सांगलीचा एक शेतकरी मुंबईच्या लोकलमध्ये भिक मागतानाचे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले. अत्यंत वेदनादायक असे वृत्त आहे हे. आज शेतकरी आणि कामगार हे दोघेही असुरक्षित जीवन जगत आहेत. फक्त सरकारी नोकर सुरक्षित आहेत. बाकी खाजगी क्षेत्रातील अवस्था ही नाव मोठं लक्षण खोटं अशीच आहे. त्यामुळे सांगलीच्या शेतकºयाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील कर्मचारी भिकेला लागणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. सांगलीचा हा शेतकरी नारायण पवार याने डाळींबाची शेती केली होती. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याची ही शेती जळून गेली. शेतीच्या व्यवसायात अपयश आले. कर्जबाजारी झालेल्या या नारायण पवार नावाच्या शेतकºयावर भिक मागायची वेळ आली. मुंबईच्या लोकलमध्ये हातात डबा घेऊन हा शेतकरी दरिद्री नारायणासारखा भिक मागू लागला. हे अत्यंत भयावह आणि चिंताजनक असे दृष्य होते. आपण शेतीमुळे कंगाल झालो. काही पिकवू शकत नाही आता या पडिक जमिनीकडे पाहून जगण्यासाठी मला हात पसरावे लागत आहेत असे सांगत नारायण पवार भिक मागत राहिले. वरुणराजाने अवकृपा केली. टँकरचे दर परवडेनासे झाले. त्यामुळे डाळिंबाची बाग जळून गेली. बँकेचे कर्ज थकले. जमिनीवर बँकेचा बोजा चढला. दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विवंचनेने नारायण पवार यांचा कणाच मोडून गेला. त्यामुळे त्यांनी भिक मागण्याचा निर्णय घेतला. अतिशय वाईट. सरकारी अनास्था आणि शेतकरी, कष्टकरी, खाजगी असुरक्षित कर्मचारी यांच्याबाबत कोणतेही कायदे नसल्यामुळे या देशात फक्त भिकाºयांचीच संख्या वाढणार का? कुसुमाग्रजांची कणा ही कविता प्रत्येकाला आजवर उभारी देत होती. नैसर्गिक संकटांवर मात करत जगणाºया त्या कणा कवितेतील नायकातील सकारात्मक आणि लढण्याची, संघर्ष करण्याची ताकद प्रत्येकाला प्रेरणा देत होती. ‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून । ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.’। माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,। मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.। भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,। प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.। कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे। पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला । पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती हात ठेउन, फत लढ म्हणा!। पण आज परिस्थिती अशी आहे की सगळा कणाच मोडून काढलेला आहे. भिक मागण्याची वेळ शेतकरी आणि कामगारांवर आलेली आहे. मेल्यानंतर, आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुुंबाला मदत देणारे सरकार जिवंतपणी जगू देत नाही. आज शेतकरी जगला, कष्टकरी जगला तर सगळे ठिक असतील असा विचारच कोणी करेनासे झाले आहे. काय परिस्थिती आलेली आहे. आजवर कर्जबाजार,नापिकीला सामोरे गेलेल्या शेतकºयाला आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. आज शेतकरी आत्महत्या न करता भिक मागतो आहे. यातले कोणते चित्र चांगले आहे? शेतकरºयांनी आत्महत्या करावी की अशी भिक मागावी? आत्तापर्यंत हे विदर्भ मराठवाड्याचे शेतकरी आत्महत्यांचे लोण पश्चिम महाराष्टÑ आणि कोकणात कधी नव्हते. पण तिथेही ते आता पोहोचताना दिसते आहे. ज्यांच्यात आत्महत्या करण्याचे धाडस नाही ते अशी भिक मागताना दिसत आहेत. काय अवस्था आहे ही देशाची? कुसुमाग्रजांच्या कवितेतील तो नायक मदत नाकारून लढायला तयार होतो. कारण त्याचा कणा शाबूत आहे. आज कणाच मोडून काढण्याचे काम सरकार करते आहे. त्यामुळे या देशात शेतकरी आणि खाजगी क्षेत्रातील असंघटीत कष्टकरी हा अत्यंत असुरक्षित आहे. खाजगी क्षेत्रातले कर्मचारी, शिक्षणसेवक, नर्स, अंगणवाडी शिक्षिका यांनी रस्त्यावर उतरून भिक मागितली पाहिजे असे सरकारला वाटते का? महिनोंमहिने पगार नसल्यामुळे हे कर्मचारी अस्तावस्त झालेले दिसतात. त्यांनी करायचे काय? भिक मागणे हाच त्यावरचा उपाय आहे असे समजायचे का? मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा असे सांगणारा नायक कुठे आणि संसार मोडल्यामुळे त्याच्या पाठिचा कणा मोडून काढणारे प्रशासन कुठे? या देशात भिकाºयांची संख्या वाढवणे हाच विकास म्हणायचा का? म्हणजे तुम्ही कुठले भिकारी? तर कोणी म्हणेल आम्ही शेतकरी भिकारी. तुम्ही कुठले भिकारी? तर आम्ही कारखान्यात काम करणारे पण वेळेवर पगार न झाल्याने तयार झालेले नवभिकारी. असे शिक्षक भिकारी, अंगणवाडी सेवक भिकारी, माध्यमात काम करणारे भिकमंगे, खाजगी क्षेत्रात पगार वेळेवर न झाल्याने देशोधडीला लागलेले नवभिकारी असे चित्र आपल्याला पहायला मिळते आहे. म्हणजे पूर्वी गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे गट होते. आता गरीब आणि श्रीमंत असे दोनच गट तयार झाले आहेत. मध्यमवर्गियांमधील एक गट गरीबीत गेला तर दुसरा गट श्रीमंत झाला. या श्रीमंत झालेल्या मध्यमवर्गियांना नवश्रीमंत असे म्हटले जाते. तसेच या गरीबीत आलेल्या नव्या गटाला नवगरीब किंवा नवभिकारी म्हणावे लागणार इतके हे भिषण दृष्य आहे. फक्त पदाची खोटी प्रतिष्ठा सांभाळत पोकळ पोटाची ढेकर देण्याची आलेली ही वेळ अत्यंत वाईट आहे. यामुळे सरकार गोरगरिबांचे शाप घेत आहे. आज बळीराजा जर भिक मागू लागला आणि कामगारवर्ग जर पगार वेळेवर न होण्याच्या शोषणाला बळी पडला तर या देशाचे चित्र काय आहे? सरकार नेमके काय करते आहे? या असुरक्षिततेतून कोण बाहेर काढणार आहे या समाजाला? अत्यंत वाईट परिस्थिती असताना कसले अच्छे दिन आणि कसला विकास झाला याचे उत्तर आता सरकारला द्यावे लागेल. एका दरिद्री झालेल्या नारायण पवारने भिक मागण्याचे धाडस केले. असे धाडस ज्याला शक्य होणार नाही त्याने फक्त आत्महत्याच करायची बाकी काही नाही.
मंगळवार, २२ मे, २०१८
बळीराजा झाला दरिद्री नारायण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा