25/04/2016
- हैद्राबादच्या रोहित वेमुलाने आत्महत्या का केली? तर याचे उत्तर अनेकांना माहित नसेल. रोहितने याकूब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने एकूणच फाशीच्या शिक्षेविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्याच्या मित्रासह त्याला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. त्याची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. या जीवघेण्या स्थितीला कंटाळून रोहितने आत्महत्या केली. पण आमचा कन्हैयाकुमार त्यापेक्षा हुशार निघाला. त्याने अफझल गुरूची तरफदारी केली, देशविरोधी घोषणा दिल्या आणि संपूर्ण देश पेटवून देण्याचा इरादा केला. त्यामुळे इथून पुढे या देशात देशद्राही वागणे हेच आपल्या हिताचे आहे का? असा प्रश्न पडतो. कदाचित रोहीतला त्याची चूक पटली असावी म्हणून त्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला असेल. त्याची सतसद विवेक बुद्धी कुठे तरी जागृत असेल म्हणून पश्चातापाने त्याने हे कृत्य केले असेल. पण कन्हैयाला पश्चाताप सोडा आपल्या देशद्रोही कृत्याचा अभिमान वाटतो. आज त्याची पाठराखण करण्यासाठी डाव्या विचारसरणीचे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार पुण्यातही गेले. पुण्यातल्या हरामखोर लोकांनी त्याचे व्याख्यान ठेवले. संजिव अभ्यंकरसारख्या श्रेष्ठ गायकाचा कार्यक्रम रद्द करून बालगंधर्व उपलब्ध करून दिले. या ठिकाणी संजिव अभ्यंकर यांचे व्यतिरीक्त अन्य कोणाचा कार्यक्रम असता तर तो रद्द केला गेला असता का? पण देशद्रोह्याला पाठीशी घालण्यासाठी पुणेकर आतुर झाले हे मात्र दिसून आले.
- भारत विरोधी घोषणा देणार्या कन्हैय्याला ऐकण्यासाठी जे जे गेले त्यांना या देशाबद्दल प्रेम नाही हेच यातून दिसून आले. अफझल गुरूला फाशी दिली याचे या लोकांना दु:ख झाले हेच यातून स्पष्ट झाले आहे. अफझल गुरूचा संसदेवर हल्ला झाला तेव्हा लोकशाहीच्या पवित्र मंदीरावरील हल्ला अशी वक्तव्ये याच लोकांनी केली होती. तेच लोक आता अफझल गुरूसाठी अश्रू ढाळत आहेत. पुरोगामीपणाच्या खोट्या बुरख्या आडून देशाचे विभाजन करायला निघाले आहेत. त्यामुळे आयोजकांमुळे या देशाच्या पोटातील उपद्रवी जंतांचे दर्शन काल घडले.
- सध्या देशात आणि महाराष्ट्रात धूमाकूळ चालला आहे. तृप्ती देसाई यांच्या ब्रिगेडने शनिशिंगणापूर, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तसेच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केले आणि त्यामुळे काही दंगा झाला नाही म्हणून आता मशिदीत जाउन हैदोस घालण्याचा प्रकार ही बया करते आहे. याला कसला पुरोगामीपणा म्हणायचा? आज कायदा जरी तृप्ती देसाईंच्या बाजूला असला तरी सुजाण समाज त्यांच्याबरोबर नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे तृप्ती देसाईंना भलेही मंदिर प्रवेश मिळालेला असला तरी त्यांच्यातील हेकेखोरपणा हा काही हक्कासाठी, भक्तीसाठी आणि चांगल्यासाठी नव्हता हे सांगायला कसल्याही पुराव्याची गरज नाही. हिला मंदीरात गेल्यावर आता दर्गादर्शनाला जाण्याची काय बुद्धी झाली? याचे कारण एकच की या डाव्या आणि भंकस पुरोगाम्यांकडे आता कोणताही कार्यक्रम नाही. पूर्वी नक्षलवादासारखी कामे याच डाव्यांनी केली. आता नवा नक्षलवाद त्यांनी दहशतवादाच्या मार्गाने सुरू करून चांगल्या देशात अनाचार माजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. रोहीत वेमुलाला वेळीच आपली चूक कळली असावी. त्यामुळेच या चुकीमुळे तोंड दाखवणेही कठीण वाटल्याने त्याने आत्महत्या केली असावी. पण त्याचाही या हलकट लोकांनी बाजार मांडला. त्यासाठी त्याल देशद्रोही कन्हैय्याकुमारला देशभर फिरवण्याचा प्रकार चालवला आहे. सध्याची व्यवस्था, मोदी सरकार या नालायक लोकांना खुपते आहे. जर समजा मोदींनी सत्तेचा त्याग केला, भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला तर कन्हैय्याकुमारचे नेतृत्व स्विकारण्याचा मोठेपणा हे डावे कारणार का? देशद्रोह्यांच्या हातात नेतृत्व देण्याचे काम डावे पुरोगामी आणि भेकट कॉंग्रेसवाले करणार का? यामध्ये कॉंग्रेसचेही नालायक लोक आहेत. त्यांना जर कन्हैयाकुमारची बाजू पटते आहे तर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अफझल गुरूला फाशी का दिली गेली? राहुल गांधींनी याचे उत्तर दिले पाहिजे. सोनिया गांधींना याबाबत खुलासा करायला पाहिजे. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि जर हे चूक आहे असे वाटते तर तत्कालीन कृत्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांवरच मनुष्यवधाचा खटला या सरकारने का भरू नये याचा खुलासा केला पाहिजे. सवंग लोकपियतेसाठी आणि प्रसिद्धीसाठी असे नागडे होण्याचे काम हे जे लोक करत आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आणखी घृणा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तृप्ती देसाई काय किंवा कन्हैय्याकुमार काय या देशात अन्य कोणतेही प्रश्न नाहीत म्हणून हा तमाशा करत आहेत. त्यांच्यामागे शिटी वाजवत डावे, पुरोगामी, समाजवादी आणि कॉंग्रेसवाले धींड निघाल्यासारखे जात आहेत. पण यातून जर कन्हैयाचा फायदा झाला तर त्यालाही खड्याप्रमाणे बाजूला करायला हेच लोक मागे पाहणार नाहीत. कारण यांची नितीच दुष्टांची आहे. वाईट याच गोष्टीचे वाटते की ज्या पुण्यातून पेश्व्यांनी अटकेपार झेंडा फडकवला, ज्या लोकमान्यांनी स्वराज्याची हाक दिली, ज्या पुण्यातून महात्मा फुले यांनी समतेची ज्योत पेटवली त्याच पुण्यात आज देशद्रोहाची मशाल फिरवली जात आहे.
शनिवार, ३० एप्रिल, २०१६
देशद्रोहाची मशाल आली पुण्यात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा