्या १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी राणे यांचे नाव दिलेले एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ आॅगस्ट, १९८४ पासून २५ वर्षे सेवेत होते. विशेष म्हणजे कारवार येथे आयएनएस. चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे. पण या व्यतिरीक्त महाराष्टÑाने त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. त्यांच्या या शौर्यदिनाच्या निमित्ताने हा गौरव व्हावा आणि राज्य सरकारने त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करावा ही अपेक्षा आहे. भारतीय सैन्यही त्यामुळे समाधान व्यक्त करेल.
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
रामा राघोबा राणे यांच्या शौर्याची गाथा तरी राज्य सरकारने अभ्यासक्रमात समाविष्ट करf
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा