रविवार, १३ मे, २०१८
उमंग, दबंग आणि सवंग!
गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेसने उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील आघाडी उघडली आहे. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करून एक आघाडी करण्याची तयारी केली. या आघाडीचे नेतृत्व आपण करू असे काँग्रेसने दर्शवले, पण त्याला फारसा कोणी प्रतिसाद दिला नाही. म्हणजे डिनरला दिलेला तेव्हाचा प्रतिसाद हा ‘रात गयी बात गयी’ अशाच प्रकारे विस्मरणात गेला. डिनर डिप्लमसीप्रमाणे भोजनास उपस्थित असणाºया अनेक भोजनभाऊंनी पुन्हा अन्य चाचपणी करण्याचे प्रयत्न सुरूकेले. पण या सगळ्यात काँग्रेसची भिस्त होती ती शरद पवार यांच्यावर. मात्र, शरद पवारांचे गणित आणि नीती कोणाला कधी समजली आहे का? अनेकवेळा यापूर्वी अनेकांनी म्हटले आहे की, ‘शरद पवार यांचे हो हो, म्हणजे नाही नाही’ आणि ‘नाही नाही म्हणजे हो हो.’ परंतु, त्यांची ही प्रवृत्ती सगळीकडे लक्षात आल्यावर त्यांनी ‘ना हो, हो ना’ असा नवा गेम सुरू केला आहे. या गेममध्ये सर्व दगडांवर पाय ठेवून स्वत: सेफ झोनमध्ये राहण्याचा फॉर्म्युला त्यांनी जोपासला आहे.काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांना पवारांवर विश्वास होता की, ते या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे त्यांनी डिनर पार्टीच्या दुसºयाच दिवशी त्यांची वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली. त्याचा परिणाम तर नंतर दिसलाच नाही. पण, शरद पवार आपल्यापासून भांडून गेले तरी अखेरच्या टप्प्यात ते आपल्या बाजूने उभे राहतील असा विश्वास गांधी मायलेकरांना आहे. म्हणजे तसा इतिहासच आहे. म्हणजे सोनिया गांधींच्या विदेशीचा मुद्दा करून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली असली तरी कायम छोट्या भावाची भूमिका निमूटपणे स्वीकारली आहे. अगदी पहिल्याच निवडणुकीत १९९९ ला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी परस्पर लढूनही महाराष्ट्र विधानसभेत आघाडीचे सरकार स्थापन केले आणि दुय्यम भूमिका घेतली. सोनिया गांधींकडे पंतप्रधानपद जाऊ नये म्हणून बाहेर पडणाºया शरद पवारांनी १९९९च्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, विरोधीपक्ष नेतेपद सोनिया गांधींकडे जात असताना, त्याला मात्र विरोध केला नाही. हे न उलगडणारे कोडेच होते. पण, शरद पवारांनी धीर सोडला नव्हता, कारण १९ वर्षांत भाजप जर सत्तेपर्यंत पोहोचतो, तर आपल्यालाही ते अशक्य नाही हे त्यांनी जाणले होते. कुठूनतरी सत्तेत आपण टेकू देत राहिले म्हणजे त्याचा आधारस्तंभ होता आले पाहिजे. त्या महालापेक्षा आधारस्तंभाचे महत्त्व वाढले पाहिजे हे शरद पवारांनी जाणले. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचे धोरण आखले. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यावर काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित झाले. सोनिया गांधींकडे सगळे काँगी पंतप्रधान म्हणून पाहू लागले. त्यावेळी शरद पवारांनी ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली. भाजपकडून आणि अनेकांकडून सोनिया गांधींना विरोध होत असताना ‘मौनं सर्वार्थ साधनम’ या न्यायाने त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. कारण, या सरकारला आपल्या आठ-नऊ खासदारांचे समर्थन देऊन सरकारमध्ये महत्त्वाचे पद पदरात पाडून घेणे हे त्यांचे तेव्हाचे ध्येय होते. झालेही तसेच. सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा दावा सोडला आणि डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. तिथे दुसºया नाही, तर तिसºया क्रमांकावर शरद पवारांचे नाव मंत्रिमंडळात आले. कारण, प्रणव मुखर्जींसारखे दिग्गज तिथे होतेच. पण, या एक दोन मंत्रीपदाचा लाभ उठवत आपण पुढचे ध्येय गाठायचे हे शरद पवारांचे धोरण होते. पण ‘जॉन जानी जनार्दन’ किंवा ‘अमर अकबर अँन्थनी’ असे स्वरूप असलेल्या राष्टÑवादीच्या या त्रिकुटाने ज्याप्रकारे राष्ट्रवादीची निर्मिती केली त्या त्रिकुटाला राष्ट्रवादीचा प्रसार वाढवता आला नाही. तारीक अन्वर यांना राष्ट्रवादी त्यांच्या राज्यात वाढवता आला नाही. पी.ए. संगमा यांनी त्यांच्या राज्यात राष्टÑवादी वाढविली, पण नंतर तेही पावारांपासून दूर गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही महाराष्ट्रवादी अशीच राहिली. त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाºया शरद पवारांना २००९ च्या निवडणुकीचे परिणाम दिसू लागले होते. एकीकडे काँग्रेस तेंव्हा पुन्हा बाळसे धरत होती. काँग्रेसमधून महाराष्ट्रातलेच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे माजी मुख्यमंत्रीही केंद्रीय मंत्री बनले होते. काँग्रेस वरचढ होत होती. त्यामुळे आपले गणित बिघडत आहे याची जाणिव त्यांना झाली होती. पक्ष हारत होता तरी हिंमत न हारता नवी नीती शरद पवारांनी आखण्यास सुुरुवात केली.२००९ च्या निवडणुकीत महाराष्टÑातील काही उत्साही कार्यकर्ते भारताचे भावी पंतप्रधान असाच शरद पवारांचा उल्लेख करत होते. प्रसारमाध्यमांमधूनही तसे वर्णन येत होते. त्यावेळी भाजप नेतृत्वहीन झालेली होती. अडवाणींचे नेतृत्व सर्वमान्य होत नव्हते त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याने काँग्रेसने २०० चा टप्पा पार केला होता. या निवडणुकीत राहुल गांधींना एका पत्रकार परिषदेत कोणीतरी प्रश्न विचारला होता की शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान होतील का? त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले होते की त्यांचे जास्त खासदार निवडून आले तर ते पंतप्रधान होऊ शकतात. आघाडीत ज्यांचे जास्त खासदार त्यांचा पंतप्रधान होईल. हा अपमान शरद पवारांच्या तेव्हा जिव्हारी लागला होता. कारण ज्यावेळी देवेगौडा जेमतेम आठ-दहा खासदारांच्या बळावर काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होतात, तर आठ-दहा खासदारांच्या पाठिंब्याच्या बळावर आघाडीतील वरिष्ठ अनुभवी नेता म्हणून ते पद आपल्याला मिळायला हरकत नाही असे त्यांनाही वाटत होतेच. राष्टÑवादीची खासदार संख्या काँग्रेसपेक्षा कधीही जास्त होऊ शकणार नव्हती कारण तेवढे उमेदवारही राष्टÑवादीने लढवलेले नव्हते. पण राहुल गांधींचा वचपा काढण्याचे तेव्हापासून शरद पवारांनी ठरवले असावे. २००९ ला काँग्रेस सत्तेत आली पण राहुल गांधींचे नेतृत्व निष्प्रभ आणि थट्टेचा विषय राहील याकडे पवारांंनी लक्ष दिले. सातत्याने चुकणारी पावले आणि येणारे अपयश यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व चेष्टेचा विषय झाले. त्याचा पुरेपूर फायदा पवारांनी उठवला होता. कारण केंद्रातील काँग्रेसचे संख्याबळ कमी होणारच होते, पण महाराष्टÑात राष्टÑवादीचे खासदार जास्त निवडून आणून शरद पवारांनी महाराष्टÑावरची आपली पकड कायम असल्याचे दाखवले होते. २०० च्या पार असलेली काँग्रेस पन्नाशीही गाठू शकली नव्हती. त्यामुळे आम्ही संख्याबळ तुमच्यापेक्षा जास्त नाही केले तरी तुमचे कमी करू शकतो हे २०१४ च्या निवडणुकीत सिद्ध झाले होते.आता मुद्दा येतो ते डिनर डिप्लमसीनंतरच्या भेटीचा. आघाडीचे नेतृत्व जाहीर होत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसबरोबर आहोत हे स्पष्ट केलेले नाही. उलट प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद वाढवावी हा संदेश पोहोचवून डिनर पार्टीतल्या भोजनभाऊंना प्रत्येकाने आपापल्या राज्यात काँग्रेसला रोखावे आणि आपला वाटा वाढवावा असे संदेश पेरले.आघाडीत पंतप्रधानपदासाठी केवळ शरद पवारच नाहीत तर ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग, मायावती असे अनेक नेते रांगेत आहेत. त्यात स्वत:चे नाव राहुल गांधी कसे काय जाहीर करू शकतील. त्यामुळे मोदी भाजपविरोधीतल आघाडीच्या नेतृत्वाचा प्रश्न आला तेंव्हा तो अनुत्तरीत राहिला. पण चार दिवसांपूर्वी कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींनी २०१९ ला मोदींचा पराभव करून आपण पंतप्रधान होऊ असे जाहीर केले. त्यावर आघाडीतील कोणी फारसे बोलले नाहीत. फक्त मोदी आणि पवार हे दोघेच बोलले. त्यातून त्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवून २००९ चा सूट पवारांनंी घेतला. पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना फक्त ‘बाजारात तुरी अन्... आधी तूर तर येऊ द्या’ असे सांगून, दिल्ली खूप दूर असल्याचे सांगितले. म्हणजे राहुल गांधींचे हे स्वप्न पूर्णच होऊ शकणार नाही असाच होरा पवारांनी मांडला होता. त्याचवेळी प्रचाराच्या भाषणात पाण्याच्या टँकरच्या लाईनमध्ये बादली घेऊन येणारा आणि मध्येच घुसणारा दबंग असा उल्लेख राहुल गांधींचा मोदींनी केला आणि पंतप्रधानपदासाठी खूपजण लाईनीत आहेत, वाट पहा असा सल्ला दिला. जे आपल्याला बोलता येत नाही ते दुसºयाकडून बोलवून घ्यायचे ही नीती पवारांच्या नव्या उमंगची रणनीती होती. त्याप्रमाणे मोदींच्या तोंडून राहुल गांधींना उत्तर देण्याचे काम शरद पवारांनी केले. मोदी आणि शरद पवार हे एकमेकांना नेमके काय सल्ले देतात हे बारामतीच्या कार्यक्रमात सिद्ध झाले नसले तरी त्याची प्रचिती आत्ता आली होती. शरद पवारांची उमंग आणि राहुल गांधीना दबंग ठरवून मोदींच्या तोंडून सवंग वक्तव्य करण्याचे नवे राजकारण देशाने पाहिले.
पवार-मोदी
दुसरी मोठी रेषाएखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर उपाय एकच असतो, तो म्हणजे समोर दुसरी मोठी रेषा काढणे. आपोआप ती दुसरी रेषा सापेक्षतावादाने छोटी होते. त्याचप्रमाणे मोदींच्या नावाने भाजप वाढत असेल आणि काँग्रेस संपत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचे काम म्हणजे शरद पवारांनी आखलेली दुसरी रेषा होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा