सध्या निपाह या विषाणूची दहशत आरोग्यक्षेत्रात पसरली आहे. त्यामुळे एकुणच भितीचे वातावरण आहे. तसे दर चार दोन वर्षांनी आपल्याकडे नवनवे रोग येत असतात आणि त्याची भिती, काळजी यामध्ये अनेक दिवस निघून जातात. त्या रोगावर मात करण्याची चर्चा होते. त्याची लस, औषधे काय असणार याबाबत जनजागृतीचा उत येतो. पण त्या रोगावर मात काही होत नसते. हे आपल्या देशात आता नित्याचेच झालेले आहे. पोलिओ निर्मूलनाची मोहिम १९९५ पासून हातात घेतली. त्याला आता २३ वर्ष झाली तरीही अजून पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. आपण फक्त स्वातंत्र्यानंतर देवी या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो आहोत. परंतु टीबी किंवा क्षयरोगासारखे रोग आपल्याकडे फोफावतानाच दिसतात. त्यावर नियंत्रण आणायचे तर नवीन कोणता तरी रोग धुमाकूळ घालतो. वीस वर्षांपूर्वी असाच आपल्याकडे डेग्यू हा जीवघेणा रोग आला. त्याची दहशत पसरली. ताप आला की मनात भितीचे थैमान घालायचे. घरात शिरलेला डास दिसला की हो डेग्युचा तर नसेल अशा भितीने काहूर माजायचे. यो डेग्युची भिती थोडीफार कमी झाली. तो बरा होऊ शकतो असे वाटल्यावर जरा कुठे सुटकेचा निश्वास टाकतो तो पक पक पकाक करत बर्ड फ्ल्यू नावाचा रोग आला होता. हा रोग म्हणे कोंबड्यांमुळे होतो अशी दहशत साधारण पंधरा वर्षापूर्वी पसरली. झाले ज्याने त्याने आपल्या कोंबड्या मारून टाकल्या. हॉटेलमधूनही चिकन, अंडी मागवणे बंद झाले. कित्येकांनी आपल्या पोर्ल्टीफार्ममधील हजारो कोंबड्या पकापक मारून टाकल्या. का तर या कोंबड्यांमुळे हा बर्ड फ्ल्यू पसरू शकतो याची भिती मनात होती. या बर्ड फ्ल्यूचे बसतान बसल्यावर आणि त्याची भिती नाहीशी झाल्यावर एकाएकी स्वाईन फ्ल्यू नावाच्या रोगाची दहशत निर्माण झाली. हा रोग म्हणे डुकरांमुळे होतो. त्यामुळे प्रत्येकजण तोंडाला मास्क लावून बाहेर पडू लागला. त्यामुळे मास्क विक्रीचा धंदा चांगला तेजीत आला होता. याचे बस्तान बसले आणि गेल्या काही दिवसांपासून आता निपाह नावाचा नवा संसर्गजन्य रोग माणसांच्या राशीला आला आहे. हा रोग म्हणे वववाघळांमुळे होतो. केरळ राज्यातील कोझिकोडे जिल्'ात काही भागांमध्ये झालेल्या निपाह विषाणूंच्या संसगार्मुळे मृत्यूने थैमान घातले आहे. मात्र, या विषाणूच्या संसर्गाने महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाऊ नये. हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळला आहे, अशी माहितीही प्रसिद्ध झालेली आहे. विषाणूच्या संपर्कात मानव आल्यास त्याच्यामार्फत दुसºया व्यक्तीला संसर्ग होण्याची भीती असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केले. आता वटवाघूळ हा प्राणी काही कोणी आवडीने बघेल, त्याला पाळेल किंवा सहज दिसेल असे नाही. त्यामुळे त्याच्यामुळे संसर्ग होण्याची भिती बाळगण्याचे कारण नाही. पण केरळमध्येच हा रोग का पसरला याची एक शक्यता असू शकते. त्यावर संशोधन तज्ज्ञांनी करावे हवे तर. पण केरळमध्ये अनेक मसाज पार्लर, आयुर्वेदीक ट्रीटमेंट देणाºया संस्था आहेत. तिथे वटवाघळाचे तेल काढून त्याने मालिश केले जाते. त्यामुळे यातून हा काही रोग निर्माण झाला आहे का याचा तपास केला पाहिजे. निपाह विषाणूच्या संसगार्बाबत गैरससमजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत एनआयव्हीचे संचालक डॉ. देवेंद्र मौर्या यांनी बरेच मार्गदर्शन केले आहे. पण एकदा संशय आणि भितीचे भूत मानगुटावर बसले तर ते उतरणे अवघड असते. केरळमध्ये वटवाघळांना संसर्ग झालेल्या निपाह या विषाणूमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू प्रामुख्याने फळांच्या झाडावर असलेल्या हजारो वटवाघळांपैकी मोजक्याच काही वटवाघळांमध्ये दिसून येतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याबाबत गैरसमजदेखील असायला नकोत, असा सल्ला डॉ. मौर्या यांनी दिला. झाडावर लटकणाºया वटवाघळांच्या मूत्रांद्वारे या विषाणूचा प्रसार होऊन संसर्ग होतो. गावांपासून ते शहरात सर्वत्र वटवाघळे असतात. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते. झाडावर लटकणाºया सर्वच वटवाघळांपासून विषाणूंचा संसर्ग होत नाही. निपाह विषाणूचा स्वाइन फ्लूसारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र स्वाइन फ्लू च्या तुलनेत निपाह विषाणूच्या संसगार्मुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. मौर्या यांनी केले. अर्थात काही हौशी आणि अतिउत्साही लोक कोंबड्या , डुकरे मारावीत त्याप्रमाणे वटवाघळे पकडून मारण्याचा उपद्व्याप करतील. त्यांनाही रोखण्याची गरज आहे. कारण पर्यावरणातील एक प्राणीजात यामुळे नष्ट होऊ शकते. विषाणूंचा संसर्ग झालेली वटवाघळे आकाराने मोठी असतात. मंदिरे, विहिरी, गुहांमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघळे आढळतात. त्या वटवाघळांचा आकार लहान असतो. या ठिकाणी आढळणाºया वटवाघळांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी घाबरून जाऊ नये. तसेच विनाकारण वटवाघळांचा शोध घेऊ नये. वटवाघळांच्या सान्निध्यात मनुष्य आल्यास त्यामुळे मानवाला संसर्ग होण्याची भीती असते, असे आवाहन डॉक्टरांनी केलेले आहे. पण त्यासाठी आपला अतिउत्साहीपणा दाखवू नये हे महत्वाचे आहे. या रोगाची लागण झाल्यावर त्या रुग्णाला ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी या आजाराची लक्षणे आहेत, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. यावर सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुर आहे. या रोगाचा संबंध वटवाघळाशी कसा आला आणि वटवाघूळ आणि माणसे कशी भेटली याचाही शोध घ्यावा लागेल. पण केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघळाचे तेल काढले जाते. हे तेल मसाजसाठी वापरतात. त्यामुळे असे तेल काढण्यासाठी वटवाघळे मारताना काहीतरी गडबड झाली असेल आणि या रोगाचा प्रसार झाला असू शकतो. पण या रोगामुळे वटवाघळांवर संक्रांत आलेली आहे हे निश्चित.
बुधवार, २३ मे, २०१८
वटवाघळांवर संक्रांत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा