तब्बल ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची जबाबदारी फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गने घेतली असून कंपनीची चूक मान्य केली आहे. त्यामुळे आता फेसबुक आणि अन्य सोशल मिडीयाच्या आहारी जाताना फार मोठी काळजी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. आपल्याकडे फेसबुकची लोकप्रियता ही २०१३ ते २०१५ या काळात शिखरावर पोहोचली. आता त्याला थोडी ओहोटी लागल्याचे चित्र असले तरी २०१४ च्या निवडणुकीत फेसबुकची भूमिका फार मोठी होती हे नाकारून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जनतेसमोर आणून भाजपला ही निवडणूक जिंकण्यास मदत करणारे सोशल मिडीयावरील प्रभावी माध्यम ही फेसबुकची ओळख भारतात झाली होती. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे ही माध्यमे मोदी विरोधात असताना भाजपने फेसबुकचा वापर अत्यंत खुबीने करत वर्तमानपत्रे आणि वाहिन्या या विकाऊ आहेत पण फेसबुक हा मात्र सामान्यांचा, जनतेचा चेहरा आहे असे भासवले होते. त्याचा परिणाम भाजपला चांगले यश मिळवून देण्यात झाला होता. पण त्याच फेसबुकची विश्वासार्हता आता धोक्यात आल्यानंतर आता नेमके कोण विश्वासार्ह आहे असा प्रश्न निर्माण होतो. फेसबुकच्या झुकेरबर्गनेच कबूली दिल्यानंतर आता सत्यासत्यतेचा प्रश्न शिल्लक रहात नाही. पण ज्या माध्यमामध्ये सत्ता पालट करण्याची ताकद आहे त्याची विश्वासार्हता धोक्यात आल्यावर नेमके काय चित्र समोर येईल हा प्रश्न आहे. अमेरिकेसारख्या देशापाठोपाठ असा डेटा मिळवण्यासाठी अन्य देशातील राजकीय पक्षांनीही प्रयत्न सुरु केल्याचे समोर येते आहे. २०१४ च्या निवडणुकांमधून पराभव झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपल्या चिंतन बैठकीत सोशल मिडीयाचे तंत्र आपण आत्मसात केले पाहिजे असा निष्कर्ष काढला होता. यात अगदी राष्टÑवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातील मुत्सद्दी नेते शरद पवार यांनीही ते मान्य केले होते. अशा परिस्थितीत आता २०१९ च्या निवडणुका जवळ येत असतानाच सोशल मिडीयातील किंग असलेल्या फेसबुकच्या विश्वासार्हतेचा निर्माण झालेला प्रश्न सर्वच पक्षांच्या दृष्टीने चिंतेचा आहे. फेसबुक युजर्स डेटा लीक प्रकरणाने संपूर्ण देशातील राजकारण आता तापले आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुक डेटा लीक प्रकणावर झुकेरबर्गने चिंता व्यक्त केली आणि आपली चूक मान्य केली. भारतासह इतर देशांमध्ये होणाºया निवडणुकीत फेसबुकचा दुरुपयोग होऊ देणार नाही, अशी ग्वाही झुकेरबर्गने दिली आहे. पण यावर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न सगळयांना पडला तर त्यात चूक काहीच नाही. रशियासह अनेक देशांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण फेसबुकने उपाययोजना करत त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले, असे झुकेरबर्ग म्हणत आहे. भारतासह इतर सर्व देशांमध्ये होणाºया निवडणुकांच्यावेळी कुठल्याही बाहेरील शक्तींचा सामना करण्यासाठी फेसबुक अनेक पावले उचलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह रशियन बॉट्सना ओळखण्यापर्यंत अनेक उपाय केले आहेत, असे झुकेबरबर्गने सांगितलं. २०१७ ला फ्रान्समध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि अमेरिकेतील अलाबामा येथे झालेल्या सिनेट निवडणुकीत रशियन बॉट्सने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. केंब्रिज अॅनालिटीका कंपनीशी काँग्रेसने संपर्क साधल्याचा आरोपही आज भाजपकडून होत आहे. असे झाले तर या माध्यमाची विश्वासार्हता धोक्यात आली असतानाच त्याचा दुरुपयोग होऊ शकतो हेही स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारची डेटा चोरी म्हणजे फेसबुक यूजर्सचा तो विश्वासघात आहे. ज्या माध्यमाच्या वापरातून सत्तापालट झाला तेच संशयाच्या भोवºयात सापडल्यामुळे अनेक समीकरणे बदलतील असा काहींचा कयास असू शकतो. पण हे जे होत आहे ते अत्यंत नियोजनपूर्वक होत आहे. साधारण दहा दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की फेसबुकवरचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ९० टक्के फॉलोअर्स हे फेक आहेत. त्या पाठोपाठ अमेरिकेतील बातमी येणे, काँग्रेसने संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे आणि झुकेरबर्गने कबूली देणे या क्रमवारीचा विचार केला तर सोशल मिडीयाला बदनाम करून त्याकडे धावणाºया युवापिढीचे लक्ष अन्य माध्यमांकडे हटवण्याचा प्रयत्न होत आहे का याचा तपास करावा लागेल. तरीही काही काळजी घेतली तर आपला डेटा चोरीला जाणार नाही हे करता येईल. फेसबुक फेसबुक अकाउंटवर असलेला फोन नंबर लगेच काढून टाका. या नंबरचा गैरवापर होऊ शकतो. एखाद्याला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तो मेसेंजरची मदत घेऊ शकतो. यापूर्वी फेसबुक रजिस्ट्रेशनसाठी फोन नंबर मागितला जायचा, आता त्याची गरज नाही. फेसबुकवर जन्मतारीख ठेवण्याची गरज नाही. तुमच्या जन्मतारखेचा वापर करून हॅकर्स अनेक प्रकारची माहिती मिळवू शकतात. पिकनिकसाठी वा कार्यालयीन कामासाठी घराबाहेर जाताना त्याबद्दलची माहिती मित्रांना देण्याचा मोह टाळा. अन्यथा, तुमच्या गैरहजेरीत तुमच्या घरी चोरी होण्याचा धोका असतो. अशा अनेक खबरदारींनी आपण आपले फेसबुक अकौंट सुरक्षित ठेऊ शकतो. परंतु ज्याप्रकारे सोशल मिडीयावर आपल्या अभिव्यक्तीचा वापर करता येतो त्या तंत्राचा योग्य दुरुपयोग करून राजकीय पक्ष आपल्या सोयीचे निर्णय डेटा चोरी करून मिळवू शकतात असा संदेशही यातून जात आहे. यासाठी आपला डेटा चोरीला जाणार नाही आणि आपण कोणाच्या प्रभावाखाली आहोत असे कोणाला वाटता कामा नये यासाठी आता फेसबुक युजर्सनेच आपला डेटा गुप्त राहील याची काळजी घेतली पाहिजे. यावरुन व्यक्त होणाºया विचारांना दाबण्यासाठी विश्वासार्हता नाही असे दाखवण्यासाठी निर्माण केलेले हे षडयंत्रही असू शकते. माध्यमांना दाबून, बदनाम करून निवडणुका जिंकण्याचा कोणी इरादा करत असेल तर तो हाणून पाडावा लागेल. हा जेवढ्या फेसबुकच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे तेवढाच त्या माध्यमाचा वापर करणाºया प्रत्येकाचा आहे. याचे कारण फेसबुकची विश्वासार्हता संपुष्टात येणे ही आपली विश्वासार्हता संपुष्टात येण्याचे चित्र असणार आहे. त्यामुळे फेसबुकचा चेहरा आपण आहोत हे लक्षात घेऊन त्याची विश्वासार्हता आणि गुप्तता जपण्याचा वैयक्तीक पातळीवर प्रयत्न केला तर कोणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला यश येणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा