सोमवार, ५ मे, २०२५

सर्वांसाठी सर्वकाही म्हणजे ‘दै. मुंबई चौफेर’


आज मुंबई चौफेर हे आपणा सर्वांचे लाडके दैनिक ३१ वर्षे पूर्ण करून बत्तीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा हा वेलू गेला गगनावरी... त्याप्रमाणे बाबा तथा मुरलीधरशेठ शिंगोटे यांनी ३० वर्षांपूर्वी हे दै. मुंबई चौफेर नावाचे रोपटे लावले; पण बाबांची कल्पकता, दिव्यदृष्टीने ते लवकरच जनमानसात पोहोचले आणि त्या रोपट्याचा वेल गगनभरारी घेऊ लागला. बाबांनंतर त्यांचे पुत्र अरविंद शिंगोटे, प्रवीण शिंगोटे आणि पुढच्या पिढीतील प्रतीक शिंगोटे यांनी त्यात काळानुसार बदल केला आणि जो मुंबई चौफेर छोट्या आकारात पूर्वी होता, तो गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या आकारात येऊ लागला. त्यामुळे सर्वांसाठी सर्वकाही घेऊन येणारे वृत्तपत्र म्हणजे दै. मुंबई चौफेर असे समीकरण झाले आहे.


या सगळ्या बदलांना आमच्यावर प्रेम करणाºया सर्व वाचक, विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतकांनी मान्यता देऊन त्याचे स्वागत केले, त्यामुळे हा वेलू आता गगनावरी जाताना दिसत आहे, त्यासाठी या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. बदलत्या आकारानुसार एकाच वर्तमानपत्रात सर्व काही देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये प्रत्येक दिवशी असणारे एक वेगळ्या विषयाचे पान आणि त्याचे वाचकवर्गाकडून होणारे स्वागत हे फार महत्त्वाचे आहे.

विशेष म्हणजे सध्याचे सरते वर्ष हे निवडणुकांचे वर्ष होते. लोकसभा निवडणुका आणि पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सरत्या वर्षात झाल्या. यासाठी मुंबई चौफेरने निवडणूक विषयक दिलेल्या विशेष पानाचे आमच्या वाचकवर्गाकडून जोरदार कौतुक झाले. त्यानिमित्ताने अनेक नवे लेखकही आमच्याकडे प्रविष्ठ झाले. या पानाला आमच्या नेहमीच्या संपादकीय पानाप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला.


कोपरा अन् कोपरा वाचला जातो हे मुंबई चौफेरचे वैशिष्ट्य आहे. वाचक नेहमीच मुंबई चौफेरमधील लिखाणाला भरभरून प्रतिसाद देतात आणि फोन करून आवर्जून आपल्या भावना व्यक्त करतात, हे आमच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे. यातील काही प्रतिक्रिया तर आपल्याला सांगितल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. गतवर्षी ४ जूनला सिनेसृष्टी गाजवणाºया अभिनेत्री सुलोचनादीदींचे निधन झाले. त्या दिवशी तातडीने लिहिलेला अग्रलेख वाचकांना तर आवडलाच, पण चार दिवसांनी सुलोचनादीदी यांच्या कन्या कांचनताई घाणेकर यांनी दूरध्वनीवरून कळवले की, इतक्या वर्तमानपत्रांमधून आईबद्दल लिहून आले त्यात सर्वोत्कृष्ट संपादकीय अग्रलेख हा मुंबई चौफेरचा आहे आणि सर्वांनी ते कबूल केलेले आहे. या प्रतिक्रियाच आम्हाला वाचकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बळ देत असतात. स्व. बाबा तथा मुरलीधरशेठ शिंगोटे यांचा हाच आग्रह आम्हाला कायम असायचा की, वाचकांना जे हवे आहे, ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांचा तो विचार प्रामाणिकपणे जपत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.

आजच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल तो आमचे हितचिंतक आणि मुंबई चौफेरचे खास वाचक असलेले सदानंद देऊळकर यांचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्थापन झाल्यापासून कार्यालयीन कामकाज सांभाळणारे देऊळकर मुंबई चौफेरच्या प्रती लेख आवडतात म्हणून सातत्याने प्रत्येक स्टॉलवरून खरेदी करतात आणि ज्येष्ठ नागरिकांना वाटतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत लेखांचे जाहीर वाचन केले जाते. प्रती कमी पडल्यातर त्याच्या झेरॉक्स काढतात आणि वाटतात, पण सर्वांना आवर्जून मुंबई चौफेर वाचत जा, तुमचे समाधान होईल असे सांगतात. गतवर्षी आषाढी एकादशीला मुंबई चौफेरमधून प्रसिद्ध झालेल्या विठूरायाच्या छायाचित्राची फ्रेम करून त्यांनी त्याची पूजा केली होती, हे आमच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा तºहेचे असंख्य वाचक आणि चौफेरप्रेमी आम्हाला सातत्याने कळवत असतात तीच आमची ताकद आहे.


काळानुसार आम्ही केलेले बदल हे वाचकांना आवडले आहेत. प्रत्येक सोमवारी अर्थविषयक घडामोडी असणारे बिझनेसचे पान, प्रत्येक मंगळवारी असणारे दिशादर्शक असे करिअरचे पान तरुण पिढीला मार्गदर्शक ठरत आहे, त्यामुळे अनेकांना आपल्या जीवनाची दिशा मिळाल्याचे वाचक सांगतात. प्रत्येक गुरुवारी येणाºया आरोग्यविषय धन्वंतरी या विशेष पानातून समाजाचे चांगले प्रबोधन होत आहे. यामध्ये डॉ. शैलेश उमाटे यांच्या वृद्धांच्या समस्येवरचे, मानसिक विश्लेषण करणारे लेख वाचून असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना मुंबई चौफेरकडे कळवल्या.

गतवर्षात तरुणांना प्रेरणा देणाºया अशा विशेष मुलाखती आम्ही दिल्या. यात नामांकित उद्योजक आणि संघर्षकरून यशस्वी झालेल्यांचा आलेख आम्ही मांडला होता. यामध्ये दीडशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या धूतपापेश्वर उद्योगाचे रणजीत पुराणिक, पितांबरी उद्योगचे रवींद्र प्रभूदेसाई, माधवबागचे साने यांच्या मुलाखतींना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्हाला अशा प्रेरणादायी मुलाखती वरचेवर वाचायला मिळाव्यात म्हणून आग्रह केला. वाचकांचा विचार घेऊन चालवले जाणारे दैनिक हेच तर मुंबई चौफेरचे वैशिष्ट्य आहे.


प्रत्येक शुक्रवारी गुन्हेगारी जगताचा वेध घेणारे जागृती हे पान आमच्या वाचकांना सावध करते, तर शनिवारचे कर्मज्ञान हे पान वाचकांना मानसिक समाधान देते. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे एक परिपूर्ण दैनिक म्हणून मुंबई चौफेरची सर्वत्र ओळख झालेली आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाटक, चित्रपट, महिलांविषयी विशेष मार्गदर्शनपर माहिती आणि सर्व क्षेत्रातील बित्तंबातमी देताना तीन दशकांची परंपरा असलेली शब्दकोडीही आम्ही वाचकांना या अंकातून देतो. याला वाचकांचा मिळत असलेला प्रतिसाद भविष्यातही असाच वाढणाºया वेलूप्रमाणे असावा ही अपेक्षा आहे.

गेली पंधरा वर्षे नियमीतपणे लिहिणारे विजय सामंत आणि नव्याने जोडलेल्या लेखकांमध्ये हस्तसामुग्रीकमध्ये हेमंत रणनवरे यांच्या लेखालाही वाचकांचा प्रतिसाद मिळतो आहे. विविध विषयांवर मालिका लिहिणाºया सोनम ठाकूर या आखाती देशातून चौफेरसाठी लेखन करतात तर अंजली जोशी जगभरातील इतिहास घडवणाºया संशोधन करणाºया महिलांबाबत लिखाण करतात ते अमेरिकेत राहून मुंबई चौफेरकडे पाहतात. त्यामुळे साता समुद्राकडे चौफेरची पसरलेली ख्याती आम्हाला अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. चंद्रशेखर खेर, मोहन गद्रे, दीपक गुंड्ये, डॉ. अमर भोसले, ऋतुजा केळकर, वैशाली देसाई, अवधूत वाघ असे असंख्य लेखक मुंबई चौफेरसाठी प्रेमाने लेखन करतात, तेव्हा आमच्या कुटुंबाची व्याप्ती किती वाढत चालली आहे हे दिसते.


‘नव्या युगाची हाक’ हे ब्रीद आम्ही २०२२ पासून घेऊन घेतलेली झेप वाचकप्रिय होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. वाचकांच्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करून त्यांना हवे ते वाचायला मिळेल याची गॅरंटी आम्ही यानिमित्ताने देऊ, कारण हे सर्वसामान्यांचे दैनिक आहे. यात सामान्य माणसांचा चेहरा प्रत्येकाला दिसतो, म्हणून तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. वाचकांच्या या तीन दशकांच्या प्रेमाचा वारसा बरोबर घेऊन जाताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

- प्रफुल्ल फडके/९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: