लाचारी माणसाला काय करायला लावते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे नाव घ्यावे लागते. एरव्ही दखलपात्रही नसलेली ही कर्तृत्वशून्य व्यक्ती, अचानक आक्रमक झाल्याचा आव आणला आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंवरच टीका करू लागली. हे म्हणजे अतिच झाले. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांच्या मागे मागे फिरणारे आणि गोंडा घोळणारे रामदास कदम हे राणेसाहेबांनी शिवसेना सोडल्यावर हतबल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची लाचारी करून आपल्या पदरात विरोधी पक्षनेतेपद पाडून घेतले. पण, त्या पदाची जी शान होती, शोभा होती, ती रामदास कदमांनी पार धुळीला मिळवून टाकली. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, ‘गाढवाला गुळाची चव काय?’ त्याप्रमाणे रामदास कदमांचे झाले. विरोधी पक्षनेता पद काय असते, हेच त्यांनान समजल्यामुळे त्या पदाची पार वाट लावून टाकलीच, पण स्वत:ची लायकी दाखवून दिली. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. मुख्यमंत्र्यांबरोबरीचे स्थान विरोधीपक्ष नेत्याचे असते. हे रामदास कदमांना कधी कळलेच नाही. कारण, अभ्यास करण्याची, शिकायची त्यांना कधी जरुरी वाटली नाही. पाय चाटून आणि लाचारी करून, लोकांचे जोडे उचलण्यात धन्यता मानून लाभाचे पद मिळवायचे एवढेच ज्यांना जमते, अशा स्वाभिमान शून्य माणसाला पदाचे महत्त्व काय कळणार? नेमके झाले तसेच. विरोधी पक्षनेत्याची ताकद म्हणजे, सत्ताधारी पक्षाला घाम फोडण्याची धमक असावी लागते. नारायण राणे हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना घाम फुटायचा. सभागृहात समोर राणे दिसले की, त्यांच्या छातीत धडधड व्हायची. आज हा तोफखाना काय आगीचे गोळे सोडणार, या विचारातच विलासराव सभागृहात येत. हा विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा राणेसाहेबांनी निर्माण केला होता. त्याआधीही जे जे विरोधी पक्षनेते होऊन गेले, त्यांनी त्या सभागृहाचे पद सन्मानाने भूषवले होते. यात शरद पवार, नारायण राणे, गोपिनाथ मुंडे, नितीन गडकरी, छगन भुजबळ अशा नेत्यांनी सभागृहे दणाणून सोडलेली होती. त्यांच्या भाषणांचा, चर्चेचा योग्य परिणाम होऊन जनतेची कामे होत होती. पण, हे कधी रामदास कदमांना समजलेच नाही. त्यांनी आपल्या चार वर्षाच्या काळात या पदाची शान घालवली. विरोधी पक्षनेता म्हणून बोलताना अभ्यास करावा लागतो, त्यासाठी सरकारच्या चुका दाखवण्यासाठी सगळे संदर्भ उभे करावे लागतात, यासाठी डोके लागते. पण, यांचे डोके फक्त फेटा बांधण्यापुरते आणि लाचारीने खाली गेलेल्या मानेला ओझे असल्यासारखे आहे. त्यांना कधी अभ्यास करायचा असतो, हे समजलेच नाही. उद्धव ठाकरेंची लाचारी करायची, आदित्य ठाकरेंसारख्या पोरसवदा बाळाचे पाय चाटायचे, या पलीकडे रामदास कदमांनी काही केलेच नाही. त्यामुळे फक्त आपल्याला शिव्या देण्यासाठी नेमले आहे, असाच समज रामदास कदमांचा झाला. उठसूट शिव्या देणे म्हणजे पक्षाचे काम, अशी अवस्था रामदास कदमांची झाली. त्या शिवसेनेची रामदास कदमांनी शिव्या देणारी सेना अशी अवस्था करून टाकली. विकासकामे नाहीत, अभ्यासपूर्ण वक्तव्ये नाहीत, आपण कोणत्या खात्याचे मंत्री आहोत याचे भान नाही, फक्त खासदारनारायण राणे यांच्यावर बेछूट टीका करणे, हाच एककलमी कार्यक्रम हाती घेऊन हे रामदास उद्धव ठाकरेंचे दास म्हणून राहू लागले. पण, नारायण राणेसाहेबांवर टीका करण्यासाठी यांच्या अंगात काही कर्तृत्व आहे का, हे आधी रामदास कदमांनी पाहायला पाहिजे. शिडी लावून उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला कशासाठी जातात. रामदास कदम हे पर्यावरण मंत्री आहेत, औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने काय काम केले, हे सांगता येईल का? कोकणातील नाणार प्रकल्प लादण्यासाठी आणि तेथील हजारो कलमे, आंब्यांची झाडे उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या खात्याचा हिरवा कंदील दाखवला. नाणार प्रकल्पाला ना हरकत देऊन पर्यावरणाची हानी करण्याचा प्लॅन आखला आणि हे म्हणे पर्यावरण मंत्री. औरंगाबादचा कचरा प्रश्न इतका चिघळला की, त्यावरून दंगली घडल्या. पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री या नात्याने तो प्रश्न हाताळण्यासाठी यांनी काय केले? काहीही केले नाही. कारण, करण्यासाठी कर्तृत्व असावे लागते. यांचे कर्तृत्व फक्त शिव्या देण्याचे. सडकछाप गुंडाप्रमाणे वावरणा-या कदमांना पत्रकार परिषदेला सामोरे जाता येत नाही की, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत. फक्त नारायण राणे यांच्यावर टीका करायची या पलीकडे काहीही येत नाही. पर्यावरण मंत्री म्हणून प्लास्टिक बंदी आणून प्लास्टिक पिशवीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा नवा धंदा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. दर महिन्याला खंडणीप्रमाणे प्लास्टिकपोटी दंड गोळा करायला जायचे आणि प्लास्टिक उत्पादक कारखानदारांकडून काही मिळते काय, याची तोडपाणी करायचे धंदे फक्त रामदास कदमांनी केले. प्लास्टिक बंदी आणायची, तर संपूर्ण का नाही आणली? किराणा व्यापारी, हॉटेल चालक अशा मोठय़ा व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी वापरली, तर त्यापासून पर्यावरणाची हानी होत नाही. पण, तीच पिशवी रस्त्यावरच्या गरीब विक्रेत्याने वापरली की, पर्यावरणाची हानी होते. असले बेअक्कल कारभार फक्त रामदास कदमच करू शकतात. पर्यावरण मंत्री आहेत की, शिवसेनेसाठी खंडणी, पक्षनिधी गोळा करणारे मंत्री आहेत, असाच प्रश्न पडतो. ज्या ज्या पदावर ते गेले, तेथे तेथे रामदास कदमांनी घाण करून टाकलेली दिसून येते. आपल्याला कोणी विचारत नाही आणि काही जमत नाही, याची जाणीव झाल्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी आता रामदास कदमांनी नवा उद्योग सुरू केलेला आहे, तो म्हणजे नारायण राणेंवर टीका करायची. राणेंवर टीका केली की, आपल्याला प्रसिद्धी मिळेल यामुळे आपले नाकर्तेपण झाकून ठेवून बेछूट आरोप करण्याचे तंत्र रामदास कदमांनी हाती घेतले. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते म्हणून किती शान असायला पाहिजे होती. पण, यांनी पार स्वत:ची आणि पद, पक्ष सगळय़ाचीच वाट लावली आहे. लाचारी करून मिळालेल्या पदांचे हे असे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा