सोमवार, ७ मे, २०१८

‘नीट’च्या विद्यार्थ्यांना नीट वागवा

संपूर्ण देशात रविवारी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ घेण्यात आली. यावेळी गैरप्रकार टाळण्यासाठी म्हणून परीक्षार्थींची केंद्रावर कसून तपासणी करण्यात आली. हा प्रकार अत्यंत हिडीस असा म्हणावा लागेल. नीटची परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी म्हणजे कुठली चतुर्थ श्रेणीतील कामगारांची भरती नाही. नीटची परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी हे गुन्हेगारी जगताकडे वळण्यासाठी म्हणून ही परीक्षा देण्यासाठी आलेले नाहीत. नीटची परीक्षा केंद्र म्हणजे काही स्मगलिंगचे काम करणारे तरबेज नव्हेत. हे विद्यार्थी म्हणजे सभ्य जगतात येणारी भावी पिढी असणार आहे. माणसांना निरोगी बनवण्यासाठी आणि रुग्णांंची तपासणी करण्यासाठी तयार होणारे डॉक्टर यात असणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची ज्या प्रकारे तपासणी करण्यात आली ती अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. परीक्षेला जाताना जी विद्यार्थ्यांची तपासणी केली त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा चक्क मानसिक छळ करण्याचाच प्रकार झालेला आहे. अशा अवस्थेत, अपमानीत झालेले विद्यार्थी पेपर कसा काय लिहू शकतील याचा विचार कोणीही केला नाही ही सखेद आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर तसेच लांब बा'ा कापण्यात आल्या. पायात बुट नको, कंबरेला पट्टा नको, यासारखे अनेक निर्बंध आणि तपासण्यांचा सामना यावेळी विद्यार्थ्यांना करावा लागला. यावेळी विद्याथीर्नींचीदेखील तपासणी करण्यात आली. का तर म्हणे कॉपी कुठे लपवली नाही ना हे पाहण्यासाठी. जी मुले नीटची परीक्षा देण्यासाठी येतात ती मेरीटमधली असतात. त्यामुळे ती कॉपी करून पास होणारी मुले असूच शकत नाहीत. कॉपी करून नीटची परीक्षा पास होणे सोपे आहे का याचाही विचार केला पाहिजे. कारण कॉपी नेमकी काय आणि कशाची करायची आहे हे तरी माहिती असले पाहिजे ना? म्हणूनच ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना अपमानीत करण्यात आले त्याचा निषेधच व्हायला हवा. परीक्षा केंद्रावर ज्या हॉलमध्ये विद्यार्थी बाकावर पेपर लिहीण्यासाठी बसतात त्या हॉलमध्ये सुपरवाजर असतात. एका हॉलमध्ये जास्तीत जास्त ३० ते ४० विद्यार्थी असतात. त्यांच्यावर ते सहजपणे लक्ष ठेवू शकतात. सर्व परिक्षार्थी जरी खाली मानेने पेपर सोडवत असले तरी त्या सुपरवायजरचे लक्ष सर्वांकडे असताना कॉपी करणे कसे शक्य आहे? म्हणजे सुपरवायजर काय वर्गात झोपा काढतात का? कोणी काही गैरप्रकार, कॉपी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम सुपरवायजरचे असते. नीटच्या परीक्षेला बाहेर तपासणी करून हॉलमध्ये सोडलेले विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला सुपरवायजर नसतो का? असे असताना अशा हीनप्रकारे केलेली तपासणी ही अत्यंत चुकीची आहे. मुळात कॉपी करून पास होता येते, मेरीटमध्ये येता येते आणि गुणीजनांना डावलले जाऊ शकते हा विचारच चुकीचा आहे. दिलेल्या वेळेत पेपर सोडवायचा म्हणजे मनात, डोक्यात अभ्यास तयार असायला लागतो. आडातच नसेल तर पोहºयात येणार कुठून? खरे तर सरकारने एकदा प्रयोग करून पहावा की समोर अभ्यासाची पुस्तके घेऊन, पुस्तकात पाहून पेपर सोडवा असे सांगून पहावे. पुस्तकात पाहून पेपर सोडवणारा विद्यार्थी शंभर पैकी शंभर गुण मिळवतो का याचे निरिक्षण करून पहा. कोणत्या प्रश्नाचे उत्तर पुस्तकात नेमके कुठे आहे हे समजण्यासाठी तरी मुलांचा अभ्यास असला पाहिजे. अभ्यास न करणारे पुस्तक समोर ठेऊनही यशस्वी होणार नाहीत. उत्तीर्ण होण्यापुरते थोडेफार गुण मिळवतील फार तर पण प्राविण्य मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे चांगले गुण मिळवायचे असतील नियमीत अभ्यास आणि कॉपी न करता पेपर सोडवणे हाच उपाय आहे. याची जाणिव त्या विद्यार्थ्यांना असतेच. त्यामुळे अशाप्रकारे संशयाच्या चष्म्यातून नीटच्या विद्यार्थ्यांकडे पाहणे हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्टÑात एका ठिकाणी परीक्षेला आलेल्या एका विद्यार्थ्याने फॅशनची पँट घातल्याने त्याला मज्जाव करण्यात आला होता. ही पँट बदलल्यानंतरच या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. हे तरूण विद्यार्थी आहेत. हेच त्यांचे वय आहे. आत्ताच त्यांना असे कपडे घालता येणार आहेत. एकदा का वैद्यकीय शिक्षण आणि करीअर सुरू झाले की तसे कपडे घालता येणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे जीन्सच का घातली, रंगीत कपडेच का घातले असे विचारून परीक्षेपासून अडवण्याचे प्रकार चुकीचे आहेत. मुलींच्या बाबतीतही अशाच प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना पेन घेऊन जाण्यासही मज्जाव करण्यात आला. अशाप्रकारे तपासणी केल्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळल्याचे दिसून आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असाच म्हणावा लागेल. त्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजेत. अशा प्रकारे परीक्षार्थींची तपासणी करता येणार नाही याबाबत कोणीतरी आदेश काढले पाहिजेत. देशातील अनेक घटनांवर न्यायालय भाष्य करत असते. याबाबत न्यायालयानेही आपली मते नोंदवण्याची गरज आहे. कॉलर असलेली शर्ट अथवा लांब बा'ांचे शर्ट परीक्षेदरम्यान घालू नये, याबाबतची नियमावली आधीच विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला, असे या नीटच्या संयोजकांचे म्हणणे आहे. परंतु सभ्य पोषाखात कॉलर आणि पूर्ण बा'ांचा शर्ट याला महत्व आहे. या सभ्य परीक्षेला जाताना अशा कॉलरलेस कपड्यांत किंवा आखूड बा'ामध्ये जाण्यात अनेकांना संकोच वाटू शकतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना उन्हाच्या तिरीपीत असे आखूड बा'ांचे कपडे घालून कोणी बाहेर पडू शकेल का? उन्हाच्या झळांनी बाहेर पडल्यावर हाताची त्वचा, मान काळी लाल पडते, मुलीही शक्यतो सनकोट वापरतात. असे असताना आखूड बा'ांचे आणि कॉलरलेस कपडे घालण्याचा नियम हा चुकीचा आहे. उन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा मानेवर होत असतो. त्या मानेचे संरक्षणासाठी कॉलरचे शर्ट आवश्यक असतात. असे शर्ट जर परीक्षा केंद्रावर आल्यावर कापले जात असतील तर ते चुकीचे आहे. या नियमांत बदल होणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: