-
डावा विचार किंवा लाल बावटा हा नेहमीच व्यवस्थेविरोधात लढत आलेला आहे. व्यवस्थांमध्ये अस्थाव्यस्थपणा आला की लाल बावट्याचा अंकूश या मातणार्या सत्ताधारी हत्तीवर ठेवण्याचे काम केले गेले आहे. हे काम करणारे अनेक दिग्गज आणि ऋषितृल्य लोक डाव्या विचारांच्या आणि कम्युनिस्ट पक्षांमध्ये होते. आज या देशात इतके प्रचंड प्रश्न, समस्या आहेत की त्यावेळी हा लाल बावटा कुठे गेला असा प्रश्न पडू लागला आहे. भांडवलदार पक्षांनी लाल बावटा पूर्णपणे झाकून टाकला काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच या कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्ते आणि त्यांच्या इतिहासावर थोडा उहापोह करण्याची गरज आहे. या इतिहासावरून नजर मारली तरी या वाढती महागाई, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोर्या याविरोधात लढण्याचे बळ मिळेल.
- १९२० मध्ये तुर्कस्तानचा सुलतान जो भारतीय मुस्लिमांचा खलिफा होता. त्याला इंग्रजांनी पदच्युत केल्यावर मुजाहिदांचा फार मोठा गट काबुलला रवाना झाला. तेथून तो सोवियत यूनियन मध्ये गेला. अशा गटाची पहिली बैठक ताश्कंद येथे १९२१ मध्ये झाली. या बैठकीला एम.एन.रॉय उपस्थित होते. भारतात त्यावेळी कम्युनिस्ट विचारांचे छोटे छोटे गट कार्यरत होते.
- एप्रिल १९२१ मध्ये गांधी विरुद्ध लेनिन हे छोटेखानी पुस्तक कॉ. डांगे यांनी लिहून मुंबई, कोलकाता, मद्रास लाहौर, कानपुर येथे प्रसिद्ध केले. वैचारिक मंथनाच्या युगात या पुस्तकाने फार मोलाची कामगिरी केली. आज डाव्या पक्षांनी अशा वैचारीक मंथनासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण चित्र अत्यंत वाईट आहे. लाल बावटा आणि डावे पक्ष हे हातपाय गाळून बसले आहेत असे दिसते. किंवा बर्याच ठिकाणी छोटे गटतटात गुरफटलेले लाल बावट्यांचे पक्ष हे भांडवलदार पक्षांच्या दावणीला बांधलेले दिसतात. ऑगस्ट १९२२ मध्ये कॉम्रेड डांगे यांनी सोशलिस्ट हे साप्ताहिक सुरू केले. कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करणारे हे भारतातील पहिले साप्ताहिक होते. त्यामुळे तत्कालीन मुंबई प्रांतात कॉ. डांगे यांच्याभोवती एक गट तरुण कम्युनिस्टांचा तयार झाला. कॉ. डांगे, कॉ. पर्वते, कॉ. जोगळेकर, कॉ. घाटे, कॉ. मिरजकर हे ते तरूण होते. आज परिस्थिती फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशभरात कामगारांचे प्रश्न वाढले आहेत. शेतकर्यांचे प्रश्न वाढले आहेत. महागाईचा पोटापाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावतो आहे. कंत्राटी कामगार पद्धतीने असुरक्षित कामगारांची संख्या वाढली आहे. बेरोजगारांची संख्या वाढली आहे. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे. अशावेळी लाल रक्त सळसळले पाहिजे. धोक्याचा कंदील दाखवणारा लाल बावटा उफाळून येण्याची गरज आहे. त्यासाठी डावे, कम्युनिस्ट नेत्यांच्या कामगिरीचा अभ्यास केला गेला पाहिजे. आज सगळी वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे ही भांडवलदारांची बटीक झाली आहेत. ब्रिटीशकाळात जो प्रकार होता तसाच स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षानंतर असेल तर हातात लाल बावट्याची मशाल करून नव्या क्रांतीची घोषणा देण्याची गरज आहे.
- ब्रिटीश काळात कॉ डांगे आणि नव्या तरूणांनी जो एकत्र येवून संघर्षाची ठिणगी टाकली त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. लाहौर, मद्रास, कोलकाता, कानपुर, येथे ब्रिटीशांच्या काळात एकजूट झाली त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. तेव्हा व्यापक कायदेशीर पक्ष स्थापन करावा, कम्युनिस्ट पक्षाची गुप्त संघटना तयार करावी ह्याबद्दल एकवाक्यता होती. आज या एकवाक्यतेचा लाल बावट्याचे निषाण हातात घेतलेल्या पक्षांमध्ये अभाव आहे. त्यामुळेच २४ वर्षांची प. बंगालमधील डाव्यांची सत्ता गमवावी लागली.
- १९२३ साली कॉ. सिंगारवेलू यांनी पहिला मे दिन साजरा केला. लेबर किसान पार्टीची घोषणा केली. कॉ. डांगे यांना निमंत्रण होते पण ते हजर राहू शकले नाहीत. परंतु नंतर सोशलिस्टमध्ये आपल्या सर्व चळवळींचा उल्लेख या पक्षाच्या नावाने करायला सुरुवात केली. पक्ष स्थापन झाल्यावरही विखुरलेल्या कम्युनिस्टांना एकत्र करून देशभर कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याचे काम होते. देशाबाहेर अशी परिषद व्हावी अशी रॉय यांची सूचना होती तथापि कॉ. डांगे व सिंगारवेलू याबाबत सहमत नव्हते. ब्रिटिश गुप्तहेर संघटनेची या गटांच्या हालचालीवर कावळ्यासारखी बारीक नजर होती. म्हणूनच कॉ. डांगे, कॉ.शौकत उस्मानी, कॉ.सिंगारवेलू, कॉ. मुझफर अहमद, कॉ.गुलाम हुसेन, नलिनी गुप्ता इत्यादीवर कानपुर कटाचा खटला भरण्यात आला. फेब्रुवारी १९२४ मध्ये खटल्यानिमित्त नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. कॉ.डांगे यांची कम्युनिस्ट पक्ष स्थापन करावा अशी उघड सूचना होती. कानपूरमधील पत्रकार सत्यभक्त यांनी परिषद घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर २६,२७,२८,डिसेंबर १९२५ कानपुर येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची रीतसर स्थापना झाली.
- ही सगळी चळवळ सामान्यांसाठी होती. या देशात समतेचे, सामान्यांचे कष्टकरी, शेतकरी यांचे राज्य असले पाहिजे, स्वातंत्र्य असले पाहिजे यासाठी ब्रिटीशांच्या धोरणांना विचारांनी विरोध आणि लढा देण्याचे काम लाल बावट्याने केले होते. पण ब्रिटीशांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कॉंग्रेसमुळे डावे बाजूला सारले गेले. कॉंग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष ब्रिटीशांना राहिल्यामुळे दोघांच्या धोरणात फरक राहिला नाही. नेमकी तीच अवस्था आज आहे. प्रभावी विरोधी पक्ष नाही. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सामान्यांसाठी पुढारपण करणारे कोणी नाही. अशावेळी आपल्या इतिहासावर नजर मारून लाल बावट्याने क्रांतीची मशाल हाती घेतली पाहिजे.
-
डावा विचार किंवा लाल बावटा हा नेहमीच व्यवस्थेविरोधात लढत आलेला आहे. व्यवस्थांमध्ये अस्थाव्यस्थपणा आला की लाल बावट्याचा अंकूश या मातणार्या सत्ताधारी हत्तीवर ठेवण्याचे काम केले गेले आहे. हे काम करणारे अनेक दिग्गज आणि ऋषितृल्य लोक डाव्या विचारांच्या आणि कम्युनिस्ट पक्षांमध्ये होते. आज या देशात इतके प्रचंड प्रश्न, समस्या आहेत की त्यावेळी हा लाल बावटा कुठे गेला असा प्रश्न पडू लागला आहे. भांडवलदार पक्षांनी लाल बावटा पूर्णपणे झाकून टाकला काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच या कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्ते आणि त्यांच्या इतिहासावर थोडा उहापोह करण्याची गरज आहे. या इतिहासावरून नजर मारली तरी या वाढती महागाई, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोर्या याविरोधात लढण्याचे बळ मिळेल.
- १९२० मध्ये तुर्कस्तानचा सुलतान जो भारतीय मुस्लिमांचा खलिफा होता. त्याला इंग्रजांनी पदच्युत केल्यावर मुजाहिदांचा फार मोठा गट काबुलला रवाना झाला. तेथून तो सोवियत यूनियन मध्ये गेला. अशा गटाची पहिली बैठक ताश्कंद येथे १९२१ मध्ये झाली. या बैठकीला एम.एन.रॉय उपस्थित होते. भारतात त्यावेळी कम्युनिस्ट विचारांचे छोटे छोटे गट कार्यरत होते.
- एप्रिल १९२१ मध्ये गांधी विरुद्ध लेनिन हे छोटेखानी पुस्तक कॉ. डांगे यांनी लिहून मुंबई, कोलकाता, मद्रास लाहौर, कानपुर येथे प्रसिद्ध केले. वैचारिक मंथनाच्या युगात या पुस्तकाने फार मोलाची कामगिरी केली. आज डाव्या पक्षांनी अशा वैचारीक मंथनासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण चित्र अत्यंत वाईट आहे. लाल बावटा आणि डावे पक्ष हे हातपाय गाळून बसले आहेत असे दिसते. किंवा बर्याच ठिकाणी छोटे गटतटात गुरफटलेले लाल बावट्यांचे पक्ष हे भांडवलदार पक्षांच्या दावणीला बांधलेले दिसतात. ऑगस्ट १९२२ मध्ये कॉम्रेड डांगे यांनी सोशलिस्ट हे साप्ताहिक सुरू केले. कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करणारे हे भारतातील पहिले साप्ताहिक होते. त्यामुळे तत्कालीन मुंबई प्रांतात कॉ. डांगे यांच्याभोवती एक गट तरुण कम्युनिस्टांचा तयार झाला. कॉ. डांगे, कॉ. पर्वते, कॉ. जोगळेकर, कॉ. घाटे, कॉ. मिरजकर हे ते तरूण होते. आज परिस्थिती फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशभरात कामगारांचे प्रश्न वाढले आहेत. शेतकर्यांचे प्रश्न वाढले आहेत. महागाईचा पोटापाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावतो आहे. कंत्राटी कामगार पद्धतीने असुरक्षित कामगारांची संख्या वाढली आहे. बेरोजगारांची संख्या वाढली आहे. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार, अनागोंदी माजली आहे. अशावेळी लाल रक्त सळसळले पाहिजे. धोक्याचा कंदील दाखवणारा लाल बावटा उफाळून येण्याची गरज आहे. त्यासाठी डावे, कम्युनिस्ट नेत्यांच्या कामगिरीचा अभ्यास केला गेला पाहिजे. आज सगळी वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे ही भांडवलदारांची बटीक झाली आहेत. ब्रिटीशकाळात जो प्रकार होता तसाच स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षानंतर असेल तर हातात लाल बावट्याची मशाल करून नव्या क्रांतीची घोषणा देण्याची गरज आहे.
- ब्रिटीश काळात कॉ डांगे आणि नव्या तरूणांनी जो एकत्र येवून संघर्षाची ठिणगी टाकली त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. लाहौर, मद्रास, कोलकाता, कानपुर, येथे ब्रिटीशांच्या काळात एकजूट झाली त्याची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे. तेव्हा व्यापक कायदेशीर पक्ष स्थापन करावा, कम्युनिस्ट पक्षाची गुप्त संघटना तयार करावी ह्याबद्दल एकवाक्यता होती. आज या एकवाक्यतेचा लाल बावट्याचे निषाण हातात घेतलेल्या पक्षांमध्ये अभाव आहे. त्यामुळेच २४ वर्षांची प. बंगालमधील डाव्यांची सत्ता गमवावी लागली.
- १९२३ साली कॉ. सिंगारवेलू यांनी पहिला मे दिन साजरा केला. लेबर किसान पार्टीची घोषणा केली. कॉ. डांगे यांना निमंत्रण होते पण ते हजर राहू शकले नाहीत. परंतु नंतर सोशलिस्टमध्ये आपल्या सर्व चळवळींचा उल्लेख या पक्षाच्या नावाने करायला सुरुवात केली. पक्ष स्थापन झाल्यावरही विखुरलेल्या कम्युनिस्टांना एकत्र करून देशभर कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याचे काम होते. देशाबाहेर अशी परिषद व्हावी अशी रॉय यांची सूचना होती तथापि कॉ. डांगे व सिंगारवेलू याबाबत सहमत नव्हते. ब्रिटिश गुप्तहेर संघटनेची या गटांच्या हालचालीवर कावळ्यासारखी बारीक नजर होती. म्हणूनच कॉ. डांगे, कॉ.शौकत उस्मानी, कॉ.सिंगारवेलू, कॉ. मुझफर अहमद, कॉ.गुलाम हुसेन, नलिनी गुप्ता इत्यादीवर कानपुर कटाचा खटला भरण्यात आला. फेब्रुवारी १९२४ मध्ये खटल्यानिमित्त नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. कॉ.डांगे यांची कम्युनिस्ट पक्ष स्थापन करावा अशी उघड सूचना होती. कानपूरमधील पत्रकार सत्यभक्त यांनी परिषद घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर २६,२७,२८,डिसेंबर १९२५ कानपुर येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची रीतसर स्थापना झाली.
- ही सगळी चळवळ सामान्यांसाठी होती. या देशात समतेचे, सामान्यांचे कष्टकरी, शेतकरी यांचे राज्य असले पाहिजे, स्वातंत्र्य असले पाहिजे यासाठी ब्रिटीशांच्या धोरणांना विचारांनी विरोध आणि लढा देण्याचे काम लाल बावट्याने केले होते. पण ब्रिटीशांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कॉंग्रेसमुळे डावे बाजूला सारले गेले. कॉंग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष ब्रिटीशांना राहिल्यामुळे दोघांच्या धोरणात फरक राहिला नाही. नेमकी तीच अवस्था आज आहे. प्रभावी विरोधी पक्ष नाही. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सामान्यांसाठी पुढारपण करणारे कोणी नाही. अशावेळी आपल्या इतिहासावर नजर मारून लाल बावट्याने क्रांतीची मशाल हाती घेतली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा