गुजरातमध्ये १४ महिन्यांच्या एका चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसा उसळली असतानाच लातूरमध्ये एका गतिमंद मुलीवर परप्रांतीय तरुणाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा या ठिकाणी गतिमंद मुलीवर परप्रांतीय तरुणाने बलात्कार केला. आरोपीचे नाव महंमद कुरेशी असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन जर स्थानिकांवर अन्याय, अत्याचार करणार असतील तर गुजरातची पुनरावृत्तीच नाही तर अनुकरण महाराष्ट्रातही होऊ शकते. संजय निरुपमसारख्या नेत्यांना मतांचे राजकारण करण्यासाठी अशा गुंड पुंडांचा पुळका येत असला तरी मुंबई आणि इतर महाराष्ट्रातही या परप्रांतियांनी दंगाफसाद, गुंडगिरी, बलात्कार, मुलींची छेडाछेडी सुरू केली तर महाराष्ट्रातूनही परप्रांतियांना गुजरातप्रमाणेच हाकलणे भाग पडेल हे लक्षात घेतले पाहिजे. मुंबई आणि मराठी माणूस सहनशील आहे, सगळ्यांना सामावून घेतो आहे याचा अर्थ कुणीही यावे आणि इथल्या माणसावर अन्याय करावा असे नाही. ज्या महाराष्ट्राने, मुंबईने आपल्याला आसरा दिला आहे, नोकरी-धंदा दिला आहे, त्या महाराष्ट्राशी गद्दारी करण्याची कोणी हिंमत करू नये हे उत्तम. आज मुंबईतील नोकरी आणि रोजगाराच्या सगळ्या संधी या उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतातील तरुणांनी हिरावून घेतल्या आहेत. जिथे दिसेल तिथे मराठी माणसाला डावलले जाते आहे. उलट या यूपी, बिहारच्या गुंडांची दादागिरी मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आज मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, भाजीपाला, छोटेमोठे टपरीपासूनचे स्टॉल यांच्यासह गृहनिर्माण संस्थांमध्ये असणारे सिक्युरिटी गार्डच नाही तर गणपती आणि नवरात्रात येणारे भटजीही मराठी नाहीत. या सगळ्यांनी मुंबईवर कब्जा मिळवून मराठी माणसाला देशोधडीला लावले आहेच. मराठी माणूस फक्त या लोकांचे ग्राहक बनून आपल्या खिशातला पैसा त्यांना देत आहे. मराठी माणूस यांना आज पोसत असताना गद्दारी करून मराठी लोकांना छळणे, इथल्या मुलीबाळींची छेडछाड करणे, अत्याचार करणे, गतिमंद मुलींवर अन्याय करणे असले प्रकार होत असतील तर गुजराप्रमाणेच महाराष्ट्रातून या लोकांना हाकलून देण्यासाठी मराठी माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी अत्याचारी, बलात्कारी, गुंडांची बाजू घेण्याचा प्रयत्न जर संजय निरुपमसारखे परप्रांतीय नेते करणार असतील तर हा महाराष्ट्र, ही मुंबई त्यांचीही उचलबांगडी केल्याशिवाय राहणार नाही. संजय निरुपम यांनी उद्दामपणे या परप्रांतीय, उत्तर प्रदेश, बिहारींची वकिली सुरू करून नवे राजकारण सुरू केले आहे. ते त्यांनी त्वरित थांबवले पाहिजे. हा महाराष्ट्र आहे. इथे सुसंस्कृतपणा आहे.इथली संस्कृती गुंडगिरी करून बिघडवायचा प्रयत्न कोणी करू नये आणि निरुपम यांनी त्या गुंडगिरीचे समर्थन करू नये. अशा गुंडांना महाराष्ट्रात, मुंबईत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी याच निरुपम यांनी केली होती. याला म्हणतात अन्नछत्रात जेवायचे आणि मिरपूड मागायची. एकतर इथल्या जास्तीत जास्त संधी हिरावून घेतल्या जात आहेत, वर आरक्षण मागत आहेत. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात जेवढी म्हणून सलून, जेंट्स पार्लर आहेत ती सगळी या यूपी, बिहारच्या कारागिरांनी काबीज केलेली आहेत. मराठी माणसांची, मराठी नाभिकांची दुकानेच दिसत नाहीत. मराठी कारागीर कुठेतरी रस्त्याच्या कडेला, बिल्डिंगच्या कोप-यात, फुटपाथवर धंदा करतात, तर हे लोक आलिशान वातानुकूलित दुकाने काढून ग्राहकांना लुटतात. वर तुमच्या मराठी लोकांना धंदा करता येत नाही म्हणून नावे ठेवतात. हे चित्र बदलले पाहिजे. या बिहारी लोकांच्या, यूपीच्या तरुणांच्या तोडीस तोड पार्लर उभी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याला आमच्या मराठी नेत्यांनीच पक्षभेद विसरून प्रोत्साहन दिले पाहिजे. आज हे बिहार आणि यूपीचे कारागीर अशा दुकानांतून अनेक अवैध धंदे करून समाजस्वास्थ्य बिघडवत असतात. इथली संस्कृती बिघडवून, इथल्या लोकांना लुटून वर इथल्या मुलींकडे वाईट नजरेने पाहण्याचे प्रकार सतत घडत असताना गप्प बसणे, सहन करणे मराठी माणसाला आता शक्य होणार नाही.गुजरातमध्ये १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केल्याची घटना या परप्रांतियांकडून घडल्यावर तिथल्या लोकांनी एकजुटीने येऊन पिसाळलेली कुत्री पिटाळावीत, ढेकणे मारावीत तशा पद्धतीने या परप्रांतियांना ठोकून बाहेर काढायला सुरुवात केली. महाराष्ट्रात असे धारिष्टय़ दाखवायची वेळ आलेली आहे. आज पश्चिम उपनगरातच नव्हे तर नवी मुंबई, ठाणे सगळीकडे रिक्षाचालक हे मोठय़ा संख्येने परप्रांतीय आहेत. त्यांची दहशत आणि गुंडगिरी इतकी वाढलेली आहे की मीटरप्रमाणे रिक्षा चालवत नाहीतच पण शेअर रिक्षाच्या नावाखाली प्रत्येक बसस्टॉप काबीज करून बस प्रवाशांवर दहशत निर्माण करण्याचे काम हे रिक्षावाले करतात. पोलीसही या रिक्षाचालकांना घाबरतात. कानात हेडफोन लावायचे आणि तोंडात गुटखा कोंबून सुसाट रिक्षा चालवायची. रिक्षात महिला, तरुणी बसल्या असतील तरीही त्याचे त्यांना भान नसते. गाडी स्लो करायची आणि प्रत्येक सिग्नलवर थुंकायचे. सगळी मुंबई घाण करण्याचे काम या परप्रांतियांनी चालवले आहे.
या प्रकाराला आळा बसलाच पाहिजे. अशा गुंडांची पाठराखण जर काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासारखे लोक करत असतील तर ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेने या संजय निरुपमसारख्या लोकांना आणून डोक्यावर घेतले आणि आपल्या लोकांना त्रास देण्याचे तंत्र सुरू केले. इसापनीतीतील कथेतल्या बेडकाने आपल्या बेडूक बांधवांना धडा शिकवण्यासाठी सापाला विहिरीत आणावे आणि त्या सापाने एकेकाला गिळंकृत करावे, त्याप्रमाणे शिवसेनेने असे अनेक संजय निरुपम आणून इथल्या मराठी माणसाला देशोधडीला लावले. गिरण्या उद्ध्वस्त केल्या, तिथे मॉल आले, त्या मॉलमध्ये मराठी नाहीतर अन्य प्रांतातल्या लोकांना नोक-या दिल्या. आता तेच लोक मराठी माणसांच्या सहनशक्तीचा फायदा घेत इथे गुंडगिरी करू लागले तर गुजराती माणसांचे इथेही अनुकरण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निरुप यांनी आपली जागा लक्षात घेऊन महाराष्ट्राशी गद्दारी करण्याचे काम करू नये.