बुधवार, ७ मे, २०२५

‘सिंदूर ’ने भरला रक्ताचा मळवट


गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण भारतात एक प्रकारची खदखद होती. निरपराध पर्यटकांची पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडून हत्या केल्याची सल प्रत्येकाला होती. याचा बदला कधी घेणार असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता. त्या प्रश्नाचे उत्तर बुधवारी पहाटे आॅपरेशन सिंदूरने दिले. अतिशय नियोजन पद्धतीने केलेल्या या कारवाईत कुख्यात अशा मसूद अझहर, हाफिज सईद, सलालुद्दीन अशा राक्षसांना नेस्तनाबूत केले गेले. त्यामुळे बुधवारची पहाट तमाम भारतीयांचा उर अभिमानाने भरून येणारी ठरली.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आॅपरेशन सिंदूर लाँच करण्यात आले होते. या आॅपरेशनअंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये ९ ठिकाणांवर स्ट्राईक केला आणि पंतप्रधान मोदींनी दिलेल्या इशाºयाप्रमाणे कल्पनेपलीकडे धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांना गाडण्यासाठी या आॅपरेशन सिंदूरने कबर खोदली आहे.

बुधवारी मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते ते तळच उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला आणि भारतीय लष्कराची क्षमता दाखवून दिली. भारतीय संरक्षण दलांच्या तिन्ही विभागांची ताकद जगाला दाखवून दिली. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.


या आॅपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चक अमरु, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद येथे एकाचवेळी कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांना काही कळायच्या आतच त्यांना उखडून टाकले. तमाम भारतीयांच्या दृष्टीने ही बाब अतिशय संवेदनशील आणि भावनिक होती. आठच दिवसांपूर्वी भारत सरकारने सर्व अधिकार लष्कराला दिले होते. ही कारवाई कशाप्रकारे करायची याचे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे निरपराध हिंदूंना त्यांच्या कुटुंबीयांसमोर अत्यंत क्रूरपणे गोळ्या घालून ठार करण्यात आले होते आणि त्यांच्या बायकांना विधवा केले होते. कपाळावरचे कुंकू पुसून आपला राक्षसी अवतार दाखवणाºया पाकिस्तानी दहशतवाद्यांना या कुंकवाने रक्ताचा मळवट भरला आणि धडा शिकवला. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावल्या, महिलांना सोडून दिले आणि त्यांच्या समोर त्यांच्या नवºयांना ठार केले. यात कोणी नवविवाहीत होते. याने संपूर्ण भारतीयांचे काळीज पिळवटून निघाले होते. त्यामुळे या दहशतवाद्यांना धडाही तसाच शिकवणे गरजेचे होते. मोदी सरकार तो धडा शिकवेल यात तिळमात्रही कोणाला शंका नव्हती. त्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवला. भारतीय लष्कराला सर्वाधिकार बहाल करून हा बदला घेतला. ही निश्चितच अतिशय समाधानाची बाब आहे. बुधवारचा सूर्य उगवला तोच मुळी लाल पहाटेची किनार पांघरून. भारतीय सैन्यदलाचे सर्व अधिकारी आणि भारतीय सैन्यदल अभिनंदनाच पात्र आहेत. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. भारतीय महिलांच्या कपाळीचे सिंदूर पुसणाºयांना रक्ताचा मळवट भरून हा बदला घेतला ही फार छान गोष्ट आहे. हा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.

हा केवळ पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनाच धडा नाही तर भारतातील फुटीरतावादी आणि फितूर प्रवृत्तींनाही धडा आहे. गेल्या पंधरा दिवसांत या संकटकाळात सर्वांनी एक असले पाहिजे या भावनेचा विसर पडलेले काही सडक्या प्रवृत्तीचे विरोधक होते. यात विशेषत: उबाठा सेनेचे काही पावटे होते. ते सरकारवर टीका करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढवत होते. रोज सकाळी कॅमेºयापुढे येऊन बरळणाºया या भोंग्याने भारतीय लष्कराचे मनोबल खच्चीकरण करण्याचे अतोनात प्रयत्न केले होते. पण अशा प्रवृत्तींनाही चांगला धडा यातून मिळाला आहे. बुधवारी या महाभोंग्याचे कॅमेºयापुढे येण्याचे धाडसही झाले नाही. कसली प्रतिक्रिया देण्याची हिंमतही झाली नाही. पण भारतीय लष्कराने आम्ही कुठे कमी नाही आणि सोडणार नाही हे दाखवून दिले. इंडिया आघाडीतील या बेछूट घटक पक्षांमुळे पाकिस्तानला अशी भावना झाली की भारतात अंदाधुंदी आहे. पण हे सगळे समज भारतीय लष्कराने खोटे ठरवले. वास्तविक काँग्रेसचे मालक असलेले राहुल गांधी यांनी आणि काँग्रेसचे नाममात्र राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत म्हटल्यावर बाकीच्या घटक पक्षांनी साथ देणे आवश्यक होते. पण इंडिया आघाडीतील उबाठासारखे घटक पक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसला काडीमात्र किंमत देत नाहीत हे दाखवण्यासाठी दहशतवाद्यांचे समर्थन करत राहिले आणि सरकारवर टीका करत राहिले. हे कमी की काय महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वटेट्टीवार यांच्यासारखे नेतेही पहलगाममधील दहशतवाद्यांनी धर्म विचारला नाही असा दावा करू लागले. धर्म विचारायला त्यांना इतका वेळ मिळाला का असा सवाल करून हल्ल्यात महाराष्ट्रातील आपल्या घरातील माणूस गमावलेल्या महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम वडेट्टीवार यांनी केले होते. अशा दुष्ट प्रवृत्तींचे तोंडही भारतीय सैन्याने बंद केले आहे. याबाबत राजकारणातील परिपक्वता काय असते हे शरद पवारांनी दाखवून दिले. त्यांनी आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही वेळ राजकारणाची नाही, आम्ही याबाबतीत सरकारच्या पाठीशी आहोत हे ठामपणे सांगितले. पण या बुधवारच्या कारवाईने सीमेपलीकडील दहशतवादी आणि देशांतर्गत वाईट प्रवृत्ती दोघांनाही त्यांची जागा दाखवून दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: