सोमवार, ६ जानेवारी, २०२०

वेळीच आळा घाला!

दिल्लीत काही घडले की, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतातच. तोच प्रकार काल रात्रीही पाहायला मिळाला. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली असून, या हल्ल्याविरोधात मुंबईतल्या गेटवे आॅफ इंडियावर अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली.मुंबईबरोबर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनीही पुण्यात निदर्शनं केली, पण ही निदर्शनं नेमकी कोणी कुणाची केली हेच अनाकलनीय आहे. ‘भ्याड हल्लेखोरांचा’ असे म्हणायची प्रथा आहे, पण ज्यांचा निषेध केला जात आहे, त्या हल्लेखोरांचा शोध कोण, कधील कसा घेणार, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अराजक माजवण्याची गरज नाही.रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत पोलीस मुख्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणा‍ºया विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या एका गटाने दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधावा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. जखमी विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हल्लेखोरांना अटक करावी आणि विद्यापीठ परिसरातली परिस्थिती पूर्ववत व्हावी अशा त्यांच्या मागण्या आहेत, पण जेएनयूमध्ये सातत्याने काय चालले आहे, याचा तपास केला पाहिजे. इथे विद्यार्थी शिकायला येतात की राजकारण करायला? हाच प्रश्न आहे. संघटनेची कामे करायला येतात की, शिकायला? याचा तपास केला पाहिजे. ते विद्यापीठ आहे की, राजकीय आखाडा?जेएनयू प्रशासनाने रविवारी झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. ही संपूर्ण घटनाक्रमावर जेएनयूच्या कुलसचिवांनी एक निवेदन जारी केलं आहे. १ जानेवारी २०२० ला विद्यापीठाचं हिवाळी सत्र सुरू झालं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू होती, मात्र ३ तारखेला या प्रक्रियेला विरोध करणारा एका गट कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस परिसरात घुसला आणि इंटरनेट सर्व्हर निकामी केलं. निदर्शनं करणा‍ºया विद्यार्थ्यांच्या गटाने अनेक विभागांच्या इमारतीला टाळं ठोकलं. त्या विद्यार्थ्यांची ओळख पटवल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली.त्यानंतर ४ जानेवारीला ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने इंटरनेटबरोबर वीजपुरवठाही बंद करण्यात आला. निदर्शनं करणा‍ºया विद्यार्थ्यांच्या एका गटाने विभागाचा फोनही बंद करून टाकला. हे काय चालले आहे? विद्यार्थी इथे येऊन सरळ सरळ धुडगूस घालतात. त्यांच्यावर कारवाई केली, तर लगेच त्याचे पडसाद देशभर उमटवले जातात. त्या एका विद्यापीठाचा प्रश्न असताना तो तिथल्या तिथे सोडवायचे सोडून तो राष्ट्रीय प्रश्न का केला जात आहे, हे समजले पाहिजे.जेएनयू प्रशासन म्हणतं की, ५ जानेवारीला नोंदणी केलेले विद्यार्थी विभागाच्या इमारतीत जात होते. त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर ५ जानेवारीच्या दुपारी विभागाबरोबर हॉस्टेलच्या परिसरातही नोंदणीचा विरोध करणा‍ºया आणि आधीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. प्रशासनाच्या मते दुपारी ४.३० वाजता नोंदणी प्रक्रियेचा विरोध करणा‍ºया विद्यार्थ्यांच्या गटाने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर तोंड झाकून काही गुंड पेरियार हॉस्टेलच्या खोलीत घुसले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला.जे विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने अभ्यास करू इच्छितात, त्यांचे या ठिकाणी काय होणार, हे पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे नियमांचं उल्लंघन करणा‍ºया आणि विद्यार्थ्यांकरिता असुरक्षित वातावरण तयार करणा‍ºया लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यासाठी जेएनयूच्या मते गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, पण या ठिकाणी एका विद्यापीठाचा प्रश्न असताना त्यासाठी संपूर्ण देश का हाताशी धरला जात आहे?रविवारी दिल्लीस्थित जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशे घोष यांना बेदम मारहाण झाली.मास्क परिधान केलेल्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. माझ्या शरीरावरील जखमांमधून रक्त वाहत आहे. मला बेदम मारहाण करण्यात आली, असं आयशे घोष यांनी रविवारी आपल्या तक्रारीत सांगितले, पण हे नक्की काय चालले आहे? विद्यापीठाची शिस्त नावाची काही पद्धत आहे की, नाही.). एकूणच त्याचे पडसाद मुंबई, पुण्यात उमटवणे हा कुठला शक्तिप्रदर्शनाचा भाग आहे, हेही पाहावे लागेल. हे विद्यापीठ देशभर दंगली, आंदोलने निर्माण करण्याचे केंद्रस्थान बनू पाहात आहे का, हे तपासावे लागेल. विशेष म्हणजे जेएनयू टीचर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जाहीर सभेदरम्यान हा प्रकार घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी केल्याचा आरोप जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. बुरखाधारी अज्ञात व्यक्तींनी हॉस्टेलमध्ये धुमाकूळ घातल्याचं सोशल मीडियावरील व्हिडीओंमधून स्पष्ट होत आहे.जेएनयूमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कँपसमध्ये पन्नासच्या आसपास लोक घुसले. त्यांच्या हातात काठ्या आणि दंडुके होते. बहुतेकांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. कँपसमध्ये आल्या आल्या त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या हल्लेखोरांनी कँपसमधल्या गाड्यांच्या काचाही तोडल्या. अनागोंदी माजवण्याचा उद्देश असलेल्या गटांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अस्थिरता पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचं आणि शिकण्याचं केंद्र असलं पाहिजे, पण इथे वेगळंच काही घडताना दिसत आहे. त्याला वेळीच आळा घातला पाहिजे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: