पुणे तिथे काय उणे? अशी पुणेकर अभिमानाने आत्मप्रौढी मिरवतात. पण पुणे तिथे विवेकबुद्धीचे उणे असल्याचे दिसून आले. अंधश्रद्धेवर वर्षानुवर्ष प्रहार करणाºया आणि या देशात अंधश्रद्धेविरोधात कायदा यावा यासाठी लढा देणाºया डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हाच पुण्यातील विवेकाचा खून झालेला होता. पुणेकर विद्वान म्हणून गणलेले असताना सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेऊन आपले वेगळेपण दाखवण्यात धन्यता मानणाºया पुण्यात एका नामांकीत रूग्णालयात डॉक्टरांसमक्ष एक मांत्रिक रुग्णावर उपचार करतो हेच धक्कादायक आहे. पण पुरणपोळीप्रमाणेच चिकनवर साजूक तुपाची धार ओतुन मिटक्या मारणाºया किंवा पुरणपोळी बरोबर कटाच्या आमटीपेक्षा तांबडा पांढरा रस्सा मिळाला तर बरे होईल असा वेगळा विचित्र विचार करणाºया पुणेकरांनी हॉस्पिटलमध्ये मांत्रिक आणला तर त्यात पुणेकरांना आश्चर्य वाटणार नाही. पण पुरोगामी महाराष्टÑाला हे निश्चितच लांछनास्पद आहे. वाईट गोष्टींचे अनुकरण पटकन होते, त्यातून पुणेकरांनी केले म्हणून बाकीच्यांना त्याचा मोह आवरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच या घटनेची फार मोठी भिती आहे. महाराष्टÑ पुरोगामी असला तरी तो पुणे सोडून पुरोगामी आहे. कारण पुण्यातील उत्तर पेशवाईची प्रवृत्ती अजूनही बºयाच अंशी शाबुत आहे. त्यामुळेच पुण्यात रुग्णाला बरे करण्यासाठी चक्क अतिदक्षता विभागातच डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीत मांत्रिकाकडून मंत्रोच्चाराद्वारे जादूटोणा करीत उपचार सुरू होते, हे धक्कादायक आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने हात वर केले आहेत. पण रुग्णालय म्हणजे काही बाजार किंवा धर्मशाळा नाही की कोणीही येतो आणि काहीही करुन जातो. सर्वत्र सीसी टिव्ही कॅमेरे आणि बंदोबस्त असताना हे असले प्रकार कसे काय घडू शकतात? संध्या गणेश सोनवणे या महिलेला छातीत दुधाची गाठ असल्यामुळे २० फेब्रुवारीला स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम येथे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली. नर्सिंग होमचे स्त्रीरोगतज््ज्ञ डॉ. सतीश चव्हाण आणि डॉ. अर्चना चव्हाण यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने संध्या यांना २१ फेब्रुवारी रोजी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी दीनानाथ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दुपारी एका साध्या वेशातील मांत्रिकाला आणून हळद, कुंकू, बुक्का आणि फुलांद्वारे उपचार घेत असलेल्या महिलेवर मंत्रोच्चार केले. या प्रकाराचे चित्रीकरण महिलेचा भाऊ महेश जगताप यांनी मोबाईलमध्ये केले. सोमवारी संध्या सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी मृत्यूचे कारण स्पष्ट करावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. म्हणजे आपल्या रुग्णालयात चुकीची शस्त्रक्रीया करुन दुसºया रुग्णालयात या डॉक्टरने महिलेला धाडले. पुढचे उपचार करण्यासाठी सोबत मांत्रिकाला आणले. हे सगळे दिनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही? या सर्वांवर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जादू टोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करणारा डॉ. चव्हाण आणि एक अनोळखी साध्या वेशातील व्यक्ती अतिदक्षता विभागात येतात. आपला देवावर विश्वास असून महिलेच्या उपचारासाठी मांत्रिकाला आणले असल्याचे सांगतात. त्यानंतर फुले, हळदी-कुंकवाने मंत्रोच्चार करण्यास सुरवात होते. हे सगळेच अजब आहे. त्या महिलेच्या भावाने त्याला संशय आला म्हणून चित्रिकरण केले म्हणून ही बाब समोर आली. वास्तविक रुग्णालयातील सीसी टिव्ही फुटेजमध्येच ही दिसल्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. त्यामुळे असे प्रकार इथे यापूर्वीही घडले होते काय अशा शंकेला वाव आहे. वास्तविक पाहता अतिदक्षता विभागात नातेवाइकांशिवाय कोणालाच सोडले जात नाही. परंतु, दीनानाथ रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाच कसा, याची चौकशी झाली पाहिजे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर याबाबत म्हणतात की, अतिदक्षता विभागात जो प्रकार घडला, त्यामध्ये मंगेशकर रुग्णालयाचा काहीही संबंध नाही. आमच्या पूर्वपरवानगी शिवाय चोरून हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. हे काही उत्तर नव्हे. हॉस्पिटलमध्ये कोणीही असे कसे घुसू शकते? सुरक्षा नावाचा काही प्रकार आहे की नाही? या प्रकाराला जो जबाबदार डॉक्टर चव्हाण आहे त्याची कार्यपद्धतीच चुकीची होती असे दिसते आहे. मृत संध्या सोनवणे यांच्यावर छातीतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी रात्री आठची वेळ दिली होती; परंतु सध्या ग्रह चांगले नसून यमाची घंटा असल्याचे सांगत नऊ किंवा दहा वाजण्याचा मुहूर्त चांगला असल्याचे त्याने सांगितले आणि रुग्णाला त्रास होत असतानादेखील त्यांनी उशिराने शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोनवणे कुटुंबीय व जगताप कुटुंबीयांना देवावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होईल असे सांगत दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाद्वारे मंत्रोच्चार केले. डॉ. चव्हाण पंचांग पाहून मुहूर्तावर सर्व शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे अत्यंत हास्यास्पद आणि भयावह आहे. चव्हाणच्या रुग्णालयाच्या मुख्य दरवाजावर कोहळा, घोड्याचा नाल आणि देवतांच्या तसबिरी असल्याचे निदर्शनास आले. हा कसा काय डॉक्टर असू शकतो? पण खरा प्रश्न आहे की, दीनानाथमध्ये मांत्रिकाला प्रवेश मिळालाच कसा? दीनानाथ रुग्णालयाच्या नवीन व जुन्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये अतिदक्षता विभागामध्ये गंभीर रुग्ण ठेवले जातात. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांना पाहण्यासाठी पास दिले जातात. अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टर, नर्स, सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षारक्षकांचे कडे असूनही डॉक्टर आणि मांत्रिक रुग्णाकडे कसे काय पोचले? सर्वांच्या समक्ष मंत्रोच्चार करीत असताना त्यांना कोणी रोखले कसे नाही? त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यात डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी प्लँचेट करून त्यांचा आत्मा बोलावला होता. आता हा प्रकार होत आहे. हे सर्वात वाईट आणि घातक आहे. महाराष्टÑाला प्रतिगामी युगाकडे घेऊन जाण्याचा प्रकार आहे. त्यासाठी यावर त्वरीत कारवाई होऊन संबंधितांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून शिक्षा केली पाहिजे.
बुधवार, १४ मार्च, २०१८
पुणे तिथे काय उणे?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा