रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

माथी भडकवणे थांबवले पाहिजे

  • जगभरात सातत्याने वेगवेगळ्या मुस्लिम संघटना निर्माण होत आहेत. ठराविक कालावधी झाल्यानंतर नवनव्या संघटना धूमाकूळ घालण्यासाठी येतात. सिम्मी, अल कैदा, हुर्रीयत, तालिबान, लष्करे तोयबा अशा अनेक नावांनी पुढे येवून दहशत माजवण्यासाठी या संस्था पुढे येतात. त्याला पाकीस्तानसारख्या देशातून प्रोत्साहन मिळते. आता तोच प्रकार आयसीसकडून होताना दिसतो आहे. भारतात दहशत माजवण्यासाठी आयसीस उत्सुक होण्याचे कारण पाकीस्तानची प्रेरणा हेच आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशती संघटनेची पालेमुळे ती अनपेक्षित नाहीत. 
  •   भारतावर हल्ले चढवून सारा दक्षिण आशिया पादाक्रांत करण्याचा आयसिसचा इरादा आहे.  त्यांना पूर्ण जगावरच इस्लामिक स्टेट आणायचे आहे. म्हणजे अल कैदाने जसे जेहादच्या नावाखाली मुस्लिम तरूणांना भडकावले होते तसाच प्रकार आता सुरू आहे. त्या जेहादींचा फटका जसा भारताला बसला तसाच प्रकार पुन्हा आयसीसच्या माध्यमातून घडवण्याचे प्रयत्न होणार आहेत यात शंकाच नाही. याकूबला फाशी दिल्यानंतर छोटा शकीलच्या आदेशावरून ज्याप्रमाणात अंत्ययात्रेसाठी किंवा जनाजासाठी लोक जमले ते पाहता भारतात फार मोठा हा इस्लामी विषारी बॉंम्ब आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतासह आशिया खंडावर आपली दहशत माजवण्यासाठी अफगाण व पाक तालिबानी गटांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अल-कायदालाही वेगळे अस्तित्व न ठेवता इस्लामच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या एक किमान अब्ज मुस्लिमांची जगात एकच खिलाफत स्थापन होईल आणि आयएसचा प्रमुख हा त्या खिलाफतीचा खलिफा असेल, असे या आयसीसचे स्वप्न आहे. हे स्वप्न म्हणजे जगभरात दहशत माजवणारे असेल.
  •     आयएसने अजून आमच्या भूमीवर पाय रोवलेले नाहीत. हा धोका टाळण्यासाठी आपण सारे एकत्र यायला हवे,’ असे पाकिस्तानचे परराष्ट्रसचिव ऐजाज चौधरी आता म्हणत आहेत. परंतु पाकीस्तानवर विश्‍वास कधीच ठेवता येणार नाही. त्यात आयएसला एकदा ठरविल्यानंतर त्यांना पाकिस्तानात पाय रोवणे, कठीण नाही. पाकिस्तानातील बजबजपुरी आयएसला अत्यंत अनुकूल आहे. आयएस पाकिस्तानात येणे, याचा अर्थ भारताच्या दारात हा भयंकर धोका प्रत्यक्ष येऊन ठेपणे आहे. 
  •    इतर इस्लामी दहशती गट आणि आयएस यांचे लक्ष्य, कामाची पद्धत आणि दहशतवाद्यांची तयारी यात मुळातच खूप फरक आहे. आयएसला सार्‍या जगावर इस्लामचे राज्य आणायचे आहे. त्यासाठी, ते वाटेत येणार्‍या सार्‍यांना -अगदी शियांनाही- निर्दयपणे कापून काढायला तयार आहेत, असे जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे अमेरिकन पत्रकारांची, सैनिकांची हत्या इराकमध्ये केली गेलेली आहे तशाच प्रकारचे हल्ले पाकीस्तानने भारतात केलेले आहेत. भारतीय जवानांची मुंडकी कापून नेण्याचा हलकटपणा पाकीस्तानने केलेला आहे. त्यामुळे आयसीसशी पाकीस्तान हातमिळवणी करणार हे निश्‍चितच आहे. भारतावरचे हल्ले, हे त्यांना जसे आशियावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी हवेत, तसेच या हल्ल्यांमधून आयएसला अमेरिकेलाही इशारा द्यायचा आहे. अमेरिकेशी आत्ताच थेट लढाई पुकारणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालविणे आहे हे आयसीसने जाणले आहे. याचे कारण, न्यूयॉर्कचे जुळे मनोरे पडल्यापासून अमेरिकेने स्वतःची सुरक्षाव्यवस्था चिरेबंदी केली आहे. त्यापेक्षा, भारतासारख्या सौम्य पण अवाढव्य लक्ष्यांवर हल्ले चढविणे, आयएसला सोपे वाटत असावे. कारण भारतात प्रचंड प्रमाणात घुसखोरी करून आलेले पाकीस्तानी, बांगलादेशी घुसखोर हे अशा लोकांना आश्रय देतात याची माहिती आयसीसला आहें. राजकारणासाठी शत्रूशी हातमिळवणी करून आपल्या सत्तेचा मार्ग मोकळा करणारी भारतीय राजकारणाची स्वार्थी प्रवृत्ती याचाही आयसीसने अभ्यास केला आहे. भारतातील धुमसत्या धार्मिक तणावांचा सहज फायदा उठविता येईल, असाही आयएसचा कयास असावा. त्यामुळे भारताला या संभाव्य धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
  • भारतीय तरुणांना आयएसची कशी भुरळ पडते आहे, याची अनेक उदाहरणे देशभरातून पुढे येत आहेत. महाराष्ट्रातील दोन तरुण त्यांच्या कचाट्यात सापडल्याची बातमी आलीच होती. विशेषत: नवी मुंबईतील एक पत्रकार ज्याप्रकारे त्यांच्या नादाला लागला यावरून या लोकांना देशप्रेमापेक्षा धर्मप्रेम महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ज्या भारताने आसरा दिला, ज्या भारतात वाढले, लहानाचे मोठे झाले त्यांच्याशी गद्दारी करण्याची प्रवृत्ती यांच्यात निर्माण झालेली आहे. तेलंगणमधील तब्बल १७ तरुण आयएसच्या जाळ्यात सापडले होते. यातील एक तरुण तर इंजिनीअर आहे.  तरीही खिदमत आणि जन्नत या दोन संकल्पनांचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. त्यासाठी गरोदर बायकोला तशाच अवस्थेत सोडून भारताबाहेर पडायला तयार झाला. अजमल कसाबही अल्लाचे काम म्हणून दहशतवादी हल्ला करण्यासाठी भारतात आला होता. त्यामुळे या माथेफिरू, रेकी केलेल्या, संमोहीत केलेल्या मुसलमान तरूणांना रोखण्याची गरज आहे. त्यातच ओवेसीसारखे देशद्रोही या देशात वावरत आहेत. खिदमत म्हणजे इस्लामची सेवा आणि ती केल्यानंतर (लढाईत मरून?) मिळणारा स्वर्ग म्हणजे जन्नत. या कालबाह्य संकल्पना रुजविण्यासाठी आयएसने सोशल मीडियाचा जो प्रचंड वापर जगभर चालविला आहे, तो भयानक असाच आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही आश्चर्यकारक आहे. आज भारतात काही हजार तरुणांच्या मनात आयएसने थोडेतरी औत्सुक्य निर्माण केले आहे. 
  •    या सार्‍यातून प्रश्न असा पडतो की, आपले राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि एकूणच समाज या भीषण आव्हानाचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर काहीतरी तयारी करतो आहे की नाही? आयएसला सुन्नी पंथ सोडून कोणीच इस्लामी वाटतच नाही. इतर धर्मांचे लोक तर सोडाच, पण इस्लामच्या इतर पंथांचे अस्तित्वही आयएसला मान्य नाही. भारताचा विचार केला तर किमान सहा ते सात प्रमुख पंथांचे मुस्लिम भारतात अनेक शतके नांदत आहेत. त्यांची भाषा, चालीरीती, आहारविहार हे भौगोलिक परिसराशी आणि तिथल्या विशाल सांस्कृतिक वारशाशी जोडलेले आहेत. मुस्लिमांमधील ही विविधता संपूष्टात आणण्याचा जो प्रकार चालवला आहे तो थांबवला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविधतेतून एकता सांगताना आम्हाला भारतातील मुस्लिमांची जी विविधता आहे त्याला तडा जावू न देण्याच आव्हान आहे. माथी भडकवण्याचे जे काम भविष्यात होणार आहे ते थोपवणे आज आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: