संताप आणणाºया आणि मन सुन्न करणाºया अशा या दोन घटना. पैकी एक आहे बिहारची. तर दुसरी आहे महाराष्टÑाची. बिहार हा मागासच आहे, अविकसीत आहे आणि निष्क्रिय लोकांचे राज्य आहे. पण पुरोगामी म्हणवून घेणाºया महाराष्टÑातील ही दुसरी घटना आहे, त्यामुळे आमचे पुरोगामीपणाचे ढोंग आहे का असा प्रश्न मनाला विचारावा लागेल. या दोन्ही घटनांचे मूळ आहे जातीभेद हा. बिहारमधील लालगंज येथील जी ए माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जातीनुसार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हणजे सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे सोपे व्हावे, यासाठी अशी आसनव्यवस्था केल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. परंतु हा भेदभाव एका विद्यार्थीनीनेच दाखवून दिला आहे, त्याबद्दल त्या मुलीचेही कौतुक करावे लागेल. भावी पिढीला जातीभेद नको आहेत, पण शिक्षणाच्या व्यवस्थेतूनच ती जातीभेदाची प्रवृत्ती, विचार रूजवला जात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शाळेतील एका विद्यार्थिनीने या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरु झाली आहे. सरकारी शाळेत दहावी इयत्तेत शिकणाºया अंजली कुमार या विद्यार्थिनीने गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. शाळेत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जातीनुसार करण्यात आली असून आमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. एकीकडे सरकारी पातळीवर शिक्षण संस्था किंवा सरकारी शाळांमधून असा भेदभाव केला जात असताना आणि तोही मोठ्या व्यक्तिंकडून होत असताना विद्यार्थीवर्गाला तो मान्य नाही ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. परंतु हे जे चालले आहे ते निश्चितच लांछनास्पद आहे. पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटला जात असताना शालेय पातळीवर केली जाणारी ही भेदभावाची वृत्ती अत्यंत घातक आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून शाळेत हा प्रकार सुरु आहे. परंतु चार वर्षात एका मुलीला याची जाणिव झाली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. बिहारमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजना सुरु आहेत. यात ९ वीत शिकणाºया विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी ३ हजार रुपये, नववी ते बारावीत शिकणाºया मुलींच्या गणवेशासाठी एक हजार रुपये, सॅनिटरी नॅपकिनसाठी १५० रुपये आणि नववी ते बारावीत शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी वषार्ला १८०० रुपयांची शिष्यवृत्ती अशा विविध योजना सुरु आहेत. ७५ टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थीनीच या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजना राबवण्यासाठी जागा जातीनिहाय ठरवून देण्याचा होत असलेला प्रकार हा अत्यंत घातक आहे. दुसरी घटना आहे महाराष्टÑातल्या मराठवाड्यातील बीड जिल्'ातील. आंतरजातीय प्रेमविवाहामुळे एका तरूणावर अत्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा