शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

काही दिवसांपूर्वी पुण्यात रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीची अतिशय क्रूरपणे हत्या केली गेली. दिलीप कोल्हटकर म्हणजे दिग्दर्शक, अभिनेते असले तरी त्यांची आणखी एक ओळख म्हणजे महाराष्ट्राचा छोटा गडकरी असे वर्णन ज्यांचे केले जाते, त्या बाळ कोल्हटकरांचे ते पुत्र आहेत. वाहतो ही दुर्वाची जुडी, सीमेवरुन परत जा, देणाराचे हात हजार, उघडले स्वर्गाचे द्वार अशी अनेक नवाक्षरी नाटके ज्या सिद्धहस्त लेखकाने गाजवली त्या कोल्हटकर कुटुंबातली ही शोकांतीका कोणालाही वेदनादायी अशीच आहे. दिलीप कोल्हटकर जवळपास दीड वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. सोबत पत्नी आणि वृद्ध सासू असे नोकरांच्या जिवावर राहणारे हे ज्येष्ठ नागरिक. पण अशा अवस्थेत नोकराने अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या ही फारच धक्कादायक आहे. नामांकीत लोकांवर ही वेळ येत असेल तर सामान्य माणसांचे काय ? यामुळे केवळ पुण्यातीलच नव्हे तर सगळीकडेच असणाºया ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी अशाच निरस आणि असुरक्षित जगण्यापेक्षा मरणाला कवटाळलेले बरे या विचाराने एका समाधानी ज्येष्ठ दांम्पत्याने राष्ट्रपतींकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती. आपण मरावे असे का वाटते या लोकांना ? म्हातारपण खरेच वाईट असते का? म्हातारपण म्हणजे बालपण हे जरी खरे असले तरी ती आयुष्याची तिन्हीसांज असते. तिन्हीसांज होताना प्रत्येकचजण असुरक्षित आहे अशा भावनेत असतो. सूर्य आता डुबणार आहे. चंद्राचा पत्ता नाही. अशा करकरीत टळटळीत तिन्हीसांजेला जी भिती मनात काहूर माजवत असते तीच स्थिती आयुष्याच्या या तिन्हीसांजेला असते. १९८० च्या दशकात जयवंत दळवींचे म्हातारपणातील या एकाकीपणाची व्यथा मांडणारे नाटक संध्या छाया येवून गेले. खूप गाजले होते ते नाटक. पण ते पाहुन बाहेर पडताना प्रेक्षकांच्या मनात खरंच म्हातारपण इतकं वाईट असतं का असा प्रश्न डोकावत राहतो. मनात गलबलत राहतं. आज तीच परिस्थिती सगळीकडे दिसते आहे. ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा आणि त्यांच्या असुरक्षित जगण्याने सामान्य माणूस चिंताग्रस्त आहे. पोटापाण्यासाठी, करीअरसाठी आईबापाला सोडून परदेशात गेलेली मुलं आणि आपल्या मुलांच्या आठवणीत भूतकाळात जगत एकेक दिवस जगणाºया म्हाताºयांना कसला आधारच नाही. त्यामुळे नोकर चाकर, केअर टेकर ठेवून जगायचे. मरण येत नाही तोपर्यंत जगायचे. दोघांतील एकजण आधी गेला तर दुसºयाने मरणाची वाट पहात जगायचे. त्यांच्या मरणाची वाट पहात त्यांच्या संपत्ती, वस्तू यावर डोळा ठेवणारे किती काळ हे जगणार आहेत याची वाट पहात असल्याप्रमाणे गिधाडासारखी धाड टाकायला टपून बसलेले.  हे वातावरणच अतिशय वेदनादायी आहे. संध्या छायेला उत्तर देण्यासाठी वसंत कानेटकरांनी प्रेमाच्या गावा जावे हे नाटक लिहिले आणि म्हातारपणाचा खरा आनंद कसा घ्यायचा हे दाखवून दिले. पण तो आनंदही क्षणभंगूरच ठरला बहुदा. कारण आज प्रत्येक शहरांमधून नोकरचाकरांच्या जीवावर जगणारे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यासारख्या शहरात नोकरांवर कितपत विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरफोडी, फसवणूक, अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये दुकान व घरातील नोकरांचा सहभाग असल्याचे दिसून येत होते.  गेल्या काही दिवसांत नोकर मालकांच्या जीवावर उठल्याचे दिसून आले आहे. किरकोळ कारणावरून मालकांना मारण्यापर्यंत घरातील नोकरांची मजल गेली आहे. नोकरांनी दिलेल्या माहितीवरून लुटमार, चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, काही नोकरांनी मालकांचा विश्वासघात करून लाखोंचा ऐवज पळविला आहे. त्यामुळे नोकर ठेवताना मालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आजकाल आजारी असलेल्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी खास अटेंडंटची मागणी वाढत आहे. परराज्यातून कारागीर म्हणून येणारे अनेक नोकर पुण्यात काम करतात. व्यवसायाचा व्याप वाढत असल्याने मालक काही भार कमी करून नोकरांवर थोडी जबाबदारी वाढवून महत्त्वाची कामे दिली जातात. बहुतांश कामगार विश्वासू व प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर व्यवसाय सोडून ते बाहेरची कामे करतात. हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे अशा काही घटनांवरून स्पष्ट होत आहे. कोल्टटकरांच्या घटनेमध्ये नोकराने खाण्या-पिण्यास देत नाहीत, सतत किरकिर करतात अशा शुल्लक कारणांवरून दीपाली कोल्हटकर यांचा खून केला.  त्या अगोदर आणखी एका घटनेत एका नोकरानेच मालक बाहेर गेल्यानंतर त्याच्याजवळील किल्लीने घर उघडून पावणेआठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. महापालिकेत अधिकारी असलेल्या व्यक्तीने वृद्ध पित्याची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या नोकराने एके दिवशी रोख रक्कम, सोन्याची अंगठी व मोबाइल घेऊन पसार झाला होता.  काही महिन्यांपूर्वी रास्ता पेठेतील ह्यबॉम्बे रेक्झिनह्ण नावाच्या दुकानात नोकराने एका साथीदारामार्फत घरफोडी करून तब्बला साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हे प्रकार पुण्यातील असले तरी ते प्रातिनिधीक आहेत. ते कधीही कुठेही घडू शकतात त्यामुळे मोठ्या शहरातील ज्येष्ट नागरिक असुरक्षित आहेत हेच यातून दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: