रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

दहशतवादाचा आसरा घेणे हे पाकिस्तानचे शस्त्र

जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची व्याप्ती फार मोठी आहे. शनिवारी सुरू झालेल्या या हल्लयाविरोधातील कारवाई जवळपास ३० तास सुरु होती. ती दुपारी म्हणजे तब्बल ३० तासांनंतर थांबली. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी आता लष्करी तळांना लक्ष केल्याचे गेल्या दोन वर्षापासून दिसून येते आहे. यापूर्वी २०१६ या नववर्षाची सुरुवातच दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळावर हल्ला करून केली होती. पठाणकोट येथील हवाई दलाच्या निवासी भागावर हल्ला केला होता त्यात अनेक जवान शहीद झाले होते तर जवान, पोलीस आणि नागरिकही या हल्लयात जखमी झाले होते. आज दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते. अशी कारवाई करताना लष्कराला अडथळे असतात ते आपल्या नागरिकांचा दहशतवाद्यांनी ढालीसारखा वापर करू नये हा. कारण सैनिक हा सीमेवर लढायला जातो तो शत्रूला मारायला नाही, तर या भूमीला, इथल्या नागरिकांचे रक्षण करायला तो तिथे असतो. पण यातून एक लक्षात घेतले पाहिजे की पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचे लक्ष आता इथुनपुढे सातत्याने लष्करी तळ, लष्करी अधिकाºयांच्या निवासी वसाहती, नागरी वसाहती आणि सार्वजनिक ठिकाणे असणार आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा शहरांमध्येही दक्षता घ्यावी लागणार आहे. गर्दीची ठिकाणे सुरक्षित करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासन आणि लष्कर या दोघांनाही घ्यावी लागेल. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेला हा हल्ला आणि त्याविरोधातील सुरू असलेली कारवाई ही जवळपास ३० तास चालू होती. पठाणकोटच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्लयाची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली होती. त्याचप्रमाणे हा हल्लाही याच दहशतवादी संघटनेने केलेला असल्याचे समोर येते आहे. भारतात सातत्याने हल्ले करणाºयांमध्ये जैश ए मोहम्मद, लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहुद्दीन, जामात ए मुजाहुद्दीन, सिपाई ए साहेबा पाकीस्तान, अल उमर मुजाहीद्दीन, तारिक ए मुजाहुद्दीन, अशा वेगवेगळ्या नावांनी ३२ पेक्षा जास्त संघटना कार्यरत आहेत. या सगळ्यांना पोसण्याचे काम पाकीस्तान करते आहे. किंबहुना दहशतवादाचा आसरा घेणे हे पाकिस्तानचे शस्त्र झालेले आहे. म्हणूनच हा हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला आहे हे सांगायला कोणाही तज्ज्ञाच्या मताची आवश्यकता नाही. समोरासमोर थेट लढण्याची धमक नसल्याने दहशतवाद्यांचा वापर करुन घेण्याचे तंत्र पाकिस्तानने गेल्या दोन अडीच दशकांपासून अवलंबले आहे. त्यामुळे अशा शेकडो वेगवेगळ्या नावाच्या संघटना अस्तित्वात आल्या तरी त्यामागे पाकीस्तानचा हात असतो हे निश्चित झालेले आहे. सुंजवा तळावर  झालेल्या या हल्लयात भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. चार दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. पण नेमके किती दहशतवादी याठिकाणी घुसले होते याचा अंदाज नसल्यामुळे ही कारवाई दीर्घकाळ सुरू होती. दहशतवाद्यांच्या या हल्लयात एका स्थानिक नागरिकालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी सर्वात प्रथम पहाटे पाच वाजता लष्करी तळावर असलेल्या स्टाफ क्वार्टरवर जैशच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. शनिवारपासून सुंजवामधील परिस्थिती लक्षात घेऊन जम्मू शहरात रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. या परिसरात सुरक्षा रक्षकांचा वेढाही वाढवण्यात आला होता. पण एकएक दहशतवादी वेचून मारायचा म्हटले तरी त्यांची नेमकी संख्या कळणे फार महत्त्वाचे आहे. पाक पुरस्कृत दहशतवादी जेव्हा जेंव्हा भारतात घातपाती कृत्ये करण्यासाठी येतात तेंव्हा तेंव्हा ते टोळीने आल्याचे दिसून आले आहे. २६/११ चा मुंबईवर झालेला जो हल्ला होता त्यामध्ये १० जणांची टोळी शिरली होती. एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ला करण्याचा प्रकार त्यांनी केला होता. त्यामुळे सगळे शांत होईपर्यंत, मारले जाईपर्यंत किंवा एखादा जीवंत पकडण्यात यश येईपर्यंत ही कारवाई करावी लागते. थांबून थांबून हे दहशतवादी लपून बसून हल्ले करत आहेत. त्यामुळे ही कारवाई करताना फार संयमाने निर्णय घ्यावे लागतात. दहशतवाद्यांविरुध्द सुरु असलेल्या या कारवाईत आणि शोध मोहिमेदरम्यान एके ४७ रायफलसह इतर हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकदाची आरपारची लढाई होवूनच जाऊ दे असा सूर सोशल मिडीयावरूनही आळवला जात आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जेंव्हा जेंव्हा असा हल्ला होतो तेंव्हा तेंव्हा सर्व राजकीय पक्ष आपल्यातील मतभेद विसरुन एक असतात हे भारतीय लोकशाहीचे बलस्थान आहे. पण तरीही काँग्रेसमध्ये काही विचित्र माणसेही याचा राजकीय गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. २६/११ च्या हल्लयानंतर ऐन आणीबाणीच्या परिस्थितीत राम गोपाल वर्माला ते ठिकाण दाखवायला नेणाºया विलासराव देशमुख यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. असा आगाउपणा करणारे राजकारणी हे कधीकधी देशहितास बाधक ठरतात. तसे काही पावटे आजही काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा राजकीय लाभासाठी कोणीही फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर तो मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असेल. १९७१ च्या बांग्लादेश निर्मितीसाठी झालेल्या पाकिस्तान युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक जनसंघाचे आणि विरोधी नेते असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी केले होते. इंदिराजींचा गौरव त्यांनी दुर्गा संबोधून केला होता. तो दिलदारपणा आज काँग्रेसमध्ये नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक काँग्रेस नेत्यांना करता आले नाही. त्यांनी त्यातही खोड्या काढून चुका शोधण्याचा अधमपणा केला होता. म्हणूनच आजच्या परिस्थितीत सर्वांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. दहशतवादी जेंव्हा अशा ठिकाणी घुसतात तेंव्हा आपल्या नागरिकांचा महत्वाच्या ठिकाणांचा ते ढालीसारखा वापर करत असतात. त्यांच्याप्रमाणे आपल्या लष्कराला बेछूट गोळीबार करणे शक्य नसते. याचे कारण आपले सैनिक आपल्या रक्षणसाठी लढत असतात. ते शत्रूला मारण्यासाठी नाही तर आपल्यासाठी तिथे झुंजत असतात. साहजिकच आपल्या नागरिकांना त्रास न होता ही कारवाई करताना वेळ लागतो हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: