बुधवार, २५ एप्रिल, २०१८

कायद्यापुढे कोणी मोठा नाही

गेली पाच वर्ष चर्चेत असलेला आसाराम बापू अखेर दोषी ठरला. न्यायालयापुढे फार मोठा बुरखा फाटून आसाराम बापू हा जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र ठरला. त्यामुळे न्यायदेवतेपुढे सगळे समान आहेत हे बिंबवण्यात न्याय व्यवस्था यशस्वी झालेली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला आणि स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू अशी आसाराम बापूची ओळख आहे. बुधवारी आसाराम बापूसह तीनजणांना दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणातून दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण अध्यात्म, भक्ती या नावाखाली भोंदुगिरी करुन माया जमवणाºया या धंदेवाईकांचा बुरखा यामुळे फाटला हे फार महत्वाचे झाले. आसाराम बापूच्या शिक्षेनंतर कोणतीही हिंसा भडकू नये म्हणून राजस्थानसह तीन राज्यांत अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. म्हणजे आसारामला शिक्षा झाली तर त्याचे समर्थक राडा करतील, दंगा करतील अशी भिती अकारण पसरवली गेली आहे. एका बलात्काºयाला शिक्षा दिली तर त्यामुळे दंगा होण्याची गरज नाही. समाजातील एका नराधमाला शिक्षा सुनावल्याचा आनंद आणि दिवाळी साजरी व्हायला पाहिजे. समर्थकांनी आता आपण भानावर आले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. आसाराम नावाच्या मृगजळाकडे धावून आपण नको तिकडे भरकटत चाललो होतो हे लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोर्टातच आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी आसारामसह त्याचे सहकारी शिल्पी आणि शरद यांना दोषी ठरवण्यात आले. शिवा आणि प्रकाश या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आसारामची बाजू मांडण्यासाठी १४ वकील कोर्टात हजर होते. तर पीडितेची बाजू मांडण्यासाठी फक्त दोनच सरकारी वकील होते. यावरून आसाराम आपल्या सुटकेसाठी किती प्रयत्न करत होता हे लक्षात येईल. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये या न्यायाने आज समाजात अनेक भोंदू बाबा, बुवा, बापू, महाराज वावरत आहेत. सापडला तर चोर नाहीतर देवाहून थोर अशी यांची गत आहे. आसाराम पकडला गेला आणि असे अनेक बुवे अजूनही सुपात असू शकतात. आसारामने गेल्या पंचवीस वर्षात प्रचंड प्रस्त माजवले होते. प्रचंड लिला केल्या होत्या. त्याचे खरे स्वरुप लोकांना २०१३ पासून समजले असले तरी तो बुरखा फाटायला त्याच्या काही दिवस अगोदर सुरुवात झाली होती. त्याने केलेल्या रंगीन लिलाच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरलेल्या आहेत. संपूर्ण देशात २०१२-१३ मध्ये दुष्काळ पडलेला असताना ऐन उन्हाळ्यात या आसारामबापूने टँकर लावून रंगीत पाण्याने रंगपंचमी केली होती. स्वत: काचेच्या पेटीत बसून भक्तांवर रंगीत पाणी शिंपडून आशिर्वादाच्या पिचकाºया उडवत होता. बापूंचा प्रसाद म्हणून ते पाणी आपल्या अंगावर उडवून घेण्यासाठी महिला पुरूष धन्यता मानत होते. सगळीकडे दुष्काळ पडला होता, पिण्याचे पाणी मिळत नव्हते असे असताना आपल्या मस्ती आणि पैशाच्या जोरावर प्रशासनाला वेठीस धरुन याच आसारामने पाण्याचे टँकर पाणी उडवायला मागवले होते. असा कधी देव असतो का? लोकांना प्यायला पाणी नाही, ते द्यायचे सोडून पाण्यात लीला करणे हे संतांचे काम असते का? याच देशात एकनाथांसारखे संत वाळवंटात पाण्यासाठी तडफडणाºया गाढवाला गंगेचे पाणी पाजण्याचे काम करतात असा आदर्श आहे. तर दुसरीकडे माणसे पाण्यासाठी तडफडत असताना त्यांना पाणी न देता ते हजारो लिटर पाणी नासवण्यात दंग झालेला आसाराम दिसतो. त्यामुळे तेंव्हाच प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर टीका करायला सुरूवात केली होती. त्याच त्याच्या पिचकाºया त्याच्या नाशाला कारणीभूत ठरल्या आहेत. आज आसाराम गेल्या पाच वषार्पासून जोधपूर तुरुंगात आहे. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून ३१ आॅगस्ट २०१३ रोजी अटक केली होती. २०१३ रोजी त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती. जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसारामसहित त्याच्या चार भक्तांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये आसारामबरोबरच त्याचे हस्तक किंवा दलाल हे अतिशय दोषी आहेत. यामध्ये हॉस्टेल वॉर्डन शिल्पी ऊर्फ संचिता गुप्ता ही फार मोठी वाईट प्रवृत्तीच म्हणावी लागेल. अशा भोंदू बाबांचे प्रस्त वाढवण्यात अशा बायांचे काम महत्वाचे असते. भूत-प्रेताची भीती दाखवणे, विद्याथीर्नींना आसारामकडे पाठवणे असे प्रकार करुन ही शिल्पी आसारामचा शारिरीक हव्यास पूर्ण करत होती. यातील काही मुलींनी आपल्यावर अत्याचार केल्याचे जाहीर केले म्हणून हे उघड झाले. हे इतके सोपे काम नव्हते. कारण त्यापूर्वी आसारामने एवढे मोठे साम्राज्य निर्माण केले होते की त्याविरोधात कोणी जाणे केवळ अशक्य होते. कारण त्याच्या भक्तांची साम्राज्याची ताकद इतकी मोठी होती की पोलीस, कायदा, राजकीय यंत्रणा कोणीही त्याचे काहीही वाकडे करु शकत नव्हते. या धाकामुळेच अनेक जणींना त्याच्या वासनेची शिकार व्हावे लागले होते. एकीकडे अहिंसा, सत्य आणि ब्रह्मचर्याची शिकवण देत स्वत:ची शारिरीक हौस भागवण्यात दंग असलेला हा आसाराम म्हणजे फार मोठे दुकान होते. त्याने आयुर्वेद आणि अध्यात्माच्या नावावर साबण, तेल, शांपूसारखी असंख्य उत्पादने बाजारात आणून प्रचंड पैसा जमवला होता. देशभरात अनेक भूखंड घेऊन माया जमवली होती. त्या साम्राज्याला उद्ध्वस्त करण्याचे काम एका पिडीतेने केले, त्यामुळे ती या प्रकरणानंतर अभिनंदनास पात्र ठरते. शोषण झालेल्या महिला निर्भयपणे अशा पुढे आल्या तर गुन्हेगारांना शासन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आसारामला दोषी ठरवून शिक्षेस पात्र ठरवणे हे जितके गरजेचेआहे तितकेच त्या तक्रारदार मुलीचे कौतुक करावे लागेल. कारण तिच्यामुळे भविष्यातील अबलांची अब्रू वाचली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: