कोणत्याही निवडणुकीत जेंव्हा हारजीत होते तेंव्हा त्यावर येणाºया प्रतिक्रिया नेहमीच एका ठराविक साच्याच्या असतात. जेंव्हा एखादा पक्ष किंवा उमेदवार जिंकतो तेंव्हा त्याचे विरोधक टीका करतात ‘धनशक्तीचा विजय.’ हेच विरोधक जिंकतात तेंव्हा ते प्रतिक्रिया व्यक्त करतात की, ‘जनशक्तीचा विजय.’ अशाप्रकारे आपल्या यशापयशाचे मूल्यमापन करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अनेकजण पराभवाननंतर आमचा नैतिक विजय झाला असा दावा करतात. तो नैतिक विजय कसा असतो हा संशोधनाचाच विषय आहे. पण नैतिकता आणि नितीमत्तेची भाषा पराभवानंतर असे लोक करतात की ज्यांचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. त्यात गेल्या काही वर्षांपासून एक प्रतिक्रिया आपल्या पराभवावर प्रतिक्रिया देण्यासाठी येत आहे. ती म्हणजे इव्हीएम मशिनमुळे आमचा पराभव झाला. मंगळवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतरही अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. मंगळवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल जसजसे समोर येत गेले, तसतसे राजकीय पक्षांनी दावे-प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे. भाजप विजयाच्या जवळ जाताना दिसत आहे म्हटल्यावर अशा प्रतिक्रिया वेगाने येऊ लागल्या. हा पराभव तर काँग्रेसच्या जीव्हारी लागला. त्यामुळे या अपयशाचे खापर फोडायला त्यांना ईव्हीएम मशिनशिवाय दुसरा कोणताही आधार नव्हताच. भाजपच्या छुप्या युतीने आपले स्थान टिकवले असले तरी ही सल जेडीएसलाही जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या काही नेत्यांनीही याबाबत तशीच प्रतिक्रिया उमटली. वास्तविक या अगोदर भाजपने आपणच जिंकणार असल्याचा दावा केला होता. अनेक मतदानोत्तर अथवा मतदानपूर्व चाचण्यांमध्येही भाजपच ही निवडणूक जिंकेल असाच कल आला होता. त्रिशंकू कल येईल असे सांगणाºया अनेक अंदाजकर्त्यांचे निकाल चुकीचे ठरले आहेत. पण याचे वास्तव निकाल खेळीमेळीत स्विकारण्याचा दिलदारपणा काँग्रेसकडे नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे आमचा पराभव भाजपने नाही तर ईव्हीएम मशिनने केला असेच मत व्यक्त केले. कर्नाटकातील भाजप विजयाचा धक्का महाराष्टÑातील नेत्यांना इतका बसला आहे की त्यांनीही या पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडले आहे. यामध्ये महाराष्टÑातील काँग्रेस नेते आहेतच. पण सगळीकडे पराभव पत्करावे लागणाºया राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशिनवर खापर फोडले आहे. पण हा या सगळ्या नेत्यांचा बालीशपणाच म्हणावा लागेल. याचे कारण ज्यावेळी पाच महिन्यांपूर्वी गुजरात निवडणुका झाल्या होत्या आणि काँग्रेसची कामगिरी तिथे चांगली झाली होती तेंव्हा सर्वांनी राहुल गांधींचे कौतुक केले होते. महाराष्टÑातील शिवसेना नेते उध््दव ठाकरे यांना तर जणू मूठभर मांस चढले होते. त्यामुळे त्यांनी त्या दिवसापासून आता मोदींची लाट ओसरली, आता काँग्रेसची परिस्थिती सुधारेल असे ठोकताळे मांडून राहुल गांधींची सातत्याने पाठराखण करायला सुरुवात केली होती. गुजरातमध्ये भाजपला काठावर पास बहुमत मिळाले पण त्यावेळी काँग्रेसने आणि काँग्रेस समर्थक शिवसेना, मनसे या पक्षांनी त्यावेळी मशिनवर खापर फोडले नाही. त्यावेळी कल बदलला, हवा संपली, लाट ओसरली अशीच थट्टा सुरु केली. पंजाबच्या निवडणुकीतही काँग्रेसला विजय मिळाला होता, मोदी सत्तेवर आल्यानंतर दिल्लीत झालेल्या फेरनिवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाशवी बहुमत मिळाले होते. त्यावेळी ईव्हीएम घोटाळा झाला, असे का वाटले नाही, काँग्रेस अथवा काँगे्रेसच्या आधाराने मोठे होऊ पाहणाºया शिवसेना आदी पक्षांना? ईव्हीएम मशिनमध्ये आता व्हेरिफीकेशन होते. त्यामुळे आपले मत अचूक दिले आहे याची खात्री प्रत्येक मतदाराला असते. तरीही असा संशय घेणे म्हणजे काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांनी मतदारांवर अविश्वास दाखवण्याचा परिणाम आहे. पण पराभव आणि विजय हा होतच असतो. त्याचा इतका बाऊ करायचा नसतो. तो नम्रपणे, मोठ्या मनाने स्विकारण्यातच खरा पुरूषार्थ आहे. परंतु कोल्ह्याला द्राक्षे आंबट या न्यायाने आम्हाला विजय मिळत नाही कारण ईव्हीएम मशिन बोगस आहेत असे आरोप केले जातात. ईव्हीम मशिनवर निवडणुका गेली दोन दशके घेतली जात आहे. ती काही मोदी सत्तेवर आल्यानंतर घेतली जात नाही. काँग्रेस सत्तेवर असतानाच ईव्हीएम मशिनचा वापर सुरु झालेला आहे. त्यामुळे मशिनवर असा अविश्वास दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. आपला पराभव कसा स्विकारायचा आणि त्यातही आनंद कसा मानायचा हे एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना यांचेकडून शिकायची गरज आहे. १९९८ च्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजेश खन्ना हे निवडणूक लढवत होते. अडवाणींनी गुजरातमधील गांधीनगर आणि दिल्ली अशा दोन ठिकाणाहून ही निवडणूक लढवली होती. परंतु दिल्लीतील त्यांचा विजय कठीण मानला जात होता. राजेश खन्ना विजयी होतील असे सर्वांना वाटत होते. परंतु साधारण १० हजार मतांनी अडवाणी राजेश खन्नांचा पराभव करून निवडून आले. त्यावेळी राजेश खन्नानी रजत शर्मा यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, हा विजय माझाच आहे. याचे कारण मी पराभूत झाल्यावर एकाही वर्तमानपत्राने बातमीमध्ये अडवाणी विजयी झाल्याचे म्हटले नाही. प्रत्येकाची हेडलाईन ही राजेश खन्ना पराभूत झाला अशीच आहे, त्यामुळे हा माझाच विजय आहे असे म्हणून राजेश खन्नांनी दु:खातही आनंद मानला होता.
मंगळवार, १५ मे, २०१८
ईव्हीएम मशिनवर खापर किती दिवस फोडणार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा