बेकेट सॅमवेल या नाटककाराने १९४० च्या दशकात लिहिलेल्या ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाने एक नवा विचार दिला होता. अनाकलनीय अॅब्सर्ब्ड नाटकांच्या प्रथेलाच या नाटकाने सुरुवात केली होती. यातील ‘ब्लादीमीर’ आणि ‘एस्ट्रॉगन’ ही दोन मुख्य पात्रे. एका गोदोची वाट संपूर्ण नाटक होईपर्यंत पाहतात. हा गोदो शेवटपर्यंत येत नाही. पण त्यांचा आशावाद मात्र कायम असतो. त्यासाठी त्यांची चाललेली धडपड म्हणजे ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक. आता हे राजकीय रंगभूमीवर नाटक भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन प्रमुख कलाकार करत आहेत. विकास, अच्छे दिन नावाचा गोदो कधी येईल, याची वाट हे दोघे पाहत आहेत आणि जनतेचे मनोरंजन करताना डोके सुन्न करत आहेत.शुक्रवारी मोदी सरकारने अविश्वास प्रस्तावात बाजी मारत आपली ताकद दाखवून दिली असली तरी विरोधकांच्या रणनीतीत हे सरकार सापडले आहे. अर्थात विरोधक विशेषत: काँग्रेसने मोदींना घेरण्यासाठी ‘मिठी मिठी’ बाते केली असली तरी त्यामुळे विरोधकांचा हेतू सफल झाला नाही. मुळात अविश्वास ठराव हा तेलुगू देशम या पक्षाने आंध्र प्रदेशच्या मुद्दय़ावरून आणला होता. त्याचे समर्थन करण्याबाबत विरोधकांनी चकार शब्द काढल्याचे दिसले नाही. तर या चर्चेसाठी मिळालेल्या संधीचा फायदा काँग्रेसकडून निवडणुकीतील भाषणबाजीप्रमाणे केला. साहजिकच या चर्चेत विकासात्मक काहीच चर्चा झाली नाही. मोदींची निष्क्रियता दाखवण्यात विरोधक अपुरे पडले. त्यामुळे आगामी काळात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा ‘वेटिंग फॉर गोदो’चा खेळ सुरू होण्यास नवा मार्ग मिळाला आहे.कोणीतरी तारणहार येणार आहे, कोणीतरी नवे काहीतरी घेऊन येणार आहे, कोणीतरी उद्धार करायला येणार आहे. या विश्वासावरच तर जग जगत असते. अमुक एक येईल आणि आमची संकटे दूर करील. अमुक एक आमची दु:खे दूर करील या विश्वासावर माणूस जगत असतो. या प्रत्येकाच्या जगण्याच्या कलेलाच ‘वेटिंग फॉर गोदो’चे नाटक म्हणावे लागेल.‘गोदो’ नावाचे काल्पनिक पात्र कधीतरी स्टेजवर अवतरेल आणि काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, या अपेक्षेत प्रेक्षक असतो. ब्लादिमीर आणि एस्ट्रॉगन यांच्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न तो गोदो सोडवेल हा विश्वास प्रत्येकाला असतो. हे दोघे संपूर्ण नाटकभर अनेक प्रश्नांवर उहापोह करत राहतात. रडतात, दमतात, थकतात, कुढतात आणि गोदोची वाट पाहत असतात. पण, हा गोदो काही केल्या येत नाही. फक्त आशावाद दाखवणे आणि आज नाही, तर उद्या येईल ही वाट पाहण्यात सगळे दमतात. हे न संपणारे नाटक मग ‘वेटिंग फॉर गोदो पार्ट वन’, ‘पार्ट टू’ असे होत जाते. तसेच काहीसे नाटक आता राजकीय रंगभूमीवर घडताना दिसत आहे. त्या रंगभूमीचे प्रमुख कलाकार आहेत ते अमित शाह आणि नरेंद्र मोदी.सध्या भारतातील राजकारणात जे चालले आहे, त्यावरून २० व्या शतकात अनाकलनीय नाटकाच्या माध्यमातून बेकेटने राजकीय रंगमंचावरील आगामी काळातील खेळाचेच वर्णन केले आहे काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बेकेट सॅमेवल हा डाव्या विचारसरणीचा आहे, हे वेगळे सांगायची गरज आता उरलेली नाही. पण, भांडवलदारांच्या या प्रवृत्तीवर हातोडा मारायची संधी त्याने कधीच सोडलेली नाही. मालक कामगार प्रश्न असोत, नाहीतर अन्य कोणतेही; परंतु शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर त्याने पुरेपूर केलेला होता. त्याच्या याच लेखणीचा प्रत्यय भारतीय राजकीय मंचावर येताना दिसतो आहे.२०१४ ला अमित शाह आणि नरेंद्र मोदी या दोघांनी निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे स्वप्न दाखवले होते. याचा स्पष्ट अर्थ आहे की, त्यापूर्वी देशात अच्छे दिन कधीच नव्हते. म्हणजे संघ किंवा त्यांच्या परिवारातील नेहमीच या देशात सोन्याचा धूर निघत होता, तसे चित्र आपल्याला पुन्हा निर्माण करायचे आहे, असे सांगत आलेले आहेत. अगदी गेली चाळीस- पन्नास र्वष त्यांच्या नवरात्रातील प्रभात फे-यांमधून जे श्लोक वाचत हिंडतात, त्यातही ‘ऋषिंनी, मुनींनी जिथे वास केला, तिथे धूर तो कांचनांचा निघाला’ असा उल्लेख असतो. भारताच्या समृद्धीचे स्वप्न पाहणे गैर काहीच नाही. पण, त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत, ते होतात का हे महत्त्वाचे. तसे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि राष्ट्रपती म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम असताना, २०२० पर्यंत भारत महासत्ता होईल हे स्वप्न दाखवले होतेच. अर्थात कदाचित मधली दहा र्वष काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारकडे सत्ता गेली नसती, तर हे स्वप्न साकार झालेही असते, असा युक्तीवाद करता येईल. पण, मोठी-मोठी स्वप्न पाहणे आणि असे होईल, तसे होईल हे सांगण्याचे राजकारण म्हणजेच वेटिंग फॉर गोदोचे नाटय़ होताना दिसते आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शुक्रवारच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना ही स्वप्ने दाखवली ती खोटी आहेत, काही केले नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनीच मारलेल्या मिठी पुराणात हे विषय गुंडाळले गेले. खासदार कुमार केतकर यांनी जरी ही छबी निर्माण करण्याचे आणि चर्चेत राहण्याचे राहुल गांधी यांचे सवरेत्तम प्रयत्न असल्याचे म्हटले असले, तरी चांगले विषय आणि मुद्दे असताना अशी नौटंकी करून त्या विषयांना बगल देण्याची संधी काँग्रेसने घालवली असेच म्हणावे लागेल. मोदी-शाह यांचा हा वेटिंग फॉर गोदोचा नाटय़ अॅब्सब्र्ड शो सुरूच राहणार आहे, हे सांगण्याइतके कौशल्य राहुल गांधींकडे नसल्यामुळे किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे मोदी-शाह यांचे हे नाटक दाखवण्यास राहुल गांधी कमी पडले. त्यांच्या भाषणातील मुद्दे मोदींना अडचणीत आणणारे होते, पण त्यांनी मिठी मारून ते मुद्दे गुंडाळून ठेवले. त्यानंतर डोळा मारून आपण बोललो त्यात गांभीर्य काहीच नव्हते, हेच दाखवून दिले. त्यामुळे मोदी-शाह यांचे वेटिंग फॉर गोदो हे नाटक पुढे चालू ठेवण्यास काँग्रेसने ब-यापैकी मदत केली, असे म्हणायला काहीच हरकत नाही.अच्छे दिन आनेवाले है, म्हणजेच वेटिंग फॉर गोदो. गोदो शेवटपर्यंत येत नाही आणि अच्छे दिनही येत नाहीत. फक्त ब्लादीमीर आणि एस्ट्रॉगनप्रमाणे दोघे टाईमपास करताना दिसतात. वेटिंग फॉर गोदोमध्ये एस्ट्रॉगनला भूक लागलेली असताना, खाण्यासाठी गाजर देतो, असे दृष्य आहे. अशी गाजरे आपण कितीवेळा खातो आहोत आणि सरकारकडून आपल्याला मिळत आहेत याचा विचार करायला पाहिजे.जनधन योजनेत २५ कोटी खाती उघडली आहेत, असे सरकार सांगते आहे. पण, यातील नेमकी खाती किती आहेत, याचा आकडा समोर येणे गरजेचे आहे. जनधन योजनेचा सरकारचा हेतू चांगला होता. पण, सरकारी बँकांच्या कर्मचा-यांनी पूर्वी ज्यांची खाती उघडली होती, त्यांच्याच खात्यांवर जनधन योजनेचा शिक्का मारल्याचे प्रकार झालेले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कसलेही नियंत्रण नसताना अशा योजना आणणे हा निव्वळ कागदोपत्री देखावा झाला. तोच प्रकार मुद्रा योजनेतील कर्जाबाबत. कोणत्याही बँकेत या मुद्रा योजनेची माहिती देण्यास बँक अधिकारी तयार नाहीत. चौकशी करायला गेल्यावर ग्राहकाला चोर असल्याप्रमाणे हाकलून लावतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुद्रा योजनेतून कर्ज किती दिली गेली, कोण लाभार्थी आहेत, किती रोजगार निर्माण झाला, याबाबत सर्वत्र अंधार आहे. हे सगळे अनाकलनीय, अॅब्सब्र्ड नाटकाप्रमाणे चालले आहे. मोदी सरकार निर्णय घेते आहे आणि ते जनतेला दिसत नाहीत. तरीही अच्छे दिन आयेंगे या स्वप्नावर जनता जगते आहे. कधी येणार अच्छे दिन? मोदी-शाह म्हणतात, आयेंगे आयेंगे. वेटिंग फॉर गोदो म्हणजे, नाटक संपत आले तरी, तो तारणहार गोदो येत नाही. आता पाच वर्षाची सरकारची मुदत संपत आली तरी, अच्छे दिन येत नाहीत. मग पुन्हा वेटिंग फॉर गोदोचा पार्ट टू सुरू होतो. तशी आता दुस-या टर्मची तयारी सुरू होणार. नवे नाटक वेटिंग फॉर गोदो टू सुरू होणार.अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आत्मविश्वास दाखवला, त्यात त्यांनी आता पुन्हा अविश्वासाचा प्रस्ताव आणायचा असेल तर, २०२४ ला या, असेच सांगून ते मोकळे झाले. २०१९ ची लोकसभा जिंकल्याचा विश्वास त्यांच्या वागण्यात होता. त्यामुळे हे वेटिंग फॉर गोदोचे नाटक पुढच्या टर्ममध्ये सुरू राहणार हे निश्चित. कोटय़वधींचा रोजगार मिळेल म्हणून तरुणवर्ग वाट पाहत आहेत. लाखो कोटींचे परदेशात जाऊन करार होत आहेत. त्यांची गुंतवणूक इथे होऊन मग कारखानदारी, प्रकल्प उभे राहतील आणि रोजगार वाढेल हे स्वप्नवत आहे. गुंतवणूक झाली, करार झाला पण, रोजगार काही आला नाही. रोजगार येईल, लाखो नोक-या येतील, तेव्हा आपण म्हणू अच्छे दिन आले. पण, यांनी तर अच्छे दिन आनेवाले है, असेच म्हटले आहे. त्यामुळे ते कधी येणार हे माहीत नाही, वाट पाहत बसायचे. वेटिंग फॉर गोदोचे नाटक पाहत बसायचे. अनुभवायचे. त्या नाटकाचाच एक भाग आपण व्हायचे. गोदो कधी येणार? विकास कधी होणार? गोदो कधी येणार? रोजगार कधी मिळणार? गोदो कधी येणार? शेतकरी आत्महत्या कधी थांबणार? गोदो कधी येणार? महागाई कधी कमी होणार? गोदो कधी येणार? महिलांची सुरक्षा कधी होणार? गोदो कधी येणार? शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा कधी मिळणार? गोदो गोदो गोदो करत दोघांचे प्राण जातात. पण, गोदो काही येत नाही. वेटिंग फॉर गोदो म्हणतच पडदा पडतो. तसाच प्रकार अच्छे दिनबाबत होताना दिसतो आहे. कारण, राजकीय मंचावर हे फार मोठे नाटक घडते आहे, वेटिंग फॉर गोदो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा