चित्रपट चालवण्यासाठी फुकटात प्रसिध्दीचा फंडा बॉलीवूडनं काढला असून त्याला सर्वच माध्यमे बळी पडत आहेत असे दिसत आहे. त्यामुळे आता पाळी मणिकर्णिकाची असे म्हणायची वेळ आली आहे. चित्रपट चालवण्यासाठी यात काहीतरी वादग्रस्त आहे असे जाहीर करुन त्याच्या निर्मितीपासूनच प्रदर्शनापर्यंत चर्चा करायची. त्यामुळे अफाट प्रसिध्दी मिळाल्यानंतर तो चित्रपट बºयापैकी धंदा करतो. हा फंडा चांगलाच रुळताना दिसतो आहे. प्रसिध्दी माध्यमांनी याला कितपत महत्व द्यायचे याचा विचार करायची वेळ आलेली आहे.
'पद्मावत'वरून देशभरात झालेलं रणकंदन सहा महिने चालले. त्याच्या चित्रिकरणापासूनच त्याची चर्चा होती. पण तो वादग्रस्त चित्रपट आहे असे पसरवून करणीसेनेकडून त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात राजकीय पक्षांनीही उडी घेतली. नंतर सर्वांनी क्लिन चिट देवून हा चित्रपट चांगला असल्याचा निर्वाळा दिला. करणी सेनेनेही त्याला मान्यता देवून आपले काम साधून घेतले. त्यानंतर 'अय्यारी'मध्ये सरंक्षण खात्यानं सुचवलेल्या बदलांनंतर वादग्रस्त चित्रपटांच्या यादीत आणखी एका बॉलिवूडपटाचं नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे कंगना राणवतच्या आगामी 'मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झाँसी' या चित्रपटाचे.
या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याचा आरोप करत राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घेतलाय. त्यामुळं हा चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपट तयार झाला नसताना, तो कोणीही पाहिला नसताना, त्याचे स्क्रीफ्ट कोणी वाचले नसताना त्यात झाशीच्या राणीची प्रतिमा चुकीची रंगवल्याचा साक्षत्कार कोणाला झाला ? 'मणिकर्णिका'मध्ये कंगना ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि गाण्यावर आक्षेप घेत ब्राह्मण महासभेनं निर्मात्यांना पत्रही पाठवलंय. याबाबत ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा यांचं म्हणणं आहे की 'या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रज अधिकाºयाशी प्रेमसंबंध असल्याचं दाखवण्यात आलंय. हा तर्क म्हणायचा की साक्षात्कार ? चित्रपटातील काही भाग लंडनमधील लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे, असे सांगून या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुरामुळे या पुस्तकावर उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली होती. मग, ही बंदी फक्त उत्तरप्रदेशातच का घातली गेली? या पुस्तकावर संपूर्ण देशात का नाही बंदी घातली गेली? त्यावेळी आत्ता विरोध करणारे कुठे होते? राणी लक्ष्मीबाई या ब्राह्मण होत्या. हा ब्राह्मण समाजाच्या भावनांचा प्रश्न आहे,' असं सुरेश मिश्रा यांनी म्हटलं आहे. पण देशातील मोठ्या व्यक्तिंना जातीपातीत मर्यादीत करण्याची संकुचित वृत्ती ब्राह्मण समाज केव्हा सोडणार आहे याचे उत्त्र त्यांनी दिले पाहिजे. राणी लक्ष्मीबाई ब्राह्मणांची नव्हे तर समस्त देशाची आहे, स्त्री वर्गाच्या अभिमानाची आहे, महाराष्ट्राची आहे. असे असताना असले आक्षेप मर्यादीत स्वरुपात का घेतले गेले? याचे कारण हा सुपारीचा प्रकार आहे असा वास येतो. चित्रपट चालवण्यासाठी तो तयार होण्यापूर्वीच कोणत्या तरी संघटनेला बंदी घालून चर्चा करण्याची सुपारी देण्याचा प्रकार आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर ते कापायला सेन्सॉर बोर्ड आहे की. सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह दृष्यांना मंजूरी दिल्यानंतर जर चित्रपट प्रदर्शित झाला तर तो पाहून मग विरोध केला पाहिजे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केलेला विरोध हा जाहीरातीचा स्टंट असतो हेच लक्षात घेतले पाहिजे.
१९७५ साली आंधी हा चित्रपट आला होता. आणीबाणीच्या काळात हा चित्रपट इंदीरा गांधींच्या जीवनावर आहे असा जावईशोध लावण्यात आला होता. त्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली होती. पण ती बंदी सेन्सॉरसंमत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट पाहिल्यानंतर घातली होती. कालांतराने ती बंदी हटवली गेली. पण आत्ता होत असलेले प्रकार हे निव्वळ बाजारु आहेत असेच म्हणावे लागेल. बाजीराव मस्तानी, पद्मावती आणि आता त्यानंतर मणिकर्णिकेची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटात काही आक्षेपार्ह असू नये म्हणून सातारच््या धावडशीच्या मुंबई स्थित तांबे यांनीही आपल्या भावना निर्मात्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. राणी लक्ष्मीबार्इंच्या माहेरच्या वंशातील तांबे यांनी संयमी भूमिका घेत अगोदरच आपल्याकडील दस्तऐवजांसह माहिती पुरवली होती. असे असतानाही केवळ ब्राह्मण समाजाच््या भावना दुखावत आहेत असे म्हणणे पोरकटपणाचे ठरले. देशातील मोठ्या व्यक्तिमत्वांची केली जाणारी विटंबना ही फक्त विशिष्ठ जात, धर्म, समाजापुरती मर्यादीत कशी काय असू शकते? हा राष्ट्रीय व्यक्तिंचा, देशाच, समस्त स्त्री जातीच अवमान असतो. अशा घटनेला केवळ ब्राह्मण समाजाचा अपमान आहे अशा संकुचित वृत्तीत मिश्रांनी का कोंडून ठेवले आहे? त्यामुळे हा प्रकार म्हणजे साक्षात प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट आहे असेच वाटते.
सातारा भागात कोणत्याही लहान मुलाला मुलीला लाडानं मनू म्हटलं जातं. कुठे, बाळा, बाबू म्हणतात तसे साताºयात लहान मुलांना मन्या मनू असे म्हणले जाते. हे प्रत्येक घरात म्हटले जाते. कारण मनकर्णिका या नावाचे ते लाडाचे नाव आहे. आपलं मूल किंवा मुलगी तिच्यासारखी पराक्रमी व्हावी यासाठी लक्ष्मीाबाईच्या गौरवासाठी हा शब्द दीड दोन शतके रुढ झालेला आहे. असे आपल्या बाळाचे कौतुक, पराक्रम करताना फक्त ब्राह्मणांच्या मुलांनाच मनू मन्या म्हणत नाहीत तर सगळीकडे तो सन्मान केला जातो. असे असताना चित्रपटाला विरोध करण्यासाठी घेतलेली संकुचित प्रवृत्ती घातक आहे. तितकीच सामाजिक ऐक्य आणि भेदभावविरहीत समाजाच्या एकमुखी मान्यतेला कमी लेखणारी आहे. या सर्व गोष्टी पाहता हा सगळा फुकटात प्रसिध्दी मिळवण्याचा फंडा वाटतो. करणीसेनेनंतर अशी सुपारी मणिकर्णिका चित्रपटासाठी घेतली असेल तर म्हणवे लागेल आता वेळ मणिकर्णिकाची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा