मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

हा अधिकार पप्पूला कोणी दिला?



  •  एरवी संसदेत कधीही न बसणारा पप्पू गेल्या काही दिवसात आक्रमक झाला आहे. अर्थात हा आक्रमकपणा नसून भंपकपणा आहे. संसदेत कधी तोंड उघडत नाही आणि बाहेर येवून बरळायचे हा त्यांचा फॉर्म्युला सध्या त्यांनी निवडला आहे. पण जे काही बरळला त्याने पप्पू पुन्हा पुन्हा नापास होताना दिसत आहे. 
  • सुषमा स्वराज कुठे आणि राहुल गांधी कुठे? पण राहुल गांधींनी सवंग लोकप्रियतेसाठी सध्या सुषमा स्वराज यांच्यावर टिका करण्यास सुरूवात केली आहे.
  • ललित मोदी प्रकरणात ललित मोदींनी सुषमा स्वराज यांना किती पैसे दिले म्हणून सवाल करून राहुल गांधी उर्फ पप्पूने आपला बालिशपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. अभ्यासपूर्ण संसदेत वक्तव्य करणार्‍या सुषमा स्वराज यांची बरोबरी करण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे काय? पण केवळ पूर्व वैमनस्यातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्यावर टिका केलेली आहे. म्हणजे जेव्हा बोलायचे होते तेव्हा राहुल गांधी कधीही बोलले नाहीत आणि अन्य चुकीच्या वागण्यांवर कधी आपले मतही प्रदर्शित केलेले नाही. पण केवळ सुषमा स्वराज यांच्यावर टिका करायची आहे म्हणून आपल्या तोंडाचा चंबू त्यांनी उघडला आहे यामागे केवळ मे २००४ च्या सूडाचे राजकारण आहे. बाकी सुषमा स्वराज या दोषी नाहीत हे त्यांनाही माहित असावे.
  •    २००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सोनिया गांधी पंतप्रधानपदासाठी बाशिंग बांधून तयार झाल्या होत्या. आपल्या समर्थनार्थ त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले होते. पण त्यावेळी सुषमा स्वराज या आक्रमक झाल्या होत्या. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा घेवून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करणार्‍या शरद पवार यांनीही सोनिया गांधींच्या चरणी लोटांगण घातल्यावर तोच विदेशीचा मुद्दा सुषमा स्वराज यांनी घेतला आणि सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाला कडाडून विरोध केला. त्यासाठी जर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्याच तर आपण संन्यास घेवू अशी भिष्मप्रतिज्ञाच सुषमा स्वराज यांनी केली होती. आजन्म आपण पायात चप्पल घालणार नाही. मुंडण करू आणि श्‍वेतवस्त्र परिधान करू असा पवित्रा घेतला होता. या भावनिक आवाहनामुळे सोनिया गांधींचा पंतप्रधानपदाचा मार्ग रोखला गेला होता. त्यामुळे त्यावेळची सूडाची संधी राहुल गांधी - सोनिया गांधींना आज मिळाली आहे. सत्तेत असताना सुषमा स्वराज यांच्याकडे ढुंकुनही बघण्याचे धाडस या मायलेकरांमध्ये नव्हते. पण आता रिकामपणाचे उद्योग सुचू लागले आहेत. त्यामुळे स्वराज यांना बदनाम करण्याचा धंदा पप्पूने सुरू केला आहे.
  • त्याचाच एक भाग म्हणून पप्पूने काही दिवसांपूर्वी सवाल केला की, ललित मोदींनी किती पैसे दिले..? हा प्रश्न केवळ सुषमा स्वराज यांचा अपमान करणारा नाही तर देशाच्या विदेश मंत्र्यांचा म्हणजे पर्यायाने देशाचा अपमान करणारा ठरतो पण हे पप्पूला कसे कळावे...?? अर्थात ज्यांना हा देशच आपला वाटत नाही त्यांना विदेश परदेशत स्वदेश याचा अर्थ काय कळणार म्हणा? पण  पप्पूच्या मातेला तर सुषमाजींची नौटंकी वाटते आहे. 
  • अर्थात हे स्वाभाविक आहे...देशात राहीले म्हणून केवळ देशवासी होता येत नाही तर या देशात जन्म घ्यावा लागतो येथील संस्कृती समजून घ्यावी लागते....ते सोनिया आणि राहुल यांना कुठले समजणार? गम्मत म्हणजे ज्यावेळी सुषामाजींनी जी काही मदत ललित मोदीला केली असेल त्यावेळी त्याच्यावर कोणतेही वॉरण्ट नव्हते...ते आत्ता चार- आठ दिवसांपूर्वी निघाले...चिदंबरममुळे जप्त झालेला पासपोर्टसुद्धा कोर्टाच्या आज्ञेनुसार परत करावा लागला...भारतीय पासपोर्टधारक जर विदेशात अडचणीत असेल तर त्याला भारतीय नेत्यांनी मदत करणे चुकीचे नाही...आता तशी मदत केली तर तो गुन्हा ठरेल कारण आता संदर्भ बदलले आहेत...!! हे अभ्यास न करणार्‍या कायम नापास पप्पूला कसे समजणार?
  •   ललित मोदी हा तर केवळ आर्थिक घोटाळा केलेला माणूस आहे. पण २०००० माणसे ज्या भोपाल दुर्घटनेत मृत्युमुखी पडली आणि त्यांचा एकप्रकारे खून करणार्‍याला कॉंग्रेसने देशातून पळून जायला मदत केली होती त्याचे काय..?? ही मदत या पप्पूच्या पप्पांनी म्हणजे राजीव गांधींनी केली होती. तेव्हा त्यांनी किती पैसे मिळवले होते हे पप्पूने आधी पाहिले पाहिजे ना. सोनिया गांधींना तर त्याची सगळी माहिती असेलच. कारण पप्पू तेव्हा अगदीच कुकुलं बाळ होता. युनियन कार्बाईडच्या ऍण्डरसनला देशाबाहेर पळून जायला पार विमानापर्यंत कॉंग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याची गाडी जाते हे कोणामुळे शक्य झाले होते? अँडरसन सहजपणे अमेरिकेला जाऊन पोचतो आणि तो परत कधीही भारताच्या हाती लागत नाही हे कॉंग्रेस विसरली काय? कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे विसरल्या काय? कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना याचा गंधही नसावा? आणि भारतातील ही सर्व घटना लोक विसरले काय...?? आता तर ते दोघेही या जगात नाहीत म्हणून २०००० भारतीयांचा खून विसरायचा का..??? त्यावेळी कॉंग्रेसने किती पैसे घेतले याचा हिशोब राहुल गांधी देतील का..?? भोपाळच्या या वायू दुर्घटनेत हजारो लोकांचा बळी घेणार्‍या अँडरसनला भारतातून पळून जाण्यासाठी मदत करणार्‍या कॉंग्रेसने, कॉंग्रेस नेत्यांनी किती पैसे घेतले होते? ते कुठल्या खात्यात जमा केले होते त्याचे उत्तर राहुल गांधींनी द्यावे आणि मगच सुषमा स्वराज यांच्यावर टिका करावी. तोपर्यंत सुषमा स्वराज यांच्यावर बोलण्याचा पप्पूला अधिकार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: