- शिवसेना आणि राज्यातील, देशातील छोटे पक्षांची एकूणच कामगिरी पाहता भविष्यात फक्त भाजप आणि कॉंग्रेस हेच दोन पक्ष शिल्लक राहतील असे वाटू लागले आहे. कारण कोणत्याही भूमिकेशी हे छोटे पक्ष प्रामाणिक राहताना दिसत नाहीत. सत्तेत राहूनही आपल्याच सहकारी मुख्य पक्षावर, सरकारवर टिका करण्याचा अधमपणा शिवसेना करत आहे. डाव्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्याची कोणतीही भूमिका नाही. अगदी शेतकरी संघटनेचे पक्ष असोत अथवा शेकापक्षासारखा जुना पक्ष. इतका काळ कॉंग्रेसला विरोध करण्यात गेला आता भाजपला विरोध करण्यापलिकडे यांची भूमिका काही नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने कोणाशीही सलगी करण्याचे काम असे छोटे पक्ष करत आहेत. त्यातच त्यांचे अस्तित्व संपताना दिसत आहे. म्हणूनच कॉंग्रेसची पडझड झाली तरी ती सावरेल आणि भाजपत गडबड झाली तरी तो आवरेल. कारण या दोघांशिवाय देशाला पर्याय नाही.
- कॉंग्रेस पक्ष सध्या संक्रमणावस्थेतून जात असून त्याला कधी नव्हे ते सोनिया विरुध्द राहुल असे मायलेकांच्या संघर्षाचे स्वरुप यावे, ही गांधी कुटुंबाच्याच नव्हे तर कॉंग्रेस पक्षाच्याही दृष्टीने दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. पक्षातीलच काही बडी धेंडे प्रियंका विरुध्द राहुल असे द्वंद निर्माण करून गुंता अधिक वाढविण्यात आनंद मानत आहेत. पण या संक्रमणावस्थेतून लवकर बाहेर पडण्याची गरज आहे. कारण छोट्या प्रादेशिक पक्षांप्रमाणे हा पक्ष नाही.
- कॉंग्रेस कार्यकारिणीतील काही पदाधिकार्यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या राजीनामा नाटयाने कॉंग्रेस पक्षात अचानक खळबळ माजली. कामत यांच्या राजीनाम्यामागील नेमकी कारणे काय असावीत याबद्दल निरनिराळे अंदाज बांधले जात आहेत. आणखी काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेस आणि भाजप सेनेला धक्का देवू शकतात. या कॉंग्रेसची पुनबार्र्धणी होणे गरजेचे आहे. कॉंग्रेसने कात टाकण्याची गरज आहे. नेहरू गांधी घराण्याला सोडून हा पक्ष चालवता येतो हा विश्वास निर्माण करता आला पाहिजे. हाच विश्वास भाजपने मिळवला आहे. सामान्य माणूस, चहावाला नेता होऊ शकतो हे दाखवून दिले. तोच प्रकार बिगर गांधी नेहरू कॉंग्रेस चालू शकते हे दाखवून कॉंग्रेस करू शकते. ती ताकद छोट्या पक्षांमध्ये नाही. शिवसेनाप्रमुखांनंतर घराणेशाहीने पद लादून तो पक्ष चालवता येत नाही हे दिसून आले. तसाच प्रकार शरद पवार यांनी निवृत्ती घेतली तर राष्ट्रवादी कोण चालवणार असा प्रश्न निर्माण होईल. राजू शेट्टींनंतर शेतकरी संघटना कोण चालवणार? अशा छोट्या पक्षांबाबत शंका असल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे दोन पक्ष वाढत जातील हे स्पष्ट आहे. हा बदल महाराष्ट्रातून घडणार आहे. नंतर त्याचे पडसाद अन्य राज्यात उमटतील. अगदी उत्तर प्रदेशातून मायावतींनाही आपले चंबूगबाळे आवरावे लागेल.
- संजय निरुपम यांच्यासारख्या बाहेरुन आलेल्या कार्यकर्त्याकडे देण्यात आले आहे आणि त्याने अनेक घोडचुका करुनही राहुल गांधींनी निरुपम यांना त्या पदावर कायम ठेवले आहे हेदेखील कामत यांना पसंत पडलेले नाही. शिवाय आपल्या ऐवजी पी. चिदंबरम यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णयही त्यांना रुचलेला नाही. अशा अनेक कारणांमुळे कामत यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला खरा.
- संजय निरूपम राहूल कॉंग्रेसचे तर गुरूदास कामत सोनिया कॉंग्रेसचे. त्यामुळे हा वाद असला तरी मूळ कॉंग्रेसला तसा फरक पडणार नाही. कॉंग्रेसमध्ये झालेल्या अशा नाराजीनामा नाट्यानंतर कॉंग्रेसमध्ये जे मन्वंतर सुरु झाले ते फार महत्वाचे आहे. त्यातून कदाचित कांग्रेसमध्ये पुन्हा दुफळी माजेल काय याचीही चर्चा सुरु झाली आहे. कामत जुन्या वळणाचे. साहजिकच त्यांची निष्ठा सोनियांकडे असणार. त्यामुळे कामत यांच्या कालच्या दिल्ली भेटीतील गाठीभेटींची चर्चा चांगलीच रंगली आहे. सोनियांचे सल्लागार अहमद पटेल यांचे सांत्वनाचे निमित्ताने गेलेले कामत यांनी तेथेच बाजूला ए. के. ऍण्टनी यांची भेट घेतली. ऍण्टनी यांना केरळच्या निवडणुकीत महत्व देण्यात न आल्याने तेदेखील नाराज आहेत. त्यामुळे असंतुष्टांचे गट काही नवनिर्माण करतील असे दिसते. अर्थात हे चर्चेचे बुडबुडे पुढील आठवडयात फुटूनही जातील. पण आज त्यांना महत्व आहे हे नाकारुन चालणार नाही. पुढील आठवडयात कॉंग्रेसची पूर्णपणे फेररचना करुन सोनिया गांधींच्या जागी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली जाण्याची चर्चा राजधानीत सुरु आहे.
- मात्र आता या चर्चेला निर्णायक स्वरुप प्राप्त झाले आहे. सोनिया गांधी वयाच्या सत्तरीकडे झुकल्या आहेत. त्यांची प्रकृतीही अलीकडे त्यांना साथ देत नाही. त्यांना थकवा चटकन जाणवतो. त्यामुळे सोनियांनी निवृत्ती स्वीकारावी आणि केवळ मार्गदर्शक म्हणून काम करावे व पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे द्यावी असा एक मतप्रवाह पक्षात आहे. मुळात पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले असताना मुंबईत कामत यांच्या राजीनाम्यानंतर आणि निरुपम यांच्या कारकिर्दीत काय होईल हा औत्सुक्याचा विषय आहेच. पण अशा घटनांमधून कॉंग्रेस चर्चेत राहात आहे. भाजप हा चर्चेत राहून टिकलेला पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांची अशी चर्चा होत नसल्याने कॉंग्रेस भाजपला धक्का लागण्याचे चिन्ह नाही.
बुधवार, १५ जून, २०१६
चर्चेतले पक्ष टिकतात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा